Tuesday, 3 June 2025

 🌳 *बदलाव....!*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो. न. ९३७०९८४१३८


हे निसर्ग जग !

निसर्गरचीत सौंदर्य 

वृक्ष वल्ली क्षुप ह्यांनी

निसर्ग वातावरणात

जगण्याला दिलेले वायु कण

प्राणीमात्रांचे मुक्त वावरणे

पण ह्या माणसाला 

बुध्दीजीवी प्राणी बनवुन

जबाबदारीची जाण दिली

सोबत माणुस प्रवृतीचे निर्माण ...

प्रवृतीत झालेला बदल

क्वचीतचं दिसुन येत असतो

माणुस हा प्रवृत्तीतचं जगतो

आणि प्रवृत्तीतचं मृत्युला जातो

बुध्दांनी ह्या माणसाला 

कुशल कर्म आणि अकुशल कर्म

ही काय काय आहेत ?

आणि काय त्याज्य असायला हवे ?

हे स्पष्टपणे सांगितले आहे

पांढरे शुभ्र वस्त्र परिधानाने

काषाय वस्त्र पेहराव केल्याने

प्रवृत्तीमध्ये बदलाव होत नसतो

बदलाव हा विचारांचा असतो

बदलाव हा कृतीचा असतो

बदलाव हा नीतिचा असतो...!!!


--------------------------------------

नागपूर दिनांक ३ जुन २०२५

No comments:

Post a Comment