✍️ *भारतीय लिपी / भाषा / साहित्य / प्रेम - सौंदर्यशास्त्र - नीतिशास्त्र - राष्ट्रवाद इत्यादी तमाम भाव विश्वाची जननी बुध्द तत्वज्ञान !*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.
बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
*चक्रवर्ती सम्राट अशोक* ह्यांनी तमाम जंबुद्विपामध्ये (प्राचिन एकसंघ विकास भारत) स्थापित केलेले *"८४००० स्तुप / चैत्य / स्तंभ /शिलालेख / विहार"* ही आपली प्राचिन संस्कृती बयाण करीत आहे. ती प्राचिन इतिहास साक्ष आहे. *चक्रवर्ती सम्राट अशोकाने* आपल्या शिलालेखात *"धम्म थंब / सिला थंब"* असा उल्लेख केलेला दिसुन येतो. सदर प्राचिन थंब हे *"अशोक थंब"* म्हणून ही आपल्याला परिचीत आहेत. अर्थात *"थंब"* हा शब्द *"स्तंभ"* हा शब्द आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांचे प्राचिन स्तंभ हे बुध्द वचन *"धम्म / सिल"* ह्यांची ती ओळख करून देतात. म्हणुनचं त्या स्तभांना (थंब) *"धम्म थंब / सिला स्तंभ"* म्हटल्या गेले. कालांतराने *"सिल"* (बुध्द शील) हा शब्द *"सिला वर लिपी"* कोरल्या गेल्याने *"सिल = दगड"* ह्या अर्थाने रुढ झाला. *प्राचिन बुध्द इतिहास - साहित्य ह्यावर संशोधन / लिखाण करणारी बोटावर मोजण्या इतपतचं मान्यवर आहेत.* जम्बुद्विप (भारत) देश *"इंग्रजांचा गुलाम झाला नसता"* तर, प्राचिन भारताचा सुवर्ण इतिहास हा जमिनीतीचं गडप झालेला असता. प्राचीन बुध्द इतिहास शोधण्यात *सर अलेक्झांडर कनींघम / जॉन प्रिंसेप* इत्यादी इंग्रज अधिका-यांचे मोलाचे योगदान आहे. *रिहस डेव्हिस* ह्यांचे बुध्दीझम हे ग्रंथ लिखाण / *सर एडविन अर्नाल्ड* ह्यांनी तर डेव्हिसच्या लिखाणातुन प्रेरणा घेवुन *"बुध्दगया"* मुक्ती करीता केलेल्या प्रयासामुळेचं *अनागरीक धम्मपाल* सारख्यांना बुध्दगया मुक्तीचे मिशन मिळालेले होते. आणि चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांचे शिलालेख हे बोलके झाले. *सर एडविन अर्नाल्ड* ह्यांची *"दि लाईट ऑफ एशिया"* ही पुस्तक माझी आवडीची पुस्तकं आहे. इंग्रजांच्या शासन काळामुळेचं *"प्राचिन धम्म - ब्राम्ही (धम्म) लिपी - भाषा - साहित्य"* इत्यादीचा ज्वलंत इतिहास हा जगासमोर आलेला आहे. *"गोरे इंग्रेज"* हे भारतातुन गेले. आणि *"काळ्या इंग्रजांनी"* पुनश्च भारत देशाचा *"प्राचीन बुद्ध इतिहास"* गडप करण्याची कुटनीति अवलंबन केलेली आहे.
प्राचिन *"सिंधु घाटी सभ्यता"* ही भारतीय प्रथम *"लिपीचा"* बोध ही करुन जाते. परंतु ती लिपी आजपावेतो वाचल्या / समजल्या गेलेली नाही. सदर लिपी वाचली / समजली / उमगली न जाण्याची काही कारणे सुध्दा आहेत. सदर कारणांवर पुन्हा कधी तरी चर्चा करु या. परंतु सदर *"सिंधु घाटी सभ्यता सदृश्य लिपी"* - अर्थात *"धम्म (ब्राम्ही) लिपी"* ही इ. पु. ७ - ६ व्या शतकातील *शाक्यमुनी बुध्द* कालखंडात उदयास आली. चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांनी *"धम्म लिपीत शिलालेख"* कोरलेले होते. सदर शिलालेख लिपी ही वाचल्या गेली. समजल्या गेली. परंतु सिंधु घाटी सभ्यता संस्कृती ही पहिले *"ताण्हणकर बुध्द"* ह्याची साक्ष *"चक्राकार स्तुप / घुमटाकार स्तुप - तरणताल / सिंह / वृषभ / स्वस्तिक चिन्ह"* ह्याद्वारे समस्त जगाला करुन दिली. सदर पहिले बुध्द परंपरा साक्ष ही *"चक्रवर्ती सम्राट अशोक काळातील स्तुप - चैत्य - विहार - शिलालेख"* ही बोलके आहेत. *"ताडपत्र"* ह्यावर अंकित *"त्रिपिटक ही साहित्य इतिहास"* बयाण करतो.
*आचार्य अश्वघोष / आचार्य नागार्जुन/ आचार्य आर्यसुरा / आचार्य कुमारल्भ"* ही बुध्द साहित्यातील *"चार महासुर्य"* म्हणुन नामांकित होती. हृयाशिवाय महायानी *वसुमित्र* रचित अभिधम्म ग्रंथ / प्रकरण पादशास्त्र / धातुकाय पादशास्त्र, *आचार्य कल्याणी पुत्र* रचित दिव्यावदान, *आचार्य नागार्जुन* रचित मध्यमिका कारिका / शुण्यवाद, *आर्यदेव* रचित चतु:शतक, *मैत्री नाथ* रचित अभिसमयालंकार, *असंग* रचित महायान सुत्रालंकार, *दिग्नाग* रचित न्याय प्रवेश ग्रंथ, *धर्म किर्ती* रचित न्याय बिंदु ग्रंथ, *आचार्य शांती देव* रचित बौध्दाचार्य अवतार, *आचार्य अश्वघोष* रचित बुध्दचरित्रम् / सौदरानंदम् / वज्रसुची / शारिपुत्रप्रकरणम् / उर्वशी वियोग / राष्ट्रपाल ह्या साहित्याचा विशेष उल्लेख करता येईल. *हिनयानी संप्रदाय* ह्यांचे प्रतित्यसमुत्पाद / निर्वाण प्राप्ती हे प्रमुख ग्रंथ तर *महायानी संप्रदाय* ह्यांचे प्रज्ञा पारमिता / सद्धर्म पुण्डरिक / ललित विस्तार / लंकालतार सुत्र / दशभुमीश्वर / नागानंदा ह्या बुद्ध ग्रंथांचा उल्लेख करता येईल. *बुध्द वंस* ह्या ग्रंथात बुद्ध वंशावळी दिसुन येते. श्रीलंका देशातील *दीपवंश* (बेटांचा इतिहास) आणि *महावंश* (महान इतिहास) तसेच *विशुध्दीमग्ग / जातक कथा / मिलिन्द प्रश्न* ह्या प्राचिन बौध्द साहित्याचा उल्लेख करावा लागेल. ह्याशिवाय *"गांधार कला / मथुरा कला"* ही शिल्पकला अविष्कार बुद्ध धम्माची देण आहे.
वैशाली राज्याची नगरवधु *आम्रपाली* हिच्या जन्मापासुन तर ते तिचे *"अर्हत"* होणे / मगध राजा *बिंबिसार - आम्रपाली"* ह्या दोघांचे निस्सिम प्रेम होणे - वियोग होणे ह्यामध्ये *"प्रेम - मैत्री - सौंदर्यशास्त्र / नैतिक वाद"* आम्ही शोधणार आहो की नाही ? हा प्रश्न आहे. दुसरे उदाहरण *आचार्य अश्वघोष* देता येईल.अश्वघोष ह्यांचे एका कन्येसोबत झालेले प्रेम - वियोग / अश्वघोष रचित *"उर्वशी वियोग"* ही नाट्य रचना आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. आचार्य अश्वघोष रचित *"बुद्ध चरित्रम्"* हे महाकाव्य बुद्ध जीवनावर आधारित आहे. *"सौदरानंदम्"* हे महाकाव्य बुध्दाचा चुलत भाऊ *आनंद* ह्यांच्या बुद्ध धम्म दीक्षित प्रसंगांवर आहे. तमाम बुध्द साहित्यामध्ये *"प्रेम - मैत्री - शांती - करुणा - सौंदर्यशास्त्र - नैतिक वाद - दर्शनशास्त्र - मानवशास्त्र - राष्ट्रवाद"* ह्याचा बोध होतो. *कवि कालीदास* रचित अभिज्ञान शांकुतलम् / विक्रमोर्वशीयम् / कुमारसंभवम् / रघुवंशम् / मेघदूतम् / ऋतुसंहारम् समान ४० साहित्य कृती लिहिल्याचे सांगितले जाते. परंतु कालिदास साहित्य हे *"भोगवाद"* पासुन *"अनैतिक वाद"* ह्याचा बोध करून जातो. त्या साहित्य कृतीबद्दल काय ? *कालिदास* ह्यांच्या साहित्य लिखाणात *आचार्य अश्वघोष* ह्यांचा साहित्य प्रभाव तसेच *"अपभ्रंश भाषा"* प्रभाव हा सुद्धा दिसुन येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ४० साहित्य लिखाण करणारा (?) *कालिदास ह्यांचा जन्म - मृत्यु कुठे झाला ?* हा विवादाचा विषय आहे. अर्थात *कालिदास हे काल्पनिक पात्र आहे,* हे समजून घेणे गरजेचे आहे.
चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांचे शिलालेख हे *"धम्म (ब्राम्ही) लिपी"* हा इतिहास सांगत असतांनाच *"पाली प्राकृत भाषा"* बोलीभाषा असल्याचाही तो पुरावा देतो. त्यानंतर भारतात अस्तित्वात *"गुप्त लिपी / कुटिल लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / देवनागरी लिपी / तेलगु लिपी / कन्नड लिपी / तामिळ लिपी / ग्रंथ लिपी / मध्यवेशी लिपी / ग्रंथ लिपी / मल्याळम लिपी / कलिंग लिपी / पश्चिमी लिपी / खरोष्टी लिपी ) चित्र लिपी / शंख लिपी / शाहमुखी लिपी / मोडी लिपी / उर्दु लिपी"* ह्या कालानुरूप उदयास आल्यात. *"पाली प्राकृत भाषा"* हिची लिपी ही *"धम्म लिपी"* होती. पुढे पाली भाषा ह्यावर संस्कार होवुन *"हिब्रू संस्कृत भाषा"* (तिसरी बुद्ध सांगिती - पहिली शती) हिचा उगम झाला. *"हिब्रू संस्कृत भाषेची"* लिपी मात्र *"धम्म लिपी"* हिच होती. *"पाली भाषेवर संस्कार"* होण्याची कारणे ही बुध्द धम्म हा *"महायान - हिनयान संप्रदायात विघटन"* होणे असण्याची शक्यता आहे. आता अस्तित्वात असलेली *"संस्कृत भाषा"* ही *"क्लासिकल संस्कृत"* असुन लिपी ही *"देवनागरी लिपी"* आहे. *"हिब्रू संस्कृत भाषा"* हिच्या उदयानंतर इसवी ६ - ७ व्या शतकात *"अपभ्रंश भाषा"* ही जन्माला आली. तर इसवी १२ व्या शतकात *"आदी हिंदी भाषा"* ही व्यवहारात आली. *"सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदी हिंदी होय,"* हे समजून घेणे फार गरजेचे आहे. *"उर्दू भाषा"* ही इसवी १६४५ ला जन्माला आली. *"देवनागरी लिपी"* ही इसवी ११०० मध्ये *"प्रथम प्रारुप"* स्वरुपात जन्माला आली असली तरी इसवी १७९६ ला *"व्यवहारात"* आली. तर *"आधुनिक हिंदी भाषा"* ही इसवी १८ व्या शतकात उदयास आली. आणि आधुनिक हिंदी भाषा लिपी ही *"देवनागरी लिपी"* होती.
मराठी भाषा संदर्भ इतिहासाचा पहिला शिलालेख *इसवी ७०५* सालचा पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे"* येथे सापडला आहे. दुसरा शिलालेख हा *इसवी १०१२* सालचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका *"अक्षी"* ह्या गावी सापडला. तिसरा शिलालेख *इसवी १०१८* सालचा सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* येथे सापडला. चवथा शिलालेख *इसवी १०३९* सालचा कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळा"* येथे सापडला. मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्याकरीता *"२००० वर्षांचा इतिहास "* असणे गरजेचे असल्यामुळे *"सातवाहन बौध्द काळातील नाणेघाट शिलालेख"* हा संदर्भ आधार घ्यावा लागलेला आहे. अर्थात सरते शेवटी *"तमाम मराठी साहित्यिकांना बुध्द संस्कृतीच्या पायाशीचं लोळण"* घ्यावी लागलेली आहे. आणि अभिजात मिळण्याकरीता *"ब्राह्मणी लोळण"* हा इतिहास झालेला आहे. परंतु *"बुध्द - आंबेडकरी"* म्हणवुन घेणारी काही *"साहित्यिक वर्ग"* हे *"ब्राह्मणी धारेच्या पायाशी लोटांगण"* घालीत असल्यास (?) आम्ही त्याला काय म्हणावे ? मराठी भाषेचे *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी "* असे पोट प्रकार ही दिसुन येतात. मराठी साहित्य महर्षी / आद्य कवि - शिंपी जातीचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते २/१२/१२९६) / संत नामदेव महाराज परिवारातील *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०) / महार जातीचे *संत चोखामेळा* (१२७३ ते १३३८) ही आपली तीन मान्यवर जेष्ठ संत असतांनाच *"१२ व्या शतकातील"* ब्राह्मणी व्यवस्था धारक *मुकुंदराज / संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/२/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांचा उदो उदो करण्यात आला. ह्याशिवाय सोनार जातीचे *संत नरहरी सोनार* असो वा / संत चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा* / ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज*/ वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०१/१६०८ ते १९/०३/१६५०) ही सर्व संत मंडळी पंढरपूरच्या *"विठ्ठल / बुद्ध"* ह्याला शरण गेलेली असल्यामुळे त्यांचा इतिहास हा दाबला गेला आहे. ब्राह्मणी व्यवस्थेचे - *संत रामदास स्वामी* (१६०८ ते १६८२) ह्यांचा उदो उदो करुन *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु असल्याचा खोटा इतिहास रचला गेला. संत रामदास स्वामी परिवारातील वयाने मोठे असलेले *संत एकनाथ महाराज* मात्र वंचित राहिले आहेत. वास्तविकत: *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु *संत तुकाराम महाराज* होते, हे समजून घेणे गरजेचे आहे. बुध्द - आंबेडकरी म्हणविणाऱ्या तथाकथित साहित्यिक वर्गाची *"ब्राह्मणी लोळण लाचारी"* ही कधीपर्यंत राहाणार आहे ? आम्ही साहित्य संशोधन लिखाण याकडे वळणार आहोत की नाही ? अशी बरीच प्रश्न आहेत. तेव्हा उत्तराच्या प्रतिक्षेत !!!
जय भीम ! जय संविधान !! जय बुद्ध !!!
----------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर दिनांक २० जुन २०२५