📓 *प्रा. शुक्राचार्य गायकवाड ह्यांचे संपादीत आंबेडकरी बाप ही पुस्तक म्हणजे लेखक स्व - परिवारातील स्तुतीसुमनांचा अनावश्यक संकलन प्रयास होय !*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.
बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
मुंबई येथील सुमेरु प्रिंटर्स एंड पब्लिशर्स द्वारा प्रकाशित आणि *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचे संपादीत *"आंबेडकरी बाप"* हे पुस्तक पोस्टाने मला मिळाले. पुस्तक चाळत असतांना सुरुवातीलाचं *अर्पण"* पृष्ठ / पुस्तक संपादकाने स्व:ताचा फोटो लावलेला टॅग हा दिसुन आला. *डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर* ह्यांचा शुभ संदेश / *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचे संपादकीय कथन / इहवादी साहित्यिक (बुद्ध आंबेडकरी साहित्यिक नाही) *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांची प्रस्तावना दिसुन आली. तसे बघितले तर स्व: लिखित असो वा संपादीत असो पुस्तकामध्ये असा हा क्रम नेहमीचाच आहे. सदर संपादीत पुस्तकामध्ये *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* पासुन *"पस्तिस लेखक / कवि / कार्यकर्ते"* ह्यांनी त्यांच्या बापावर लिहिलेले कथन दिसुन आले. सदर पुस्तकातील बरीच मान्यवर मला परिचीत आहेत. आणि त्यांच्या परिवार इतिहास बाबत मी परिचीत सुध्दा आहे. जसे - *प्रा. डॉ. यशवंत मनोहर / प्रा. डॉ. प्रदीप आगलावे / डॉ. धनराज डहाट / प्रा. दामोधर मोरे / प्रा. भरत सिरसाठ* इत्यादी. आंबेडकरी क्षेत्रामध्ये ब-याच लेखकांनी आत्मचरित्र (स्व: जीवन पथ) हे लिहिलेले आहे. आणि काही आत्मचरित्र हे तर अतिरंजित असल्याची टिका सुध्दा झालेली आहे. त्यामुळे *"आंबेडकरी बाप"* हे पुस्तक ह्या अतिरंजित संदर्भापासुन अलिप्त आहे काय ? हा संशोधनाचा विषय आहे. लेखकांचे आई - बाप ह्याबाबत खुप आदर आहे. आदर असायला हवा. परंतु *"आंबेडकरी बाप"* संपादीत पुस्तक प्रकाशीत करणे *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांना गरजेचे कां झाले ? हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. संपादक / प्रकाशक ह्यांचा हा व्यापार विषयक विचार असल्यास त्याबाबत न बोललेले बरे !!! *"बुध्द साहित्य / आंबेडकरी साहित्य"* गहन विषय संदर्भात हे संशोधन लेखन असते तर, सदर पुस्तक संपादीत प्रकाशनावर अभिनंदन वर्षाव करणे गरजेचे होते. परंतु ह्यात लेखक स्व:परिवार स्तुतीसुमने ??? पुस्तक मूल्य ५००/- रुपये. आता शुभ संदेश / संपादकीय / प्रस्तावना / बापाची महत्तता ह्या गंभीर विषयावर ही बोलु या. सर्वांनाच आपले आई वडिल हे प्रिय असतात.
*"आंबेडकरी बाप"* ह्या प्रा. गायकवाड संपादीत पुस्तकाला *भीमराव यशवंतराव आंबेडकर* ह्या अ-साहित्यिक /भारतीय बौध्द महासभेचे विवादीत राष्ट्रिय कार्याध्यक्ष ह्यांनी शुभ संदेश दिलेला आहे. भीमराव यशवंतराव आंबेडकर ह्यांचा परिचय केवळ *बाबासाहेब परिवार'* निगडित आहे. सदर विषय एकवेळ मान्य करता येवु शकतो. परंतु *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचे संपादकीय भाषा विचार - यशवंत मनोहर ह्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन (?) / *प्रा. डॉ यशवंत मनोहर* ह्यांची प्रस्तावना भाषा विचार कुठेतरी मनाला दुखवुन जातात. यशवंत मनोहर ह्यांनी सदर प्रस्तावना लिहिण्यापुर्वी *"श्रध्दा - अंधश्रद्धा"* ह्यामध्ये ते भेद नसल्याचे नागपुर येथे भाषण करून गेले. तसे बघितले तर *यशवंत मनोहर* हे बुद्ध- आंबेडकरी साहित्यिक नाहीत. ते *"व्यापारी - व्यवहारीक - इहवादी साहित्यिक"* आहेत. मनोहर यांना मार्क्स ही जवळचा आहे, केशवसुत ही जवळचे आहेत. मनोहर ह्यांना ही जाणीव असायला हवी की - *"श्रध्देला प्रज्ञेची जोड नसेल तर ती अंधश्रद्धा होते."* बुध्द हे श्रध्देला *"बी"* (Seed) मानतात. *"श्रध्दा"* ह्या विषयावर बुध्द साहित्यात खुप गाथा आहेत. तरी एक पाली गाथा संदर्भ देतो. *"सध्दां बिजं तपो वुट्ठि पञ्ञा मे |......"* (कसिभारद्वाज सुत्त) (अर्थात - श्रध्दा हे माझे बीज आहे....) *डॉ यशवंत मनोहर* हे "आंबेडकरी बाप" संपादीत पुस्तकातील प्रस्तावनेत लिहितात - *"आंबेडकरी बाप हे पुस्तक कारणकार्य आणि कार्यकारण सिध्दांतासारखे आहे."* आणखी दुसरा संदर्भ ही आहे - *"अर्थात जुन्यात न मावु शकणारी प्रज्ञा वा प्रतिभाच नव्या कार्यकारणभावाची वा कारणकार्यभावाची नवी निर्मिती करू शकते."* प्रा डॉ यशवंत मनोहर ह्यानी सदर बुध्द वचन समजुन घेतलेले दिसुन येत नाही. बुध्द ह्यांचा *"प्रतित्यसमुत्पाद सिध्दांत"* ही यशवंत मनोहर हे समजु शकलेले नाहीत. आणि बुद्ध सिध्दांतात उलटफेर सारखा प्रकार केलेला आहे. बुध्द साहित्यात पाली गाथा आहे - *"इदं सति इदं होति, इदं असति इदं न होति |"* (अर्थात - कारण असेल तर कार्य होते. कारण नसेल तर कार्य होत नाही.) *प्रा डॉ यशवंत मनोहर* ह्यांचा हा शब्दच्छल सहज असा विषय नाही. कारण यशवंत मनोहर ह्यांनी बुध्दाच्या *"कार्यकारणभाव सिध्दांत"* ह्याची तोडमरोड केली आहे. तिसरा संदर्भ आहे - *"तेहतीस (३३) दिव्यांनी आपल्या बापासंबधी या पुस्तकात लिहिले आहे......"* खरे तर आपला बाप ह्या विषयावर सदर पुस्तकामध्ये लिहिणारी *"पस्तीस (३५) लेखक"* आहेत. प्रा डॉ यशवंत मनोहर हे एका ठिकाणी म्हणतात - *"आंबेडकरी बाप हे या तुरुंगाविरुध्दचे अपुर्व निर्णायक बंड होते."* खरे तर आमचा एकच बाप - *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* ह्यांनी ह्या तुरुंगाविरुध्दचे निर्णायक बंड केले आहे. अन्य कोणत्याही बापानी (?) हे कार्य केलेले नाही. फक्त लढ्यात ते सहभागी होते. *यशवंत मनोहर* ह्यांच्या सदर प्रस्तावनेत अजुनही विवादीत विषय आहेत. *"सीता वरुन भाताची परिक्षा"* ही उक्ती येथे लागु आहे. तेव्हा *"आंबेडकरी बाप"* ह्या पुस्तकातील लेखकांनी स्व:ताच्या परिवाराचा उदोउदो न केलेला बरा !!! प्रत्येकांनाच आपले आईवडील हे प्रिय आहेत. तेव्हा अतिरंजित भाव हा आंबेडकरी चळवळीला मारक ठरणारा असु शकतो. अर्थात सदर पुस्तक काय संदर्भ देणार आहे ? हा संशोधनाचा विषय आहे. तुर्त इतकेचं....!!!
---------------------------------------
▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर, दिनांक १ जुन २०२५
No comments:
Post a Comment