Wednesday, 23 July 2025

 ✍️ *आई रमाई ....!*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        मो. न. ९३७०९८४१३८


आई रमाई 

प्रेम वात्सल्य पालतांना

मैत्रीचा प्रेमळ झरा 

ओठावर निरंतर ठेवुन

प्रज्ञा सुर्याची सोबत

फार अल्पशी असतांनाही

कमळ कोमलतेने

नेहमी जपणुक करीत होतीस....

भीम बाबांच्या

विदेशातील शिक्षणात

हातभार लावतांना

गोव-या वेचने असो

कमीपणा न बाळगता

पैशाची तजवीज करणे 

हे सर्व काही करतांना

अर्ध उपाशी राहातं होतीस....

भीम बाबांचे

विदेशात शिक्षण घेतांना

रमेश बाळ दगावले तरी

अभ्यासात व्यत्यय नको

ही बातमी लपवितांना

तुझ्या कोमल हृदयाला

कश्या वेदना झाल्या असतीलं

ही कल्पनांच असह्य होते माते...

राजरत्न बाळ मृत्युमुळे 

परिवार व्याकुळ मनाने

ग्रस्त असतांनाही

भीम बाबांच्या खिश्यात

कफनाला पैसे नाहीत

हे तु जाणुन घेतांना

लुगड्याचा पदर फाडुन 

कफनाची व्यवस्था केलीस माते....

भीम बाबांचे 

विदेशी शिक्षण पदवीमुळे 

सत्काराच्या आयोजनात

नविन लुगडे नसल्याने

बाबांना काही बहाना करुन

सोबतीला तु न जाता 

शाहु महाराजाची शाल पांघरून

दुरुनचं सत्कार बघत होतीसं माते...

प्रज्ञा सुर्याचा प्रकाश

हा निरंतर समाजाच्या

आणि भारत देशाच्या 

स्वातंत्र्य लढ्यावर

लक्ष केंद्रित करतांना

सामाजिक - आर्थिक समता

राजकिय समता शोधतांना

सोबत हात देत होतीस तु माते....

आई रमाई 

हे तु सर्व काही करतांना 

आपल्या प्रकृतीला न जपता

फक्त भीम बाबाकडे लक्ष देतांना

पंढरपूर जाण्याची तुझी इच्छा

बाबांनी मनाई केल्यावर 

तु कुठलाचं हट्ट न करता 

आई रमाई तु झिजत होतीसं ....

राजगृहाचे सुख

तुझ्या आजारी मनाने

कधीचं उपभोग न घेता

भीम बाबांना तुझ्या वेदना

तु कधीचं न सांगता 

एकटीनेचं मृत्यू संघर्ष करीत

बाबांना पारखे करतांना

तु सर्वांना सोडून गेलीस माते ....


---------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपूर दिनांक २२ जुलै २०२५

Monday, 21 July 2025

 💐 *एड. डॉ. मोहन गवई / एड. डॉ. एस. एम. राजन (डायरेक्टर, लॉ कॉलेज) इनकी सी. आर. पी. सी. एडव्होकेट विंग के राष्ट्रिय उपाध्यक्ष पद पर नियुक्ती !*


      *सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल* की डाटर कंसर्न राष्ट्रिय संघटन *"सी.आर.पी.सी. एडव्होकेट विंग"* के *"राष्ट्रिय उपाध्यक्ष "* पद पर *एड. डॉ. मोहन गवई / एड. डॉ. एस. एम. राजन* (डायरेक्टर लॉ कॉलेज) इनकी नियुक्ति सी.आर.पी.सी. एडव्होकेट विंग के राष्ट्रिय अध्यक्ष *एड. किशोर राम लांबट* इन्होने की है. *एड गवई / एड राजन* ये नामांकित मान्यवर है. डॉ राजन ये सेंट्रल लॉ कॉलेज के डायरेक्टर है. साथ ही भारत के विभिन्न लॉ कॉलेज से ले जुडे है. वे सीआरपीसी के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ. मिलिन्द जीवने* इनके अच्छे मित्र भी है. एड गवई एड. राजन इनकी नियुक्ती की जाणकारी सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के *राष्ट्रिय अध्यक्ष* तथा सीआरपीसी वुमन विंग / सीआरपीसी एडव्होकेट विंग / सीआरपीसी एम्पाइज विंग / सीआरपीसी हेल्थ विंग / सीआरपीसी बुध्द आंबेडकरी साहित्यिक (लिटररी) विंग / सीआरपीसी ट्रेड्स एंड कॉमर्स विंग / सीआरपीसी ट्रायबल विंग / सीआरपीसी वुमन क्लब के "राष्ट्रिय पेट्रान" - *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्हे दी गयी है. एड राजन / एड गवई ये न्यायालय में प्रॅक्टीस भी करते है तथा कानुनी सलाह भी देते है. इनके इस नियुक्ती पर *एड. बृहद्रथ मोरया / एड. राजेश लाख / एड. भागवानी / सुर्यभान शेंडे / प्रा. नितीन तागडे / इंजी. गौतम हेंदरे / डॉ. मनिषा घोष / दिलिप तांदळे / राजेंद्र घोरपडे / शालिक जिल्हेकर / रवी पाटील / एड. प्रज्ञा निकोसे / करुणा रामटेके / डॉ . भारती लांजेवार / सुरेखा खंडारे / सीमा बोरकर / डॉ राजेश नंदेश्वर* आदी सभी पदाधिकारी वर्ग ने उनका अभिनंदन किया है.

Wednesday, 16 July 2025

 💐 *एड. ब्रहदथ मोरया (गौतमादित्य) एवं एड. राजेश लाख इनकी सीआरपीसी एडव्होकेट विंग के राष्ट्रिय सचिव पद पर नियुक्ती !*


      *सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल* की डाटर कंसर्न राष्ट्रिय संघटन *"सी.आर.पी.सी. एडव्होकेट विंग"* के *"राष्ट्रिय सचिव "* पद पर *एड. ब्रहदथ मोरया (गौतमादित्य) एवं एड. राजेश एस. लाख* इनकी नियुक्ति सीआरपीसी एडव्होकेट विंग के राष्ट्रिय अध्यक्ष / सर्वोच्च न्यायालय के वकिल *एड. किशोर राम लांबट* इन्होने सीआरपीसी के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ. मिलिन्द जीवने* इनकी शिफारस पर की है. एड ब्रहदथ मोरया  एड राजेश लाख की नियुक्ती की जाणकारी सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के *राष्ट्रिय अध्यक्ष* तथा सीआरपीसी वुमन विंग / सीआरपीसी एडव्होकेट विंग / सीआरपीसी एम्पाइज विंग / सीआरपीसी हेल्थ विंग / सीआरपीसी बुध्द आंबेडकरी साहित्यिक (लिटररी) विंग / सीआरपीसी ट्रेड्स एंड कॉमर्स विंग / सीआरपीसी ट्रायबल विंग / सीआरपीसी वुमन क्लब के "राष्ट्रिय पेट्रान" - *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्हे दी गयी है. एड ब्रहदथ मोरया तथा एड लाख ये सर्वोच्च न्यायालय / उच्च न्यायालय में प्रॅक्टीस करते है. एड बृहद्रथ ये क्रिमिनल वकिली प्रॅक्टीस करते है.

 🤝 *सर्वोच्च न्यायालय के AOR एड किशोर राम लांबट सीआरपीसी एडव्होकेट विंग के राष्ट्रिय अध्यक्ष नियुक्त.*


      सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (CRPC) की डॉटर विंग *"सीआरपीसी एडव्होकेट विंग"* इस राष्ट्रिय संघटन के *"राष्ट्रिय अध्यक्ष"* पद पर, सर्वोच्च न्यायालय के AOR *एड. किशोर राम लांबट* इनकी नियुक्ती, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इनकी शिफारस पर, सेल के राष्ट्रिय सचिव *सुर्यभान शेंडे* इन्होने जाहिर की है. एड राम लांबट इनका सर्वोच्च न्यायालय के एडव्होकेट चेंबर में चेंबर है. एड राम लांबट इनके नियुक्ती पर,  सर्वोच्च / उच्च न्यायालय के *एड. राजेशकुमार लाख / एड. एम एस. पराते / एड. सी. एफ. भागवानी / एड. मोहन गवई / एड. गौतमादित्य / एड. वैभव बोरकर / एड. सागर लांबट* आदी वकिल वर्ग ने अभिनंदन किया है.

 💐 *एड. सी. एफ. भागवानी इनकी सी. आर. पी. सी. एडव्होकेट विंग के राष्ट्रिय उपाध्यक्ष पद पर नियुक्ती !*


      *सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल* की डाटर कंसर्न राष्ट्रिय संघटन *"सी.आर.पी.सी. एडव्होकेट विंग"* के *"राष्ट्रिय उपाध्यक्ष "* पद पर *एड. सी. एफ. भागवानी* इनकी नियुक्ति सी.आर.पी.सी. एडव्होकेट विंग के राष्ट्रिय अध्यक्ष *एड. किशोर राम लांबट* इन्होने सीआरपीसी के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ. मिलिन्द जीवने* इनकी शिफारस पर की है. एड भागवानी की नियुक्ती की जाणकारी सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के *राष्ट्रिय अध्यक्ष* तथा सीआरपीसी वुमन विंग / सीआरपीसी एडव्होकेट विंग / सीआरपीसी एम्पाइज विंग / सीआरपीसी हेल्थ विंग / सीआरपीसी बुध्द आंबेडकरी साहित्यिक (लिटररी) विंग / सीआरपीसी ट्रेड्स एंड कॉमर्स विंग / सीआरपीसी ट्रायबल विंग / सीआरपीसी वुमन क्लब के "राष्ट्रिय पेट्रान" - *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्हे दी गयी है. एड भागवानी ये सर्वोच्च न्यायालय / उच्च न्यायालय में प्रॅक्टीस करते है. भागवानी के इस नियुक्ती पर एड. बृहद्रथ मोरया / एड. राजेश लाख / सुर्यभान शेंडे आदी सभी पदाधिकारी वर्ग ने उनका अभिनंदन किया है.

 💐 *एड. अनिल वैद्य (माजी न्यायाधीश) इनकी सी. आर. पी. सी. एडव्होकेट विंग के राष्ट्रिय उपाध्यक्ष पद पर नियुक्ती !*


      *सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल* की डाटर कंसर्न राष्ट्रिय संघटन *"सी.आर.पी.सी. एडव्होकेट विंग"* के *"राष्ट्रिय उपाध्यक्ष "* पद पर *एड. अनिल वैद्य* (माजी न्यायाधीश) इनकी नियुक्ति सी.आर.पी.सी. एडव्होकेट विंग के राष्ट्रिय अध्यक्ष *एड. किशोर राम लांबट* इन्होने की है. *एड वैद्य* ये नामांकित लेखक तथा चिंतक है. उन्होंने १८ किताबे लिखी है. उनके लेख बहुत से पत्रिका में प्रकाशित हुये है. एड वैद्य ये महाराष्ट्र शासन के कुछ समितीयां तथा अन्य कुछ सामाजिक संस्थान पर कार्यरत रहे है. वे सीआरपीसी के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ. मिलिन्द जीवने* इनके अच्छे मित्र भी है. एड वैद्य इनकी नियुक्ती की जाणकारी सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के *राष्ट्रिय अध्यक्ष* तथा सीआरपीसी वुमन विंग / सीआरपीसी एडव्होकेट विंग / सीआरपीसी एम्पाइज विंग / सीआरपीसी हेल्थ विंग / सीआरपीसी बुध्द आंबेडकरी साहित्यिक (लिटररी) विंग / सीआरपीसी ट्रेड्स एंड कॉमर्स विंग / सीआरपीसी ट्रायबल विंग / सीआरपीसी वुमन क्लब के "राष्ट्रिय पेट्रान" - *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्हे दी गयी है. एड वैद्य ये न्यायालय में प्रॅक्टीस करते है तथा कानुनी सलाह भी देते है. वैद्य इनके इस नियुक्ती पर *एड. बृहद्रथ मोरया / एड. राजेश लाख / एड. भागवानी / सुर्यभान शेंडे / प्रा. नितीन तागडे / इंजी. गौतम हेंदरे / डॉ. मनिषा घोष / दिलिप तांदळे / राजेंद्र घोरपडे / शालिक जिल्हेकर / रवी पाटील / एड. प्रज्ञा निकोसे / करुणा रामटेके / सुरेखा खंडारे / सीमा बोरकर / डॉ राजेश नंदेश्वर* आदी सभी पदाधिकारी वर्ग ने उनका अभिनंदन किया है.

Sunday, 13 July 2025

 📓 *रमाई ह्या सिध्दार्थ तलवारे संपादीत काव्यसंग्रहाने रमाईच्या त्याग - समर्पण - प्रेम - मैत्री - करुणा - दारिद्री जीवन संघर्ष - नैतिकता आणि आदर्श स्त्री व्यक्तिमत्वाचा जगाला परिचय दिला !*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य''* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान महु म.प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


               *"रमाई"* ह्या काव्यसंग्रहाचे संपादक आयु. *सिध्दार्थ तलवारे* हे ब-याच काळापासुन माझ्या संपर्कात आहेत. त्यांचे माझे व्हाट्सअप मिडियावर नियमित विचार आदान प्रदान होत असते. कधी कधी मोबाईलवर आमचे संभाषण होत असते. आयु *सिध्दार्थ तलवारे* हे माझ्या लिखाणाचे नियमित वाचक आहेत. आमच्या ह्या नेहमीच्या बोलण्यातुनचं सिध्दार्थ तलवारे ह्यांनी *"रमाई"* संपादीत काव्यसंग्रहाचा विषय काढला. आणि सदर संपादीत काव्यसंग्रहाची एक प्रत त्यांनी मला पोस्टाने पाठविली. *रमाई ह्यांच्यावर माझी कविता मिडियात आलेली आहे.* बाबासाहेब आंबेडकर वाचतांना *"रमाई आईचे जीवन - संघर्ष - त्याग - समर्पण - प्रेम - मैत्री - करुणा - स्त्री आदर्श"* सहजपणे बोध होवुन जातो. रमाई आईच्या ह्याचं वेदना पुढे *"क्षय रोगाला"* कारणीभूत झाल्या. रमाई ह्या बाबासाहेबांना सोडून गेल्यात. बाबासाहेब हे पुर्णत: खचलेले होते. माझ्या मुंबई प्रवासात मला बाबासाहेबांच्या जुन्या आणि नविन घराला भेट देण्याचा मोह हा आवरता आला नाही. घर प्रपंच सांभाळतांना पोयबाबडीला काळोखातचं जाणे / डोक्यावर सरपण आणने / गोव-या थापणे - त्या बाजारात विकायला घेवुन जाणे / बाळाच्या मृत्युची बातमी बाबासाहेब हे विदेशात शिक्षण घेत असल्याने - त्यांच्या शिक्षणामध्ये व्यत्यय होवु नये म्हणुन सदर बातमी ही लपवुन ठेवणे / बाबासाहेब विदेशातुन शिक्षण घेवून आल्यावर आपल्याकडे घालायला नविन लुगडेचं नाही म्हणुन बहाणा करुन सत्काराला सोबत न जाणे - आणि बाबासाहेब गेल्यावर *छत्रपती शाहु महाराजांनी* दिलेला फेटा लुगडे समान गुंडाळून दुरुनचं बाबासाहेबांचा कार्यक्रम बघणे / बाळाचा मृत्यु झाल्यावर *"कफनाला बाबासाहेब ह्यांच्या खिशात पैसे नाहीत"* ही स्पष्ट जाणिव असल्याने आपल्या *लुगड्याचा पदर फाडुन* बाळाचा अंत्यसंस्कार करण्याची सुचना देणे / *बाबासाहेबांना कधी त्रास होईल* अशी रमाई कधी वागलीचं नाही / घरच्या दारिद्रीचे भांडवल केलेले नाही - बाबासाहेबांची अब्रु ही जाईल असे वर्तन केले नाही / बाबासाहेब हे *अभ्यासात - लिखाणात* गर्क असतांना - जेवण थंड झालेले असतांना - रमाई हिने कामात व्यत्यय केलेला नाही - बाबासाहेबांना जपत होती - रमाईचे खरे प्रेम असे होते. *"रमाई ही प्रेम आदर्श होती. ती मैत्री आदर्श होती. ती करुणा आदर्श ही होती. अशिक्षीत रमाई प्रज्ञा आदर्श होती."* आजु बाजुच्या बायांचे कटु टोमणे सहन करणे इत्यादी इत्यादी .... रमाईच्या वाट्याला आले होते. *"रमाई आईच्या जीवनातील खरे पैलु सहजपणे बोध होतात."* रमाई आई वाचतांना अक्षरशः आपल्या *"डोळ्यातील आसवांच्या अश्रू धारा"* ह्या सहजपणे बाहेर पडत असतात. रमाई आईच्या भावनांचा बोध करणारा *"रमाई"* हा कवितासंग्रह आहे. बाबासाहेबांनी रमाईला *"पंढरपूर"* जाण्यास मज्जाव केला. तुझ्या करिता *"नविन पंढरी"* बनविलं हे ते बोलुन गेले. रमाई ही तेव्हा गप्प होती. रमाई आई हेकड वागलेली नाही. घरचा तमाशा केला नाही. त्रागा ही केला नाही. हा विषय संस्कारांचा भाग आहे. रमाई ही *"संस्कार असलेली महामाता"* होती. डॉ बाबासाहेबांनी ही रमाईला दिलेला आपला तो शब्द पाळला. *"दीक्षाभूमी"* ही नविन पंढरीचं बाबासाहेबांनी निर्माण केली. परंतु हे सर्व सुख बघायला रमाई आईसाहेब मात्र जीवंत नव्हत्या. *"राजगृह"* ह्या बंगल्याचे जीवन सुख आईसाहेब पुर्णतः घेवु शकलेल्या नाहीत. म्हणुनचं *"रमाई"* हा काव्यसंग्रह मला फार महत्वाचा वाटतो. अत: संपादक *सिध्दार्थ तलवारे* ह्यांचे अभिनंदन हे करायलाचं हवे.

           *"रमाई"* ह्या प्रतिनिधीक काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेची *"अलग अलग समिक्षा"* करणे हे शब्दमर्यादा बंधनामुळे शक्यचं होणार नाही. समिक्षा ही सार रुपातचं करावी लागणार आहे. परंतु *समस्त कवि - साहित्यिक वर्गांनी* बुध्द - आंबेडकरी साहित्याला *"नकार आणि विद्रोह"* ह्या सिमितचं बांधले गेले असल्यामुळे *"बुध्द - आंबेडकरी साहित्याची व्यापकता"* सांगणे गरजेचे आहे. बुध्द साहित्यातील *"सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / नैतिकशास्त्र / दर्शनशास्त्र / प्रेम"* इत्यादी भाव समजुन घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी बुध्दाचे बोट पकडले आहे. आणि *"बाबासाहेबांनी आपल्या लिखाणाला तो स्पर्श ही दिला आहे. "* तेव्हा आंबेडकरी साहित्याला आपल्याला ती धार द्यावी लागणार आहे. पुर्व पार लिहिले जात आलेल्या बुद्ध - आंबेडकरी साहित्यामध्ये बदलाव होणे गरजेचे आहे. *"महत्वाचे म्हणजे समस्त लिपी - भाषा साहित्य ह्याचा उगम बुध्द विचारातुन झालेला आहे."* सिंधु घाटी सभ्यता ही पहिल्या बुध्दाचा बोध करुन देते. *"सिंधी घाटी लिपी"* ही तर वाचली - समजली - उमगली गेलेली नाही. परंतु *"धम्म लिपी"* (ब्राम्ही)/ *"पाली भाषा"* ही वाचली /समजली / उमगली गेलेली आहे. ह्या विषयावरील चर्चेचे *"माझे लिखाण"* मिडियामध्ये उपलब्ध असल्याने हा विषय बाजुला सारु या ! *"रमाई"* ह्या काव्यसंग्रहातील उपरोक्त काही भाव बाजुला सारता काही *"कविता शब्द"* रमाईच्या भावनांना वाट मोकळी करुन देतांना आढळतात.

            *"रमाई"* ह्या काव्यसंग्रहामध्ये आमचा मित्र *अनिल सुर्या* रमाईची करुणा सांगताना म्हणतो - *"शब्दालये संपली रमाई / तुझ्या करुणेपुढे / सहनशीलताही धन्य झाली / तुझ्या यातनेपुढे."* रमाई आईच्या यातना हा सहज विषय नाही. *किशोर घोरपडे* रमाईचे मोठा त्याग सांगताना म्हणतो - *"कोटी कोटी लेकरासाठी / धरतीनं सोसावा तसा तु सोसलास सोस / आमच्या जिवनाच्या फुलबागा फुलविण्यासाठी / आई रमाई...."* रमाई ही क्षय रोगातुन बाबासाहेब आंबेडकरांना सोडून गेली. तेव्हा *कुमुदिनी वैद्य* ही तिच्या कवितेत म्हणते - *"उंबरठ्याच्या आत / चार भिंतींच्या कोंदणात / राहुन दिली ही साथ / बाबासाहेबांना ..."* रमाई आईच्या गोव-या वेचण्यावर *कुसुम गांगुर्डे* ही म्हणते - *"रमाई माते / गोळा केल्यास गं शेण्या / नाही सांगितल्या / आपल्या दु:खाच्या कहाण्या."* रमाई आईच्या जीवन संघर्षावर *मीनाक्षी मुन* म्हणते - *"वरळी व्हिलेजला पहाटेला / शेणी थापायला जात होतीस / स्वयंपाकाला सरपण हवे / म्हणून काळोख पडल्यावर / पोयबावडी ते दादरपर्यंत / पायी जावुन काळोखातचं / डोक्यावर सरपण घेऊन यायचीस."* बाबासाहेब ह्यांनी तर *"थाट्स ऑन पाकिस्तान "* हा ग्रंथ रमाई आईला अर्पण केला. ह्यावर *चंद्रहास गमरे* हा त्याच्या कवितेत म्हणतो - *"रमाई / लिहुन ठेवलयं तुझे नाव / मोठ्या सुरेख अक्षरांनी / भीमांनी, साश्रु नयनांनी / पाकिस्तानच्या बुकात."* रमाई आईचे मोठेपण सांगताना *प्र. श्री. नेरुरकर* म्हणतात - *"रमाई / आईनंतर एवढं सुंदर नाव मी ऐकलं नव्हतं / तुम्हाला पाहिलं नव्हतं / तुम्हाला मी ऐकलं नव्हतं / माय तुमच्याबद्दल जेव्हा मी ऐकलं नि वाचलं / तेव्हा माझं काळीज गलबलून गेलं."* रमाई हिच्या बाबासाहेबांच्या प्रेमावर *डॉ राजेंद्र गोणारकर* लिहितो - *"तू जपलसं सूर्याला / सावली होऊन / अन् आरपार / जळत गेलीस."* रमाईच्या त्याग - समर्पण ह्या संदर्भात *दि. रा. वाघमारे* लिहितो - *"पेटलेले मरण हातात घेऊन / पिढ्यान पिढ्यांपासून / आक्रस्ताळेपणाने वावरणा-या संस्कृतीत तूच एक वादळ वेल / ठरलीस इथे !"* रमाईच्या संकटाला सामोरा जाण्यावर *दिगंबर झाल्टे* लिहितो - *"नद्या सागर थांबतात काही / पण / तू तर रमाई... / झंझावातातही थांबली नाहीस."* रमाईच्या खस्ता जीवनावर *नामदेव ढसाळ* लिहितो - *"तुझे चरित्र तुझ्या खस्ता / तुझे अश्रु तुझे उसासे तुझे शहाणपण / तुझ्या डोळ्यातले आदी अंताला स्पर्श करणारे कारुण्य."* रमाईच्या बाबासाहेब जडणघडणीवर *प्रा अशोक नाईक* म्हणतो - *"तुझा असीम त्याग / हिमालयाहुन उंच म्हणून / तू जागवू शकलीस / या मातीतला प्रज्ञा सूर्य."* डॉक्टर बाबासाहेबांच्या सत्कारा प्रसंगी रमाईकडे नविन लुगडे नव्हते. सदर प्रसंगावर *दामोदर मोरे* हे लिहितात - *"मी कसा विसरु / तेव्हाची तुझ्या डोळ्यातील वेदना ? / शाहु महाराजांनी बाबांना सन्मानाने दिलेला / जारी पटकाच नेसून गेलीस."* रमाई आईच्या कष्ट संदर्भात *प्रा. देवेंद्र खंडारे* म्हणतो - *"चुलीतल्या कांड्यांच्या धूर / ओल्या डोळ्यांनी फुंकत फुंकत / आयुष्याच्या तव्यावर / जळती भाकर होऊनच तू पोळलीस."* रमाईच्या निर्वाणातील बाबासाहेबांच्या भावनांना *प्रा. भगवान भोईर* हा शब्दबध्द करतो - *"तू तर शेवटच्या यात्रेला निघालीस / रामी, थोडा वेळ थांबना ! / ह्या दलित झोपड्या प्रकाशमान करुन ! / मग एकाच वेळी जगाचा निरोप घेऊ !"* रमाई आईचे मोठेपण इतके आहे की शब्दांनाही जागा नाही. बाबासाहेब रमाई आईला *"रामु"* ह्या प्रेम शब्दांचा प्रयोग करीत असत. अर्थात बाबासाहेब ह्यांचे सदर प्रेम संदर्भ ही आम्हाला समजुन घेणे गरजेचे आहे.

              आमचे मित्र स्मृतीशेष *योगेंद्र मेश्राम* ह्यांच्या शब्दात रमाई आहे - *"मातीचं सोनं करणारी / अन् आभाळ छताखाली काटेरी आबाळ सोसणारी / आमची 'आई'."* रमाई आईच्या त्यागाचे वर्णन *बी. बी‌. ईलमकर* हे करतात - *"रमाई / तू आलीस / ह्या भूमीवर / लाव्हा रसांची धग / तुझ्या अश्रूत फुलवीत / धगधगत्या सूर्याची / तेजस्वी ज्योत होऊन..."* विदेशातून रमाईच्या पत्राला डॉ बाबासाहेबांचे उत्तर *बेबीताई कांबळे* हिच्या शब्दामध्ये आहे - *"विलायतेला पत्र गेलं रमाईचं / वाचून डोळे भरले तिच्या भीमाचं / परतून आशय असा धाडला / म्हणून पत्र धाडतो रमा मी तुला / शील सत्य नीतीची रमा तू खाण / तुझ्यामुळे जिवंत आहे गं मान."* बाबासाहेब - रमाई ह्यांची असलेली पत्रे ही प्रेम - मैत्रीचा बंध आहेत. म्हणूनच *रमाकांत जाधव* हे त्यांच्या कवितेत लिहितात - *"तुझं अस्तित्व सावलीचं / मायेच्या माउलीचं."* डॉ बाबासाहेब ह्यांना धीर देतांना रमाई ही *रमेशचंद्र सोमकुवर* ह्यांच्या शब्दात म्हणते - *"साहेब, काळजी करु नका / संसाराचा गाडा खेचण्यास मी एकटी समर्थ आहे / वेळ आल्यास गोव-या वेचीन शरम करणार नाही / पण / तुम्ही अंगिकारलेले कार्य तडीस न्या."* रमाई हिच्या त्यागाचे वर्णन *सिध्दार्थ तलवारे* ह्यांच्या शब्दामध्ये - *"तू दीड रुपयाच्या बांधूनी पुड्या / चालविलास संसार / पण कधी केली ना बाबाकडे तक्रार."* सदर *"रमाई"* काव्यसंग्रहात ५४ कविंनी *"रमाई आईवर"* शब्द सुमने वाहिलेली आहेत. इहवादी साहित्यिक (बुद्ध - आंबेडकरी साहित्यिक नाही) *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांना ही प्रस्तावना लिहिण्याचे औचित्य मिळाल्याने रमाई आईचा मोठेपणा प्रा मनोहर यांना कळला. आणि रमाई हिच्यावर कविता लिहिलेली नाही असे पत्र प्रा. मनोहर ह्यांनी संपादक *सिध्दार्थ तलवारे* ह्यांना पाठविले. *"रमाई"* ह्या सिध्दार्थ तलवारे संपादीत काव्यसंग्रहाने *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांना *"रमाई"* कांदबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. *प्रा यशवंत मनोहर* ह्यांनी पहिल्या दोन आवृत्तीत कविमित्र *सिध्दार्थ तलवारे* ह्यांचा उल्लेख ही केला आहे. परंतु *प्रा डॉ मनोहर* ह्यांनी नंतरच्या मराठी - हिन्दी आवृत्तीतुन *सिध्दार्थ तलवारे* ह्यांच्या नावाचा उल्लेख करणे टाळले. अर्थात *"प्रा डॉ यशवंत मनोहर ह्यांनी ही नैतिकता कां ओलांडली ?"* हा एक संशोधनाचा विषय आहे. *प्रा. यशवंत मनोहर* ह्यांच्या प्रस्तावनेतील *"अर्धांगिनी / महापतिव्रता"* हे शब्द खुप वेदना करुन जातात. तसेच काही कवि वर्गानी सुध्दा *"पतिव्रता / कैवारी / साध्वी / विद्यादेवी / सतीचे वाण / सौभाग्याचं लेण / पुण्यस्मरण / अर्धांगिनी / परमेश्वर / यम विचारांच्या / आत्मा / सवाष्णी / नावाचं कुंकु / दलितांची माउली / पुण्य प्रतापे"* सारख्या केलेला शब्दांचा प्रयोग हा टाळायलाचं हवा. *"रमाई"* ह्या मराठी काव्यसंग्रहाचे *"मुखपृष्ठ / मलपृष्ठ"* साधे आणि सुंदर आहे. सदर मुखपृष्ठ अजुन ही *"छान आणि प्रभावी"* होवु शकते. सदर काव्यसंग्रह प्रकाशन हे *"आदेश प्रकाशन"* ह्यांनी केलेले असुन पुस्तक मुल्य रु. १५० आहे. *सिध्दार्थ तलवारे* ह्यांच्या ह्या प्रयासाला मी मंगलमय भावना देतो आहे.


----------------------------------------

▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक १३ जुलै २०२५

Friday, 11 July 2025

 🇮🇳 *महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक (मजसुवि) २०२५ सरकार विरोधींचा फाशीचा फंदा ?*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य",* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र‌.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


         *"मराठी भाषा विवाद"* प्रकरण उकरुन काही दुसरा नविनचं विषय साध्य करण्याचा प्रयास असण्याची जहाल शक्यता आठ - दहा दिवसांपूर्वी मी माझ्या लेखात मांडलेली होती. माझा अंदाज हा अगदी खरा ठरला.‌ *"शहरी दहशतवाद / डाव्या कडव्या"* विचारसरणीच्या संघटनांना तिव्र आळा घालण्यासाठी *"महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२५"* (मजसुवि) हे महाराष्ट्र हाऊसमध्ये मंजुर केले आहे, हे म्हणने शुध्द धुळफेक आहे. गुन्हेगारी विषयावर आळा घालण्यासाठी *"जुना Cr.PC Act"* (क्रिमिनल पिनल कोड) हा केंद्राचा एक महत्वाचा कायदा अस्तित्वात आहे. केंद्र सरकारने त्या कायद्याचे नामकरण आता *"भारतीय दंड संहिता"* असे केले असुन पुर्वीच्या *मुळ कायद्यातील ४८४ कलमा* ऐवजी ही ५३१ नविन कलमे समाविष्ट करण्यात आली. ह्याशिवाय आतंकवाद घटनांना आळा बसण्यासाठी काही कायदे आहेत. जसे - *बेकायदेशीर (अवैध) क्रियाकलाप प्रतिबंधित कायदा* (Unlawful Activities Prevention Act - UAPA) / *दहशतवाद विरोधी कायदा* (Prevention of Terrorism Act - POTA) ह्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाला आळा घालण्यासाठी *"आंतरराष्ट्रीय करार"* ही आहेत. मग *"महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक"* हा पुन्हा नविन कायदा निर्माण करण्याची कां गरज भासली ? हा अहं प्रश्न आहे. भारतीय संविधानाने (Constitution of India) भारतीय जनतेला काही *"मुलभुत अधिकार"* (Fundamental Rights) दिलेले आहेत. सदर आपल्या मुलभुत अधिकारावर *"कडव्या संघटना"* ह्या गोंडस नावाने आक्रमण करण्याचा हा प्रयास तर नाही नां ? हा अहं प्रश्न आहे. महाराष्ट्रातील *"विरोधी पक्ष"* हे मृतप्राय असल्यामुळे हा प्रयास झालेला आहे. आता *"मराठी भाषा"* नावाने केले गेलेले आंदोलन ह्या कायद्या विरोधात होते काय ? हे आपल्याला लवकरचं दिसेलचं !!!

             केंद्र सरकारने ब-याच कायद्याला बरखास्त / कमी करुन त्या कायद्याला *"काही कायद्यात सिमितीकरण"* केलेले आहे. ह्यामध्ये विशेषत: *"कामगार कायदे"* (Labour Act) ह्याचा ही समावेश आहे. केंद्र सरकार द्वारा पुर्व पार आलेले कामगार हक्क डावलणे / औद्योगिक मालकांना लाभ पोहचविणारे / केवळ कंत्राटी कामगारांचीचं भरती करणे / कामगारांना *"नोकरीत स्थायी / कायम करण्यास बाधा आणणारे कायदे"* केल्याचा गंभीर आरोप ही होतांना दिसतो आहे. जर केंद्र सरकारने कायद्याचे *"बरखास्तीकरण / कमीकरण"* केले असल्यास महाराष्ट्र सरकारला *"जनसुरक्षा विधेयक"* आणण्याची कां गरज पडली ? हा अहं प्रश्न आहे. सरकार जर *"लोक हित / कामगार हित कायद्याच्या"* (Labour Welfare Act) ऐवजी  *"भांडवलशाही वर्ग कायदे"*  (Capitalist Act) ह्याला विशेष महत्व देत असल्यास भारतातील *"लोकशाही* (Democrasy) जीवंत आहे काय ? हा प्रश्न सहजचं सुज्ञ व्यक्तीला होणार आहे. *बाबासाहेब डॉ आंबेडकरांनी* त्यांच्या काळामध्ये *"कामगार हक्क कायदे / स्त्री हक्क कायदे"* (Labour Welfare Act / Women Welfare Act) ह्याला विशेष महत्व दिलेले आहे. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांना भारतातील *"पुंजीवादी व्यवस्थेला"* (Capitalist System) पुर्णतः विरोध केलेला होता. पुंजीवादी व्यवस्था ही *"रक्त शोषण करणारी व्यवस्था"* आहे, हे बाबासाहेब डॉ. आंबेडकरांना वाटत असे. ती *"लोकशाही मारक"* सुध्दा आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. म्हणुनचं भारतामध्ये *"उद्योग / शेतीचे राष्ट्रियकरण"* (Industry / Farm Nationalization) होणे ही काळाची फार गरज आहे. *"मंदिराचे राष्ट्रियकरण"* होणे हे सुध्दा फार गरजेचे आहे. *"मंदिराचे अर्थशास्त्र"* हे विशेष असे कोडे आहे. परंतु सरकार द्वारा *"सरकारीकरण"* ऐवजी *"खाजगीकरण"* धोरण राबविले जात आहे. सदर धोरण हे *"जनहित विरोधी"* (Public U Welfare) आहे, हे खेदाने म्हणावे लागते. आपल्या देशात *"धर्मांधवाद"* हा फार बोकाळला आहे. *"राष्ट्रियता भावना"* जोपासण्यासाठी *"भारत राष्ट्रवाद मंत्रालय एवं संचालनालय"* स्थापन करणे गरजेचे असतांना शासनाचे त्याकडे लक्ष नाही. आणि *"गुन्हेगारी"* संबंधातील कायदे आधीच अस्तित्वात असतांना *"महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक"* कां असावे ? हा प्रश्न सरकारला आहे.


--------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक ११ जुलै २०२५

Thursday, 10 July 2025

✍️ *कवियित्री निर्मला जीवने हिची कविता आंबेडकरी बुध्द विचारांकडे घेवुन जाणारी !*
       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.
बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

            कवियित्री निर्मला जीवने हिचा काही दिवसांपूर्वी मला फोन आला होता. आणि तिने मला *"नवा संकल्प"* हा कविता संग्रह / *"अजिंक्य नीर"* हे स्वकथन मला पोस्टाने पाठविले. मध्यंतरी ती घसरुन पडल्यामुळे तिला चालतांना त्रास होत असल्याचे पत्र सोबतचं पाठविले. निर्मला जीवने हिचा *"नवा संकल्प"* हा दुसरा काव्य संग्रह असुन *"दवंडी"* हा तिचा पहिला काव्यसंग्रह आहे. नवा संकल्प ह्या कविता संग्रहातील काही कविता ह्या *"ललित साहित्याचा"* बोध करुन जातात. आयु निर्मला जीवने हिने हे सत्य तिच्या साहित्य लिखाणात मान्य केलेले आहे . तिच्या कविता संग्रहातील संविधान संदर्भातील शब्द संविधानाचे मुल्य जोपासतांना दिसते. ती म्हणते - *"जगण्याचे तत्वज्ञान / सांगते संविधान / मूल्य नव्या क्रांतीचे / दिसते पानापान."* आणखी ती म्हणते - *"हाच करा रे संकल्प / करु नका रे अपमान / जगण्यासाठी आम्हा / वाचविणार संविधान."* माजी सनदी अधिकारी *इ. झेड. खोब्रागडे* ह्यांनी बुध्द - आंबेडकरी साहित्याला छेद देण्याकरिता *"संविधान साहित्य संमेलन"* ह्या नावाने साहित्यामध्ये भर देण्याचा अफलातुन प्रकार चालविला आहे. दीक्षाभूमी नागपूर येथे ८ - ९ जुन २०१९ रोजी सदर आयोजन केले होते. सदर साहित्य संमेलनाला मी स्वत: आणि माझी संघटना *"सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* द्वारा विरोध करुन मा. उच्च न्यायालयात याचिका क्र. ३९४०/२०२९ दाखल केली होती. माझ्या बाजुचे मा. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल *एड. चेतन बैरवा / एड. बी.बी‌. रायपूरे* होते. उच्च न्यायालयाने सदर संमेलन हे माझ्या *"मुलभुत अधिकाराचे उल्लंघन करणारे नाही"* ह्या कारणांनी याचिका डिस्पोस्ड ऑफ केली. मी सदर याचिका माझ्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन झाल्यामुळे दाखल केलेली नव्हती. परंतु *न्या. रवी देशपांडे / न्या. विनय जोशी* ह्यांच्या संविधान ज्ञानाबद्दल काय बोलावे ? *"भारतीय संविधानाचा सन्मान करणे"* हे आपण सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. भारतीय संविधान हे मुलत: *"कायद्याचे पुस्तक"* (Legal Book) नाही. तर ते *"कायद्याचे दस्तावेज"* (Legal Documents) आहे. त्यामुळे  *"भारतीय संविधान"* हे *"साहित्य मुळींच नाही."* साहित्य हे घाणेरडे / अश्लिल ही असु शकते. साहित्य मान्य नसेल तर निषेध म्हणून *"जाळले ही जावु शकते."* इ झेड खोब्रागडे ह्यांच्या मुर्खपणामुळे नवी दिल्लीच्या जंतरमंतर स्थानात *"भारतीय संविधान जाळण्यात आले."* परंतु बिन-अकल माणसाला कोण ज्ञान सांगणार ? असो.
           निर्मला जीवने हिची *"क्रांतिदिन"* ही कविता क्रांती इतिहास अभावाची दिसुन येते. भारताचा क्रांती इतिहास हा वेगळा आहे. मग तो उठाव १८५७ चा कां असेनां ! भारतीय कांग्रेस - गांधी राजनीतिची अदुरदर्शिता ही *"भारताला स्वातंत्र ३ -४ वर्षे उशिरा"* होण्याला कारणीभूत झाला आहे. *"रयतेचा राजा शिवाजी महाराज"* ह्या कवितेचे संदर्भ बरे असले तरी छ. शिवाजी महाराजांचे शिलालेख *"संस्कृत ह्या भाषेतील"* आहेत, हे समजुन घेणे गरजेचे आहे. अर्थात ब्राह्मण्य प्रभावाचा बोध होतो.*"गुढी पाडवा"* हा कविता संदर्भ इतिहास ही निर्मला हिने जाणुन घेणे गरजेचे आहे. मग *"क्रांती"* ह्या कविता आशयातील १९४२ ची *"चले जाव क्रांती"* ही !  हा गांधी - कांग्रेसचा मोठा मुर्खपणा होता. *"द्वितीय महायुध्द "* कालखंड १९३९ - ४५ हा *"हिटलर - झारशाही विरुध्द"* सुरु होते. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी *"मित्र देश - इंग्लंड - अमेरिका - रशिया"* ह्यांना समर्थन दिलेले होते. *"महार रेजिमेंट"* युध्दात सक्रिय होती. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांना कांग्रेस मंडळी ही गद्दार म्हणत होती. कांग्रेस ही *झुरी राष्ट्र - हिटलर* सोबत सख्य करावे की *"मित्र राष्ट्र"* ह्या द्वंद्वात अडकली होती. आणि उशिराने गांधी - कांग्रेसने मित्र राष्ट्राला पाठिंबा दिला. हा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. वरुन त्या कविता ललित साहित्याचा बोध करुन देण्या-या आहेत. *"जी़वाचा मापदंड"* ह्या कवितेत ती म्हणते - *"मापदंड जीवाचा / अनुसरा मार्ग विशुध्द / पंचशील तत्व / ही शिकवण देती बुध्द."* अगदी साध्या - सोप्या भाषेत ती बुद्ध सांगुन जाते. *"प्रियदर्शी सम्राट अशोक"* संदर्भ सांगताना ती राजमुद्रा विषयावर लिहिते - *"चार सिंहाची प्रतिमा / मुद्रा आहे भारताची / असा हा राजा सर्वोत्तम / सर्वश्रेष्ठ शान या देशाची."* निर्मला जीवने हिच्या प्रत्येक कवितेची समिक्षा करण्यास शब्दबंधन मर्यादा आहे. नया संकल्प ह्या कविता संग्रहाचे प्रकाशन समिक्षा प्रकाशन पंढरपूर ह्यांनी केले असुन ही पहिलीच आवृत्ती आहे.  कवियित्रीचा प्रयास उत्तम असला तरी तिने *"ललित साहित्य"* ह्या विचारातुन बाहेर पडायला हवे. बुध्द आंबेडकरी साहित्यातील *"सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / नैतिकशास्त्र / प्रेम / स्त्री भाव"* इत्यादी आशयाची मांडणी नव्या स्वरूपात करायला हवे. पुर्व पार चालत आलेल्या साहित्य लिखाणातुन बाहेर पडुन तिने *"स्वतःचे लिखाण अस्तित्व"* निर्माण करायला हवे. निर्मला जीवने हिच्या भावी लिखाणाला माझ्या मंगल कामना आहेत.

----------------------------------------
✍️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
        नागपूर दिनांक ९ जुलै २०२५

Tuesday, 8 July 2025

 🫀 *वेदनांचे काळीज ...!*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


वेदनांचे काळीज

दु:खाचे डोंगर

ह्या उराशी बाळगुन

माणुस हा जगत असतो

खचलेला ही असतों

जीवन सत्य शोधतांना

मग महाकारुणीक बुध्द

सहज बोध करुन जातो

चार आर्यसत्य

आर्य अष्टांगिक मार्ग

बुध्द पंचशील 

शुण्यवाद सिध्दांत 

प्रतित्यसमुत्पाद 

कारणकार्यभाव सिध्दांत

कारणा असेल तर

कार्य हे घडत असते

कारण नसेल तर

कार्य घडुनचं येत नाही 

आणि बरेचं काही बुध्द विचार ....

माणुस हा सावध होतो

प्रज्ञा ही जागृत होते

आशेचे एक किरण

सुर्य - चंद्रात बघत असतो

निसर्ग जगातील सौंदर्य 

हिरवीगार वनराई

विविध रंगी फुल झाडे

उंच उंच वृक्ष - शुध्द हवा

जंगल - पहाड वगैरे वगैरे

नागमोडी वळण रस्ते

आणि कारचा हा प्रवास

मित्रांची ती सोबत

विसरलेली मानवी करुणा

पुनश्च मनाला चेतवीत असते

असत्य - धोकेदारी ह्या जगात ....

इतिहासाची प्राचीन भिंंत

ती समोर नजरेला येते

ती बोलकी झालेली असते 

प्राचिन बुद्ध काळ इतिहास 

ती कथन करीत असते

बाजुलाच उभ्या असलेल्या 

सांची स्वरुप बुध्द विहारात 

प्रवेश करीत असतांना

शांतीचा सहज बोध होतो

बुध्दा समोर हात जोडून 

बुध्द वंदना केल्यावर 

शांत मनाने तो बाहेर पडतो

एका सत्य युगात

आपले एक उद्दीष्ट समोरा ठेवुन ....


----------------------------------

नागपूर दिनांक ६ जुलै २०२५

Friday, 4 July 2025

 🤝 *जागतिक रिपब्लिकन महिला परिषद २०२५ : रिपब्लिकन जागतिक (???) किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंदोरा ? रिपब्लिकन विचार राजकिय आकलन !*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

  

             रिपब्लिकन पक्ष आहे की विचार (?) आणि आयोजक वर्गांनी *"जागतिक रिपब्लिकन महिला परिषद २०२५"* समारोहाचे आयोजन शनिवार ५ जुलै २०२५ रोजी *"डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर"* नागपूर ह्या ठिकाणी आयोजित केल्याची एक मोठी बातमी मिडियामध्ये दिसुन आली. सोबतचं रिपाई माजी राष्ट्रीय अध्यक्ष *"बॅरी‌. राजाभाऊ खोब्रागडे जन्म महोत्सव"* संदर्भ हा दिला गेला. जागतिक संदर्भ ह्या सम्मेलनाला दिसल्यामुळे *"अमेरिकेतील आजच्या सत्तारूढ असलेल्या रिपब्लिकन पार्टीचे नेते डोनाल्ड ट्रम्प"* ह्यांच्या सोबत काही समन्वय आहे काय ? हा अहं विचार मनात आला. अमेरिका ह्या देशात *"रिपब्लिकन पक्ष / डेमोक्रॅटिक पक्ष"* ह्या दोन पक्षांची उलट पालट *"युनायटेड स्टेट्स कांग्रेसवर"* नियंत्रण राहिलेले आहे. अर्थात सत्ता असते. रिपब्लिकन (?) आयोजकांनी सदर संदर्भातुन *"जागतिक रिपब्लिकन महिला परिषद २०२५ "* आयोजन केले असल्यास समस्त आयोजकांचे अभिनंदन करायला हवे ! परंतु *"रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया"* हा राजकीय संदर्भ *बाबासाहेब डॉ आंबेडकरांनी* कां दिला आहे ? हे समजून घेणे गरजेचे आहे. १५ ऑगस्ट १९३६ ला स्थापन *"स्वतंत्र मजूर पक्ष"* (Independent Labour Party) हा सन १९४२ साली बाबासाहेब डॉ आंबेडकरांना कां बरखास्त करावा लागला ? ही माहिती किती रिपब्लिकानां माहित आहे हा महत्त्वाचा विषय आहे. सन  १७-२० जुलै१९४२ साली नागपुरात बाबासाहेबांनी *"शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची"* स्थापन करुन राजकीय निवडणूक लढविली होती. नंतर १९५६ साली *"रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया"* ही राजकीय संकल्पना देवुन बाबासाहेब डॉ आंबेडकर हे आम्हाला सोडुन गेले. परंतु बाबासाहेबांचे नातु *एड. प्रकाश आंबेडकर* ह्यानी तर रिपब्लिकन विचारांची नाळ तोडुन *"बहुजन महासंघ ते वंचित आघाडी"* असा राजकीय प्रवास केलेला आहे, त्याला आम्ही काय म्हणावे ? प्रकाश आंबेडकर ह्यांना ४० - ५० वर्षापुर्वी *डॉ आनंद जीवने*'ह्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम परिचीत करणे, ही *"आमची सर्वात मोठी चुक"* झालेली आहे. अश्या ह्या दुष्काळी राजकीय परिस्थितीत *"रिपब्लिकन पक्षाचे"* बिखरणे / रिपब्लिकन नावाने विविध रुपी *"आघाड्या"* तयार होणे / रिपब्लिकन नावाने *"जागतिक रिपब्लिकन"* नावाचा संदर्भ ही ??? हा विचार माणसाला चिंताग्रस्त करून जातो. डॉ बाबासाहेबांचा *"राजकीय वारसा - रिपब्लिकन विचार"*  हा केवळ जीवंत आहे. इंडिया असलेला राष्ट्रिय राजकीय पक्ष - *"रिपब्लिकन पार्टी ऑफ इंदोरा"* सुध्दा नाही. तो मृतप्राय झालेला आहे.

            बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांचा प्रवास हा *"सामाजिक"* (बहिष्कृत हितकारणी सभा २० जुलै १९२४ / समता सैनिक दल १३ मार्च १९२७) ते *"राजकीय"* (इंडिपेंडंट लेबर पार्टी - १५ ऑगस्ट १९३६ / शेड्युल्ड कास्ट फेडरेशन १७ - २० जुलै १९४२) आणि नंतर *"धम्म विचार"* (भारतीय बौद्ध जनसंघ १९५१ / दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया ४ मे १९५५)  देवुन १४ ऑक्टोबर १९५६ रोजी जगाला *"बुद्ध"* दिला. महान *"चक्रवर्ती सम्राट अशोक"* ह्यांच्या नंतर बुध्द धम्माचे पुन: उत्थान करणारे *"महानायक"* झाले आहेत. आणि भारतीय राजकारणात सफल योध्दा झाले. तर *मोहनदास गांधी* ह्यांचा प्रवास प्रथम *"राजकारण"* (राष्ट्रिय कांग्रेस) नंतर *"धर्मकारण - समाजकारण"* असा झालेला आहे. गांधींना सत्तारुढ जातीय सत्ता वलय असल्यामुळे ते टिकाव धरु शकले. *बाबासाहेबांना* असे वलय नव्हते. *"शुण्यातुन निर्माण झालेले"* ते नेते होते. *"द्वितीय महायुध्दातील"* डॉ बाबासाहेब आंबेडकर - गांधी कांग्रेस संघर्ष / डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे मित्र पक्ष - *"इंग्रजांना खुले समर्थन"* / गांधी - कांग्रेस ह्यांचे भरकटणे *"धुरी राष्ट्र - हिटलर"* वा मित्र राष्ट्र *"इंग्लंड"* ह्यापैकी कुणाला समर्थन द्यावे हे द्वंद्वत्व / बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांना देशद्रोही म्हणने, बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्या वैचारिक संघर्षातुन तावुन निघालेले होते. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांचा *"संघर्ष - त्याग - देशभक्ती - समाजाचे उत्थान - भारतीय संविधानतुन दिलेले अधिकार"* आम्ही किती समजुन / उमगुन घेतले ? हा प्रश्न रिपब्लिकन विचारकांनी समजून घेणे गरजेचे आहे. कारण आमची राष्ट्रिय नेते - कार्यकर्ते ही *"सत्ता तुकडे घास"* खाणारी झालेली आहेत. पाय लोटांगण करणारी / विविध नेत्यांचे थुका चाटणारी आहेत. रिपब्लिकन (???) नावाने *अशोक कोल्हटकर* आणि तमाम *"चाटु टीम"* ही त्यांचे ज्वलंत उदाहरण म्हणायला हवे नां ! अर्थात *"रिपब्लिकन विचारांचे कांग्रेसीकरण"* झाल्यास वावगे काय ? *रामदास आठवले / प्रा. जोगेंद्र कवाडे / एड. सुलेखा कुंभारे* ह्यांनी मग *"रिपब्लिकन विचारांचे भगवाकरण"* केल्यास मग पोटात दुखायला नको !!! कांग्रेसी आमदार / माजी मंत्री *डॉ. नितीन राऊत* हा सुध्दा रिपब्लिकन होवुन जातो. *"रिपब्लिकन शो"* हा असा चालु असतो. *"मेरा नाम जोकर"* फेम राज कपुर विचारानुसार *"दि शो मस्ट गो ऑन."* (The show must go on) ह्या रिपब्लिकन विचारांचे (?) अगदी तेचं सुरु आहे.  *"समाज जाये भाड में !!!!!"* उद्या रिपब्लिकन गुलामीचे पोवाडे गायिले जातील !!!

        जय बुद्ध ! जय भीम !! जय भारत !!! जय संविधान !!!!!

------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपूर दिनांक ४ जुलै २०२५

Wednesday, 2 July 2025

 ✍️  *प्रा. डॉ. तारा भवाळकर समान मराठी साहित्याचे मदारी पंढरपुरच्या विठ्ठलामध्ये ही सरते शेवटी विष्णु - शिव - गणेश शोधतात !*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


              नवी दिल्ली येथे झालेल्या *"९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५"* चे अध्यक्ष पद *प्रा. डॉ. तारा भवाळकर* ह्यांनी भुषविले होते. आजपर्यंत मराठी साहित्य संमेलनात किती महिलांनी अध्यक्षपद भूषविले आहेत ? असा गणितीय लेखाजोखा हा मांडला गेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपद भुषविणा-या *प्रा डॉ तारा भवाळकर* ह्या सहाव्या विदुषी झालेल्या आहेत. अभिनंदन *डॉ तारा भवाळकर !* परंतु साहित्य *समेलनाच्या अध्यक्षांनी किती तीर मारलेत ?* हा प्रश्न मात्र जश्याचा तसाच आहे. ह्या संदर्भात *"साहित्याचा उगम - वास्तव - अभिजात दर्जा"* ह्या विषयावर माझे बरेच लेख मिडियात प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेचा उगम इतिहास *इसवी ७०५ सालचा* पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे शिलालेख"* साक्ष देतो आहे. दुसरा शिलालेख हा *इसवी १०१२ सालचा* रायगड जिल्हा अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी सापडला. तिसरा शिलालेख *इसवी १०१८ सालचा* सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* हा आहे. चवथा शिलालेख *इसवी १०३९ सालचा* कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडला. *"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी २००० वर्षांचा इतिहास असणे गरजेचे होते."* अर्थात सन २०२५ साली मराठी भाषेला २००० वर्ष होत नसल्यामुळे सरते शेवटी *"मराठी साहित्यिक वर्ग"* ही बुध्दमय संस्कृतीच्या *"नाणेघाट शिलालेख"* हा आधार शोधायला निघालेत. आणि बुद्धमय संस्कृतीचा *"नाणेघाट शिलालेख"* आधार घेवुन *"मराठी भाषेला अभिजात दर्जा"* मिळविण्यासाठी ती यशस्वी झालेले आहेत. करीता मराठी साहित्यिक वर्गाचे अभिनंदन !!!

            मराठी शिलालेख संदर्भ ह्यासोबतचं मराठी भाषातज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी *"समंत सिध्दांत"* अनुसार मराठी भाषेचे खरे मुळ *"तामिळ भाषेतुन"* मानलेले आहे. ह्याशिवाय मराठी भाषातज्ञ *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांनी श्री खरे ह्यांच्या विधानाची पुष्टी केलेली आहे. *दुर्गा भागवत* हिने राजाराम शास्त्री ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत पेक्षा जुनी आणि खरी भाषा मानलेली आहे. परंतु संस्कृत भाषा ही कोणती ? कारण बुध्द संस्कृतीमध्ये इसवी पहिल्या शतकात *"पाली भाषेवर"* संस्कार करुन *"हिब्रु संस्कृत भाषेचा"* अविष्कार केला गेला. पाली भाषा सोबतचं हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) आहे. *"देवनागरी लिपीचा"* प्रथम प्रारुप *इसवी ११०० साल* असले तरी ती *इसवी १२९६ साली* व्यवहारात आली. मराठी भाषेची  तद्वतचं *"क्लासिकल संस्कृत भाषा"* हिची लिपी ही *"देवनागरी"* आहे. तेव्हा दुर्गा भागवत ही *"क्लासिकल संस्कृत"* संदर्भ देत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. *प्रा हरी नरके* हे मराठी भाषा ही *"इसवी सनाच्या पुर्वीपासुन अहिर माहाराष्ट्री - प्राचिन म-हाटी भाषेपासुन शौरसेनी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. आणि शौरसेनी भाषेपासून कालांतराने मागधी / पैशाची या दोन भाषेची उत्पत्ती"* हा अफलातून *"जावंई शोध"* लावलेला आहे. हरी नरके ह्यांनी मराठी भाषेची *"मुळ लिपी"* कोणती ? हे सुध्दा सांगुन द्यायला हवे. मराठी भाषेची *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / कोल्हापूरी मराठी / व-हाडी मराठी "* असे पोट प्रकार दिसुन येतात.

           ब्राह्मण्य मराठी साहित्य धारेचा इतिहास हा तसा तर पुर्णतः *"फसवा इतिहास* आहे. आता मी अन्य भाषा - साहित्य संदर्भात बोलत नाही. *"मराठी भाषा - साहित्य ह्याचा खरा उदगाता कोण ?"* हा विवादाचा भाग आहे. परंतु मराठी साहित्यिकांनी मराठी साहित्याचे *"अग्रणी कवि"* म्हणून १२ व्या शतकातील *मुकुंदराज / संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/२/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांचा उदो उदो केलेला आहे. शिंपी समाजाचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते ३/०७/१३५०), संत नामदेव महाराज परिवारातील *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०), महार समाजाचे *संत चोखामेळा* (१२७३ ते १३३८) ह्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मराठी संतांना *"अग्रणी कवि"* म्हणुन स्थान देण्यात आले नाही. हा जन्म इतिहास समजून घेणे फार गरजेचे आहे. त्यांसोबतचं सोनार जातीचे *नरहरी सोनार* (११९३ ते १३१३), चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा* / ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज* (१५३३ ते १५९९), वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०१/१६०८ ते १९/०३/१६५० (१६८८) ही तमाम संत *"पंढरपूरच्या विठोबा / बुध्दाला"* शरण गेल्यामुळे दुर्लक्षित झालेली आहेत. ब्राह्मण जातीचे *संत रामदास स्वामी*(१६०६ ते १६८२) ह्यांचा मात्र उदोउदो करुन *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु असल्याचा फसवा इतिहास रचला गेला. वास्तविकत: *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु *संत तुकाराम महाराज* होते. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या शिवनेरी किल्ल्याच्या शेजारी *"बुध्द लेणी"* ह्या कोरलेल्या आहेत. बुध्दाला शरण गेलेल्या ह्या तमाम संतांच्या मराठी अभगांचा अभ्यास होणे / संशोधन होणे गरजेचे आहे.

             *प्रा. डॉ. तारा भवाळकर* ही मराठी साहित्यिक पंढरपुरच्या विठोबात *"वैष्णव / शिव / गणेश रुपे"* सांगित आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या *"दगडी मुर्तीतुन प्राण काढल्याचा विधी "* ती आपल्याला मिडिया मुलाखतीत सांगित आहे. दगडातुन प्राण काढल्यानंतर तो प्राण घागरीत ठेवल्यावर *"घागरी विठोबा"* हा सुध्दा संदर्भ देत आहे. *"दगडामध्ये काय प्राण वास असतो ?"* पंढरपूर विठोबाची मुर्ती ही मुळ मुर्ती नाही. पंढरपुर विठाबाची मुर्तींचे आक्रांत वेळी स्थानातरण करण्यात आले. वगैरे वगैरे. तारा भवाळकर ही मिडिया मुलाखतीत अजुन खुप काही सांगुन गेली. अजुन ब-याच काही मान्यवरांच्या मतांमध्ये ही विरोधाभास आहे.  खरे तर, दगडी मुर्तीचा अविष्कार ही प्राचीन कला बुध्द संस्कृतीची *"गांधार कला / मथुरा कला"* ही साक्ष आहे. तसे बघावे तर *डॉ तारा भवाळकर* हिच्या दगडी मेंदुचा प्रमाण हा परिचय आहे. *संत नामदेव महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात - *"मध्ये झाले मौन देव निज घ्यावी | बौध्द ते म्हणोनी नावे रुप ||"*  वरिष्ठ संत *जनाबाई* म्हणते - *"होवुनिया कृष्ण कंस वधियेला | आता बुद्ध झाला सखा माझा ||"* (३४४) दुस-या अभंगात ती म्हणते - *"गोकुळ अवतारु | सोळा सहस्त्रावरु | आपण योगेश्वरु | बौध्द रुपी |"* (१०५३) तिस-या अभंगात ती म्हणते - *"व्रत भंगासाठी बौध्द अवतार | झाला दिगंबर अवनीये |"* (१०९६) चवथ्या अभंगात ती म्हणते - *"ऐसा कष्ठी होऊनी बौध्द राहिलासी |"* (१०९८) अग्रणी संत *चोखामेळा महाराज* म्हणतात - *"चोखा चोखत निर्मळ | तया अंगी नाही मळ | चोखा चोखाचा सागर | चोखा भक्तीची माऊली |"* संत चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई* म्हणते - *".... देह असुनही तू ही देही | सदा समाधीस्त राही | पाहाते पाहणे गेले दुरी | मने चोखियाची महारी |"* ब्राम्हण जातीचे संत *एकनाथ महाराज* म्हणतात - *"नवबा बैसे स्थिररुप | तया नाम बौध्दरुप | संत तया दारी | तिष्ठाताति निरंतरी |"* जगद्गुरु *संत तुकाराम महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात - *"बौध्द अवतार माझिया अदृष्टा | मौर्य मुखे निष्ठा धरियेली |"* दुस-या अभंगात ते म्हणतात - *"नावे रुपे अंगी लावला विटाळ | होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध |"* अजुन संतांचे बुध्द संदर्भात खुप काही अभंग आहेत‌. *बाबासाहेब डॉ आंबेडकर* ह्यांनी पंढरपूरचा विठ्ठल हे बुध्दचं असल्याचे म्हटलेले आहे. *"पुंडलिक > पुंडरिक > कमळ."* आणि कमळ हे बुध्द धर्मात महत्वाचे मानलेले आहे. आता शब्द मर्यादेमुळे हा विषय आटोपता घेणे आवश्यक आहे.

             भाषा लिपीचा बोध ही *"सिंधु घाटी सभ्यता"* (इ. पु. ३३०० ते १९००) ही देत असली तरी ती लिपी आजपर्यंत समजली / उमगली गेलेली नाही. त्यांनतर सिंधु घाटी सदृश्य लिपी - *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) ही इ.पु. सातव्या - सहाव्या शतकात - *"बुध्द कालखंडात"* उदयास आली. बोली भाषा ही *"पाली - प्राकृत भाषा"* होती. आणि *"बुध्द साहित्याचा अविष्कार झालेला आहे."* ह्याशिवाय *"स्त्री साहित्याचा उगम"* ही बुद्ध धम्माची देण आहे. इसवी पहिल्या शतकात (हिनयान - महायान संप्रदाय विभाजन) पाली भाषेवर संस्कार होवुन *"हिब्रू संस्कृत भाषा"* जन्माला आली. हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही *"धम्म लिपी"* ( ब्राम्ही लिपी) होती. हिब्रु संस्कृत भाषा नंतर इसवी पाचव्या शतकात *"अपभ्रंश भाषा"* उदयास आली. इतकेच नाही तर *"शंख लिपी"* आणि अन्य काही लिपीचा ही अविष्कार झालेला होता. इसवी दहाव्या शतकात *"पाली प्राकृत ह्या भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदि हिंदीचा जन्म झाला."* महत्वाचे म्हणजे *"वैदिक धर्म / ब्राम्हण धर्म"* उदय हा *दहाव्या शतकानंतर* दिसुन येतो. बुध्द कालखंडात *"बम्हण"* हा शब्द प्रयोग *"विद्वान / श्रमण / समण"* ह्या अर्थाने केला जात असे. *"ब्राह्मण धर्म"* नाही. इसवी ११०० ह्या कालखंडामध्ये *"देवनागरी लिपीचे"* प्रारुप तयार होवुन इसवी १७९६ ला देवनागरी लिपी व्यवहारात आली. इसवी १६४५ ह्या कालखंडात *"उर्दु भाषा"* ही उदयास आली. इसवी १८ व्या शतकात *"आदि हिंदी"* भाषा नंतर *"आधुनिक हिंदी"* ह्या भाषेचा अविष्कार झाला. मराठी भाषा उगम उत्तरेकडुन (सातपुडा रांगा पासुन कावेरीच्या पश्चिमेकडे आणि उत्तरेस दमणपासुन दक्षिणेकडे गोव्यापर्यंत विस्तारीत गेल्याचा काही संदर्भ आहे. परंतु *"शिलालेख प्रमाण"* हे इसवी ७०५ पासुनचं दिसुन येतात. एकंदरीत *"लिपी - भाषा - साहित्य उगम"* ही बुद्ध धम्माची देण आहे. *"मुर्ती कला - शिल्प कला"* ही सुध्दा बुद्ध धर्माची देणं आहे. परंतु *तारा भवाळकर* समान मंद बुध्दीचे सा‌हित्यिक वर्ग *"लिपी / भाषा / साहित्य / कला उगम - वास्तव समजून घेत नसतील"* तर त्याला आपण काय म्हणावे ??? हाच संदर्भ मग तो *"पंढरपूरचा विठोबा / तिरुपतीचा बालाजी"* ह्यांना ही लागु आहे !!! 


-----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक २ जुलै २०२५

✍️  *प्रा. डॉ. तारा भवाळकर समान मराठी साहित्याचे मदारी पंढरपुरच्या विठ्ठलामध्ये ही सरते शेवटी विष्णु - शिव - गणेश शोधतात !*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


              नवी दिल्ली येथे झालेल्या *"९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५"* चे अध्यक्ष पद *प्रा. डॉ. तारा भवाळकर* ह्यांनी भुषविले होते. आजपर्यंत मराठी साहित्य संमेलनात किती महिलांनी अध्यक्षपद भूषविले आहेत ? असा गणितीय लेखाजोखा हा मांडला गेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपद भुषविणा-या *प्रा डॉ तारा भवाळकर* ह्या सहाव्या विदुषी झालेल्या आहेत. अभिनंदन *डॉ तारा भवाळकर !* परंतु साहित्य *समेलनाच्या अध्यक्षांनी किती तीर मारलेत ?* हा प्रश्न मात्र जश्याचा तसाच आहे. ह्या संदर्भात *"साहित्याचा उगम - वास्तव - अभिजात दर्जा"* ह्या विषयावर माझे बरेच लेख मिडियात प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेचा उगम इतिहास *इसवी ७०५ सालचा* पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे शिलालेख"* साक्ष देतो आहे. दुसरा शिलालेख हा *इसवी १०१२ सालचा* रायगड जिल्हा अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी सापडला. तिसरा शिलालेख *इसवी १०१८ सालचा* सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* हा आहे. चवथा शिलालेख *इसवी १०३९ सालचा* कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडला. *"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी २००० वर्षांचा इतिहास असणे गरजेचे होते."* अर्थात सन २०२५ साली मराठी भाषेला २००० वर्ष होत नसल्यामुळे सरते शेवटी *"मराठी साहित्यिक वर्ग"* ही बुध्दमय संस्कृतीच्या *"नाणेघाट शिलालेख"* हा आधार शोधायला निघालेत. आणि बुद्धमय संस्कृतीचा *"नाणेघाट शिलालेख"* आधार घेवुन *"मराठी भाषेला अभिजात दर्जा"* मिळविण्यासाठी ती यशस्वी झालेले आहेत. करीता मराठी साहित्यिक वर्गाचे अभिनंदन !!!

            मराठी शिलालेख संदर्भ ह्यासोबतचं मराठी भाषातज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी *"समंत सिध्दांत"* अनुसार मराठी भाषेचे खरे मुळ *"तामिळ भाषेतुन"* मानलेले आहे. ह्याशिवाय मराठी भाषातज्ञ *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांनी श्री खरे ह्यांच्या विधानाची पुष्टी केलेली आहे. *दुर्गा भागवत* हिने राजाराम शास्त्री ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत पेक्षा जुनी आणि खरी भाषा मानलेली आहे. परंतु संस्कृत भाषा ही कोणती ? कारण बुध्द संस्कृतीमध्ये इसवी पहिल्या शतकात *"पाली भाषेवर"* संस्कार करुन *"हिब्रु संस्कृत भाषेचा"* अविष्कार केला गेला. पाली भाषा सोबतचं हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) आहे. *"देवनागरी लिपीचा"* प्रथम प्रारुप *इसवी ११०० साल* असले तरी ती *इसवी १२९६ साली* व्यवहारात आली. मराठी भाषेची  तद्वतचं *"क्लासिकल संस्कृत भाषा"* हिची लिपी ही *"देवनागरी"* आहे. तेव्हा दुर्गा भागवत ही *"क्लासिकल संस्कृत"* संदर्भ देत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. *प्रा हरी नरके* हे मराठी भाषा ही *"इसवी सनाच्या पुर्वीपासुन अहिर माहाराष्ट्री - प्राचिन म-हाटी भाषेपासुन शौरसेनी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. आणि शौरसेनी भाषेपासून कालांतराने मागधी / पैशाची या दोन भाषेची उत्पत्ती"* हा अफलातून *"जावंई शोध"* लावलेला आहे. हरी नरके ह्यांनी मराठी भाषेची *"मुळ लिपी"* कोणती ? हे सुध्दा सांगुन द्यायला हवे. मराठी भाषेची *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / कोल्हापूरी मराठी / व-हाडी मराठी "* असे पोट प्रकार दिसुन येतात.

           ब्राह्मण्य मराठी साहित्य धारेचा इतिहास हा तसा तर पुर्णतः *"फसवा इतिहास* आहे. आता मी अन्य भाषा - साहित्य संदर्भात बोलत नाही. *"मराठी भाषा - साहित्य ह्याचा खरा उदगाता कोण ?"* हा विवादाचा भाग आहे. परंतु मराठी साहित्यिकांनी मराठी साहित्याचे *"अग्रणी कवि"* म्हणून १२ व्या शतकातील *मुकुंदराज / संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/२/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांचा उदो उदो केलेला आहे. शिंपी समाजाचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते ३/०७/१३५०), संत नामदेव महाराज परिवारातील *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०), महार समाजाचे *संत चोखामेळा* (१२७३ ते १३३८) ह्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मराठी संतांना *"अग्रणी कवि"* म्हणुन स्थान देण्यात आले नाही. हा जन्म इतिहास समजून घेणे फार गरजेचे आहे. त्यांसोबतचं सोनार जातीचे *नरहरी सोनार* (११९३ ते १३१३), चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा* / ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज* (१५३३ ते १५९९), वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०१/१६०८ ते १९/०३/१६५० (१६८८) ही तमाम संत *"पंढरपूरच्या विठोबा / बुध्दाला"* शरण गेल्यामुळे दुर्लक्षित झालेली आहेत. ब्राह्मण जातीचे *संत रामदास स्वामी*(१६०६ ते १६८२) ह्यांचा मात्र उदोउदो करुन *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु असल्याचा फसवा इतिहास रचला गेला. वास्तविकत: *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु *संत तुकाराम महाराज* होते. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या शिवनेरी किल्ल्याच्या शेजारी *"बुध्द लेणी"* ह्या कोरलेल्या आहेत. बुध्दाला शरण गेलेल्या ह्या तमाम संतांच्या मराठी अभगांचा अभ्यास होणे / संशोधन होणे गरजेचे आहे.

             *प्रा. डॉ. तारा भवाळकर* ही मराठी साहित्यिक पंढरपुरच्या विठोबात *"वैष्णव / शिव / गणेश रुपे"* सांगित आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या *"दगडी मुर्तीतुन प्राण काढल्याचा विधी "* ती आपल्याला मिडिया मुलाखतीत सांगित आहे. दगडातुन प्राण काढल्यानंतर तो प्राण घागरीत ठेवल्यावर *"घागरी विठोबा"* हा सुध्दा संदर्भ देत आहे. *"दगडामध्ये काय प्राण वास असतो ?"* पंढरपूर विठोबाची मुर्ती ही मुळ मुर्ती नाही. पंढरपुर विठाबाची मुर्तींचे आक्रांत वेळी स्थानातरण करण्यात आले. वगैरे वगैरे. तारा भवाळकर ही मिडिया मुलाखतीत अजुन खुप काही सांगुन गेली. अजुन ब-याच काही मान्यवरांच्या मतांमध्ये ही विरोधाभास आहे.  खरे तर, दगडी मुर्तीचा अविष्कार ही प्राचीन कला बुध्द संस्कृतीची *"गांधार कला / मथुरा कला"* ही साक्ष आहे. तसे बघावे तर *डॉ तारा भवाळकर* हिच्या दगडी मेंदुचा प्रमाण हा परिचय आहे. *संत नामदेव महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात - *"मध्ये झाले मौन देव निज घ्यावी | बौध्द ते म्हणोनी नावे रुप ||"*  वरिष्ठ संत *जनाबाई* म्हणते - *"होवुनिया कृष्ण कंस वधियेला | आता बुद्ध झाला सखा माझा ||"* (३४४) दुस-या अभंगात ती म्हणते - *"गोकुळ अवतारु | सोळा सहस्त्रावरु | आपण योगेश्वरु | बौध्द रुपी |"* (१०५३) तिस-या अभंगात ती म्हणते - *"व्रत भंगासाठी बौध्द अवतार | झाला दिगंबर अवनीये |"* (१०९६) चवथ्या अभंगात ती म्हणते - *"ऐसा कष्ठी होऊनी बौध्द राहिलासी |"* (१०९८) अग्रणी संत *चोखामेळा महाराज* म्हणतात - *"चोखा चोखत निर्मळ | तया अंगी नाही मळ | चोखा चोखाचा सागर | चोखा भक्तीची माऊली |"* संत चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई* म्हणते - *".... देह असुनही तू ही देही | सदा समाधीस्त राही | पाहाते पाहणे गेले दुरी | मने चोखियाची महारी |"* ब्राम्हण जातीचे संत *एकनाथ महाराज* म्हणतात - *"नवबा बैसे स्थिररुप | तया नाम बौध्दरुप | संत तया दारी | तिष्ठाताति निरंतरी |"* जगद्गुरु *संत तुकाराम महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात - *"बौध्द अवतार माझिया अदृष्टा | मौर्य मुखे निष्ठा धरियेली |"* दुस-या अभंगात ते म्हणतात - *"नावे रुपे अंगी लावला विटाळ | होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध |"* अजुन संतांचे बुध्द संदर्भात खुप काही अभंग आहेत‌. *बाबासाहेब डॉ आंबेडकर* ह्यांनी पंढरपूरचा विठ्ठल हे बुध्दचं असल्याचे म्हटलेले आहे. *"पुंडलिक > पुंडरिक > कमळ."* आणि कमळ हे बुध्द धर्मात महत्वाचे मानलेले आहे. आता शब्द मर्यादेमुळे हा विषय आटोपता घेणे आवश्यक आहे.

             भाषा लिपीचा बोध ही *"सिंधु घाटी सभ्यता"* (इ. पु. ३३०० ते १९००) ही देत असली तरी ती लिपी आजपर्यंत समजली / उमगली गेलेली नाही. त्यांनतर सिंधु घाटी सदृश्य लिपी - *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) ही इ.पु. सातव्या - सहाव्या शतकात - *"बुध्द कालखंडात"* उदयास आली. बोली भाषा ही *"पाली - प्राकृत भाषा"* होती. आणि *"बुध्द साहित्याचा अविष्कार झालेला आहे."* ह्याशिवाय *"स्त्री साहित्याचा उगम"* ही बुद्ध धम्माची देण आहे. इसवी पहिल्या शतकात (हिनयान - महायान संप्रदाय विभाजन) पाली भाषेवर संस्कार होवुन *"हिब्रू संस्कृत भाषा"* जन्माला आली. हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही *"धम्म लिपी"* ( ब्राम्ही लिपी) होती. हिब्रु संस्कृत भाषा नंतर इसवी पाचव्या शतकात *"अपभ्रंश भाषा"* उदयास आली. इतकेच नाही तर *"शंख लिपी"* आणि अन्य काही लिपीचा ही अविष्कार झालेला होता. इसवी दहाव्या शतकात *"पाली प्राकृत ह्या भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदि हिंदीचा जन्म झाला."* महत्वाचे म्हणजे *"वैदिक धर्म / ब्राम्हण धर्म"* उदय हा *दहाव्या शतकानंतर* दिसुन येतो. बुध्द कालखंडात *"बम्हण"* हा शब्द प्रयोग *"विद्वान / श्रमण / समण"* ह्या अर्थाने केला जात असे. *"ब्राह्मण धर्म"* नाही. इसवी ११०० ह्या कालखंडामध्ये *"देवनागरी लिपीचे"* प्रारुप तयार होवुन इसवी १७९६ ला देवनागरी लिपी व्यवहारात आली. इसवी १६४५ ह्या कालखंडात *"उर्दु भाषा"* ही उदयास आली. इसवी १८ व्या शतकात *"आदि हिंदी"* भाषा नंतर *"आधुनिक हिंदी"* ह्या भाषेचा अविष्कार झाला. मराठी भाषा उगम उत्तरेकडुन (सातपुडा रांगा पासुन कावेरीच्या पश्चिमेकडे आणि उत्तरेस दमणपासुन दक्षिणेकडे गोव्यापर्यंत विस्तारीत गेल्याचा काही संदर्भ आहे. परंतु *"शिलालेख प्रमाण"* हे इसवी ७०५ पासुनचं दिसुन येतात. एकंदरीत *"लिपी - भाषा - साहित्य उगम"* ही बुद्ध धम्माची देण आहे. *"मुर्ती कला - शिल्प कला"* ही सुध्दा बुद्ध धर्माची देणं आहे. परंतु *तारा भवाळकर* समान मंद बुध्दीचे सा‌हित्यिक वर्ग *"लिपी / भाषा / साहित्य / कला उगम - वास्तव समजून घेत नसतील"* तर त्याला आपण काय म्हणावे ??? हाच संदर्भ मग तो *"पंढरपूरचा विठोबा / तिरुपतीचा बालाजी"* ह्यांना ही लागु आहे !!! 


-----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक २ जुलै २०२५