Friday, 20 June 2025

 ✍️ *भारतीय  लिपी / भाषा / साहित्य / प्रेम - सौंदर्यशास्त्र - नीतिशास्त्र - राष्ट्रवाद इत्यादी तमाम भाव विश्वाची जननी बुध्द तत्वज्ञान !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म‌. प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


         *चक्रवर्ती सम्राट अशोक* ह्यांनी तमाम जंबुद्विपामध्ये (प्राचिन एकसंघ विकास भारत) स्थापित केलेले *"८४००० स्तुप / चैत्य / स्तंभ /शिलालेख / विहार"* ही आपली प्राचिन संस्कृती बयाण करीत आहे. ती प्राचिन इतिहास साक्ष आहे. *चक्रवर्ती सम्राट अशोकाने* आपल्या शिलालेखात *"धम्म थंब / सिला थंब"* असा उल्लेख केलेला दिसुन येतो. सदर प्राचिन थंब हे *"अशोक थंब"* म्हणून ही आपल्याला परिचीत आहेत. अर्थात *"थंब"* हा शब्द  *"स्तंभ"* हा शब्द आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांचे प्राचिन स्तंभ हे बुध्द वचन *"धम्म / सिल"* ह्यांची ती ओळख करून देतात. म्हणुनचं त्या स्तभांना (थंब) *"धम्म थंब / सिला स्तंभ"* म्हटल्या गेले. कालांतराने *"सिल"* (बुध्द शील) हा शब्द *"सिला वर लिपी"* कोरल्या गेल्याने  *"सिल = दगड"* ह्या अर्थाने रुढ झाला. *प्राचिन बुध्द इतिहास -  साहित्य ह्यावर संशोधन / लिखाण करणारी बोटावर मोजण्या इतपतचं मान्यवर आहेत.* जम्बुद्विप (भारत) देश *"इंग्रजांचा गुलाम झाला नसता"* तर, प्राचिन भारताचा सुवर्ण इतिहास हा जमिनीतीचं गडप झालेला असता. प्राचीन बुध्द इतिहास शोधण्यात *सर अलेक्झांडर कनींघम / जॉन प्रिंसेप* इत्यादी इंग्रज अधिका-यांचे मोलाचे योगदान आहे. *रिहस डेव्हिस* ह्यांचे बुध्दीझम हे ग्रंथ लिखाण / *सर एडविन अर्नाल्ड* ह्यांनी तर डेव्हिसच्या लिखाणातुन प्रेरणा घेवुन  *"बुध्दगया"* मुक्ती करीता केलेल्या प्रयासामुळेचं *अनागरीक धम्मपाल* सारख्यांना बुध्दगया मुक्तीचे मिशन मिळालेले होते. आणि चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांचे शिलालेख हे बोलके झाले. *सर एडविन अर्नाल्ड* ह्यांची *"दि लाईट ऑफ एशिया"* ही पुस्तक माझी आवडीची पुस्तकं आहे. इंग्रजांच्या शासन काळामुळेचं *"प्राचिन धम्म - ब्राम्ही (धम्म) लिपी - भाषा - साहित्य"* इत्यादीचा ज्वलंत इतिहास हा जगासमोर आलेला आहे. *"गोरे इंग्रेज"* हे भारतातुन गेले. आणि *"काळ्या इंग्रजांनी"* पुनश्च भारत देशाचा *"प्राचीन बुद्ध इतिहास"* गडप करण्याची कुटनीति अवलंबन केलेली आहे.

         प्राचिन *"सिंधु घाटी सभ्यता"* ही भारतीय प्रथम *"लिपीचा"* बोध ही करुन जाते. परंतु ती लिपी आजपावेतो वाचल्या / समजल्या गेलेली नाही. सदर लिपी वाचली / समजली / उमगली न जाण्याची काही कारणे सुध्दा आहेत. सदर कारणांवर पुन्हा कधी तरी चर्चा करु या. परंतु सदर *"सिंधु घाटी सभ्यता सदृश्य लिपी"* - अर्थात *"धम्म (ब्राम्ही) लिपी"* ही इ. पु. ७ - ६ व्या शतकातील *शाक्यमुनी बुध्द* कालखंडात उदयास आली. चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांनी *"धम्म लिपीत शिलालेख"* कोरलेले होते. सदर शिलालेख लिपी ही वाचल्या गेली. समजल्या गेली. परंतु सिंधु घाटी सभ्यता संस्कृती ही पहिले *"ताण्हणकर बुध्द"* ह्याची साक्ष *"चक्राकार स्तुप / घुमटाकार स्तुप - तरणताल / सिंह / वृषभ / स्वस्तिक चिन्ह"* ह्याद्वारे समस्त जगाला करुन दिली. सदर पहिले बुध्द परंपरा साक्ष ही *"चक्रवर्ती सम्राट अशोक काळातील स्तुप - चैत्य - विहार - शिलालेख"* ही बोलके आहेत. *"ताडपत्र"* ह्यावर अंकित *"त्रिपिटक ही साहित्य इतिहास"* बयाण करतो.

         *आचार्य अश्वघोष / आचार्य नागार्जुन/ आचार्य आर्यसुरा / आचार्य कुमारल्भ"* ही बुध्द साहित्यातील *"चार महासुर्य"* म्हणुन नामांकित होती. हृयाशिवाय महायानी *वसुमित्र* रचित अभिधम्म ग्रंथ / प्रकरण पादशास्त्र / धातुकाय पादशास्त्र, *आचार्य कल्याणी पुत्र* रचित दिव्यावदान, *आचार्य नागार्जुन* रचित मध्यमिका कारिका / शुण्यवाद, *आर्यदेव* रचित चतु:शतक, *मैत्री नाथ* रचित अभिसमयालंकार, *असंग* रचित महायान सुत्रालंकार, *दिग्नाग* रचित न्याय प्रवेश ग्रंथ, *धर्म किर्ती* रचित न्याय बिंदु ग्रंथ, *आचार्य शांती देव* रचित बौध्दाचार्य अवतार, *आचार्य अश्वघोष* रचित बुध्दचरित्रम् / सौदरानंदम् / वज्रसुची / शारिपुत्रप्रकरणम् / उर्वशी वियोग / राष्ट्रपाल ह्या साहित्याचा विशेष उल्लेख करता येईल. *हिनयानी संप्रदाय* ह्यांचे प्रतित्यसमुत्पाद / निर्वाण प्राप्ती हे प्रमुख ग्रंथ तर *महायानी संप्रदाय* ह्यांचे प्रज्ञा पारमिता / सद्धर्म पुण्डरिक / ललित विस्तार / लंकालतार सुत्र / दशभुमीश्वर / नागानंदा ह्या बुद्ध ग्रंथांचा उल्लेख करता येईल. *बुध्द वंस* ह्या ग्रंथात बुद्ध वंशावळी दिसुन येते. श्रीलंका देशातील *दीपवंश* (बेटांचा इतिहास) आणि *महावंश* (महान इतिहास) तसेच *विशुध्दीमग्ग / जातक कथा / मिलिन्द प्रश्न* ह्या प्राचिन बौध्द साहित्याचा उल्लेख करावा लागेल. ह्याशिवाय *"गांधार कला / मथुरा कला"* ही शिल्पकला अविष्कार बुद्ध धम्माची देण आहे.

            वैशाली राज्याची नगरवधु *आम्रपाली* हिच्या जन्मापासुन तर ते तिचे *"अर्हत"* होणे / मगध राजा *बिंबिसार - आम्रपाली"* ह्या दोघांचे निस्सिम प्रेम होणे - वियोग होणे ह्यामध्ये *"प्रेम - मैत्री - सौंदर्यशास्त्र / नैतिक वाद"* आम्ही शोधणार आहो की नाही ? हा प्रश्न आहे. दुसरे उदाहरण *आचार्य अश्वघोष* देता येईल.अश्वघोष ह्यांचे एका कन्येसोबत झालेले प्रेम - वियोग / अश्वघोष रचित *"उर्वशी वियोग"* ही नाट्य रचना आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. आचार्य अश्वघोष रचित *"बुद्ध चरित्रम्"* हे महाकाव्य बुद्ध जीवनावर आधारित आहे. *"सौदरानंदम्"* हे महाकाव्य बुध्दाचा चुलत भाऊ *आनंद* ह्यांच्या बुद्ध धम्म दीक्षित प्रसंगांवर आहे. तमाम बुध्द साहित्यामध्ये *"प्रेम - मैत्री - शांती - करुणा - सौंदर्यशास्त्र - नैतिक वाद - दर्शनशास्त्र - मानवशास्त्र - राष्ट्रवाद"*  ह्याचा बोध होतो. *कवि कालीदास* रचित अभिज्ञान शांकुतलम् / विक्रमोर्वशीयम् / कुमारसंभवम् / रघुवंशम् / मेघदूतम् / ऋतुसंहारम् समान ४० साहित्य कृती लिहिल्याचे सांगितले जाते. परंतु कालिदास साहित्य हे *"भोगवाद"* पासुन *"अनैतिक वाद"* ह्याचा बोध करून जातो. त्या साहित्य कृतीबद्दल काय ? *कालिदास* ह्यांच्या साहित्य लिखाणात *आचार्य अश्वघोष* ह्यांचा साहित्य प्रभाव तसेच *"अपभ्रंश भाषा"* प्रभाव हा सुद्धा दिसुन येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ४० साहित्य लिखाण करणारा (?) *कालिदास ह्यांचा जन्म - मृत्यु कुठे झाला ?* हा विवादाचा विषय आहे. अर्थात *कालिदास हे काल्पनिक पात्र आहे,* हे समजून घेणे गरजेचे आहे.

         चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांचे शिलालेख हे *"धम्म (ब्राम्ही) लिपी"* हा इतिहास सांगत असतांनाच *"पाली प्राकृत भाषा"* बोलीभाषा असल्याचाही तो पुरावा देतो. त्यानंतर भारतात अस्तित्वात *"गुप्त लिपी / कुटिल लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / देवनागरी लिपी / तेलगु लिपी / कन्नड लिपी / तामिळ लिपी / ग्रंथ लिपी / मध्यवेशी लिपी / ग्रंथ लिपी / मल्याळम लिपी / कलिंग लिपी / पश्चिमी लिपी / खरोष्टी लिपी ) चित्र लिपी / शंख लिपी / शाहमुखी लिपी / मोडी लिपी / उर्दु लिपी"* ह्या कालानुरूप उदयास आल्यात.  *"पाली प्राकृत भाषा"* हिची लिपी ही *"धम्म लिपी"* होती. पुढे पाली भाषा ह्यावर संस्कार होवुन *"हिब्रू संस्कृत भाषा"* (तिसरी बुद्ध सांगिती - पहिली शती) हिचा उगम झाला. *"हिब्रू संस्कृत भाषेची"* लिपी मात्र *"धम्म लिपी"* हिच होती. *"पाली भाषेवर संस्कार"* होण्याची कारणे ही बुध्द धम्म हा *"महायान - हिनयान संप्रदायात विघटन"* होणे असण्याची शक्यता आहे. आता अस्तित्वात असलेली *"संस्कृत भाषा"* ही *"क्लासिकल संस्कृत"* असुन लिपी ही *"देवनागरी लिपी"* आहे. *"हिब्रू संस्कृत भाषा"* हिच्या उदयानंतर इसवी ६ - ७ व्या शतकात *"अपभ्रंश भाषा"* ही जन्माला आली. तर इसवी १२ व्या शतकात *"आदी हिंदी भाषा"* ही व्यवहारात आली. *"सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदी हिंदी होय,"* हे समजून घेणे फार गरजेचे आहे. *"उर्दू भाषा"* ही इसवी १६४५ ला जन्माला आली‌. *"देवनागरी लिपी"* ही इसवी ११०० मध्ये *"प्रथम प्रारुप"* स्वरुपात जन्माला आली असली तरी इसवी १७९६ ला *"व्यवहारात"* आली. तर *"आधुनिक हिंदी भाषा"* ही इसवी १८ व्या शतकात उदयास आली. आणि आधुनिक हिंदी भाषा लिपी ही *"देवनागरी लिपी"* होती.

          मराठी भाषा संदर्भ इतिहासाचा पहिला शिलालेख *इसवी ७०५* सालचा पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे"* येथे सापडला आहे. दुसरा शिलालेख हा *इसवी १०१२* सालचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका *"अक्षी"* ह्या गावी सापडला. तिसरा शिलालेख *इसवी १०१८* सालचा सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* येथे सापडला. चवथा शिलालेख *इसवी १०३९* सालचा कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळा"* येथे सापडला. मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्याकरीता *"२००० वर्षांचा इतिहास "* असणे गरजेचे असल्यामुळे *"सातवाहन बौध्द काळातील नाणेघाट शिलालेख"* हा संदर्भ आधार घ्यावा लागलेला आहे.‌ अर्थात सरते शेवटी *"तमाम मराठी साहित्यिकांना बुध्द संस्कृतीच्या पायाशीचं लोळण"* घ्यावी लागलेली आहे. आणि अभिजात मिळण्याकरीता *"ब्राह्मणी लोळण"* हा इतिहास झालेला आहे. परंतु *"बुध्द - आंबेडकरी"* म्हणवुन घेणारी काही *"साहित्यिक वर्ग"* हे *"ब्राह्मणी धारेच्या पायाशी लोटांगण"* घालीत असल्यास (?) आम्ही त्याला काय म्हणावे ? मराठी भाषेचे *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी "* असे पोट प्रकार ही दिसुन येतात. मराठी साहित्य महर्षी / आद्य कवि - शिंपी जातीचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते २/१२/१२९६) / संत नामदेव महाराज परिवारातील *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०) / महार जातीचे *संत चोखामेळा* (१२७३ ते १३३८) ही आपली तीन मान्यवर जेष्ठ संत असतांनाच *"१२ व्या शतकातील"* ब्राह्मणी व्यवस्था धारक *मुकुंदराज / संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/२/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांचा उदो उदो करण्यात आला. ह्याशिवाय सोनार जातीचे *संत नरहरी सोनार* असो वा / संत चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा* / ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज*/ वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०१/१६०८  ते १९/०३/१६५०) ही सर्व संत मंडळी पंढरपूरच्या *"विठ्ठल / बुद्ध"* ह्याला शरण गेलेली असल्यामुळे त्यांचा इतिहास हा दाबला गेला आहे. ब्राह्मणी व्यवस्थेचे - *संत रामदास स्वामी* (१६०८ ते १६८२) ह्यांचा उदो उदो करुन *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु असल्याचा खोटा इतिहास रचला गेला. संत रामदास स्वामी परिवारातील वयाने मोठे असलेले *संत एकनाथ महाराज* मात्र वंचित राहिले आहेत. वास्तविकत: *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु *संत तुकाराम महाराज* होते, हे समजून घेणे गरजेचे आहे. बुध्द - आंबेडकरी म्हणविणाऱ्या तथाकथित साहित्यिक वर्गाची *"ब्राह्मणी लोळण लाचारी"* ही कधीपर्यंत राहाणार आहे ? आम्ही साहित्य संशोधन लिखाण याकडे वळणार आहोत की नाही ? अशी बरीच प्रश्न आहेत. तेव्हा उत्तराच्या प्रतिक्षेत !!!

    जय भीम ! जय संविधान !! जय बुद्ध !!!


----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक २० जुन २०२५

Tuesday, 17 June 2025

🌹 *ह्या निस्सिम प्रेमाची ...!*
       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
        मो. न. ९३७०९८४१३८

ह्या निस्सिम प्रेमाची
मोहक कळी फुलली अशी तु
त्यामध्ये शुद्ध मन दिसे मला गं
विविध रंगात आलीस जगात तु
सुंदर फुलांमध्ये यौवन तुझे हे
मधु गंधाचा फुलोरा फुलवुनी
तुझ्या गंधाचा आस्वाद घेण्या हा
निसर्ग जगात आलो असा मी...

ह्या निष्पाप फुलपाखरांचे 
विविध रंगी फुलांवर बसणे हे
निस्सिम प्रेमाची साक्ष देतांना
भुंग्यांला तुझ्या प्रेमाचा हेवा झाला
भुंगा तुझ्या सभोवताल घुटमळुन
कर्कश आवाज करता झाला
परंतु फुलपाखरांच्या शांत मनाने
तो तुझ्या मनाचा राजा झाला...

निसर्गाच्या मधु चक्रात हे
पृथ्वीवर बुद्धाचा जन्म झाला
प्रेम मैत्री शांती करुणा वदुनी
धम्मचक्र प्रवर्तन आकार आला
हे जम्बुद्विप बहुजन समाज ही
बुध्द दिशेने परीवर्तीत झाला
बहुजन हिताय बहुजन सुखाय 
श्वेत धाग्याचा सम्यक वाली झाला ...

----------------------------------------
नागपूर दिनांक १७ जुन २०२५

Sunday, 15 June 2025

 👺 *मृत्युच्या क्षणाचा (?) माझ्या जीवनातील जीवघेणा अनुभव ....!* (डॉ‌ बी आर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र आणि मुंबई प्रवास कार अनुभव)

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


        *"एयर इंडिया फ्लाईट AI171 बोईंग ड्रीमलाइनर अहमदाबाद लंडन"* ह्या विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटांत ते विमान कोसळुन आगीच्या ज्वालात २४१ प्रवासींचा मृत्यु झाला. अशीच *"माझ्या बालपणी"* ५० - ६० वर्षांपूर्वी नागपुरात झालेली *"नागपुर फ्लाईंग क्लबचे शिकावु विमान दुर्घटना"* मला आठवली. आम्ही लहान मुले ही गच्चीवर खेळत असतांना झालेली *"शिकावु विमान दुर्घटना"* आम्ही प्रत्यक्ष बघितली आहे. पुढे *"नागपूर फ्लाईंग क्लब"* ह्या ठिकाणी माझ्या कंपनीला काही काळाकरीता *"एम्प्लॉइज सर्व्हिस प्रोवायडर"* म्हणुन काम मिळाले होते. अश्या विमान दुर्घटना ह्या आधी ही ब-याच झालेल्या आहेत. *"परंतु त्यापासुन आपण काही शिकावे ?"* चुक सुधारावी ही मानसिकता माणुस प्रवृत्तीची दिसुन येत नाही. पुनश्च असे दु:खद अपघात होणार आहेत. *"काही मानवी चुकांमुळे तर काही तांत्रिक चुकांमुळे !!!"* ही अपघात परंपरा / मृत्यु तांडव परंपरा पुढे ही सुरुच राहाणार आहे. ह्या घटनेने मला माझ्या जीवनातील काही जीवघेण्या घटनांची आठवण झाली. *"डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु (म. प्र.)"* येथे दरवर्षी *"राष्ट्रिय सेमिनार"* त्याकरीता मला बोलावणे येत असे. सदर सेमिनारला माझा कधी *"इंदुर येथे विमान प्रवास"* असे. तर कधी ट्रेनचा प्रवास असे. इंदुर येथुन महु येथे जाण्याकरीता आमच्या करीता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ ह्यांची कार ही उभी असायची. मग *"विद्यापीठ गेस्ट हाऊस"* येथे आमचा हा मुक्काम असायचा. बरेचदा मी माझ्या *"कारने"* ही माझ्या परिवारा समवेत महु येथे गेलेलो होतो. कार हा माझा ड्रायव्हर चालवीत असे.

           डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु ह्याचा सन २०१४ ह्या साली *"सुवर्ण महोत्सव"* असल्याने विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु *डॉ आर. एस. कुरील* साहेब आणि विभागाध्यक्ष *प्रा. डॉ ‌ सी. डी. नायक* ही माझ्याकडे आलीत. त्या मान्यवरांना महु विद्यापीठात *"तथागत गौतम बुद्ध / बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर"* ह्यांची मोठी मुर्ती ही बसवायची असल्यामुळे आम्ही मुर्ती विकत घेण्यासाठी दीक्षाभुमी येथील बौध्द मेळाव्याला गेलो‌. *"बुध्द / बाबासाहेब"* ह्यांची मुर्ती विकत घेतल्यानंतर सदर मुर्ती ही *माझ्या घरी"* ठेवण्यात आली. आणि मला त्या दोन्ही मुर्तींना महु येथे पोहचविण्याची जबाबदारी ही देण्यात आली. डॉ कुरील साहेब मला म्हणाले की, *"तुम्ही उद्या एखादे वाहन करुन महु येथे यावे."* मला कारचा प्रवास हा अनुभव होता. मी डॉ कुरील साहेबांना म्हणालो की, चार चाकी वाहनाने मी सकाळी १० वाजेपर्यंत महु येथे पोहचणारचं, ह्यांची शास्वती नाही. आणि मुर्तींचे अनावरण होणे मग फार कठिण आहे. मी ट्रेन मार्गे महु येथे येणे उचित होईल. आमचे हे बोलणे झाल्यावर *डॉ कुरील साहेब / डॉ नाईक साहेब* ह्यांना माझ्या कारने नागपूर एयर पोर्ट वर सोडुन मी माझ्या कामाला लागलो. रेलची चार तिकिटे काढली. तिकिट वेटींग होते. माझ्या सोबतीला होते *सुर्यभान शेंडे / शंकरराव ढेंगरे / अधिर बागडे.* परंतु इंदुर ह्या ट्रेन मध्ये नागपूर करीता *"व्ही.आय.पी."* सीट ही राखिव नव्हती. मध्य रेल्वे प्रबंधक (DRM) ह्यांचे खाजगी सचिव (PS) *पृथ्वीराज डोंगरे / हरीश पाटील"* हे माझे मित्र आहेत. सदर दोघांनी मुंबई ला मेसेज करुन आमची तिकिटे ही कंफर्न केली. आणि आम्हाला निरोप देण्याकरीता मध्य रेल्वेचा ५ - ६ स्टाफ हा उपस्थित होता. प्रवास सुखकर झाला. सकाळी ६ वाजता आम्ही इंदुरला पोहचलो. इंदुर रेल्वे स्थानकावर आमच्या स्वागताला महु विद्यापीठातील काही स्टाफ आणि बस ही उभी होती. सदर बुद्ध / बाबासाहेब मुर्ती अनावरणाला मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री *शिवराज सिंग चव्हाण* / भारत सरकार योजना आयोगाचे सदस्य *डॉ नरेंद्र जाधव* आदी मान्यवर आम्ही उपस्थित होतो. अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु येथे बसविण्यात आलेल्या बुद्ध / डॉ बाबासाहेब आंबेडकर मुर्तीचा हा इतिहास आहे.

            सदर *"महु सुवर्ण महोत्सव"* कार्यक्रम होण्याच्या एक वर्षापूर्वी महु (मप्र) येथे *"राष्ट्रिय सेमीनार"* चे मला निमंत्रण होते. माझ्या कारने जाण्याचे आम्ही मित्रमंडळीनी ठरविले. परंतु माझा ड्रायव्हर हा *"सुट्टीवर"* होता. आणि मी नुकतेच ड्रायव्हिंग शिकलेलो होतो. ड्रायव्हर नसल्याने मी कारने महु येथे जावु नये, असा घरचा निरोप होता. मित्र ही ड्रायव्हिंग करतील असे घरच्यांना सांगुन आम्ही महुकडे निघालो. परंतु मित्रांना ड्रायव्हिंगचा अनुभव नसल्याने *"मलाच ड्रायव्हिंग जबाबदारी"* ही पार पाडावी लागली. आम्ही महु (मप्र) येथे सकाळी सुखरुप पोहचलो. सेमिनार छान झाले. परतीच्या वेळी *"चिखलदरा"* जाण्याचा आमचा प्लॉन बनला. मी नवशिक्या ड्रायव्हर होतो. चिखलदरा - इंदुर मार्ग हा सिंगल रोड होता. आणि *"चिखलदरा पर्वतावर"* माझी कार ही बंद पडली. खाली तर मृत्यू खाई होती. *"कार चालु केल्यावर ती चढावावरुन रिव्हर्स जायला लागली."* काही क्षण शिल्लक होते. *"आम्हाला खोल दरीमध्ये मृत्युला आहुती देण्याचे !"* परंतु कार कशीबशी ही पुढे सरकली. आम्ही मृत्युच्या उंबरठ्यामधुन बाहेर निघालो. चिखलदरा पोहचलो. एक दिवस मुक्काम केल्यावर आम्ही परतवाडा दोन पदरी मार्गे नागपुरला पोहचलो. सदर घटना आज ही विसरलेलो नाही. माझ्या जीवनात असा घटना अनुभव बराच आहे. असाच एक अन्य अनुभव *"बाळासाहेब ठाकरे समृध्दी मार्ग प्रवासाचा"* आहे.*" मुंबई - पुणे - नासिक"* रात्रीचा प्रवास समृध्दी मार्गाने *"मी / इंजी. विजय बागडे / डॉ. उमाजी बिसेन"* करीत होतो. तसे बघितले तर *"समृध्दी मार्गे आमचा हा रात्रीचा प्रवास"* बराच वेळा झालेला आहे. परंतु एकदा समुध्दी मार्गावरून *"कारनी रात्रीचा प्रवास"* करतांना कारमध्ये काही खडखड आवाज यायला लागला. म्हणुन ड्रायव्हरनी गाडी एका साइडला थांबवुन तो आवाज शोध घेण्याचा प्रयत्न केला. *रात्रीच्या सुनसान क्षणी* दोन अनोळखी व्यक्ती आमच्या कारजवळ आले. काही विचारपुस ती करायला ही लागले. अर्थात ती गुंडांची *"लुटपाट टोळी"* असण्याचा बोध होत होता. ड्रायव्हर हा धोका कळुन चुकला. कार सुरु करुन पेट्रोल पंप जवळ पोहचुन कार मध्ये येणारा तो आवाज बघितला. पेट्रोल पंपावरील रेस्टारेंटमध्ये चहा घेवुन आम्ही मुंबई दिशेने निघालो होतो. एकंदरीत आपल्या जीवनात असे अनुभव येत असतात. अनुभव हे माणसाला नविन शिकायला सांगत असतात.


------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक १५ जुन २०२५

Friday, 13 June 2025

 🌹 *बौध्द साहित्यातील प्रेम संदर्भाने साहित्य जगताला एक नविन दिशा दिली ...!*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


             बौध्द साहित्यातील प्रेम संदर्भ आणि मानवी मनातील प्रेम संदर्भ ही भिन्न भिन्न भाव आहेत. बौध्द साहित्यातील प्रेम आयाम हे मानवी मुल्य निगडीत आहे. *"बुध्द तत्वज्ञानाची निव ही प्रेम, मैत्री, अहिंसा, शांती, करुणा ह्या विचाराशी निगडित आहे. आणि त्याला प्रेम आयामाने एकमेकांशी जोडलेले आहे."* आरोग्य आणि आनंदासाठी स्वतःवर प्रेम करणे हे फार सोपे असते. *"प्रेम ही एक शक्तिशाली, सकारात्मक उर्जा आहे. जी शरीर आणि मन यांच्यातील निरोगी संतुलनासाठी आवश्यक ही आहे."* इतर व्यक्तीचे प्रेम ओळखणे हा तर सहज विषय नाही. *"बुध्द साहित्यातील प्रेम संदर्भ हा प्रामाणिक अंतर्मनाचा साद घालीत असतो. आणि हा सौंदर्यशास्त्र ह्याचा एक भाग आहे."* बुध्द साहित्यामध्ये *"नैतिकवाद"* ह्या आयामाला अन्योन्य महत्व असुन *"भोगवाद"* ह्याला थारा नाही. *"कालीदास साहित्य"* खरे तर अनैतिक वादाकडुन भोगवाद विषयाकडे गेलेले दिसुन येते. आणि *कालीदास* ह्याच्या जन्म-मृत्युचा इतिहास एक कोडे आहे. अर्थात कालीदास हे काल्पनिक पात्र आहे, असे ही म्हणता येईल. *"आंबेडकरी साहित्य"* हे तर बुध्द साहित्य विचारातुनचं निर्मित झालेले आहे. *डॉ बाबासाहेब आंबेडकर* ह्यांना व्यवस्थेनी दिलेली वेदना आवाहने ही सर्व परिचीत आहेत. परंतु बाबासाहेबांनी व्यवस्थेशी बदला घेतलेला नाही. बुध्द मैत्री भावनेची पहाट फुलविली होती. *चक्रवर्ती सम्राट अशोक* ह्यांनी पुनर्जीवित केलेले *"बुद्ध धम्म शासन"* ह्याला बाबासाहेबांनी पुनश्च रोपन केले आहे. सिध्दार्थ गोतम बुध्द हे *"महाकारुणिक बुद्ध"* झाले. चक्रवर्ती सम्राट अशोक हे तर जंबुद्वीपात *"देवानाम पिय"* झाले. आणि बाबासाहेब हे *"मैत्रेय बुद्ध"* झाले.

           प्रेम आयाम ह्या गंभीर विषयावर विशेष चर्चा करतांना *"आचार्य रजनीश ते ओशो रजनीश"* असा हा व्यक्ती विषय *कालिदास* ह्या सारखा काल्पनिक विषय नाही. बुध्दांनी आपले वारीश हे संघाला मानले. ओशो रजनीश ही अगदी त्याच मार्गाने गेले. आचार्य रजनीश ह्यांचे पुस्तक *"संभोग से समाधी तक"* हे खुप चर्चीत झाले होते. बरीच मान्यवर सुध्दा *"रजनीश शिष्य"* झालीत. काही शिष्य ही माझ्या परिचीत होती. एका शिष्याने बुध्द - आंबेडकराचा मार्ग सोडुन *"रजनीश मार्ग"* हा पत्करला होता. तो एक चांगला लेखक होता. त्यानी *"रजनीश विचाराशी निगडीत"* बरीच पुस्तके लिहिली. त्या रजनीश शिष्याच्या पुस्तकाला स्वतःला बुध्द - आंबेडकरी म्हणणा-या एका नामांकित प्राध्यापकाची प्रस्तावना होती. तो रजनीश शिष्य एकदा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की, *"मी त्याच्या पुस्तकाच्या विमोचनात प्रमुख अतिथी व्हावे."* मी मात्र त्या रजनीश शिष्याच्या पुस्तकाला प्रमुख अतिथी होणे नाकारले. कारण रजनीश हा विषय माझ्या बुध्दीला पटलेला नव्हता. कालीदास आणि रजनीश ह्यांच्या लिखाणावर भाष्य काय करावे ? *ओशो रजनीश* ह्याला भारतात विरोध सुरू झाला. *ओशो रजनीश ह्यांनी अमेरिकेत आश्रय घेतला.* रजनीश सोबत होती पर्सनल सेक्रेटरी *मां शीला आनंद.* ह्या पुर्वी रजनीश ह्यांची खाजगी सचिव होती *मां लक्ष्मी*. परंतु मां शीला आनंद ही मां लक्ष्मी हिला दुर सारण्यात सफल झाली होती. हा इतिहास शब्द मर्यादेमुळे आटोपता घेतो. ओशो रजनीश ह्यांचे सर्व काही व्यवहार सुत्रे मां शिला आनंद हलवीत होती. मां शिला आनंद हिने अमेरिकेतील *"ओरगान"* शहरालगत जंगलातील ६२००० एकर जमिन *"ओशो फाऊंडेशन"* ह्या पैश्यातुन विकत घेवुन *"रजनीशपुरम्"* शहर वसविले. *"सेवेमध्ये होती ९६ रोल्स राईस लक्झरी कार आणि एक जेट विमान."* परंतु काही कारणे झालीत. ओशो रजनीश ह्यांना अमेरिका देश सोडावा लागला. *मां शीला आनंद* हिला जेल झाली. रजनीश - शीला ही विभक्त झालीत. *रजनीश* ह्यांनी भारतामध्ये पाय ठेवल्यावर ओशो रजनीश म्हणाले होते की, *"मी बुध्दाच्या धरतीवर पाय ठेवीत आहे."* मुलत: ओशो रजनीश हे *"तेरा पंधी जैन"* होते. *शीला आनंद* हिचा इतिहास ही अलग होता. अमेरिकी *मार्क हेरीस सिल्वरमेन* हे शीलाचे पहिले पती होते‌. मार्क ह्यांचा मृत्यु झाल्यावर रजनिश शिष्य *जॉन शेल्फर* ह्यांच्या सोबत शीला हिनी दुसरा विवाह केला. अमेरिकेत शीला ही जेलमधुन सुटल्यानंतर स्वीस नागरीक *उर्स बिर्नास्टील* ह्यांच्या सोबत शीला हिने तिसरा विवाह केला. *शीला आनंद* ही ओशो रजनीश ह्यांच्यापासुन अलग झाल्यावर ही, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाली की, *"ओशो हे माझे गुरु आहेत. मी ओशोवर आज ही प्रेम करते."* परंतु ओशोची विचारधारा *"संभोग से समाधी तक"* ह्यामुळे शीला आनंद ही *"एड्स"* ह्या रोगामुळे मृत्युला प्राप्त झाली. बुध्दाच्या अष्टांग मार्गातील *"समाधी"* (Concentration) ही सम्यक मार्ग दाखविणारी आहे. तर ओशो रजनीश ह्यांची *"समाधी"* ???  हा विवाद विषय. *"विपश्यना"* (Meditation) हा अलग विषय आहे. मग *ली होंगजी* ह्यांची फालुन दाफा असो वा फालुन गोंग साधना. सांगावयाचे असे की, *"आपण कोणत्या मार्गाने जात आहे, ती दिशा समजुन घेणे गरजेचे आहे."*

             *"प्रेम"* (Love) हा व्यापक विषय आहे. सोप्या सरळ भाषेत मानवी दृष्टिकोनातून *"प्रेम म्हणजे दुस-या व्यक्तीबद्दल / प्राणी / वस्तु बद्दल तीव्र आकर्षण - भावनिक आसक्ती / काळजी / जवळीक / संरक्षण / आकर्षण / आपुलकी / विश्वास"* ह्या संदर्भाचा समावेश होतो. प्रेमाची काही रुपे ही आहेत. जसे की - *रोमॅंटिक प्रेम* (लैंगिक आकर्षण - भावना आधारित) / *मित्र प्रेम* (मैत्री - विश्वास - सहकार्य आधारित) / *कुटुंब प्रेम* (कौंटुबिक आपुलकी - काळजी) / *स्नेह* (व्यक्ती - वस्तु प्रती स्नेह भाव) / *परोपकार* (इतरांना मदत करणे - कल्याणकारी भावना). प्रेमाची काही गुणधर्म ही दिसुन येतात. जसे की - *आत्मियता* (जवळीक - विश्वास) / *उत्कटता* (तिव्र प्रेम भावना) / *बांधिलकी* (नाती जपणे). तसे बघितले तर *प्रेम* हे मानवी जीवनात खुप आवश्यक विषय आहे. सिध्दार्थ हे गोतम बुध्द बनण्यापुर्वी *"राजकुमार सिध्दार्थ - यशोधरा"* ह्यांंचे निस्सिम प्रेम संदर्भ / यशोधरा हिचा त्याग - जबाबदारी हा सहज असा विषय नाही. *आम्रपाली* हिचे वैशालीची नगरवधु बनने / *"आम्रपाली - सम्राट बिंबीसार"*  ह्यांचे निस्सिम प्रेम / देश प्रेमासाठी त्या दोघांचे वियोग होणे, हा प्रेम संदर्भ समजुन घेणे गरजेचे आहे. *महात्मा ज्योतिबा फुले - सावित्रीबाई* ह्यांच्या अंतर्मन प्रेमाचे आम्ही कधी मुल्यमापनचं केले नाही. हाच प्रश्न *बाबासाहेब डॉ आंबेडकर - रमाई* ह्यांच्या अंतर्मन प्रेमाचा आहे. त्यांच्या त्यागाचे केवळ बखाणचं गायिले गेले. परंतु कृतीशीलता शुण्य राहीली. *"साहित्य लिपी - भाषा उगम"* हे बुध्द विचार आहेत. ह्याबाबत हवे तसे संशोधन - प्रसार - प्रचार हा कधी झालाचं नाही. कुकुरबिटा सारखे लिखाण रचल्या गेले. *बुध्द - आंबेडकरी साहित्याला फक्त "विद्रोह - नकार" ह्या सिमित करण्यात आले.*  बुध्द  - आंबेडकरी साहित्यातील *"सौंदर्यशास्त्र - नैतिक वाद - मानवतावाद - प्रेम भाव"* इत्यादी अहं शोधण्याचा कां प्रयास केला नाही ? हा माझा प्रश्न आहे. भोमणगिरी साहित्यिकांची लाचारी स्विकारण्यात आली.  *आचार्य अश्वघोष* ह्यांचे एका कन्येशी प्रेम होणे - वियोग झाल्यानंतर *"उर्वशी वियोग"* नाटक लिहिणे हा भावनेचा विषय असला तरी, *"बुध्द साहित्याने आपली नैतिकता"* जोपासलेली आहे. इसवी १० व्या शतकानंतरचे *वैदिक युग* हे अनैतिकता युग होते. *"भोगवाद"* युग होते. *"वैदिक युगातील साहित्याने"* -  भोगवाद / अनैतिकता वाद / भ्रष्टाचार / धोकादारी / अविश्वास ह्या सर्व सीमा पार केलेल्या दिसुन येतात. प्रेम संदर्भ हे बदललेले आहेत. अर्थात अध:पतनांचे राज्य !!!


-----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर, दिनांक १३ जुन २०२५

Tuesday, 10 June 2025

 🇮🇳🤝 *भारतीय संविधान की मुल संरचना संदर्भ में सर्वोच्च न्यायालय और संसद इनके बीच उभरा हुआ संविधान अधिकार विवाद !*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


           *"भारत का संविधान"* (Constitution of India) यह मुलत: नागरिकों के *"मुलभुत अधिकार"* (Fundamental Rights) तथा *"मार्गदर्शक तत्व"* (Directive Principles) इन दो पहियों पर खडा है. सर्वोच्च न्यायालय द्वारा *"केशवानंद भारती"* (१९७३) इस केस ने, *"मुल सरंचना"* (Basic Structure) को संसद छेड नहीं सकती, यह निर्णय १३ न्यायाधिशों के पीठ ने, *"७ विरुध्द ६"* बहुमत से दिया था. तत्कालीन सरन्यायाधीश *एम. एस. सिकरी* इनकी अध्यक्षतावाली १३ न्यायाधीश खंडपीठ मे थे - *जे. एम. शेलत / के. एस. हेगडे / ए. एन. ग्रोवर / ए. एन. रे / पी जगमोहन रेड्डी / डी. जी. पालेकर / एच. आर. खन्ना / के. के. मैथु / एम. एच. बेग / एस. एन. द्विवेदी / बी. के. मुखर्जी / वाय. वी. चंद्रचुड.* और केशवानंद भारती केस रही - केशवानंद भारती केरल के एक हिंदु मठ के पुजारी थे. उन्होंने *"केरल भुमी सुधार अधिनियम "* को चुनौति दी थी. उनका कथन था कि, *"धार्मिक संस्थानो की संपत्ती को सरकार द्वारा अधिग्रहण नहीं किया जा सकता."* सर्वोच्च न्यायालय में ६८ दिन चले सुनबाई में, सर्वोच्च न्यायालय द्वारा बहुमत में अपने निर्णय में कहा कि, *"संसद को संविधान में संशोधन करने का अधिकार है. लेकिन संसद को संविधान के मुल सरंचना (Basic Structure) को बदलने की कोई अनुमति नहीं देता है."* अत: न्यायालय का वह निर्णय संसद के लिये *"गले का फासं"* बन गया है. अत: *"मुल संरचना"* (Basic Structure) क्या है ? यह भी एक विवादीत प्रश्न बन गया है. उपराष्ट्रपती *जगदीश धनकड* भी उसी विवादित प्रश्न पर ही उंगली रखकर, *"न्याय व्यवस्था"* पर आरोप करते रहे है. शायद *"नरेंद्र मोदी सरकार* को खुश कर, जगदीश धनकड राष्ट्रपति बनने के सपने देख रहे है. *"संविधानिक पद"* पर बैठे हुये *जगदीश धनकड* की वह कृति - *"संविधान पर बलात्कार"* समान दिखाई देती है, जो बहुत ही निंदनीय भाष्य है.

          भारतीय संविधान की *"मुल संरचना"* क्या है ? इस अंतरंग में जाने के पहले, सर्वोच्च न्यायालय द्वारा दिये गये और कुछ खास केस निर्णय भी महत्वपूर्ण है. *एस. आर. बोम्मई केस* (१९९४) / *इंदिरा नेहरु गांधी* विरुध्द राजनारायण (१९७५) / *मिनर्वा मिल्स* विरुध्द भारत संघ (१९८०) / *शंकरी प्रसाद केस* (१९५१) / *गोलक नाथ* विरुद्ध पंजाब राज्य (१९६७) / *वामनराव* केस (१९७१) / *२४ वा संविधान संशोधन* (१९७१) / *४२ वा संविधान संशोधन अधिनियम* (१९७६) यह उपरोक्त प्रमुख केस है. परंतु शब्द मर्यादा के कारण इन केस पर, हम फिर कभी चर्चा करेंगे. मेरी *"डॉक्टर उपाधी"* मिलने के बाद, मैने *"लोक प्रशासन / उद्द्योग प्रशासन / कानुन / संविधान / समाजशास्त्र / डॉ आंबेडकर / गांधी / बुध्दीझम / साहित्य / कला / इतिहास / अर्थशास्त्र / राजनीति"* आदि विषयों पर अध्ययन किया है. *"मेडिकल ऑफिसर"* भी रहा हुं. अत: उन तमाम विषयों के अध्ययन ने, मुझे एक नयी दिशा प्रदान की. जो भारतीय व्यवस्था से जुडे विषय है. भारत के *सरन्यायाधीश* बनने के बाद *भुषण गवई* इनका मुंबई दौरे का यह बयाण मुझे बहुत अच्छा लगा. सरन्यायाधीश *भुषण गवई* ने कहां कि, *"कार्यपालिका (Executive) / न्यायपालिका (Judiciary) / विधायिका (Legislature) यह तिनों व्यवस्था एक समान ही है. यहां कोई बडा और कोई छोटा नहीं है. भारत का संविधान (Constitution) ही यह सर्वोच्च है."* महाराष्ट्र शासन की ओर से *"सरन्यायाधीश प्रोटोकॉल"* पालन ना होना, वह जातीयवादी नालायकी का एक प्रमाण है. वंचित आघाडी के *एड. प्रकाश आंबेडकर / सुजित आंबेडकर* समान मुर्ख नेता लोग क्या कहते हैं ? वह मायने नहीं रखता. कभी कभी हमें लगता भी है कि, *प्रकाश आंबेडकर* इनके वकिल बनने के बाद, *प्रकाश आंबेडकर* इनको सामाजिक क्षेत्र मे *"सबसे पहले परिचीत"* कराना / नागपुर में *"पहला जाहिर सत्कार समारोह"* लेना, यह हमारी बहुत बडी भुलं थी. आज से चालिस साल पहले *डॉ. आनंद जीवने* इनकी अध्यक्षता में ही हमने, *"धनवटे रंगमंदिर"* मे जाहिर सत्कार समारोह किया था. हाथी पर बिठाकर बहुत बडी *"रॅली"* का सफल आयोजन किया था. हमने *प्रकाश आंबेडकर* इनसे जो अपेक्षा रखी थी, वे उन दिशा की ओर कभी बढें ही नहीं !!! यही नहीं *"दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया"* (TBSI) इसकी *"स्कीम"* (दुसरी बॉय लॉज) यह *हरिष मजगौरी* इन्होने मेरे स्टडी रुम में बैठकर ही लिखी थी. हरिष मजगौरी ये मेरे मम्मी के बुवा के लडके थे. हरीश मजगौरी भी *"TBSI के ट्रस्टी"* थे. तत्कालीन राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ. स. वि. रामटेके* भी कभी कभी मेरे घर आते थे. कहने का तात्पर्य यह कि, मैं बचपन से ही *"आंबेडकरी आंदोलन"* को देखते आया हुं. इसके साथ ही बाबासाहेब के बॉडीगार्ड रहे मेरे मामा *दिपकचंद फुलझेले / आकांत माटे / सदानंद फुलझेले* इनसे भी डॉ बाबासाहेब के सहवास विचार की जाणकारी मुझे मिलती रही.

         भारतीय संविधान का *"बुनियादी (मुल) तत्व"* (Basic Structure) क्या है ? वास्तव में यह प्रश्न ही उपस्थित करना *"बिन-अकल के सामने बिन बजाना समान ही विषय है ."* हमारे भारतीय संविधान में - *"संघीय संरचना / लोकतंत्र / धर्मनिरपेक्षता / कानुन का शासन / स्वतंत्र और निष्पक्ष चुनाव / न्यायिक समिक्षा"* आदी बुनियादी विषय यह सम्मिलीत है. अगर संसद में बिन-अकल / अनपढ / गुंडेगिरी व्यक्ति / भ्रष्टाचारी लोग जाते हो तो, हम *"विकास भारत"* का विचार कभी नहीं रख सकते. *बाबासाहेब डॉ आंबेडकर* इन्होने २५ नवंबर १९४९ को *"संविधान सभा"* (Constituent Assembly) में दिये गये भाषण की मुझे याद आ गयी. बाबासाहेब कहते हैं - *"संविधान यह कितना भी अच्छा हो, उसे अमल में लाने की जिम्मेदारी जीन पर है, वे लोग अप्रामाणिक हो तो, संविधान यह बुरा हो जाएगा. तथा संविधान यह कितना भी बुरा हो, उसे अमल करने की जाणकारी जीन पर है, वे लोग प्रामाणिक हो तो, संविधान यह अच्छा होने वाला है."* प्राचिन अखंड भारत (जंबुद्वीप) का *चक्रवर्ती सम्राट अशोक* इनके शासन काल के बाद, इसवी १० वी शती से *"वैदिक युग"* -  गद्दारी / धोकादारी का युग शुरु हो गया है. आज के ज्यादातर सत्ताधारी ऊनके ही वारिस दिखाई देते है. उपराष्ट्रपती *जगदीश धनकड* यह तो, *"संविधान बलात्कारी पुरुष"* दिखाई देता है. कांग्रेस के पितामह *मोहनदास गांधी* / संघवादी नायक *के सुदर्शन* / प्राचीन विचारविद *भर्तृहरी* इनके शब्दों में तो, *"भारतीय राजनीति यह वेश्यालय है."* अर्थात नेता लोग *"वेश्या"* हो गये है नां !!! अत: ऐसे नेताओं से *"समृध्द भारत"* की, क्या अपेक्षा करे ? इनकी मानसिकता *"बुरे विचारों की हो"* तो, उन्हे *"भारतीय संविधान"* में दोष दिखेगा ही !!! भारत के पडोसी देश - *"नेपाल / म्यानमार / बांगला देश / श्रीलंका / पाकिस्तान"* आदी देशों के शासन स्थिती का बोध करे तो, *"भारत के संविधान"* की महत्तता दिखाई देगी. लेकीन *"सम्यक बुध्दी"* होना भी जरुरी है.

             जब मैं *"कानुन की पढाई"* कर रहा था, तब हमारे प्राध्यापक *"भारतीय कानुन का लचीलापन तथा कानुन की कठोरता"* इस विषय पर भाष्य करते थे. अर्थात *"भारतीय संविधान"* को समझना इतना सहज भी नहीं है. संविधान के *"मार्गदर्शक तत्व "* (Directive Principles) की रक्षा के लिये / कभी कभी तो, *"मुलभूत अधिकारों"* (Fundamental Rights) का भी संशोधन किया जा सकता है. परंतु वह दोनो भी *"भारतीय संविधान रथ"* के दो पहिये है. *"सर्वोच्च न्यायालय"* यह *"भारतीय संविधान"* की कस्टोडियन है. *"वॉच डॉग"* है. भारत के सरन्यायाधीश *भुषण गवई* इनका मुंबई का उपरी पॅरा कथन मुझे बहुत अच्छा लगा. हमारे तिनो व्यवस्था में - *"कार्य पालिका (Executive) / न्यायपालिका (Judiciary) / विधायिका (Legislature)"* में गुणवत्ता प्राप्त / प्रामाणिक / देशभक्त आदी गुणवान लोगों का अभाव है. *"ऐसा विषय भी नहीं है कि, गुणवान लोगों की भारत में कमी है."* प्रश्न यह कि, भारत भ्रष्टाचार में लिप्त हो चुका है. *"भारत देशभक्ती"* दिखाई नहीं देती. *"मेरीट धारक"* पर सदियों से अन्याय होता आ रहा है. भारत आजादी के ७५ साल होने पर भी, *"भारत राष्ट्रवाद मंत्रालय / संचालनालय"* नहीं बन पाया है. ना ही बजेट कोई आर्थिक प्रावधान रहा है. आदमी की पहचान *"जाति - धर्म"* से होती है. ना कि नागरिकता *"भारतीय"* बनकर !!!


------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपुर दिनांक १० जुन २०२५

Saturday, 7 June 2025

 🌞 *आंबेडकरी बाप : ह्या प्रा. शुक्राचार्य गायकवाड स्तुतीसुमने संपादीत पुस्तकातील प्रा. डॉ. यशवंत मनोहर / प्रा. प्रदीप आगलावे ह्यांचे बाप मनोगत ?* (भाग - २)

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य,* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२


         मुंबई येथील *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* संपादीत / सुमेरु प्रिंटर्स एंड पब्लिशर्स द्वारा प्रकाशित *"आंबेडकरी बाप"* ह्या संपादीत पुस्तकावर माझी १ जुलै २०२५ रोजी माझी समिक्षा मिडियात प्रकाशित झाली. सदर माझ्या समिक्षेवर काही मान्यवरांकडुन मला व्यक्तीश: मेसेजेस प्राप्त झालेत. बहुतेक सर्वांनीच त्या माझ्या समिक्षेवर सकारात्मक भाव प्रदर्शित केला. काहींनी त्यावर अजुन प्रकाश टाकण्याचा विचार बोलल्याने सदर लिहिण्याचा हा उद्देश आहे. सदर संपादीत पुस्तकात ३५ लेखकापैकी *ज. वि. पवार* ह्या एकमेव मान्यवरांना सोडले तर सर्वांनीच त्यांच्या बापावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केलेला आहे. ज. वि. पवार ह्यांनी *"बापाचं नातं"* ह्या आपल्या मनोगतात बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांना रेखाटले आहे. साहित्यामध्ये *"आत्मकथन"* (स्व: जीवन पथ) लिहिण्याचा एक भाव दिसुन येतो. ब-याच समिक्षकांनी *"आत्मकथन"* हे एकांगी आणि अतिरंजित भाव असल्याची टीका केलेली आहे. *"आंबेडकरी बाप"* हे संपादीत पुस्तक लेखकांचे आत्मकथनचं आहे. त्यामुळे अतिरंजित भाव हा सदर संपादीत पुस्तकामध्ये आहे काय ? हा तर संशोधनाचा विषय आहे. तसे बघितले तर प्रा. शुक्राचार्य गायकवाड ह्यांनी *"बुद्ध - आंबेडकरी साहित्य"* ह्यावर संशोधनात्मक पुस्तक प्रकाशित केले असते तर, गायकवाड ह्यांच्या पुस्तकावर शब्द वर्षाव केला गेला असता. परंतु *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचा विचार व्यापारीक असल्यास त्यावर न बोललेले बरे ! सदर पुस्तकाची छपाई / मुखपृष्ठ / पेपर दर्जा इत्यादी बघता संपादीत पुस्तकाचे मुल्य रु. ५००/-  ठेवलेले आहे. सदर पुस्तकात *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचे फोटो असलेला एक टॅग आणि पुस्तकाच्या शेवटच्या पृष्ठावर संपादकाने आमचे मित्र *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* ह्यांच्या लेखणीतुन स्वतःचा परिचय लिहुन घेतलेला आहे. आणि प्रस्तावना *प्रा. डॉ यशवंत मनोहर* ह्यांनी लिहिलेली असुन सदर प्रस्तावनेची समिक्षा ही आधीच्या माझ्या समिक्षेत आलेली आहे.

         *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* असो वा *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* असो ह्या दोन्ही मान्यवरांचे जन्मगाव हे मला चांगले परिचीत आहे. *प्रा प्रदीप आगलावे* हा तर माझा जिवलग मित्र. *प्रदीप - सरोज* ह्यांच्या लग्नाचा मध्यस्थ ही मी तसेच फोटोग्राफर मीचं होतो. प्रदीपच्या लग्नातील ही एक घटना आहे. साधु साधु साधु म्हणतांना वधु ही वराचा पाया पडत असते. *सरोज* ही प्रदिपच्या पाया पडलेली नव्हती. तेव्हा प्रदिप ह्याने रागाने मंगळसुत्र सरोजकडे फेकुन दिले. सरोज हिच्या गळ्यामध्ये ते टाकलेले नव्हते. **मंगळसुत्र"* स्त्री यांनी बांधावे वा नाही हा ज्याचा त्याचा इच्छेचा प्रश्न आहे. *"लग्न हे बंधन आहे वा करार (Contract))"* हा विषय ही व्यक्ती सापेक्ष म्हणायला हवा. पण गोविंदराव वंजारी ह्यांनी नंतर प्रदिपच्या खांद्यावर हात ठेवुनी असा राग बरा नाही, हे बोलल्याचे मी बघितले आहे. *सरोज* हिने ही नंतर मंगळसुत्र घातल्याचे हे माझ्या स्मरणात नाही. प्रदीप आगलावे ह्यांच्या *सेवाग्राम* ह्या गावाला माझ्या ब-याच भेटी ही झाल्यात. सेवाग्राम अर्थात *मोहनदास गांधी* ह्यांची कर्मभूमी. प्रदीप आगलावे ह्यांचे जीवन हे *बापु आश्रमातील* आर शंकरनजी ह्यांच्या निवासातील एका खोलीत गेले. आर शंकरन ह्यांना प्रदीप आगलावे आणि विजय आगलावे हे *"चाचाजी"* म्हणायचे. गांधी आश्रमात असतांना प्रदीप आगलावे हा तेव्हा *"खादी वस्त्र"* परिधान करीत असे. *"माझी आणि प्रदीप ह्यांची मैत्री"* सुप्रसिद्ध कवि स्मृतीशेष *प्रा. ज्योती लांजेवार* ह्यांच्यामुळे झाली. तेव्हा लांजेवार ह्यांची मुलगी *प्रा. डॉ. अपर्णा लांजेवार* ही तेव्हा शिक्षण घेत होती. आता अपर्णा ही हैदराबाद येथे *"वरिष्ठ प्राध्यापक"* म्हणुन कार्यरत आहे. अपर्णा ही प्रदीप - माझ्या जिवलग मैत्रीबद्दल छानपणे माहिती देवु शकेल. प्रदीप नागपुरला शिकायला आला तेव्हा ही प्रदीप हा *"खद्दर वस्त्रधारी"* होता. प्रदीप हा नागपुर विद्यापीठ वस्तीगृहात राहातं असे. प्रदीप हा नंतर गोविंदराव वंजारी ह्यांच्या कॉलेजमध्ये *"प्राध्यापक"* म्हणून तो रुजु झाला होता. त्यांनतर त्याने चंदननगर येथे किरायाने राहायला सुरुवात केली. तेव्हा माझ्या दवाखान्यात असलेले औषधीचे खाली डबे मी प्रदीप ह्याला दिले. प्रदीप ह्याची गरीबी मी जवळुन बघितली आहे‌. प्रदीप ह्याचे *"प्रेम प्रकरण"* इत्यादींची मी साक्ष आहे‌. प्रदीप ह्याच्यावर असलेला गांधी प्रभाव हा *"मी / एड. मिलिंद बनसोड"* (माजी उपजिल्हाधिकारी) ह्यांच्या संपर्कात आल्यानंतर बदललेला होता. प्रदीप मग *"आंबेडकरी"* झाला. *प्रदीप - मी* आम्ही दोघे ही माझ्या घरी बरेचदा *"एका प्लेटमध्ये"* जेवण करीत असु. पुढे काही कारणे झाली / काही खाजगी विषय आहे / कामाच्या व्यस्ततेतुन आम्ही अलग अलग झालो. तरीही सरोज ही माझ्याकडे कधीकधी येत असे. आज ही *सरोज* कुठे भेटली तर हालचाल ती विचारीत असते. *प्रदीप* ह्याची ही बोलचाल कधी कधी होत असते. सांगायचे असे की प्रदीप ह्यांच्या लेखणीत हा भाव दिसुन आलेला नाही. कारण प्रदीपच्या आई, वडिल, भाऊ आणि परिवारासोबत माझे जवळचे नाते झाले होते.

          *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांचे जन्मगाव *येरला* (ता‌. काटोल) हे सुध्दा माझे चांगले असे परिचीत गाव आहे. ग्रामिण रुग्णालय नरखेड येथे मी *"मेडिकल ऑफिसर"* म्हणून कार्यरत होतो. काटोल येथिल ग्रामीण रुग्णालयातील *"मेडिकल सुपरीटेंडेंट"* तसेच प्रायव्हेट मेडिकल प्रक्टिसनर हे आमच्या शासन रुग्णालयात *"फॅमिली प्लॅनिंग सर्जरी"* करण्यास येत असत. आम्ही *"डॉक्टर अधिकारी / तहसीलदार / पोलिस निरीक्षक"* ह्यांच्या बैठका ह्या नित्याच्याच होत असतं. माझे नागपुरवरून नरखेड येथे जाणे - येणे हे नेहमीचे असल्यामुळे *"येरला"* येथे ही आमची *"वैद्यकीय कारणांमुळे"* भेटी होणे नविन नव्हते. कारण सदर क्षेत्राचे आरोग्य राखणे ही आमची *"शासन अधिकारी"* म्हणून जबाबदारी असे. त्यांनतर माझी बदली ही *"भिवापुर"* तहसील क्षेत्रामध्ये झाली होती. साहित्यिक *डॉ. धनराज डहाट* हे सुद्धा काटोल परिसरातीलचं. माझे वडिल हे जिल्हा परिषद शाळेमध्ये *"मुख्याध्यापक"* म्हणून कार्यरत होते. एकंदरीत माझे जीवन हे दारिद्र्यात गेलेले नसले तरी, *"खेड्यातील जीवन"* हे मी जवळुन बघितले आहे. शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे जीवन ही जवळुन बघितले आहे. खेड्यातील कास्तकार असो वा मजुर वर्ग असो, हा काबाडकष्टी असायचा. खेड्यातील शाळेत मुलांना दाखल करण्याची जबाबदारी ही शाळेतील शिक्षकांची असायची. आणि शिक्षण हे *"राष्ट्रिय कार्यक्रम"* शासन धोरण ठरलेले होते. *"शिक्षण हे मोफत दिले जात असे‌."*  खेड्यातुन तालुक्याच्या ठिकाणी शिकण्याकरीता पायी चालत जाणे हे विशेष असे नाविण्य नव्हते. *प्रा यशवंत मनोहर* ह्यांच्या *"बुद्ध - आंबेडकरी साहित्य लिखाणावर"* (?)  मागिल समिक्षेत लिहिलेले आहे. यशवंत मनोहर हे *"बुद्ध - आंबेडकरी साहित्यिक"* नाहीत. प्रा मनोहर हे *"व्यवसायिक / व्यवहारी / इहवादी साहित्यिक"* आहेत. तर *प्रा. प्रदीप आगलावे* ह्यांचे संशोधन लिखाण मग ते *समाजशास्त्रीय* विषय असो / *बुद्ध - आंबेडकरी* विषय असो दिसुन येत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे धर्मांतर पुस्तक असो वा समाजशास्त्रीय लिखाण असो, *"कॉपी एंड पेस्ट"* ह्या सदरात मोडणारे आहे. अर्थात *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* ह्यांना *"बुद्ध - आंबेडकरी साहित्यिक / संशोधक"* म्हणावे काय ? हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे बरेच संशोधन लिखाण हे उपलब्ध असुन, *"जात हा बंद वर्ग आहे"* (Caste is a closed class.) सारखे एखादे समाजशास्त्रीय संशोधन *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* ह्यांचे नावावर नाही. बुध्द - आंबेडकरी साहित्यातील *"नविनता शोध / सौंदर्यशास्त्र"* इत्यादीचे लिखाण होणे गरजेचे आहे. सदर बोध *"आंबेडकरी बाप"* ह्या संपादीत पुस्तकातुन कुठे ही झालेला नाही, असे खेदाने म्हणावे लागते. केवळ आणि केवळ संपादक / लेखक ह्यांची ही स्तुतीसुमने उधळली गेली आहेत. आणि हा प्रकार *"बुद्ध - आंबेडकरी साहित्य - चळवळ"* ह्यकरीता धोकादायक ठरणारा आहे.


------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपूर दिनांक ७ जुन २०२५

Thursday, 5 June 2025

 🌹 *हे जीवन संगित ...!*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर

       मो. न‌ ९३७०९८४१३८


फुलों का अपनापन, मन ही भाया है

हे जीवन संगित, बुद्ध बुद्ध ही रहा है...


ना कोई वहां, द्वेष राग लोभ रहा है

वैरता धोकादारी, कहीं दुर दुर रही है

पंछीओं का साथ, हे निष्पाप रहा है

निसर्ग मन में, बुद्ध बुद्ध ही दिखा है...


हे इतिहास देखें तो, वादें वादें हीं रहे है

पेट में छुरां युं, अपनों द्वारा ही भोपा है

पहचान करना भी, वहं आसान नहीं है 

बुध्द शरणं में, प्रेम मैत्री करुणा रही है...


बुध्द धम्मचक्रप्रवर्तन, एक क्रांती रही है

हे मानव मानव में, वह इतिहास रचा है

कार्यकारण भाव युं, जीवन मुल रहा है

प्रतित्यसमुत्पाद, मानव को सिख देता है...


---------------------------------------

नागपुर दिनांक ४ जुन २०२५

Tuesday, 3 June 2025

 🌳 *बदलाव....!*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो. न. ९३७०९८४१३८


हे निसर्ग जग !

निसर्गरचीत सौंदर्य 

वृक्ष वल्ली क्षुप ह्यांनी

निसर्ग वातावरणात

जगण्याला दिलेले वायु कण

प्राणीमात्रांचे मुक्त वावरणे

पण ह्या माणसाला 

बुध्दीजीवी प्राणी बनवुन

जबाबदारीची जाण दिली

सोबत माणुस प्रवृतीचे निर्माण ...

प्रवृतीत झालेला बदल

क्वचीतचं दिसुन येत असतो

माणुस हा प्रवृत्तीतचं जगतो

आणि प्रवृत्तीतचं मृत्युला जातो

बुध्दांनी ह्या माणसाला 

कुशल कर्म आणि अकुशल कर्म

ही काय काय आहेत ?

आणि काय त्याज्य असायला हवे ?

हे स्पष्टपणे सांगितले आहे

पांढरे शुभ्र वस्त्र परिधानाने

काषाय वस्त्र पेहराव केल्याने

प्रवृत्तीमध्ये बदलाव होत नसतो

बदलाव हा विचारांचा असतो

बदलाव हा कृतीचा असतो

बदलाव हा नीतिचा असतो...!!!


--------------------------------------

नागपूर दिनांक ३ जुन २०२५

Sunday, 1 June 2025

 📓 *प्रा. शुक्राचार्य गायकवाड ह्यांचे संपादीत आंबेडकरी बाप ही पुस्तक म्हणजे लेखक स्व - परिवारातील स्तुतीसुमनांचा अनावश्यक संकलन प्रयास होय !*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


           मुंबई येथील सुमेरु प्रिंटर्स एंड पब्लिशर्स द्वारा प्रकाशित आणि *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचे संपादीत *"आंबेडकरी बाप"* हे पुस्तक पोस्टाने मला मिळाले. पुस्तक चाळत असतांना सुरुवातीलाचं *अर्पण"* पृष्ठ / पुस्तक संपादकाने स्व:ताचा फोटो लावलेला टॅग हा दिसुन आला. *डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर* ह्यांचा शुभ संदेश / *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचे संपादकीय कथन / इहवादी साहित्यिक (बुद्ध आंबेडकरी साहित्यिक नाही) *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांची प्रस्तावना दिसुन आली. तसे बघितले तर स्व: लिखित असो वा संपादीत असो पुस्तकामध्ये असा हा क्रम नेहमीचाच आहे. सदर संपादीत पुस्तकामध्ये *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* पासुन *"पस्तिस लेखक / कवि / कार्यकर्ते"* ह्यांनी त्यांच्या बापावर लिहिलेले कथन दिसुन आले. सदर पुस्तकातील बरीच मान्यवर मला परिचीत आहेत. आणि त्यांच्या परिवार इतिहास बाबत मी परिचीत सुध्दा आहे. जसे - *प्रा. डॉ. यशवंत मनोहर / प्रा. डॉ. प्रदीप आगलावे / डॉ. धनराज डहाट / प्रा. दामोधर मोरे / प्रा. भरत सिरसाठ* इत्यादी. आंबेडकरी क्षेत्रामध्ये ब-याच लेखकांनी आत्मचरित्र (स्व: जीवन पथ) हे लिहिलेले आहे. आणि काही आत्मचरित्र हे तर अतिरंजित असल्याची टिका सुध्दा झालेली आहे. त्यामुळे *"आंबेडकरी बाप"* हे पुस्तक ह्या अतिरंजित संदर्भापासुन अलिप्त आहे काय ? हा संशोधनाचा विषय आहे. लेखकांचे आई - बाप ह्याबाबत खुप आदर आहे. आदर असायला हवा. परंतु *"आंबेडकरी बाप"* संपादीत पुस्तक प्रकाशीत करणे *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांना गरजेचे कां झाले ? हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. संपादक / प्रकाशक ह्यांचा हा व्यापार विषयक विचार असल्यास त्याबाबत न बोललेले बरे !!! *"बुध्द साहित्य / आंबेडकरी साहित्य"* गहन विषय संदर्भात हे संशोधन लेखन असते तर, सदर पुस्तक संपादीत प्रकाशनावर अभिनंदन वर्षाव करणे गरजेचे होते. परंतु ह्यात लेखक स्व:परिवार स्तुतीसुमने ??? पुस्तक मूल्य ५००/- रुपये. आता शुभ संदेश / संपादकीय / प्रस्तावना / बापाची महत्तता ह्या गंभीर विषयावर ही बोलु या. सर्वांनाच आपले आई वडिल हे प्रिय असतात.

        *"आंबेडकरी बाप"* ह्या प्रा. गायकवाड संपादीत पुस्तकाला *भीमराव यशवंतराव आंबेडकर* ह्या अ-साहित्यिक /भारतीय बौध्द महासभेचे विवादीत राष्ट्रिय कार्याध्यक्ष ह्यांनी शुभ संदेश दिलेला आहे. भीमराव यशवंतराव आंबेडकर ह्यांचा परिचय केवळ *बाबासाहेब परिवार'* निगडित आहे. सदर विषय एकवेळ मान्य करता येवु शकतो. परंतु *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचे संपादकीय भाषा विचार - यशवंत मनोहर ह्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन (?) / *प्रा. डॉ यशवंत मनोहर* ह्यांची प्रस्तावना भाषा विचार कुठेतरी मनाला दुखवुन जातात. यशवंत मनोहर ह्यांनी सदर प्रस्तावना लिहिण्यापुर्वी *"श्रध्दा - अंधश्रद्धा"* ह्यामध्ये ते भेद नसल्याचे नागपुर येथे भाषण करून गेले. तसे बघितले तर *यशवंत मनोहर* हे बुद्ध- आंबेडकरी साहित्यिक नाहीत. ते *"व्यापारी - व्यवहारीक - इहवादी साहित्यिक"* आहेत. मनोहर यांना मार्क्स ही जवळचा आहे, केशवसुत ही जवळचे आहेत. मनोहर ह्यांना ही जाणीव असायला हवी की - *"श्रध्देला प्रज्ञेची जोड नसेल तर ती अंधश्रद्धा होते."* बुध्द हे श्रध्देला *"बी"* (Seed) मानतात. *"श्रध्दा"* ह्या विषयावर बुध्द साहित्यात खुप गाथा आहेत. तरी एक पाली गाथा संदर्भ देतो. *"सध्दां बिजं तपो वुट्ठि पञ्ञा मे |......"* (कसिभारद्वाज सुत्त) (अर्थात - श्रध्दा हे माझे बीज आहे....) *डॉ यशवंत मनोहर* हे "आंबेडकरी बाप" संपादीत पुस्तकातील प्रस्तावनेत लिहितात - *"आंबेडकरी बाप हे पुस्तक कारणकार्य आणि कार्यकारण सिध्दांतासारखे आहे."* आणखी दुसरा संदर्भ ही आहे - *"अर्थात जुन्यात न मावु शकणारी प्रज्ञा वा प्रतिभाच नव्या कार्यकारणभावाची वा कारणकार्यभावाची नवी निर्मिती करू शकते."* प्रा डॉ यशवंत मनोहर ह्यानी सदर बुध्द वचन समजुन घेतलेले दिसुन येत नाही. बुध्द ह्यांचा *"प्रतित्यसमुत्पाद सिध्दांत"* ही यशवंत मनोहर हे समजु शकलेले नाहीत. आणि बुद्ध सिध्दांतात उलटफेर सारखा प्रकार केलेला आहे. बुध्द साहित्यात पाली गाथा आहे - *"इदं सति इदं होति, इदं असति इदं न होति |"* (अर्थात - कारण असेल तर कार्य होते. कारण नसेल तर कार्य होत नाही.) *प्रा डॉ यशवंत मनोहर* ह्यांचा हा शब्दच्छल सहज असा विषय नाही. कारण यशवंत मनोहर ह्यांनी बुध्दाच्या *"कार्यकारणभाव सिध्दांत"* ह्याची तोडमरोड केली आहे.‌ तिसरा संदर्भ आहे - *"तेहतीस (३३) दिव्यांनी आपल्या बापासंबधी या पुस्तकात लिहिले आहे......"* खरे तर आपला बाप ह्या विषयावर सदर पुस्तकामध्ये लिहिणारी *"पस्तीस (३५) लेखक"* आहेत. प्रा डॉ यशवंत मनोहर हे एका ठिकाणी म्हणतात - *"आंबेडकरी बाप हे या तुरुंगाविरुध्दचे अपुर्व निर्णायक बंड होते."* खरे तर आमचा एकच बाप - *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* ह्यांनी ह्या तुरुंगाविरुध्दचे निर्णायक बंड केले आहे. अन्य कोणत्याही बापानी (?) हे कार्य केलेले नाही. फक्त लढ्यात ते सहभागी होते‌. *यशवंत मनोहर* ह्यांच्या सदर प्रस्तावनेत अजुनही विवादीत विषय आहेत. *"सीता वरुन भाताची परिक्षा"* ही उक्ती येथे लागु आहे. तेव्हा *"आंबेडकरी बाप"* ह्या पुस्तकातील लेखकांनी स्व:ताच्या परिवाराचा उदोउदो न केलेला बरा !!! प्रत्येकांनाच आपले आईवडील हे प्रिय आहेत. तेव्हा अतिरंजित भाव हा आंबेडकरी चळवळीला मारक ठरणारा असु शकतो. अर्थात सदर पुस्तक काय संदर्भ देणार आहे ? हा संशोधनाचा विषय आहे. तुर्त इतकेचं....!!!


---------------------------------------

▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      ‌नागपूर, दिनांक १ जुन २०२५