🌞 *आंबेडकरी बाप : ह्या प्रा. शुक्राचार्य गायकवाड स्तुतीसुमने संपादीत पुस्तकातील प्रा. डॉ. यशवंत मनोहर / प्रा. प्रदीप आगलावे ह्यांचे बाप मनोगत ?* (भाग - २)
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य,* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.
बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक
मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२
मुंबई येथील *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* संपादीत / सुमेरु प्रिंटर्स एंड पब्लिशर्स द्वारा प्रकाशित *"आंबेडकरी बाप"* ह्या संपादीत पुस्तकावर माझी १ जुलै २०२५ रोजी माझी समिक्षा मिडियात प्रकाशित झाली. सदर माझ्या समिक्षेवर काही मान्यवरांकडुन मला व्यक्तीश: मेसेजेस प्राप्त झालेत. बहुतेक सर्वांनीच त्या माझ्या समिक्षेवर सकारात्मक भाव प्रदर्शित केला. काहींनी त्यावर अजुन प्रकाश टाकण्याचा विचार बोलल्याने सदर लिहिण्याचा हा उद्देश आहे. सदर संपादीत पुस्तकात ३५ लेखकापैकी *ज. वि. पवार* ह्या एकमेव मान्यवरांना सोडले तर सर्वांनीच त्यांच्या बापावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केलेला आहे. ज. वि. पवार ह्यांनी *"बापाचं नातं"* ह्या आपल्या मनोगतात बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांना रेखाटले आहे. साहित्यामध्ये *"आत्मकथन"* (स्व: जीवन पथ) लिहिण्याचा एक भाव दिसुन येतो. ब-याच समिक्षकांनी *"आत्मकथन"* हे एकांगी आणि अतिरंजित भाव असल्याची टीका केलेली आहे. *"आंबेडकरी बाप"* हे संपादीत पुस्तक लेखकांचे आत्मकथनचं आहे. त्यामुळे अतिरंजित भाव हा सदर संपादीत पुस्तकामध्ये आहे काय ? हा तर संशोधनाचा विषय आहे. तसे बघितले तर प्रा. शुक्राचार्य गायकवाड ह्यांनी *"बुद्ध - आंबेडकरी साहित्य"* ह्यावर संशोधनात्मक पुस्तक प्रकाशित केले असते तर, गायकवाड ह्यांच्या पुस्तकावर शब्द वर्षाव केला गेला असता. परंतु *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचा विचार व्यापारीक असल्यास त्यावर न बोललेले बरे ! सदर पुस्तकाची छपाई / मुखपृष्ठ / पेपर दर्जा इत्यादी बघता संपादीत पुस्तकाचे मुल्य रु. ५००/- ठेवलेले आहे. सदर पुस्तकात *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचे फोटो असलेला एक टॅग आणि पुस्तकाच्या शेवटच्या पृष्ठावर संपादकाने आमचे मित्र *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* ह्यांच्या लेखणीतुन स्वतःचा परिचय लिहुन घेतलेला आहे. आणि प्रस्तावना *प्रा. डॉ यशवंत मनोहर* ह्यांनी लिहिलेली असुन सदर प्रस्तावनेची समिक्षा ही आधीच्या माझ्या समिक्षेत आलेली आहे.
*प्रा. डॉ. यशवंत मनोहर* असो वा *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* असो ह्या दोन्ही मान्यवरांचे जन्मगाव हे मला चांगले परिचीत आहे. *प्रा प्रदीप आगलावे* हा तर माझा जिवलग मित्र. *प्रदीप - सरोज* ह्यांच्या लग्नाचा मध्यस्थ ही मी तसेच फोटोग्राफर मीचं होतो. प्रदीपच्या लग्नातील ही एक घटना आहे. साधु साधु साधु म्हणतांना वधु ही वराचा पाया पडत असते. *सरोज* ही प्रदिपच्या पाया पडलेली नव्हती. तेव्हा प्रदिप ह्याने रागाने मंगळसुत्र सरोजकडे फेकुन दिले. सरोज हिच्या गळ्यामध्ये ते टाकलेले नव्हते. **मंगळसुत्र"* स्त्री यांनी बांधावे वा नाही हा ज्याचा त्याचा इच्छेचा प्रश्न आहे. *"लग्न हे बंधन आहे वा करार (Contract))"* हा विषय ही व्यक्ती सापेक्ष म्हणायला हवा. पण गोविंदराव वंजारी ह्यांनी नंतर प्रदिपच्या खांद्यावर हात ठेवुनी असा राग बरा नाही, हे बोलल्याचे मी बघितले आहे. *सरोज* हिने ही नंतर मंगळसुत्र घातल्याचे हे माझ्या स्मरणात नाही. प्रदीप आगलावे ह्यांच्या *सेवाग्राम* ह्या गावाला माझ्या ब-याच भेटी ही झाल्यात. सेवाग्राम अर्थात *मोहनदास गांधी* ह्यांची कर्मभूमी. प्रदीप आगलावे ह्यांचे जीवन हे *बापु आश्रमातील* आर शंकरनजी ह्यांच्या निवासातील एका खोलीत गेले. आर शंकरन ह्यांना प्रदीप आगलावे आणि विजय आगलावे हे *"चाचाजी"* म्हणायचे. गांधी आश्रमात असतांना प्रदीप आगलावे हा तेव्हा *"खादी वस्त्र"* परिधान करीत असे. *"माझी आणि प्रदीप ह्यांची मैत्री"* सुप्रसिद्ध कवि स्मृतीशेष *प्रा. ज्योती लांजेवार* ह्यांच्यामुळे झाली. तेव्हा लांजेवार ह्यांची मुलगी *प्रा. डॉ. अपर्णा लांजेवार* ही तेव्हा शिक्षण घेत होती. आता अपर्णा ही हैदराबाद येथे *"वरिष्ठ प्राध्यापक"* म्हणुन कार्यरत आहे. अपर्णा ही प्रदीप - माझ्या जिवलग मैत्रीबद्दल छानपणे माहिती देवु शकेल. प्रदीप नागपुरला शिकायला आला तेव्हा ही प्रदीप हा *"खद्दर वस्त्रधारी"* होता. प्रदीप हा नागपुर विद्यापीठ वस्तीगृहात राहातं असे. प्रदीप हा नंतर गोविंदराव वंजारी ह्यांच्या कॉलेजमध्ये *"प्राध्यापक"* म्हणून तो रुजु झाला होता. त्यांनतर त्याने चंदननगर येथे किरायाने राहायला सुरुवात केली. तेव्हा माझ्या दवाखान्यात असलेले औषधीचे खाली डबे मी प्रदीप ह्याला दिले. प्रदीप ह्याची गरीबी मी जवळुन बघितली आहे. प्रदीप ह्याचे *"प्रेम प्रकरण"* इत्यादींची मी साक्ष आहे. प्रदीप ह्याच्यावर असलेला गांधी प्रभाव हा *"मी / एड. मिलिंद बनसोड"* (माजी उपजिल्हाधिकारी) ह्यांच्या संपर्कात आल्यानंतर बदललेला होता. प्रदीप मग *"आंबेडकरी"* झाला. *प्रदीप - मी* आम्ही दोघे ही माझ्या घरी बरेचदा *"एका प्लेटमध्ये"* जेवण करीत असु. पुढे काही कारणे झाली / काही खाजगी विषय आहे / कामाच्या व्यस्ततेतुन आम्ही अलग अलग झालो. तरीही सरोज ही माझ्याकडे कधीकधी येत असे. आज ही *सरोज* कुठे भेटली तर हालचाल ती विचारीत असते. *प्रदीप* ह्याची ही बोलचाल कधी कधी होत असते. सांगायचे असे की प्रदीप ह्यांच्या लेखणीत हा भाव दिसुन आलेला नाही. कारण प्रदीपच्या आई, वडिल, भाऊ आणि परिवारासोबत माझे जवळचे नाते झाले होते.
*प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांचे जन्मगाव *येरला* (ता. काटोल) हे सुध्दा माझे चांगले असे परिचीत गाव आहे. ग्रामिण रुग्णालय नरखेड येथे मी *"मेडिकल ऑफिसर"* म्हणून कार्यरत होतो. काटोल येथिल ग्रामीण रुग्णालयातील *"मेडिकल सुपरीटेंडेंट"* तसेच प्रायव्हेट मेडिकल प्रक्टिसनर हे आमच्या शासन रुग्णालयात *"फॅमिली प्लॅनिंग सर्जरी"* करण्यास येत असत. आम्ही *"डॉक्टर अधिकारी / तहसीलदार / पोलिस निरीक्षक"* ह्यांच्या बैठका ह्या नित्याच्याच होत असतं. माझे नागपुरवरून नरखेड येथे जाणे - येणे हे नेहमीचे असल्यामुळे *"येरला"* येथे ही आमची *"वैद्यकीय कारणांमुळे"* भेटी होणे नविन नव्हते. कारण सदर क्षेत्राचे आरोग्य राखणे ही आमची *"शासन अधिकारी"* म्हणून जबाबदारी असे. त्यांनतर माझी बदली ही *"भिवापुर"* तहसील क्षेत्रामध्ये झाली होती. साहित्यिक *डॉ. धनराज डहाट* हे सुद्धा काटोल परिसरातीलचं. माझे वडिल हे जिल्हा परिषद शाळेमध्ये *"मुख्याध्यापक"* म्हणून कार्यरत होते. एकंदरीत माझे जीवन हे दारिद्र्यात गेलेले नसले तरी, *"खेड्यातील जीवन"* हे मी जवळुन बघितले आहे. शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे जीवन ही जवळुन बघितले आहे. खेड्यातील कास्तकार असो वा मजुर वर्ग असो, हा काबाडकष्टी असायचा. खेड्यातील शाळेत मुलांना दाखल करण्याची जबाबदारी ही शाळेतील शिक्षकांची असायची. आणि शिक्षण हे *"राष्ट्रिय कार्यक्रम"* शासन धोरण ठरलेले होते. *"शिक्षण हे मोफत दिले जात असे."* खेड्यातुन तालुक्याच्या ठिकाणी शिकण्याकरीता पायी चालत जाणे हे विशेष असे नाविण्य नव्हते. *प्रा यशवंत मनोहर* ह्यांच्या *"बुद्ध - आंबेडकरी साहित्य लिखाणावर"* (?) मागिल समिक्षेत लिहिलेले आहे. यशवंत मनोहर हे *"बुद्ध - आंबेडकरी साहित्यिक"* नाहीत. प्रा मनोहर हे *"व्यवसायिक / व्यवहारी / इहवादी साहित्यिक"* आहेत. तर *प्रा. प्रदीप आगलावे* ह्यांचे संशोधन लिखाण मग ते *समाजशास्त्रीय* विषय असो / *बुद्ध - आंबेडकरी* विषय असो दिसुन येत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे धर्मांतर पुस्तक असो वा समाजशास्त्रीय लिखाण असो, *"कॉपी एंड पेस्ट"* ह्या सदरात मोडणारे आहे. अर्थात *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* ह्यांना *"बुद्ध - आंबेडकरी साहित्यिक / संशोधक"* म्हणावे काय ? हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे बरेच संशोधन लिखाण हे उपलब्ध असुन, *"जात हा बंद वर्ग आहे"* (Caste is a closed class.) सारखे एखादे समाजशास्त्रीय संशोधन *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* ह्यांचे नावावर नाही. बुध्द - आंबेडकरी साहित्यातील *"नविनता शोध / सौंदर्यशास्त्र"* इत्यादीचे लिखाण होणे गरजेचे आहे. सदर बोध *"आंबेडकरी बाप"* ह्या संपादीत पुस्तकातुन कुठे ही झालेला नाही, असे खेदाने म्हणावे लागते. केवळ आणि केवळ संपादक / लेखक ह्यांची ही स्तुतीसुमने उधळली गेली आहेत. आणि हा प्रकार *"बुद्ध - आंबेडकरी साहित्य - चळवळ"* ह्यकरीता धोकादायक ठरणारा आहे.
------------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर दिनांक ७ जुन २०२५
No comments:
Post a Comment