Friday, 20 June 2025

 ✍️ *भारतीय  लिपी / भाषा / साहित्य / प्रेम - सौंदर्यशास्त्र - नीतिशास्त्र - राष्ट्रवाद इत्यादी तमाम भाव विश्वाची जननी बुध्द तत्वज्ञान !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म‌. प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


         *चक्रवर्ती सम्राट अशोक* ह्यांनी तमाम जंबुद्विपामध्ये (प्राचिन एकसंघ विकास भारत) स्थापित केलेले *"८४००० स्तुप / चैत्य / स्तंभ /शिलालेख / विहार"* ही आपली प्राचिन संस्कृती बयाण करीत आहे. ती प्राचिन इतिहास साक्ष आहे. *चक्रवर्ती सम्राट अशोकाने* आपल्या शिलालेखात *"धम्म थंब / सिला थंब"* असा उल्लेख केलेला दिसुन येतो. सदर प्राचिन थंब हे *"अशोक थंब"* म्हणून ही आपल्याला परिचीत आहेत. अर्थात *"थंब"* हा शब्द  *"स्तंभ"* हा शब्द आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांचे प्राचिन स्तंभ हे बुध्द वचन *"धम्म / सिल"* ह्यांची ती ओळख करून देतात. म्हणुनचं त्या स्तभांना (थंब) *"धम्म थंब / सिला स्तंभ"* म्हटल्या गेले. कालांतराने *"सिल"* (बुध्द शील) हा शब्द *"सिला वर लिपी"* कोरल्या गेल्याने  *"सिल = दगड"* ह्या अर्थाने रुढ झाला. *प्राचिन बुध्द इतिहास -  साहित्य ह्यावर संशोधन / लिखाण करणारी बोटावर मोजण्या इतपतचं मान्यवर आहेत.* जम्बुद्विप (भारत) देश *"इंग्रजांचा गुलाम झाला नसता"* तर, प्राचिन भारताचा सुवर्ण इतिहास हा जमिनीतीचं गडप झालेला असता. प्राचीन बुध्द इतिहास शोधण्यात *सर अलेक्झांडर कनींघम / जॉन प्रिंसेप* इत्यादी इंग्रज अधिका-यांचे मोलाचे योगदान आहे. *रिहस डेव्हिस* ह्यांचे बुध्दीझम हे ग्रंथ लिखाण / *सर एडविन अर्नाल्ड* ह्यांनी तर डेव्हिसच्या लिखाणातुन प्रेरणा घेवुन  *"बुध्दगया"* मुक्ती करीता केलेल्या प्रयासामुळेचं *अनागरीक धम्मपाल* सारख्यांना बुध्दगया मुक्तीचे मिशन मिळालेले होते. आणि चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांचे शिलालेख हे बोलके झाले. *सर एडविन अर्नाल्ड* ह्यांची *"दि लाईट ऑफ एशिया"* ही पुस्तक माझी आवडीची पुस्तकं आहे. इंग्रजांच्या शासन काळामुळेचं *"प्राचिन धम्म - ब्राम्ही (धम्म) लिपी - भाषा - साहित्य"* इत्यादीचा ज्वलंत इतिहास हा जगासमोर आलेला आहे. *"गोरे इंग्रेज"* हे भारतातुन गेले. आणि *"काळ्या इंग्रजांनी"* पुनश्च भारत देशाचा *"प्राचीन बुद्ध इतिहास"* गडप करण्याची कुटनीति अवलंबन केलेली आहे.

         प्राचिन *"सिंधु घाटी सभ्यता"* ही भारतीय प्रथम *"लिपीचा"* बोध ही करुन जाते. परंतु ती लिपी आजपावेतो वाचल्या / समजल्या गेलेली नाही. सदर लिपी वाचली / समजली / उमगली न जाण्याची काही कारणे सुध्दा आहेत. सदर कारणांवर पुन्हा कधी तरी चर्चा करु या. परंतु सदर *"सिंधु घाटी सभ्यता सदृश्य लिपी"* - अर्थात *"धम्म (ब्राम्ही) लिपी"* ही इ. पु. ७ - ६ व्या शतकातील *शाक्यमुनी बुध्द* कालखंडात उदयास आली. चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांनी *"धम्म लिपीत शिलालेख"* कोरलेले होते. सदर शिलालेख लिपी ही वाचल्या गेली. समजल्या गेली. परंतु सिंधु घाटी सभ्यता संस्कृती ही पहिले *"ताण्हणकर बुध्द"* ह्याची साक्ष *"चक्राकार स्तुप / घुमटाकार स्तुप - तरणताल / सिंह / वृषभ / स्वस्तिक चिन्ह"* ह्याद्वारे समस्त जगाला करुन दिली. सदर पहिले बुध्द परंपरा साक्ष ही *"चक्रवर्ती सम्राट अशोक काळातील स्तुप - चैत्य - विहार - शिलालेख"* ही बोलके आहेत. *"ताडपत्र"* ह्यावर अंकित *"त्रिपिटक ही साहित्य इतिहास"* बयाण करतो.

         *आचार्य अश्वघोष / आचार्य नागार्जुन/ आचार्य आर्यसुरा / आचार्य कुमारल्भ"* ही बुध्द साहित्यातील *"चार महासुर्य"* म्हणुन नामांकित होती. हृयाशिवाय महायानी *वसुमित्र* रचित अभिधम्म ग्रंथ / प्रकरण पादशास्त्र / धातुकाय पादशास्त्र, *आचार्य कल्याणी पुत्र* रचित दिव्यावदान, *आचार्य नागार्जुन* रचित मध्यमिका कारिका / शुण्यवाद, *आर्यदेव* रचित चतु:शतक, *मैत्री नाथ* रचित अभिसमयालंकार, *असंग* रचित महायान सुत्रालंकार, *दिग्नाग* रचित न्याय प्रवेश ग्रंथ, *धर्म किर्ती* रचित न्याय बिंदु ग्रंथ, *आचार्य शांती देव* रचित बौध्दाचार्य अवतार, *आचार्य अश्वघोष* रचित बुध्दचरित्रम् / सौदरानंदम् / वज्रसुची / शारिपुत्रप्रकरणम् / उर्वशी वियोग / राष्ट्रपाल ह्या साहित्याचा विशेष उल्लेख करता येईल. *हिनयानी संप्रदाय* ह्यांचे प्रतित्यसमुत्पाद / निर्वाण प्राप्ती हे प्रमुख ग्रंथ तर *महायानी संप्रदाय* ह्यांचे प्रज्ञा पारमिता / सद्धर्म पुण्डरिक / ललित विस्तार / लंकालतार सुत्र / दशभुमीश्वर / नागानंदा ह्या बुद्ध ग्रंथांचा उल्लेख करता येईल. *बुध्द वंस* ह्या ग्रंथात बुद्ध वंशावळी दिसुन येते. श्रीलंका देशातील *दीपवंश* (बेटांचा इतिहास) आणि *महावंश* (महान इतिहास) तसेच *विशुध्दीमग्ग / जातक कथा / मिलिन्द प्रश्न* ह्या प्राचिन बौध्द साहित्याचा उल्लेख करावा लागेल. ह्याशिवाय *"गांधार कला / मथुरा कला"* ही शिल्पकला अविष्कार बुद्ध धम्माची देण आहे.

            वैशाली राज्याची नगरवधु *आम्रपाली* हिच्या जन्मापासुन तर ते तिचे *"अर्हत"* होणे / मगध राजा *बिंबिसार - आम्रपाली"* ह्या दोघांचे निस्सिम प्रेम होणे - वियोग होणे ह्यामध्ये *"प्रेम - मैत्री - सौंदर्यशास्त्र / नैतिक वाद"* आम्ही शोधणार आहो की नाही ? हा प्रश्न आहे. दुसरे उदाहरण *आचार्य अश्वघोष* देता येईल.अश्वघोष ह्यांचे एका कन्येसोबत झालेले प्रेम - वियोग / अश्वघोष रचित *"उर्वशी वियोग"* ही नाट्य रचना आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. आचार्य अश्वघोष रचित *"बुद्ध चरित्रम्"* हे महाकाव्य बुद्ध जीवनावर आधारित आहे. *"सौदरानंदम्"* हे महाकाव्य बुध्दाचा चुलत भाऊ *आनंद* ह्यांच्या बुद्ध धम्म दीक्षित प्रसंगांवर आहे. तमाम बुध्द साहित्यामध्ये *"प्रेम - मैत्री - शांती - करुणा - सौंदर्यशास्त्र - नैतिक वाद - दर्शनशास्त्र - मानवशास्त्र - राष्ट्रवाद"*  ह्याचा बोध होतो. *कवि कालीदास* रचित अभिज्ञान शांकुतलम् / विक्रमोर्वशीयम् / कुमारसंभवम् / रघुवंशम् / मेघदूतम् / ऋतुसंहारम् समान ४० साहित्य कृती लिहिल्याचे सांगितले जाते. परंतु कालिदास साहित्य हे *"भोगवाद"* पासुन *"अनैतिक वाद"* ह्याचा बोध करून जातो. त्या साहित्य कृतीबद्दल काय ? *कालिदास* ह्यांच्या साहित्य लिखाणात *आचार्य अश्वघोष* ह्यांचा साहित्य प्रभाव तसेच *"अपभ्रंश भाषा"* प्रभाव हा सुद्धा दिसुन येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ४० साहित्य लिखाण करणारा (?) *कालिदास ह्यांचा जन्म - मृत्यु कुठे झाला ?* हा विवादाचा विषय आहे. अर्थात *कालिदास हे काल्पनिक पात्र आहे,* हे समजून घेणे गरजेचे आहे.

         चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांचे शिलालेख हे *"धम्म (ब्राम्ही) लिपी"* हा इतिहास सांगत असतांनाच *"पाली प्राकृत भाषा"* बोलीभाषा असल्याचाही तो पुरावा देतो. त्यानंतर भारतात अस्तित्वात *"गुप्त लिपी / कुटिल लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / देवनागरी लिपी / तेलगु लिपी / कन्नड लिपी / तामिळ लिपी / ग्रंथ लिपी / मध्यवेशी लिपी / ग्रंथ लिपी / मल्याळम लिपी / कलिंग लिपी / पश्चिमी लिपी / खरोष्टी लिपी ) चित्र लिपी / शंख लिपी / शाहमुखी लिपी / मोडी लिपी / उर्दु लिपी"* ह्या कालानुरूप उदयास आल्यात.  *"पाली प्राकृत भाषा"* हिची लिपी ही *"धम्म लिपी"* होती. पुढे पाली भाषा ह्यावर संस्कार होवुन *"हिब्रू संस्कृत भाषा"* (तिसरी बुद्ध सांगिती - पहिली शती) हिचा उगम झाला. *"हिब्रू संस्कृत भाषेची"* लिपी मात्र *"धम्म लिपी"* हिच होती. *"पाली भाषेवर संस्कार"* होण्याची कारणे ही बुध्द धम्म हा *"महायान - हिनयान संप्रदायात विघटन"* होणे असण्याची शक्यता आहे. आता अस्तित्वात असलेली *"संस्कृत भाषा"* ही *"क्लासिकल संस्कृत"* असुन लिपी ही *"देवनागरी लिपी"* आहे. *"हिब्रू संस्कृत भाषा"* हिच्या उदयानंतर इसवी ६ - ७ व्या शतकात *"अपभ्रंश भाषा"* ही जन्माला आली. तर इसवी १२ व्या शतकात *"आदी हिंदी भाषा"* ही व्यवहारात आली. *"सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदी हिंदी होय,"* हे समजून घेणे फार गरजेचे आहे. *"उर्दू भाषा"* ही इसवी १६४५ ला जन्माला आली‌. *"देवनागरी लिपी"* ही इसवी ११०० मध्ये *"प्रथम प्रारुप"* स्वरुपात जन्माला आली असली तरी इसवी १७९६ ला *"व्यवहारात"* आली. तर *"आधुनिक हिंदी भाषा"* ही इसवी १८ व्या शतकात उदयास आली. आणि आधुनिक हिंदी भाषा लिपी ही *"देवनागरी लिपी"* होती.

          मराठी भाषा संदर्भ इतिहासाचा पहिला शिलालेख *इसवी ७०५* सालचा पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे"* येथे सापडला आहे. दुसरा शिलालेख हा *इसवी १०१२* सालचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका *"अक्षी"* ह्या गावी सापडला. तिसरा शिलालेख *इसवी १०१८* सालचा सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* येथे सापडला. चवथा शिलालेख *इसवी १०३९* सालचा कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळा"* येथे सापडला. मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्याकरीता *"२००० वर्षांचा इतिहास "* असणे गरजेचे असल्यामुळे *"सातवाहन बौध्द काळातील नाणेघाट शिलालेख"* हा संदर्भ आधार घ्यावा लागलेला आहे.‌ अर्थात सरते शेवटी *"तमाम मराठी साहित्यिकांना बुध्द संस्कृतीच्या पायाशीचं लोळण"* घ्यावी लागलेली आहे. आणि अभिजात मिळण्याकरीता *"ब्राह्मणी लोळण"* हा इतिहास झालेला आहे. परंतु *"बुध्द - आंबेडकरी"* म्हणवुन घेणारी काही *"साहित्यिक वर्ग"* हे *"ब्राह्मणी धारेच्या पायाशी लोटांगण"* घालीत असल्यास (?) आम्ही त्याला काय म्हणावे ? मराठी भाषेचे *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी "* असे पोट प्रकार ही दिसुन येतात. मराठी साहित्य महर्षी / आद्य कवि - शिंपी जातीचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते २/१२/१२९६) / संत नामदेव महाराज परिवारातील *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०) / महार जातीचे *संत चोखामेळा* (१२७३ ते १३३८) ही आपली तीन मान्यवर जेष्ठ संत असतांनाच *"१२ व्या शतकातील"* ब्राह्मणी व्यवस्था धारक *मुकुंदराज / संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/२/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांचा उदो उदो करण्यात आला. ह्याशिवाय सोनार जातीचे *संत नरहरी सोनार* असो वा / संत चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा* / ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज*/ वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०१/१६०८  ते १९/०३/१६५०) ही सर्व संत मंडळी पंढरपूरच्या *"विठ्ठल / बुद्ध"* ह्याला शरण गेलेली असल्यामुळे त्यांचा इतिहास हा दाबला गेला आहे. ब्राह्मणी व्यवस्थेचे - *संत रामदास स्वामी* (१६०८ ते १६८२) ह्यांचा उदो उदो करुन *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु असल्याचा खोटा इतिहास रचला गेला. संत रामदास स्वामी परिवारातील वयाने मोठे असलेले *संत एकनाथ महाराज* मात्र वंचित राहिले आहेत. वास्तविकत: *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु *संत तुकाराम महाराज* होते, हे समजून घेणे गरजेचे आहे. बुध्द - आंबेडकरी म्हणविणाऱ्या तथाकथित साहित्यिक वर्गाची *"ब्राह्मणी लोळण लाचारी"* ही कधीपर्यंत राहाणार आहे ? आम्ही साहित्य संशोधन लिखाण याकडे वळणार आहोत की नाही ? अशी बरीच प्रश्न आहेत. तेव्हा उत्तराच्या प्रतिक्षेत !!!

    जय भीम ! जय संविधान !! जय बुद्ध !!!


----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक २० जुन २०२५

Tuesday, 17 June 2025

🌹 *ह्या निस्सिम प्रेमाची ...!*
       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
        मो. न. ९३७०९८४१३८

ह्या निस्सिम प्रेमाची
मोहक कळी फुलली अशी तु
त्यामध्ये शुद्ध मन दिसे मला गं
विविध रंगात आलीस जगात तु
सुंदर फुलांमध्ये यौवन तुझे हे
मधु गंधाचा फुलोरा फुलवुनी
तुझ्या गंधाचा आस्वाद घेण्या हा
निसर्ग जगात आलो असा मी...

ह्या निष्पाप फुलपाखरांचे 
विविध रंगी फुलांवर बसणे हे
निस्सिम प्रेमाची साक्ष देतांना
भुंग्यांला तुझ्या प्रेमाचा हेवा झाला
भुंगा तुझ्या सभोवताल घुटमळुन
कर्कश आवाज करता झाला
परंतु फुलपाखरांच्या शांत मनाने
तो तुझ्या मनाचा राजा झाला...

निसर्गाच्या मधु चक्रात हे
पृथ्वीवर बुद्धाचा जन्म झाला
प्रेम मैत्री शांती करुणा वदुनी
धम्मचक्र प्रवर्तन आकार आला
हे जम्बुद्विप बहुजन समाज ही
बुध्द दिशेने परीवर्तीत झाला
बहुजन हिताय बहुजन सुखाय 
श्वेत धाग्याचा सम्यक वाली झाला ...

----------------------------------------
नागपूर दिनांक १७ जुन २०२५

Sunday, 15 June 2025

 👺 *मृत्युच्या क्षणाचा (?) माझ्या जीवनातील जीवघेणा अनुभव ....!* (डॉ‌ बी आर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र आणि मुंबई प्रवास कार अनुभव)

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


        *"एयर इंडिया फ्लाईट AI171 बोईंग ड्रीमलाइनर अहमदाबाद लंडन"* ह्या विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटांत ते विमान कोसळुन आगीच्या ज्वालात २४१ प्रवासींचा मृत्यु झाला. अशीच *"माझ्या बालपणी"* ५० - ६० वर्षांपूर्वी नागपुरात झालेली *"नागपुर फ्लाईंग क्लबचे शिकावु विमान दुर्घटना"* मला आठवली. आम्ही लहान मुले ही गच्चीवर खेळत असतांना झालेली *"शिकावु विमान दुर्घटना"* आम्ही प्रत्यक्ष बघितली आहे. पुढे *"नागपूर फ्लाईंग क्लब"* ह्या ठिकाणी माझ्या कंपनीला काही काळाकरीता *"एम्प्लॉइज सर्व्हिस प्रोवायडर"* म्हणुन काम मिळाले होते. अश्या विमान दुर्घटना ह्या आधी ही ब-याच झालेल्या आहेत. *"परंतु त्यापासुन आपण काही शिकावे ?"* चुक सुधारावी ही मानसिकता माणुस प्रवृत्तीची दिसुन येत नाही. पुनश्च असे दु:खद अपघात होणार आहेत. *"काही मानवी चुकांमुळे तर काही तांत्रिक चुकांमुळे !!!"* ही अपघात परंपरा / मृत्यु तांडव परंपरा पुढे ही सुरुच राहाणार आहे. ह्या घटनेने मला माझ्या जीवनातील काही जीवघेण्या घटनांची आठवण झाली. *"डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु (म. प्र.)"* येथे दरवर्षी *"राष्ट्रिय सेमिनार"* त्याकरीता मला बोलावणे येत असे. सदर सेमिनारला माझा कधी *"इंदुर येथे विमान प्रवास"* असे. तर कधी ट्रेनचा प्रवास असे. इंदुर येथुन महु येथे जाण्याकरीता आमच्या करीता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ ह्यांची कार ही उभी असायची. मग *"विद्यापीठ गेस्ट हाऊस"* येथे आमचा हा मुक्काम असायचा. बरेचदा मी माझ्या *"कारने"* ही माझ्या परिवारा समवेत महु येथे गेलेलो होतो. कार हा माझा ड्रायव्हर चालवीत असे.

           डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु ह्याचा सन २०१४ ह्या साली *"सुवर्ण महोत्सव"* असल्याने विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु *डॉ आर. एस. कुरील* साहेब आणि विभागाध्यक्ष *प्रा. डॉ ‌ सी. डी. नायक* ही माझ्याकडे आलीत. त्या मान्यवरांना महु विद्यापीठात *"तथागत गौतम बुद्ध / बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर"* ह्यांची मोठी मुर्ती ही बसवायची असल्यामुळे आम्ही मुर्ती विकत घेण्यासाठी दीक्षाभुमी येथील बौध्द मेळाव्याला गेलो‌. *"बुध्द / बाबासाहेब"* ह्यांची मुर्ती विकत घेतल्यानंतर सदर मुर्ती ही *माझ्या घरी"* ठेवण्यात आली. आणि मला त्या दोन्ही मुर्तींना महु येथे पोहचविण्याची जबाबदारी ही देण्यात आली. डॉ कुरील साहेब मला म्हणाले की, *"तुम्ही उद्या एखादे वाहन करुन महु येथे यावे."* मला कारचा प्रवास हा अनुभव होता. मी डॉ कुरील साहेबांना म्हणालो की, चार चाकी वाहनाने मी सकाळी १० वाजेपर्यंत महु येथे पोहचणारचं, ह्यांची शास्वती नाही. आणि मुर्तींचे अनावरण होणे मग फार कठिण आहे. मी ट्रेन मार्गे महु येथे येणे उचित होईल. आमचे हे बोलणे झाल्यावर *डॉ कुरील साहेब / डॉ नाईक साहेब* ह्यांना माझ्या कारने नागपूर एयर पोर्ट वर सोडुन मी माझ्या कामाला लागलो. रेलची चार तिकिटे काढली. तिकिट वेटींग होते. माझ्या सोबतीला होते *सुर्यभान शेंडे / शंकरराव ढेंगरे / अधिर बागडे.* परंतु इंदुर ह्या ट्रेन मध्ये नागपूर करीता *"व्ही.आय.पी."* सीट ही राखिव नव्हती. मध्य रेल्वे प्रबंधक (DRM) ह्यांचे खाजगी सचिव (PS) *पृथ्वीराज डोंगरे / हरीश पाटील"* हे माझे मित्र आहेत. सदर दोघांनी मुंबई ला मेसेज करुन आमची तिकिटे ही कंफर्न केली. आणि आम्हाला निरोप देण्याकरीता मध्य रेल्वेचा ५ - ६ स्टाफ हा उपस्थित होता. प्रवास सुखकर झाला. सकाळी ६ वाजता आम्ही इंदुरला पोहचलो. इंदुर रेल्वे स्थानकावर आमच्या स्वागताला महु विद्यापीठातील काही स्टाफ आणि बस ही उभी होती. सदर बुद्ध / बाबासाहेब मुर्ती अनावरणाला मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री *शिवराज सिंग चव्हाण* / भारत सरकार योजना आयोगाचे सदस्य *डॉ नरेंद्र जाधव* आदी मान्यवर आम्ही उपस्थित होतो. अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु येथे बसविण्यात आलेल्या बुद्ध / डॉ बाबासाहेब आंबेडकर मुर्तीचा हा इतिहास आहे.

            सदर *"महु सुवर्ण महोत्सव"* कार्यक्रम होण्याच्या एक वर्षापूर्वी महु (मप्र) येथे *"राष्ट्रिय सेमीनार"* चे मला निमंत्रण होते. माझ्या कारने जाण्याचे आम्ही मित्रमंडळीनी ठरविले. परंतु माझा ड्रायव्हर हा *"सुट्टीवर"* होता. आणि मी नुकतेच ड्रायव्हिंग शिकलेलो होतो. ड्रायव्हर नसल्याने मी कारने महु येथे जावु नये, असा घरचा निरोप होता. मित्र ही ड्रायव्हिंग करतील असे घरच्यांना सांगुन आम्ही महुकडे निघालो. परंतु मित्रांना ड्रायव्हिंगचा अनुभव नसल्याने *"मलाच ड्रायव्हिंग जबाबदारी"* ही पार पाडावी लागली. आम्ही महु (मप्र) येथे सकाळी सुखरुप पोहचलो. सेमिनार छान झाले. परतीच्या वेळी *"चिखलदरा"* जाण्याचा आमचा प्लॉन बनला. मी नवशिक्या ड्रायव्हर होतो. चिखलदरा - इंदुर मार्ग हा सिंगल रोड होता. आणि *"चिखलदरा पर्वतावर"* माझी कार ही बंद पडली. खाली तर मृत्यू खाई होती. *"कार चालु केल्यावर ती चढावावरुन रिव्हर्स जायला लागली."* काही क्षण शिल्लक होते. *"आम्हाला खोल दरीमध्ये मृत्युला आहुती देण्याचे !"* परंतु कार कशीबशी ही पुढे सरकली. आम्ही मृत्युच्या उंबरठ्यामधुन बाहेर निघालो. चिखलदरा पोहचलो. एक दिवस मुक्काम केल्यावर आम्ही परतवाडा दोन पदरी मार्गे नागपुरला पोहचलो. सदर घटना आज ही विसरलेलो नाही. माझ्या जीवनात असा घटना अनुभव बराच आहे. असाच एक अन्य अनुभव *"बाळासाहेब ठाकरे समृध्दी मार्ग प्रवासाचा"* आहे.*" मुंबई - पुणे - नासिक"* रात्रीचा प्रवास समृध्दी मार्गाने *"मी / इंजी. विजय बागडे / डॉ. उमाजी बिसेन"* करीत होतो. तसे बघितले तर *"समृध्दी मार्गे आमचा हा रात्रीचा प्रवास"* बराच वेळा झालेला आहे. परंतु एकदा समुध्दी मार्गावरून *"कारनी रात्रीचा प्रवास"* करतांना कारमध्ये काही खडखड आवाज यायला लागला. म्हणुन ड्रायव्हरनी गाडी एका साइडला थांबवुन तो आवाज शोध घेण्याचा प्रयत्न केला. *रात्रीच्या सुनसान क्षणी* दोन अनोळखी व्यक्ती आमच्या कारजवळ आले. काही विचारपुस ती करायला ही लागले. अर्थात ती गुंडांची *"लुटपाट टोळी"* असण्याचा बोध होत होता. ड्रायव्हर हा धोका कळुन चुकला. कार सुरु करुन पेट्रोल पंप जवळ पोहचुन कार मध्ये येणारा तो आवाज बघितला. पेट्रोल पंपावरील रेस्टारेंटमध्ये चहा घेवुन आम्ही मुंबई दिशेने निघालो होतो. एकंदरीत आपल्या जीवनात असे अनुभव येत असतात. अनुभव हे माणसाला नविन शिकायला सांगत असतात.


------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक १५ जुन २०२५

Friday, 13 June 2025

 🌹 *बौध्द साहित्यातील प्रेम संदर्भाने साहित्य जगताला एक नविन दिशा दिली ...!*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


             बौध्द साहित्यातील प्रेम संदर्भ आणि मानवी मनातील प्रेम संदर्भ ही भिन्न भिन्न भाव आहेत. बौध्द साहित्यातील प्रेम आयाम हे मानवी मुल्य निगडीत आहे. *"बुध्द तत्वज्ञानाची निव ही प्रेम, मैत्री, अहिंसा, शांती, करुणा ह्या विचाराशी निगडित आहे. आणि त्याला प्रेम आयामाने एकमेकांशी जोडलेले आहे."* आरोग्य आणि आनंदासाठी स्वतःवर प्रेम करणे हे फार सोपे असते. *"प्रेम ही एक शक्तिशाली, सकारात्मक उर्जा आहे. जी शरीर आणि मन यांच्यातील निरोगी संतुलनासाठी आवश्यक ही आहे."* इतर व्यक्तीचे प्रेम ओळखणे हा तर सहज विषय नाही. *"बुध्द साहित्यातील प्रेम संदर्भ हा प्रामाणिक अंतर्मनाचा साद घालीत असतो. आणि हा सौंदर्यशास्त्र ह्याचा एक भाग आहे."* बुध्द साहित्यामध्ये *"नैतिकवाद"* ह्या आयामाला अन्योन्य महत्व असुन *"भोगवाद"* ह्याला थारा नाही. *"कालीदास साहित्य"* खरे तर अनैतिक वादाकडुन भोगवाद विषयाकडे गेलेले दिसुन येते. आणि *कालीदास* ह्याच्या जन्म-मृत्युचा इतिहास एक कोडे आहे. अर्थात कालीदास हे काल्पनिक पात्र आहे, असे ही म्हणता येईल. *"आंबेडकरी साहित्य"* हे तर बुध्द साहित्य विचारातुनचं निर्मित झालेले आहे. *डॉ बाबासाहेब आंबेडकर* ह्यांना व्यवस्थेनी दिलेली वेदना आवाहने ही सर्व परिचीत आहेत. परंतु बाबासाहेबांनी व्यवस्थेशी बदला घेतलेला नाही. बुध्द मैत्री भावनेची पहाट फुलविली होती. *चक्रवर्ती सम्राट अशोक* ह्यांनी पुनर्जीवित केलेले *"बुद्ध धम्म शासन"* ह्याला बाबासाहेबांनी पुनश्च रोपन केले आहे. सिध्दार्थ गोतम बुध्द हे *"महाकारुणिक बुद्ध"* झाले. चक्रवर्ती सम्राट अशोक हे तर जंबुद्वीपात *"देवानाम पिय"* झाले. आणि बाबासाहेब हे *"मैत्रेय बुद्ध"* झाले.

           प्रेम आयाम ह्या गंभीर विषयावर विशेष चर्चा करतांना *"आचार्य रजनीश ते ओशो रजनीश"* असा हा व्यक्ती विषय *कालिदास* ह्या सारखा काल्पनिक विषय नाही. बुध्दांनी आपले वारीश हे संघाला मानले. ओशो रजनीश ही अगदी त्याच मार्गाने गेले. आचार्य रजनीश ह्यांचे पुस्तक *"संभोग से समाधी तक"* हे खुप चर्चीत झाले होते. बरीच मान्यवर सुध्दा *"रजनीश शिष्य"* झालीत. काही शिष्य ही माझ्या परिचीत होती. एका शिष्याने बुध्द - आंबेडकराचा मार्ग सोडुन *"रजनीश मार्ग"* हा पत्करला होता. तो एक चांगला लेखक होता. त्यानी *"रजनीश विचाराशी निगडीत"* बरीच पुस्तके लिहिली. त्या रजनीश शिष्याच्या पुस्तकाला स्वतःला बुध्द - आंबेडकरी म्हणणा-या एका नामांकित प्राध्यापकाची प्रस्तावना होती. तो रजनीश शिष्य एकदा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की, *"मी त्याच्या पुस्तकाच्या विमोचनात प्रमुख अतिथी व्हावे."* मी मात्र त्या रजनीश शिष्याच्या पुस्तकाला प्रमुख अतिथी होणे नाकारले. कारण रजनीश हा विषय माझ्या बुध्दीला पटलेला नव्हता. कालीदास आणि रजनीश ह्यांच्या लिखाणावर भाष्य काय करावे ? *ओशो रजनीश* ह्याला भारतात विरोध सुरू झाला. *ओशो रजनीश ह्यांनी अमेरिकेत आश्रय घेतला.* रजनीश सोबत होती पर्सनल सेक्रेटरी *मां शीला आनंद.* ह्या पुर्वी रजनीश ह्यांची खाजगी सचिव होती *मां लक्ष्मी*. परंतु मां शीला आनंद ही मां लक्ष्मी हिला दुर सारण्यात सफल झाली होती. हा इतिहास शब्द मर्यादेमुळे आटोपता घेतो. ओशो रजनीश ह्यांचे सर्व काही व्यवहार सुत्रे मां शिला आनंद हलवीत होती. मां शिला आनंद हिने अमेरिकेतील *"ओरगान"* शहरालगत जंगलातील ६२००० एकर जमिन *"ओशो फाऊंडेशन"* ह्या पैश्यातुन विकत घेवुन *"रजनीशपुरम्"* शहर वसविले. *"सेवेमध्ये होती ९६ रोल्स राईस लक्झरी कार आणि एक जेट विमान."* परंतु काही कारणे झालीत. ओशो रजनीश ह्यांना अमेरिका देश सोडावा लागला. *मां शीला आनंद* हिला जेल झाली. रजनीश - शीला ही विभक्त झालीत. *रजनीश* ह्यांनी भारतामध्ये पाय ठेवल्यावर ओशो रजनीश म्हणाले होते की, *"मी बुध्दाच्या धरतीवर पाय ठेवीत आहे."* मुलत: ओशो रजनीश हे *"तेरा पंधी जैन"* होते. *शीला आनंद* हिचा इतिहास ही अलग होता. अमेरिकी *मार्क हेरीस सिल्वरमेन* हे शीलाचे पहिले पती होते‌. मार्क ह्यांचा मृत्यु झाल्यावर रजनिश शिष्य *जॉन शेल्फर* ह्यांच्या सोबत शीला हिनी दुसरा विवाह केला. अमेरिकेत शीला ही जेलमधुन सुटल्यानंतर स्वीस नागरीक *उर्स बिर्नास्टील* ह्यांच्या सोबत शीला हिने तिसरा विवाह केला. *शीला आनंद* ही ओशो रजनीश ह्यांच्यापासुन अलग झाल्यावर ही, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाली की, *"ओशो हे माझे गुरु आहेत. मी ओशोवर आज ही प्रेम करते."* परंतु ओशोची विचारधारा *"संभोग से समाधी तक"* ह्यामुळे शीला आनंद ही *"एड्स"* ह्या रोगामुळे मृत्युला प्राप्त झाली. बुध्दाच्या अष्टांग मार्गातील *"समाधी"* (Concentration) ही सम्यक मार्ग दाखविणारी आहे. तर ओशो रजनीश ह्यांची *"समाधी"* ???  हा विवाद विषय. *"विपश्यना"* (Meditation) हा अलग विषय आहे. मग *ली होंगजी* ह्यांची फालुन दाफा असो वा फालुन गोंग साधना. सांगावयाचे असे की, *"आपण कोणत्या मार्गाने जात आहे, ती दिशा समजुन घेणे गरजेचे आहे."*

             *"प्रेम"* (Love) हा व्यापक विषय आहे. सोप्या सरळ भाषेत मानवी दृष्टिकोनातून *"प्रेम म्हणजे दुस-या व्यक्तीबद्दल / प्राणी / वस्तु बद्दल तीव्र आकर्षण - भावनिक आसक्ती / काळजी / जवळीक / संरक्षण / आकर्षण / आपुलकी / विश्वास"* ह्या संदर्भाचा समावेश होतो. प्रेमाची काही रुपे ही आहेत. जसे की - *रोमॅंटिक प्रेम* (लैंगिक आकर्षण - भावना आधारित) / *मित्र प्रेम* (मैत्री - विश्वास - सहकार्य आधारित) / *कुटुंब प्रेम* (कौंटुबिक आपुलकी - काळजी) / *स्नेह* (व्यक्ती - वस्तु प्रती स्नेह भाव) / *परोपकार* (इतरांना मदत करणे - कल्याणकारी भावना). प्रेमाची काही गुणधर्म ही दिसुन येतात. जसे की - *आत्मियता* (जवळीक - विश्वास) / *उत्कटता* (तिव्र प्रेम भावना) / *बांधिलकी* (नाती जपणे). तसे बघितले तर *प्रेम* हे मानवी जीवनात खुप आवश्यक विषय आहे. सिध्दार्थ हे गोतम बुध्द बनण्यापुर्वी *"राजकुमार सिध्दार्थ - यशोधरा"* ह्यांंचे निस्सिम प्रेम संदर्भ / यशोधरा हिचा त्याग - जबाबदारी हा सहज असा विषय नाही. *आम्रपाली* हिचे वैशालीची नगरवधु बनने / *"आम्रपाली - सम्राट बिंबीसार"*  ह्यांचे निस्सिम प्रेम / देश प्रेमासाठी त्या दोघांचे वियोग होणे, हा प्रेम संदर्भ समजुन घेणे गरजेचे आहे. *महात्मा ज्योतिबा फुले - सावित्रीबाई* ह्यांच्या अंतर्मन प्रेमाचे आम्ही कधी मुल्यमापनचं केले नाही. हाच प्रश्न *बाबासाहेब डॉ आंबेडकर - रमाई* ह्यांच्या अंतर्मन प्रेमाचा आहे. त्यांच्या त्यागाचे केवळ बखाणचं गायिले गेले. परंतु कृतीशीलता शुण्य राहीली. *"साहित्य लिपी - भाषा उगम"* हे बुध्द विचार आहेत. ह्याबाबत हवे तसे संशोधन - प्रसार - प्रचार हा कधी झालाचं नाही. कुकुरबिटा सारखे लिखाण रचल्या गेले. *बुध्द - आंबेडकरी साहित्याला फक्त "विद्रोह - नकार" ह्या सिमित करण्यात आले.*  बुध्द  - आंबेडकरी साहित्यातील *"सौंदर्यशास्त्र - नैतिक वाद - मानवतावाद - प्रेम भाव"* इत्यादी अहं शोधण्याचा कां प्रयास केला नाही ? हा माझा प्रश्न आहे. भोमणगिरी साहित्यिकांची लाचारी स्विकारण्यात आली.  *आचार्य अश्वघोष* ह्यांचे एका कन्येशी प्रेम होणे - वियोग झाल्यानंतर *"उर्वशी वियोग"* नाटक लिहिणे हा भावनेचा विषय असला तरी, *"बुध्द साहित्याने आपली नैतिकता"* जोपासलेली आहे. इसवी १० व्या शतकानंतरचे *वैदिक युग* हे अनैतिकता युग होते. *"भोगवाद"* युग होते. *"वैदिक युगातील साहित्याने"* -  भोगवाद / अनैतिकता वाद / भ्रष्टाचार / धोकादारी / अविश्वास ह्या सर्व सीमा पार केलेल्या दिसुन येतात. प्रेम संदर्भ हे बदललेले आहेत. अर्थात अध:पतनांचे राज्य !!!


-----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर, दिनांक १३ जुन २०२५

Tuesday, 10 June 2025

 🇮🇳🤝 *भारतीय संविधान की मुल संरचना संदर्भ में सर्वोच्च न्यायालय और संसद इनके बीच उभरा हुआ संविधान अधिकार विवाद !*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


           *"भारत का संविधान"* (Constitution of India) यह मुलत: नागरिकों के *"मुलभुत अधिकार"* (Fundamental Rights) तथा *"मार्गदर्शक तत्व"* (Directive Principles) इन दो पहियों पर खडा है. सर्वोच्च न्यायालय द्वारा *"केशवानंद भारती"* (१९७३) इस केस ने, *"मुल सरंचना"* (Basic Structure) को संसद छेड नहीं सकती, यह निर्णय १३ न्यायाधिशों के पीठ ने, *"७ विरुध्द ६"* बहुमत से दिया था. तत्कालीन सरन्यायाधीश *एम. एस. सिकरी* इनकी अध्यक्षतावाली १३ न्यायाधीश खंडपीठ मे थे - *जे. एम. शेलत / के. एस. हेगडे / ए. एन. ग्रोवर / ए. एन. रे / पी जगमोहन रेड्डी / डी. जी. पालेकर / एच. आर. खन्ना / के. के. मैथु / एम. एच. बेग / एस. एन. द्विवेदी / बी. के. मुखर्जी / वाय. वी. चंद्रचुड.* और केशवानंद भारती केस रही - केशवानंद भारती केरल के एक हिंदु मठ के पुजारी थे. उन्होंने *"केरल भुमी सुधार अधिनियम "* को चुनौति दी थी. उनका कथन था कि, *"धार्मिक संस्थानो की संपत्ती को सरकार द्वारा अधिग्रहण नहीं किया जा सकता."* सर्वोच्च न्यायालय में ६८ दिन चले सुनबाई में, सर्वोच्च न्यायालय द्वारा बहुमत में अपने निर्णय में कहा कि, *"संसद को संविधान में संशोधन करने का अधिकार है. लेकिन संसद को संविधान के मुल सरंचना (Basic Structure) को बदलने की कोई अनुमति नहीं देता है."* अत: न्यायालय का वह निर्णय संसद के लिये *"गले का फासं"* बन गया है. अत: *"मुल संरचना"* (Basic Structure) क्या है ? यह भी एक विवादीत प्रश्न बन गया है. उपराष्ट्रपती *जगदीश धनकड* भी उसी विवादित प्रश्न पर ही उंगली रखकर, *"न्याय व्यवस्था"* पर आरोप करते रहे है. शायद *"नरेंद्र मोदी सरकार* को खुश कर, जगदीश धनकड राष्ट्रपति बनने के सपने देख रहे है. *"संविधानिक पद"* पर बैठे हुये *जगदीश धनकड* की वह कृति - *"संविधान पर बलात्कार"* समान दिखाई देती है, जो बहुत ही निंदनीय भाष्य है.

          भारतीय संविधान की *"मुल संरचना"* क्या है ? इस अंतरंग में जाने के पहले, सर्वोच्च न्यायालय द्वारा दिये गये और कुछ खास केस निर्णय भी महत्वपूर्ण है. *एस. आर. बोम्मई केस* (१९९४) / *इंदिरा नेहरु गांधी* विरुध्द राजनारायण (१९७५) / *मिनर्वा मिल्स* विरुध्द भारत संघ (१९८०) / *शंकरी प्रसाद केस* (१९५१) / *गोलक नाथ* विरुद्ध पंजाब राज्य (१९६७) / *वामनराव* केस (१९७१) / *२४ वा संविधान संशोधन* (१९७१) / *४२ वा संविधान संशोधन अधिनियम* (१९७६) यह उपरोक्त प्रमुख केस है. परंतु शब्द मर्यादा के कारण इन केस पर, हम फिर कभी चर्चा करेंगे. मेरी *"डॉक्टर उपाधी"* मिलने के बाद, मैने *"लोक प्रशासन / उद्द्योग प्रशासन / कानुन / संविधान / समाजशास्त्र / डॉ आंबेडकर / गांधी / बुध्दीझम / साहित्य / कला / इतिहास / अर्थशास्त्र / राजनीति"* आदि विषयों पर अध्ययन किया है. *"मेडिकल ऑफिसर"* भी रहा हुं. अत: उन तमाम विषयों के अध्ययन ने, मुझे एक नयी दिशा प्रदान की. जो भारतीय व्यवस्था से जुडे विषय है. भारत के *सरन्यायाधीश* बनने के बाद *भुषण गवई* इनका मुंबई दौरे का यह बयाण मुझे बहुत अच्छा लगा. सरन्यायाधीश *भुषण गवई* ने कहां कि, *"कार्यपालिका (Executive) / न्यायपालिका (Judiciary) / विधायिका (Legislature) यह तिनों व्यवस्था एक समान ही है. यहां कोई बडा और कोई छोटा नहीं है. भारत का संविधान (Constitution) ही यह सर्वोच्च है."* महाराष्ट्र शासन की ओर से *"सरन्यायाधीश प्रोटोकॉल"* पालन ना होना, वह जातीयवादी नालायकी का एक प्रमाण है. वंचित आघाडी के *एड. प्रकाश आंबेडकर / सुजित आंबेडकर* समान मुर्ख नेता लोग क्या कहते हैं ? वह मायने नहीं रखता. कभी कभी हमें लगता भी है कि, *प्रकाश आंबेडकर* इनके वकिल बनने के बाद, *प्रकाश आंबेडकर* इनको सामाजिक क्षेत्र मे *"सबसे पहले परिचीत"* कराना / नागपुर में *"पहला जाहिर सत्कार समारोह"* लेना, यह हमारी बहुत बडी भुलं थी. आज से चालिस साल पहले *डॉ. आनंद जीवने* इनकी अध्यक्षता में ही हमने, *"धनवटे रंगमंदिर"* मे जाहिर सत्कार समारोह किया था. हाथी पर बिठाकर बहुत बडी *"रॅली"* का सफल आयोजन किया था. हमने *प्रकाश आंबेडकर* इनसे जो अपेक्षा रखी थी, वे उन दिशा की ओर कभी बढें ही नहीं !!! यही नहीं *"दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया"* (TBSI) इसकी *"स्कीम"* (दुसरी बॉय लॉज) यह *हरिष मजगौरी* इन्होने मेरे स्टडी रुम में बैठकर ही लिखी थी. हरिष मजगौरी ये मेरे मम्मी के बुवा के लडके थे. हरीश मजगौरी भी *"TBSI के ट्रस्टी"* थे. तत्कालीन राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ. स. वि. रामटेके* भी कभी कभी मेरे घर आते थे. कहने का तात्पर्य यह कि, मैं बचपन से ही *"आंबेडकरी आंदोलन"* को देखते आया हुं. इसके साथ ही बाबासाहेब के बॉडीगार्ड रहे मेरे मामा *दिपकचंद फुलझेले / आकांत माटे / सदानंद फुलझेले* इनसे भी डॉ बाबासाहेब के सहवास विचार की जाणकारी मुझे मिलती रही.

         भारतीय संविधान का *"बुनियादी (मुल) तत्व"* (Basic Structure) क्या है ? वास्तव में यह प्रश्न ही उपस्थित करना *"बिन-अकल के सामने बिन बजाना समान ही विषय है ."* हमारे भारतीय संविधान में - *"संघीय संरचना / लोकतंत्र / धर्मनिरपेक्षता / कानुन का शासन / स्वतंत्र और निष्पक्ष चुनाव / न्यायिक समिक्षा"* आदी बुनियादी विषय यह सम्मिलीत है. अगर संसद में बिन-अकल / अनपढ / गुंडेगिरी व्यक्ति / भ्रष्टाचारी लोग जाते हो तो, हम *"विकास भारत"* का विचार कभी नहीं रख सकते. *बाबासाहेब डॉ आंबेडकर* इन्होने २५ नवंबर १९४९ को *"संविधान सभा"* (Constituent Assembly) में दिये गये भाषण की मुझे याद आ गयी. बाबासाहेब कहते हैं - *"संविधान यह कितना भी अच्छा हो, उसे अमल में लाने की जिम्मेदारी जीन पर है, वे लोग अप्रामाणिक हो तो, संविधान यह बुरा हो जाएगा. तथा संविधान यह कितना भी बुरा हो, उसे अमल करने की जाणकारी जीन पर है, वे लोग प्रामाणिक हो तो, संविधान यह अच्छा होने वाला है."* प्राचिन अखंड भारत (जंबुद्वीप) का *चक्रवर्ती सम्राट अशोक* इनके शासन काल के बाद, इसवी १० वी शती से *"वैदिक युग"* -  गद्दारी / धोकादारी का युग शुरु हो गया है. आज के ज्यादातर सत्ताधारी ऊनके ही वारिस दिखाई देते है. उपराष्ट्रपती *जगदीश धनकड* यह तो, *"संविधान बलात्कारी पुरुष"* दिखाई देता है. कांग्रेस के पितामह *मोहनदास गांधी* / संघवादी नायक *के सुदर्शन* / प्राचीन विचारविद *भर्तृहरी* इनके शब्दों में तो, *"भारतीय राजनीति यह वेश्यालय है."* अर्थात नेता लोग *"वेश्या"* हो गये है नां !!! अत: ऐसे नेताओं से *"समृध्द भारत"* की, क्या अपेक्षा करे ? इनकी मानसिकता *"बुरे विचारों की हो"* तो, उन्हे *"भारतीय संविधान"* में दोष दिखेगा ही !!! भारत के पडोसी देश - *"नेपाल / म्यानमार / बांगला देश / श्रीलंका / पाकिस्तान"* आदी देशों के शासन स्थिती का बोध करे तो, *"भारत के संविधान"* की महत्तता दिखाई देगी. लेकीन *"सम्यक बुध्दी"* होना भी जरुरी है.

             जब मैं *"कानुन की पढाई"* कर रहा था, तब हमारे प्राध्यापक *"भारतीय कानुन का लचीलापन तथा कानुन की कठोरता"* इस विषय पर भाष्य करते थे. अर्थात *"भारतीय संविधान"* को समझना इतना सहज भी नहीं है. संविधान के *"मार्गदर्शक तत्व "* (Directive Principles) की रक्षा के लिये / कभी कभी तो, *"मुलभूत अधिकारों"* (Fundamental Rights) का भी संशोधन किया जा सकता है. परंतु वह दोनो भी *"भारतीय संविधान रथ"* के दो पहिये है. *"सर्वोच्च न्यायालय"* यह *"भारतीय संविधान"* की कस्टोडियन है. *"वॉच डॉग"* है. भारत के सरन्यायाधीश *भुषण गवई* इनका मुंबई का उपरी पॅरा कथन मुझे बहुत अच्छा लगा. हमारे तिनो व्यवस्था में - *"कार्य पालिका (Executive) / न्यायपालिका (Judiciary) / विधायिका (Legislature)"* में गुणवत्ता प्राप्त / प्रामाणिक / देशभक्त आदी गुणवान लोगों का अभाव है. *"ऐसा विषय भी नहीं है कि, गुणवान लोगों की भारत में कमी है."* प्रश्न यह कि, भारत भ्रष्टाचार में लिप्त हो चुका है. *"भारत देशभक्ती"* दिखाई नहीं देती. *"मेरीट धारक"* पर सदियों से अन्याय होता आ रहा है. भारत आजादी के ७५ साल होने पर भी, *"भारत राष्ट्रवाद मंत्रालय / संचालनालय"* नहीं बन पाया है. ना ही बजेट कोई आर्थिक प्रावधान रहा है. आदमी की पहचान *"जाति - धर्म"* से होती है. ना कि नागरिकता *"भारतीय"* बनकर !!!


------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपुर दिनांक १० जुन २०२५

Saturday, 7 June 2025

 🌞 *आंबेडकरी बाप : ह्या प्रा. शुक्राचार्य गायकवाड स्तुतीसुमने संपादीत पुस्तकातील प्रा. डॉ. यशवंत मनोहर / प्रा. प्रदीप आगलावे ह्यांचे बाप मनोगत ?* (भाग - २)

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य,* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२


         मुंबई येथील *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* संपादीत / सुमेरु प्रिंटर्स एंड पब्लिशर्स द्वारा प्रकाशित *"आंबेडकरी बाप"* ह्या संपादीत पुस्तकावर माझी १ जुलै २०२५ रोजी माझी समिक्षा मिडियात प्रकाशित झाली. सदर माझ्या समिक्षेवर काही मान्यवरांकडुन मला व्यक्तीश: मेसेजेस प्राप्त झालेत. बहुतेक सर्वांनीच त्या माझ्या समिक्षेवर सकारात्मक भाव प्रदर्शित केला. काहींनी त्यावर अजुन प्रकाश टाकण्याचा विचार बोलल्याने सदर लिहिण्याचा हा उद्देश आहे. सदर संपादीत पुस्तकात ३५ लेखकापैकी *ज. वि. पवार* ह्या एकमेव मान्यवरांना सोडले तर सर्वांनीच त्यांच्या बापावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केलेला आहे. ज. वि. पवार ह्यांनी *"बापाचं नातं"* ह्या आपल्या मनोगतात बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांना रेखाटले आहे. साहित्यामध्ये *"आत्मकथन"* (स्व: जीवन पथ) लिहिण्याचा एक भाव दिसुन येतो. ब-याच समिक्षकांनी *"आत्मकथन"* हे एकांगी आणि अतिरंजित भाव असल्याची टीका केलेली आहे. *"आंबेडकरी बाप"* हे संपादीत पुस्तक लेखकांचे आत्मकथनचं आहे. त्यामुळे अतिरंजित भाव हा सदर संपादीत पुस्तकामध्ये आहे काय ? हा तर संशोधनाचा विषय आहे. तसे बघितले तर प्रा. शुक्राचार्य गायकवाड ह्यांनी *"बुद्ध - आंबेडकरी साहित्य"* ह्यावर संशोधनात्मक पुस्तक प्रकाशित केले असते तर, गायकवाड ह्यांच्या पुस्तकावर शब्द वर्षाव केला गेला असता. परंतु *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचा विचार व्यापारीक असल्यास त्यावर न बोललेले बरे ! सदर पुस्तकाची छपाई / मुखपृष्ठ / पेपर दर्जा इत्यादी बघता संपादीत पुस्तकाचे मुल्य रु. ५००/-  ठेवलेले आहे. सदर पुस्तकात *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचे फोटो असलेला एक टॅग आणि पुस्तकाच्या शेवटच्या पृष्ठावर संपादकाने आमचे मित्र *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* ह्यांच्या लेखणीतुन स्वतःचा परिचय लिहुन घेतलेला आहे. आणि प्रस्तावना *प्रा. डॉ यशवंत मनोहर* ह्यांनी लिहिलेली असुन सदर प्रस्तावनेची समिक्षा ही आधीच्या माझ्या समिक्षेत आलेली आहे.

         *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* असो वा *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* असो ह्या दोन्ही मान्यवरांचे जन्मगाव हे मला चांगले परिचीत आहे. *प्रा प्रदीप आगलावे* हा तर माझा जिवलग मित्र. *प्रदीप - सरोज* ह्यांच्या लग्नाचा मध्यस्थ ही मी तसेच फोटोग्राफर मीचं होतो. प्रदीपच्या लग्नातील ही एक घटना आहे. साधु साधु साधु म्हणतांना वधु ही वराचा पाया पडत असते. *सरोज* ही प्रदिपच्या पाया पडलेली नव्हती. तेव्हा प्रदिप ह्याने रागाने मंगळसुत्र सरोजकडे फेकुन दिले. सरोज हिच्या गळ्यामध्ये ते टाकलेले नव्हते. **मंगळसुत्र"* स्त्री यांनी बांधावे वा नाही हा ज्याचा त्याचा इच्छेचा प्रश्न आहे. *"लग्न हे बंधन आहे वा करार (Contract))"* हा विषय ही व्यक्ती सापेक्ष म्हणायला हवा. पण गोविंदराव वंजारी ह्यांनी नंतर प्रदिपच्या खांद्यावर हात ठेवुनी असा राग बरा नाही, हे बोलल्याचे मी बघितले आहे. *सरोज* हिने ही नंतर मंगळसुत्र घातल्याचे हे माझ्या स्मरणात नाही. प्रदीप आगलावे ह्यांच्या *सेवाग्राम* ह्या गावाला माझ्या ब-याच भेटी ही झाल्यात. सेवाग्राम अर्थात *मोहनदास गांधी* ह्यांची कर्मभूमी. प्रदीप आगलावे ह्यांचे जीवन हे *बापु आश्रमातील* आर शंकरनजी ह्यांच्या निवासातील एका खोलीत गेले. आर शंकरन ह्यांना प्रदीप आगलावे आणि विजय आगलावे हे *"चाचाजी"* म्हणायचे. गांधी आश्रमात असतांना प्रदीप आगलावे हा तेव्हा *"खादी वस्त्र"* परिधान करीत असे. *"माझी आणि प्रदीप ह्यांची मैत्री"* सुप्रसिद्ध कवि स्मृतीशेष *प्रा. ज्योती लांजेवार* ह्यांच्यामुळे झाली. तेव्हा लांजेवार ह्यांची मुलगी *प्रा. डॉ. अपर्णा लांजेवार* ही तेव्हा शिक्षण घेत होती. आता अपर्णा ही हैदराबाद येथे *"वरिष्ठ प्राध्यापक"* म्हणुन कार्यरत आहे. अपर्णा ही प्रदीप - माझ्या जिवलग मैत्रीबद्दल छानपणे माहिती देवु शकेल. प्रदीप नागपुरला शिकायला आला तेव्हा ही प्रदीप हा *"खद्दर वस्त्रधारी"* होता. प्रदीप हा नागपुर विद्यापीठ वस्तीगृहात राहातं असे. प्रदीप हा नंतर गोविंदराव वंजारी ह्यांच्या कॉलेजमध्ये *"प्राध्यापक"* म्हणून तो रुजु झाला होता. त्यांनतर त्याने चंदननगर येथे किरायाने राहायला सुरुवात केली. तेव्हा माझ्या दवाखान्यात असलेले औषधीचे खाली डबे मी प्रदीप ह्याला दिले. प्रदीप ह्याची गरीबी मी जवळुन बघितली आहे‌. प्रदीप ह्याचे *"प्रेम प्रकरण"* इत्यादींची मी साक्ष आहे‌. प्रदीप ह्याच्यावर असलेला गांधी प्रभाव हा *"मी / एड. मिलिंद बनसोड"* (माजी उपजिल्हाधिकारी) ह्यांच्या संपर्कात आल्यानंतर बदललेला होता. प्रदीप मग *"आंबेडकरी"* झाला. *प्रदीप - मी* आम्ही दोघे ही माझ्या घरी बरेचदा *"एका प्लेटमध्ये"* जेवण करीत असु. पुढे काही कारणे झाली / काही खाजगी विषय आहे / कामाच्या व्यस्ततेतुन आम्ही अलग अलग झालो. तरीही सरोज ही माझ्याकडे कधीकधी येत असे. आज ही *सरोज* कुठे भेटली तर हालचाल ती विचारीत असते. *प्रदीप* ह्याची ही बोलचाल कधी कधी होत असते. सांगायचे असे की प्रदीप ह्यांच्या लेखणीत हा भाव दिसुन आलेला नाही. कारण प्रदीपच्या आई, वडिल, भाऊ आणि परिवारासोबत माझे जवळचे नाते झाले होते.

          *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांचे जन्मगाव *येरला* (ता‌. काटोल) हे सुध्दा माझे चांगले असे परिचीत गाव आहे. ग्रामिण रुग्णालय नरखेड येथे मी *"मेडिकल ऑफिसर"* म्हणून कार्यरत होतो. काटोल येथिल ग्रामीण रुग्णालयातील *"मेडिकल सुपरीटेंडेंट"* तसेच प्रायव्हेट मेडिकल प्रक्टिसनर हे आमच्या शासन रुग्णालयात *"फॅमिली प्लॅनिंग सर्जरी"* करण्यास येत असत. आम्ही *"डॉक्टर अधिकारी / तहसीलदार / पोलिस निरीक्षक"* ह्यांच्या बैठका ह्या नित्याच्याच होत असतं. माझे नागपुरवरून नरखेड येथे जाणे - येणे हे नेहमीचे असल्यामुळे *"येरला"* येथे ही आमची *"वैद्यकीय कारणांमुळे"* भेटी होणे नविन नव्हते. कारण सदर क्षेत्राचे आरोग्य राखणे ही आमची *"शासन अधिकारी"* म्हणून जबाबदारी असे. त्यांनतर माझी बदली ही *"भिवापुर"* तहसील क्षेत्रामध्ये झाली होती. साहित्यिक *डॉ. धनराज डहाट* हे सुद्धा काटोल परिसरातीलचं. माझे वडिल हे जिल्हा परिषद शाळेमध्ये *"मुख्याध्यापक"* म्हणून कार्यरत होते. एकंदरीत माझे जीवन हे दारिद्र्यात गेलेले नसले तरी, *"खेड्यातील जीवन"* हे मी जवळुन बघितले आहे. शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे जीवन ही जवळुन बघितले आहे. खेड्यातील कास्तकार असो वा मजुर वर्ग असो, हा काबाडकष्टी असायचा. खेड्यातील शाळेत मुलांना दाखल करण्याची जबाबदारी ही शाळेतील शिक्षकांची असायची. आणि शिक्षण हे *"राष्ट्रिय कार्यक्रम"* शासन धोरण ठरलेले होते. *"शिक्षण हे मोफत दिले जात असे‌."*  खेड्यातुन तालुक्याच्या ठिकाणी शिकण्याकरीता पायी चालत जाणे हे विशेष असे नाविण्य नव्हते. *प्रा यशवंत मनोहर* ह्यांच्या *"बुद्ध - आंबेडकरी साहित्य लिखाणावर"* (?)  मागिल समिक्षेत लिहिलेले आहे. यशवंत मनोहर हे *"बुद्ध - आंबेडकरी साहित्यिक"* नाहीत. प्रा मनोहर हे *"व्यवसायिक / व्यवहारी / इहवादी साहित्यिक"* आहेत. तर *प्रा. प्रदीप आगलावे* ह्यांचे संशोधन लिखाण मग ते *समाजशास्त्रीय* विषय असो / *बुद्ध - आंबेडकरी* विषय असो दिसुन येत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे धर्मांतर पुस्तक असो वा समाजशास्त्रीय लिखाण असो, *"कॉपी एंड पेस्ट"* ह्या सदरात मोडणारे आहे. अर्थात *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* ह्यांना *"बुद्ध - आंबेडकरी साहित्यिक / संशोधक"* म्हणावे काय ? हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे बरेच संशोधन लिखाण हे उपलब्ध असुन, *"जात हा बंद वर्ग आहे"* (Caste is a closed class.) सारखे एखादे समाजशास्त्रीय संशोधन *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* ह्यांचे नावावर नाही. बुध्द - आंबेडकरी साहित्यातील *"नविनता शोध / सौंदर्यशास्त्र"* इत्यादीचे लिखाण होणे गरजेचे आहे. सदर बोध *"आंबेडकरी बाप"* ह्या संपादीत पुस्तकातुन कुठे ही झालेला नाही, असे खेदाने म्हणावे लागते. केवळ आणि केवळ संपादक / लेखक ह्यांची ही स्तुतीसुमने उधळली गेली आहेत. आणि हा प्रकार *"बुद्ध - आंबेडकरी साहित्य - चळवळ"* ह्यकरीता धोकादायक ठरणारा आहे.


------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपूर दिनांक ७ जुन २०२५

Thursday, 5 June 2025

 🌹 *हे जीवन संगित ...!*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर

       मो. न‌ ९३७०९८४१३८


फुलों का अपनापन, मन ही भाया है

हे जीवन संगित, बुद्ध बुद्ध ही रहा है...


ना कोई वहां, द्वेष राग लोभ रहा है

वैरता धोकादारी, कहीं दुर दुर रही है

पंछीओं का साथ, हे निष्पाप रहा है

निसर्ग मन में, बुद्ध बुद्ध ही दिखा है...


हे इतिहास देखें तो, वादें वादें हीं रहे है

पेट में छुरां युं, अपनों द्वारा ही भोपा है

पहचान करना भी, वहं आसान नहीं है 

बुध्द शरणं में, प्रेम मैत्री करुणा रही है...


बुध्द धम्मचक्रप्रवर्तन, एक क्रांती रही है

हे मानव मानव में, वह इतिहास रचा है

कार्यकारण भाव युं, जीवन मुल रहा है

प्रतित्यसमुत्पाद, मानव को सिख देता है...


---------------------------------------

नागपुर दिनांक ४ जुन २०२५

Tuesday, 3 June 2025

 🌳 *बदलाव....!*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो. न. ९३७०९८४१३८


हे निसर्ग जग !

निसर्गरचीत सौंदर्य 

वृक्ष वल्ली क्षुप ह्यांनी

निसर्ग वातावरणात

जगण्याला दिलेले वायु कण

प्राणीमात्रांचे मुक्त वावरणे

पण ह्या माणसाला 

बुध्दीजीवी प्राणी बनवुन

जबाबदारीची जाण दिली

सोबत माणुस प्रवृतीचे निर्माण ...

प्रवृतीत झालेला बदल

क्वचीतचं दिसुन येत असतो

माणुस हा प्रवृत्तीतचं जगतो

आणि प्रवृत्तीतचं मृत्युला जातो

बुध्दांनी ह्या माणसाला 

कुशल कर्म आणि अकुशल कर्म

ही काय काय आहेत ?

आणि काय त्याज्य असायला हवे ?

हे स्पष्टपणे सांगितले आहे

पांढरे शुभ्र वस्त्र परिधानाने

काषाय वस्त्र पेहराव केल्याने

प्रवृत्तीमध्ये बदलाव होत नसतो

बदलाव हा विचारांचा असतो

बदलाव हा कृतीचा असतो

बदलाव हा नीतिचा असतो...!!!


--------------------------------------

नागपूर दिनांक ३ जुन २०२५

Sunday, 1 June 2025

 📓 *प्रा. शुक्राचार्य गायकवाड ह्यांचे संपादीत आंबेडकरी बाप ही पुस्तक म्हणजे लेखक स्व - परिवारातील स्तुतीसुमनांचा अनावश्यक संकलन प्रयास होय !*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


           मुंबई येथील सुमेरु प्रिंटर्स एंड पब्लिशर्स द्वारा प्रकाशित आणि *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचे संपादीत *"आंबेडकरी बाप"* हे पुस्तक पोस्टाने मला मिळाले. पुस्तक चाळत असतांना सुरुवातीलाचं *अर्पण"* पृष्ठ / पुस्तक संपादकाने स्व:ताचा फोटो लावलेला टॅग हा दिसुन आला. *डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर* ह्यांचा शुभ संदेश / *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचे संपादकीय कथन / इहवादी साहित्यिक (बुद्ध आंबेडकरी साहित्यिक नाही) *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांची प्रस्तावना दिसुन आली. तसे बघितले तर स्व: लिखित असो वा संपादीत असो पुस्तकामध्ये असा हा क्रम नेहमीचाच आहे. सदर संपादीत पुस्तकामध्ये *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* पासुन *"पस्तिस लेखक / कवि / कार्यकर्ते"* ह्यांनी त्यांच्या बापावर लिहिलेले कथन दिसुन आले. सदर पुस्तकातील बरीच मान्यवर मला परिचीत आहेत. आणि त्यांच्या परिवार इतिहास बाबत मी परिचीत सुध्दा आहे. जसे - *प्रा. डॉ. यशवंत मनोहर / प्रा. डॉ. प्रदीप आगलावे / डॉ. धनराज डहाट / प्रा. दामोधर मोरे / प्रा. भरत सिरसाठ* इत्यादी. आंबेडकरी क्षेत्रामध्ये ब-याच लेखकांनी आत्मचरित्र (स्व: जीवन पथ) हे लिहिलेले आहे. आणि काही आत्मचरित्र हे तर अतिरंजित असल्याची टिका सुध्दा झालेली आहे. त्यामुळे *"आंबेडकरी बाप"* हे पुस्तक ह्या अतिरंजित संदर्भापासुन अलिप्त आहे काय ? हा संशोधनाचा विषय आहे. लेखकांचे आई - बाप ह्याबाबत खुप आदर आहे. आदर असायला हवा. परंतु *"आंबेडकरी बाप"* संपादीत पुस्तक प्रकाशीत करणे *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांना गरजेचे कां झाले ? हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. संपादक / प्रकाशक ह्यांचा हा व्यापार विषयक विचार असल्यास त्याबाबत न बोललेले बरे !!! *"बुध्द साहित्य / आंबेडकरी साहित्य"* गहन विषय संदर्भात हे संशोधन लेखन असते तर, सदर पुस्तक संपादीत प्रकाशनावर अभिनंदन वर्षाव करणे गरजेचे होते. परंतु ह्यात लेखक स्व:परिवार स्तुतीसुमने ??? पुस्तक मूल्य ५००/- रुपये. आता शुभ संदेश / संपादकीय / प्रस्तावना / बापाची महत्तता ह्या गंभीर विषयावर ही बोलु या. सर्वांनाच आपले आई वडिल हे प्रिय असतात.

        *"आंबेडकरी बाप"* ह्या प्रा. गायकवाड संपादीत पुस्तकाला *भीमराव यशवंतराव आंबेडकर* ह्या अ-साहित्यिक /भारतीय बौध्द महासभेचे विवादीत राष्ट्रिय कार्याध्यक्ष ह्यांनी शुभ संदेश दिलेला आहे. भीमराव यशवंतराव आंबेडकर ह्यांचा परिचय केवळ *बाबासाहेब परिवार'* निगडित आहे. सदर विषय एकवेळ मान्य करता येवु शकतो. परंतु *प्रा. शुक्राचार्य गायकवाड* ह्यांचे संपादकीय भाषा विचार - यशवंत मनोहर ह्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन (?) / *प्रा. डॉ यशवंत मनोहर* ह्यांची प्रस्तावना भाषा विचार कुठेतरी मनाला दुखवुन जातात. यशवंत मनोहर ह्यांनी सदर प्रस्तावना लिहिण्यापुर्वी *"श्रध्दा - अंधश्रद्धा"* ह्यामध्ये ते भेद नसल्याचे नागपुर येथे भाषण करून गेले. तसे बघितले तर *यशवंत मनोहर* हे बुद्ध- आंबेडकरी साहित्यिक नाहीत. ते *"व्यापारी - व्यवहारीक - इहवादी साहित्यिक"* आहेत. मनोहर यांना मार्क्स ही जवळचा आहे, केशवसुत ही जवळचे आहेत. मनोहर ह्यांना ही जाणीव असायला हवी की - *"श्रध्देला प्रज्ञेची जोड नसेल तर ती अंधश्रद्धा होते."* बुध्द हे श्रध्देला *"बी"* (Seed) मानतात. *"श्रध्दा"* ह्या विषयावर बुध्द साहित्यात खुप गाथा आहेत. तरी एक पाली गाथा संदर्भ देतो. *"सध्दां बिजं तपो वुट्ठि पञ्ञा मे |......"* (कसिभारद्वाज सुत्त) (अर्थात - श्रध्दा हे माझे बीज आहे....) *डॉ यशवंत मनोहर* हे "आंबेडकरी बाप" संपादीत पुस्तकातील प्रस्तावनेत लिहितात - *"आंबेडकरी बाप हे पुस्तक कारणकार्य आणि कार्यकारण सिध्दांतासारखे आहे."* आणखी दुसरा संदर्भ ही आहे - *"अर्थात जुन्यात न मावु शकणारी प्रज्ञा वा प्रतिभाच नव्या कार्यकारणभावाची वा कारणकार्यभावाची नवी निर्मिती करू शकते."* प्रा डॉ यशवंत मनोहर ह्यानी सदर बुध्द वचन समजुन घेतलेले दिसुन येत नाही. बुध्द ह्यांचा *"प्रतित्यसमुत्पाद सिध्दांत"* ही यशवंत मनोहर हे समजु शकलेले नाहीत. आणि बुद्ध सिध्दांतात उलटफेर सारखा प्रकार केलेला आहे. बुध्द साहित्यात पाली गाथा आहे - *"इदं सति इदं होति, इदं असति इदं न होति |"* (अर्थात - कारण असेल तर कार्य होते. कारण नसेल तर कार्य होत नाही.) *प्रा डॉ यशवंत मनोहर* ह्यांचा हा शब्दच्छल सहज असा विषय नाही. कारण यशवंत मनोहर ह्यांनी बुध्दाच्या *"कार्यकारणभाव सिध्दांत"* ह्याची तोडमरोड केली आहे.‌ तिसरा संदर्भ आहे - *"तेहतीस (३३) दिव्यांनी आपल्या बापासंबधी या पुस्तकात लिहिले आहे......"* खरे तर आपला बाप ह्या विषयावर सदर पुस्तकामध्ये लिहिणारी *"पस्तीस (३५) लेखक"* आहेत. प्रा डॉ यशवंत मनोहर हे एका ठिकाणी म्हणतात - *"आंबेडकरी बाप हे या तुरुंगाविरुध्दचे अपुर्व निर्णायक बंड होते."* खरे तर आमचा एकच बाप - *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* ह्यांनी ह्या तुरुंगाविरुध्दचे निर्णायक बंड केले आहे. अन्य कोणत्याही बापानी (?) हे कार्य केलेले नाही. फक्त लढ्यात ते सहभागी होते‌. *यशवंत मनोहर* ह्यांच्या सदर प्रस्तावनेत अजुनही विवादीत विषय आहेत. *"सीता वरुन भाताची परिक्षा"* ही उक्ती येथे लागु आहे. तेव्हा *"आंबेडकरी बाप"* ह्या पुस्तकातील लेखकांनी स्व:ताच्या परिवाराचा उदोउदो न केलेला बरा !!! प्रत्येकांनाच आपले आईवडील हे प्रिय आहेत. तेव्हा अतिरंजित भाव हा आंबेडकरी चळवळीला मारक ठरणारा असु शकतो. अर्थात सदर पुस्तक काय संदर्भ देणार आहे ? हा संशोधनाचा विषय आहे. तुर्त इतकेचं....!!!


---------------------------------------

▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      ‌नागपूर, दिनांक १ जुन २०२५

Friday, 30 May 2025

 👌 *एकोणतीसावे बुद्ध ...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


बिहारचा सासाराम शिलालेख

शीलेमधुन शब्द बोलतो

चक्रवर्ती सम्राट अशोकाने

प्राचीन भारत देशाचा उल्लेख 

जंबुद्वीप असल्याचा 

इतिहास पुरावा दिलेला आहे....

प्राचीन जंबुद्वीपात

अठ्ठावीस बुध्द होवुन गेले

सिंधु घाटी सभ्यता ही

प्राचीन इतिहास बयाण करते

पहिले ताण्हंकर बुद्ध अस्तित्व

प्राचीन बुध्द स्तुप इतिहास

भारत लिपी भाषा ओळख ही....

आणि चवथे दीपांकर बुद्ध हे

धनाढ्य सुमेधाचे दानत्व बघतात

दहा पारमिता पार करतांना

सुमेधाचे शाक्य परिवारात

जन्माला येण्याचा एक इतिहास 

आणि अठ्ठावीसावे बुध्द

सिध्दार्थ तथागत ....

बाबासाहेब डॉ आंबेडकर ही

दि बुद्धा एंड हिज धम्मा ग्रंथात

असित ऋषींचे भविष्य कथन

इतिहास बयाण करतांना

सिध्दार्थाचे सम्यक सबुध्द होणे

धम्मचक्रप्रवर्तनाचा इतिहास 

सिध्दार्थ गोतमाचे 

बुध्दत्व दुसरे भविष्य कथन...

सिध्दार्थ गोतम

कारुणीक बुध्द झाले

चक्रवर्ती सम्राट अशोक

शिलालेखात बुद्ध कोरुन

बुध्द विश्व इतिहास केला

आणि शुध्द श्वेत वस्त्र धारक

ऐकोणतिसावे बुध्द 

मैत्रेय बुध्दाचा इतिहास ही

पृथ्वीतलावर होवुन गेला

बोधिसत्व डॉ आंबेडकर 

बोधिसत्व डॉ आंबेडकर 

बोधिसत्व डॉ आंबेडकर...!!!

----------------------------------

नागपूर दिनांक २९ मे २०२५

Monday, 26 May 2025

 🇮🇳  *विश्व के अव्वल पांच देशों में भारत की अर्थव्यवस्था चवथे स्थान पर ?* (विश्व के युवा बेरोजगारी दर / गरिबी रेखा दर / जनसंख्या वृध्दी दर / विदेशी कर्ज बोजा / मुफ्त अनाज वितरण योजना आदी देखे तो विश्व - भारतीय अर्थव्यवस्था का क्या ???)

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


         भारत सरकार *"नीति आयोग"* के मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) *बी. व्ही. आर. सुब्रह्यण्यम* जी का भारतीय अर्थव्यवस्था पर, रविवार २५ मई २०२५ को, मैने एक बयाण इलेक्ट्रॉनिक मिडिया में सुना. सुब्रह्यण्यम जी ने कहा था कि, *"भारत की अर्थव्यवस्था ये विश्व अर्थव्यवस्था के चवथे स्थान पर आ गयी है. और आने वाले दो तिन सालों में, वह तिसरे स्थान पर आने का संदेश भी दे गये. और वह कथन उनका ना होकर, वह वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक (WEF) तथा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) द्वारा बताना भी वे नहीं भुलें."* उपरीय न्युज सुनकर, मैं बहुत ही सोचं में पड गया. पिछले कुछ माह से, *"विश्व की युवा बेरोजगारी दर / गरिबी रेखा दर / जनसंख्या वृध्दी दर / विदेशी कर्ज बोजा / मुफ्त अनाज वितरण योजना"* आदी विषयों पर, मै अध्ययन कर रहा था. भारतीय अर्थव्यवस्था में *"विश्व की पाचवी अर्थव्यवस्था"* बनने पर, मैने भारत के सद्य आर्थिक स्थिती पर, एक लेख भी लिखा था. *"कौन भारत का देशभक्त नहीं चाहता कि भारत आर्थिक समृध्द बने ?"* परंतु वहां आर्थिक हेरफेर ना होकर, सही अर्थो में, *"भारत  विकसित देश"* हो. कुछ दिन पहले ही मेरा मुंबई प्रवास रहा.‌ और ज्यादा एक्सर्शन के कारण, मै ५ - ६ दिन तक *"व्हायरल फिवर"* से ग्रस्त रहा. कुछ ठिक ही हुआ तो, मुझे दो दिन के लिये नयी दिल्ली को जाना पडा. और नयी दिल्ली से वापसी पर, पुनश्च *"व्हायरल फिवर"* ने जखड दिया. अत: यह न्युज सुनकर मन नहीं माना तो, लिखने को मैं बैठ गया.

         नीति आयोग के *सुब्रह्यण्यम* ने भारत की अर्थव्यवस्था *"चवथे स्थान पंहुचने के कुछ कारण"* भी बतायें. जैसे - देश अंतर्गत बढती मांग (ग्राहक खर्च / गुंतवणूक वृध्दी) / युवा कार्यक्षम लोगों की बढती संख्या / धोरणात्मक सुधार (कर प्रणाली सुधार / डिजीटायझेशन / पायाभूत सुधार में इन्हेस्टमेंट / मेक इन इंडिया) आदी.‌ साथ साथ ही वे *"जापान की घटती अर्थव्यवस्था"* (?) पर भी बोल गये. *"जागतिक व्यापार में तणाव / जनसंख्या में कमी होना / धोरणात्मक बदलाव"* आदी. हमे *"पांच (५) अव्वल देश के अर्थव्यवस्था"* का वह ग्राफ भी समझना होगा. *"अमेरिका - ३०.५१ ट्रिलियन डॉलर / चायना - १९.२३ ट्रिलियन डॉलर / जर्मनी - ४.७५ ट्रिलियन डॉलर / भारत - ४.१८७ ट्रिलियन डॉलर / जापान - ४.१८६ ट्रिलियन डॉलर."* (स्त्रोत - WEF & IMF) अर्थात USA / संयुक्त राष्ट्र अमेरिका यह *"विश्व शक्ति देश"* है. *"चायना की अर्थव्यवस्था"* भी उसी *"विश्व शक्ति"* बनने की ओर बढ रही है.  विशेषतः *"विश्व व्यापार युध्द"* (World Trade War) भी *'अमेरिका × चायना"* बीच ही छेडा हुआ है. हमें यह समझना होगा कि, *"अमेरिकी अर्थव्यवस्था"* भी उतनी मजबूत नहीं है, जितनी  *"चायना अर्थव्यवस्था"* मजबुत है. वही चायना हमारा *"राजनैतिक शत्रु"* (विरोधी) भी है. फिर भी भारत चायना से *"व्यापारीक संबंध"* बनाये हुये है. हमारे पडोसी देश *"नेपाल / श्रीलंका / म्यानमार / बांगला देश"* आदी देश चायना से मित्रता बना चुके हैं. और भारत से दुरी हुयी है. चायना *"औद्योगिक क्षेत्र"* मे विकास की ओर है. *"जापान"* की स्थिती भी वही है. वही *"भारत के औद्योगिक विकास पहेलीओं"* (Industrial Growth) को, हम कैसे बयाण करे ??? मेरे स्वयं *विश्व के कुछ देशों के भ्रमण"* ने और अध्ययन ने, मुझे *"उद्द्योग / व्यापार"* आदि की अनुभुती करा दी.

           विश्व के देशों पर, कुल *"१०२ ट्रिलियन डॉलर" का कर्ज* बताया जाता है. *"अमेरिका - ३६ ट्रिलियन डॉलर / चायना - १४.६९ ट्रिलियन डॉलर / जापान - १०.७९ ट्रिलियन डॉलर / युनायटेड किंग्डम - ३.४६ ट्रिलियन डॉलर / फ्रांस - ३.३५ ट्रिलियन डॉलर / इटली - ३.१४ ट्रिलियन डॉलर / भारत - ३.०५७ ट्रिलियन डॉलर / जर्मनी - २.९१९ ट्रिलियन डॉलर / कॅनडा - २.२५३ ट्रिलियन डॉलर / ब्राझिल - १.८५३ ट्रिलियन डॉलर. "*  भारत का विदेशी ऋण - *६४८.८ बिलियन डॉलर,* यह दिसंबर २०२४ तक बताया जाता है. भारत के बाहरी ऋण का ५४.८% अमेरिकी डॉलर था. भारत सरकार पर कर्ज एक जटील मुद्दा है. तथा जो *"सकल घरेलु उत्पाद"* (GDP) का ५६% बताया जाता है. भारत पर *सन २०१३* में बाह्य ऋण - ४०९.४ बिलियन डॉलर तथा अल्पकालीन ऋण - २०.४ बिलियन डॉलर था. *सन २०१४* में  बाह्य ऋण - ४४६.२ बिलियन डॉलर तथा अल्पकालीन ऋण - २०.५ बिलियन डॉलर हो गया. *सन २०१९* में बाह्य ऋण - ५४३.१ बिलियन डॉलर तथा अल्पकालीन ऋण - १९.९ बिलियन डॉलर, *सन २०२४* में बाह्य ऋण - *७६५ / - लाख करोड* बताया जाता है. *सन २०२५* की भारत की *"राजस्व कुल प्राप्ति ३४.९६ लाख करोड"* / अनुमानीत लक्ष ५०.६५ लाख करोड तथा *शुध्द प्राप्ती - २८.३७ लाख करोड* बतायी गयी है. *"कर्ज बढने के प्रमुख कारण* - विकास योजना को लागु करना / राजस्व की कमी / आर्थिक मंदी /अन्य संकट बताये गये है. *"कर्ज से जुडी जोखिम"* - व्याज का भुगतान / अर्थव्यवस्था का प्रभाव / निवेश की कमी होना बताया जाता है. *"अत: भारत सरकार को, कर्ज का बोझ कम करने के लिये, राजस्व को बढाना / खर्च को कम करना यह बहुत जरुरी है."* परंतु नयी दिल्ली की *"नयी संसद भवन का निर्माण"* तथा संसद सदस्य का पेंशन / सॅलरी / सुविधा / विमान खरेदी आदी खर्च प्रश्न कर देते है. *नरेंद्र मोदी* काल में, *"सरकारी कंपनीयां ३०० से घटकर २ दर्जन"* हो जाना / *२२ उद्योगपतीयों का २२ लाख करोड का कर्ज माफ करना* (?) भी, प्रश्न चिन्ह कर जाते है.

            दुसरा महत्वपूर्ण विषय *"जनसंख्या वृध्दी"* (Population Control) का है. भारत भौगोलिक दृष्टी से *"विश्व का सातवा देश"* है. जब की *"जनसंख्या के दृष्टी"* से, दुनिया का सबसे बडा देश है. विश्व की जनसंख्या *"८ अरब"* बतायी जाती है. चायना / भारत की जनसंख्या १.४ बिलियन बतायी गयी. तथा सन २०२४ में, भारत की जनसंख्या *"१४५ करोड"* हो गयी है. विश्व के जो सबसे ज्यादा आबादी वाले १० देश है, वे - *"चायना / भारत / अमेरिका / इंडोनेशिया / पाकिस्तान / नायजेरिया / ब्राझिल / बांगला देश / रशिया / मेक्सिको"* यह देश है. विश्व का *"गरिबी दर"* (Poverty Rate) यह ९.२ % है. और उनकी *"प्रतिदिन आय २.१५ डॉलर"*  (भारतीय रु. १६५/- साधारणतः)  *"विश्व बॅंक"* (World Bank) ने बतायी है. अर्थात विश्व बॅंक उन्हे *"गरिबी रेखा"*  (Poverty Line) की ओर निर्धारित करता है. भारत में *सन २०११ - १२* में, ६१.८% लोग *गरीब* बताये गये, जो *सन २०२२ - २३* मे, २८.१% बताया गया है. अगर भारत में *"गरिबी का दर"* सन २०२५ तक उपरोक्त हो तो, भारत के *"१४५ करोड जनसंख्या"* में, सन २०२५ में, *"८१.३५ करोड"* (५६.१०%) लोगों को,*"सार्वजनिक वितरण प्रणाली"* (PDS) अंतर्गत, *"मुफ्त अनाज वितरण"* क्यौं किया जा रहा है ? यह बडा प्रश्न है. अर्थात भारत सरकार *"गरिबी रेखा दर"* (५६.१० % लोगो को मुक्त अनाज देना) यह छुपा रही है, यह सिधे तौर पर दिखाई देता है.

          वैसे भारत की बहुत सारी समस्यांएं है. परंतु *"बेरोजगारी"* (Unemployment) समस्या, विषय पर चर्चा करते है. विश्व में भी बेरोजगारी यह एक गंभीर समस्या है. कई देशों का वह प्रमुख आर्थिक और सामाजिक विषय बन चुका है. सन २०२३ में *विश्व बेरोजगारी दर - ४.९६ %* है. International Labour Organization (ILO) के अनुसार, युवा पुरुषों का बेरोजगारी दर - *१३.४%* तथा युवा महिलाओं का दर - *१२.३%* है. विश्व के कुछ देशों में *"बेरोजगारी की स्थिती"* - अमेरिका - ४.१% / चायना - ४.६% / जर्मनी - ३.४% / जापान - २.६ / भारत - ४.२% / युनायटेड किंग्डम - ४.१% / फ्रान्स - ७.४% बतायी गयी है. यहां प्रश्न *"भारत के बेरोजगारी दर - ४.२% "* का है. भारत की बेरोजगारी प्रमाण और ज्यादा हो सकता है. वह छुपाये जाने की हमें आशंका है. *बेरोजगारी के कारण* - आर्थिक मंदी / तर्कनिकी परिवर्तन / कौशल की कमी / शिक्षा तथा प्रशिक्षण की कमी / सामाजिक असमानता यह बताये जाते है. तथा *"बेरोजगारी का प्रभाव"* - आर्थिक प्रभाव / सामाजिक प्रभाव / स्वास्थ प्रभाव हमें दिखाई देते है. अत: *"बेरोजगारी का समाधान"*- आर्थिक विकास / शिक्षा तथा प्रशिक्षण की व्यवस्था / रोजगार सृजन / बेरोजगारी भत्ता / सामाजिक सुरक्षा हो सकते हैं.

         भारत मे *पहलगाम"* (कश्मिर)  प्रकरण ने, सेना को *"ऑपरेशन सिंदुर"* करना मजबुर किया. हमे हमारे तिनों दलों के सैनिकों पर नाझ़ है. परंतु भारत में *"पहलगाम समान घटना"* का होना, यह हमारी कमजोरी बयाण करती है. यह शर्मसार घटना है. और उस पर राजनीति हो तो, और खेद का विषय है. *"ऑपरेशन सिंदुर"* ने प्राचिन नागवंश की याद दिलाई.  *"कश्मिर यह नागवंशीय प्रदेश था."* तधा सिंदुर का पर्यायी शब्द *"नाग + रंगी > नारंगी / नारिंगी"* है. और वह नाग लोगो की खोज है. *भारत की तीनों सेना के मजबुती के धोरण* पर भी, प्रश्न उठाये जाते रहे है. *"भारत की आर्थिक स्थिती कमजोर क्यौ हुयी ?"* यह भी हमारे सामने प्रश्न है. भारत को *"आजादी"* मिलने के बाद, भारत की हालात बहुत खस्ता रही थी. परंतु भारत एक *"शक्तिशाली देश"* बनकर उभर गया था. आज भारत का उसी *"आर्थिक खस्ताहाली"* की ओर बढना, और दुसरी ओर *"भारत को चवथी विश्व आर्थिक बताना,"* यह परस्पर विरोधी दिशाएं है. इस पर राजनीति ना करते हुये, हमें बैठकर गंभीर चिंतन करना होगा. *"भारत राष्ट्रवाद"* का अभाव भी दिखाई देता है. और *"धर्मांधी राजनीति"* का प्रभावी होना भी, देश के आंतरीक सुरक्षा के लिये, अच्छे लक्षण नहीं है. अत: भारतीय राजनेताओं को इस विषय पर, गंभीर चिंतन करना बहुत जरुरी है. नहीं तो कांग्रेसी पितामह *मोहनदास गांधी* / संघवादी नायक *के सुदर्शन* / प्राचिन विचारविद *भर्तृहरी* इनके शब्दों में, *"भारतीय राजनीति यह वेश्यालय है."* उस शब्दों के अनुसार नेताओं को, *"वेश्या"* की उपमा दी जाना कोई गलत नहीं होगा.


------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

         नागपूर दिनांक २६ मई २०२५

Sunday, 25 May 2025

 🧜‍♂️ *आजचे बदललेले जग* ...!

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो.न. ९३७०९८४१३८


निसर्ग जगात वावरतांना 

रमणीय स्थळे - जंगल इत्यादी

ह्या मानवी मनाला 

सर्वस्वी आनंद देत असतात

खरी मनाची शांती 

निसर्ग शुध्द हवा देणारा

तो धबधबा वाटायला लागतो

आणि कारने असणारा प्रवास

सोबतीला मित्र सहवास

कारमध्ये चालणारी गप्पांची बरसात

प्रेम - मैत्री आठवणी बनुन जातात ...

बुध्द विहारात प्रवेश करणे

बुध्दाला मनस्वी वंदन

जगाच्या प्राचीन इतिहासात जातांना

प्राचीन भिंतीवर बसल्यावर

कुशीला बाहुपाशेत घेतल्याचा

एक अनुभव करुन जातो

आणि प्राचीन जगात असल्याचा

बोध ही होवुन जातो

प्राचीन संस्कृतीची प्रामाणिकता

सत्यवादीता - एकनिष्ठता 

दिलेल्या शब्दाला जागणे 

ही भावना आज शोधीत असतो

तेव्हा मला दिसुन येते

आजचे बदललेले जग !!!


-----------------------------------

नागपूर दिनांक २५ मे २०२५

Thursday, 22 May 2025

 🇮🇳 *सरन्यायाधीश भुषण गवई इनके मुंबई का प्रोटोकाल से लेकर विभिन्न नेताओं के (?) बोले गये कुछ विवादीत बयाणं !*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


          १४ मई २०२५. सरन्यायाधीश *भुषण रामकृष्ण गवई* जी इनको भारत के महामहिम राष्ट्रपति *द्रौपदी मुर्मू* इनके द्वारा शपथ ग्रहण का क्षण. भारत के इतिहास में एक बौध्द धर्मीय सरन्यायाधीश होने का दिन. वह दिन बडा ही गौरवपुर्ण दिन रहा है. वैसे भारत के राष्ट्रपति हो या सरन्यायाधीश हो, *"मागाससमाज वर्ग के महामहिम वर्गधारी"* उस वरिष्ठ स्थान पर पहुंच गये है. परंतु बौध्द धर्म से जुडा हुआ मान्यवर, वह वरिष्ठ स्थान नहीं पा सका. संविधान निर्माता *डॉ बाबासाहेब आंबेडकर* इनका सपना भी था कि, हमारे बौध्द प्रतिनिधी ऐसे वरिष्ठ स्थान पर पहुंचे. सरन्यायाधीश *भुषण गवई* जी ने, *"५२ वे सरन्यायाधीश"* बनकर उसकी पुर्ती भी की है. परंतु *"रिपब्लिकन राजनीति"* लो या, *"बहुजन समाज पार्टी की राजनीति "* लो, वह जीस और जा रही है या, *"सत्ता राजनीति की भिख"* में वह मशगुल हो गयी है, वह घटना शर्मसार करनेवाली है. *"आंबेडकरी राजनीतिक नेताओं"* के नाम भी क्या लेना ? उन्हे *"कुत्ते बोलना"* भी, वह कुत्तों की तोहिम होगी. क्यौं कि कुत्ते *"वफादार"* होते है. यह तो *"राजनैतिक भेडिया"* है, जो किसी अन्य के ही तुकडों पर पलते है. कांग्रेसी पितामह *मोहनदास गांधी* / संघवादी नायक *के. सुदर्शन* / प्राचिन विचारविद *भर्तृहरी* इनके शब्दों में, *"भारतीय राजनीति वेश्यालय"* है. अत: नेता लोग तो *"वेश्या"* हो गये नां ? रिपब्लिकन राजनीति के *रामकृष्ण गवई* जी से मेरे अच्छे संबंध रहे है. उनके छोटे सुपुत्र रिपब्लिकन के *डॉ. राजेंद्र गवई* से भी मेरे संबंध बने है. परंतु *"सामाजिक संबंध"* बने रहना और *वैचारिक भाव"* यह दोनो अलग अलग विषय है. परंतु *भुषण गवई* जी इनका सरन्यायाधीश बनना बहुत कुछ बयाण कर देता है. उसी पर्व पर सरन्यायाधीश *भुषण गवई* इनके सरन्यायाधीश बनने पर, मुंबई के पहले ही दौरे में, *"महाराष्ट्र शासन राजशिष्टाचार तथा कुछ नेताओं के नेताओं के विवादीत बयाण"* देश के लिये, एक शर्मसार संदेश भी दे गया. हम यहां उसी बिंदु पर चर्चा करते हैं.

       *"मा. सरन्यायाधीश"* ही, यह भारत वर्ष के महामहीम *"राष्ट्रपति"* को, पद और गोपनीयता की शपथ देते है.  तथा भारत देश के महामहीम *"राष्ट्रपती"* ही, यह मा. सर्वोच्च न्यायालय के *"मा. सरन्यायाधीश"* को, पद और गोपनीयता की शपथ देते है. भारत के *"प्रधानमंत्री"* वह शपथ नहीं देते, यह हमें समझना बहुत जरुरी है. वह मान्यवर केवल *"शपथ ग्रहण समारोह"* उपस्थित होते है. *"भारत के संविधान"* ने वह व्यवस्था की है. और भारत के सरन्यायाधीश *भुषण गवई* जी का यह बडा वक्तव्य रहा है कि, *"भारत का संविधान ही यह सर्वोच्च है. कार्यपालिका / न्यायपालिका / विधायिका यह तो एक समान ही है. यहां कोई भी बडा और कोई छोटा नहीं है,"* इसके पहले के ५१ वे भुतपुर्व सरन्यायाधीश *संजीव खन्ना* इन्होने भी *"भारत के संविधान"* को ही सर्वोच्च माना है. अत: संसद में बैठे हुये सभी *"संसद गण"* भी, स्वयं को सर्वोच्च कभी ना समझे. हमारे देश के लिये सर्वोच्च *"भारतीय संविधान"* ही है. और भारतीय संविधान छेडने की भुलं भी ना करे ! मै पिछले कुछ दिनो से, इस गंभिर विषय पर लिखने का मन बनाया था. परंतु *"बुध्द पुर्णिमा"* के दो - तिन दिन पहले से, मैं *"व्हायरल फिवर"* से ग्रस्त था. और वह व्हायरल फिवर ५ - ६ दिन रहा. बोलने में कष्ट हो रहा था. वही मेरा दो दिन का *"नयी दिल्ली"* दौरा भी रहा. मेरे प्रवास में ही मैने *"HWPL Korea's WARPO Interfaith Meeting"* को, २१ मई २०२५ को संबोधित भी किया. उसके पहले *"बाये पैर की जखडन"* से, एक माह पिडित रहा. ऐसे ही कुछ कारण रहे है, मैं इस महत्वपूर्ण विषय पर नहीं लिख पाया. आज लिखने का पुर्णतः मन बना ही दिया. और शब्द निकलते रहे.

        भारत के सरन्यायाधीश बनने पर, *भुषण गवई* जी पहले बार *"मुंबई दौरे"* पर आये थे. परंतु सरन्यायाधीश *भुषण गवई* जी का, स्वागत करने के लिये *"राजशिष्टाचार"* का पालन नहीं किया गया. महाराष्ट्र सरकार का एक भी *"वरिष्ठ अधिकारी"* (राज्य का प्रमुख सचिव / पोलिस महासंचालक / पोलिस आयुक्त) उपस्थित नहीं थे, बल्की *"सरकारी कार"* भी उपलब्ध नहीं करायी गयी. शायद यह चुक जानबुझकर की गयी होगी. क्यौं कि *"धर्म / जात"* यह प्रमुख कारण दिखाई देता है.‌ और महाराष्ट्र शासन की ओर से, महसूल मंत्री / भाजपा प्रदेशाध्यक्ष *चंद्रशेखर बावनकुले"* इन्होने, सर्वोच्च न्यायालय के सरन्यायाधीश कार्यालय को फोन कर, माफी मांगी है. कौन है यह *मि. चंद्रशेखर बावनकुले* नाम का प्राणी  ? जाहिर माफी तो महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री *देवेंद्र फडणवीस* इन्होने मांगणी चाहिए थी. परंतु *"ब्राह्मण्य विचारधारा"* बीच आ गयी है नां !!! भारत देश का बंट्याधार भी, इसी *"ब्राह्मण्य विचारधारा"* ने किया है, जो भारत का एक इतिहास है. यहां सवाल यह भी है कि, *"राजशिष्टाचार"* पालन ना करने की, इतनी बडी गलती किसने की है ? और क्यौं की गयी है ? भारत के सरन्यायाधीश *भुषण गवई* जी इन्होने, *"राजशिष्टाचार"* का पालन ना होने पर, जाहिर खेद भी जताया है. और वह सवाल तो, एक पहली बनकर रह गया है. उधर बाबासाहेब डॉ आंबेडकर परिवार के सदस्य - एक दुधपिता बच्चा *सुजात आंबेडकर* भी विवादित बयाण कर जाता है. साथ ही *एड. प्रकाश आंबेडकर* इनके विवादित बयाण को भी क्या कहे ? हम बहुत ही शर्मसार है, इस प्रकार की *"खोकली राजनीति"* के लिये ???


-----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       दिनांक २२ मई २०२५

Wednesday, 21 May 2025

 👌 *HWPL (H.Q.: Korea) इस विश्व स्तरीय आंतरराष्ट्रिय संघटन की ओर से, २१ मई २०२५ को झुम पर आयोजित, "विश्व शांती शिखर सम्मेलन" इस विषय पर, "आंतरधर्मीय परिसंवाद" कार्यक्रम...!*

* *डा. मिलिन्द जीवने,* अध्यक्ष - अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशन, नागपुर *(बुध्दीस्ट एक्सपर्ट / फालोवर)* इन्होंने वहां पुछें एक प्रश्नों पर, इस प्रकार उत्तर दिये...!!!


* प्रश्न - १ :

* *आपके धर्मग्रंथ में मानव प्रकृति को कैसे परिभाषीत किया गया है ?*

* उत्तर : - सबसे पहले हमें मानव प्रकृति को समझना होगा. वो कैसे बनती है ? वह किस प्रकार की होती है ? धम्मपद के यमक वग्गो की एक गाथा बताना चाहुंगा.

*"मनोपुब्बङ्गमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया | मनचा से पदुट्ठेन भासति वा करोति वा | ततोनं दुक्खमन्वेति चक्कं व वहतो पदं ||"* (अर्थात :- सभी शारीरीक, वाचिक और मानसिक कर्म पहले मन में उत्पन्न होते है. मन ही मुखिया है. अत: वे मनोमय है. जब व्यक्ति सदोष मन से बोलता है, काम करता है, तो वह कष्ट, दु:ख को उसी प्रकार भोगता है, जैसे बैलगाडी के पहिये बैल के पैरो से पीछे पीछे आते है.)

----------------------------------------

मानव प्रकृति भी उसी लक्षण अनुरुप होती है. मानव प्रकृति में वैरता भी होती है. उसी संदर्भ की धम्मपद में गाथा बतायी गयी है.

*"न हि वेरेन वेरानि सम्मन्तीध कुदाचनं | अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ||"* (अर्थात :- वैर से वैर कभी शान्त नहीं होता. अवैर से वैर शान्त होता है. यही संसार का नियम है. यही सनातन धर्म है.) हमें यह समझना होगा की, बुध्द का धर्म ही सनातन धर्म है.

-------------------------------------------

बुध्द ने मानव प्रकृति का एक नियम बताया है.

*"इदं सति इदं होति, इदं असति इदं न होति |"* (अर्थात :- कारण हो तो कार्य होता है. कारण ना हो तो कार्य नहीं होता.)

------------------------------------------

सृष्टी का कोई कर्ता है क्या ? या मानव प्रकृति बनाने का कोई कर्ता है क्या ? यह अहं प्रश्न है. बुध्द कहते हैं -

*"न हेत्थ देवो ब्रम्ह संसारस्य अत्थि कारको | बुध्दधम्मा पवत्तन्ति हेतुसंभारपच्चया ति ||"* (अर्थात :- बुद्ध ने विश्व का कोई कर्ता नहीं माना. सृष्टी के नियम अनुसार अपने आप सृष्टी चक्र चलते रहता है.)

-------------------------------------------

बुद्ध ने चार प्रकाल के भौतिक पदार्थ माना है. - पृथ्वी, आप,, तेज, वायु. बुध्द‌ ने आकाश तत्व को नहीं माना.‌ मानवी शरीर भी उसी चार तत्व से बना है. और मृत्यु के बाद उन्ही चार भौतिक तत्व में शरीर मिल जाता है. प्रतित्यसमुत्पाद सिध्दांत भी कार्यकारण नियम का अनुकरण करता है. और मानवी प्रकृति भी उसी का एक भाग है.


+++++++++++++++++++++

प्रश्न २ :

* *आपके धर्मग्रंथ के अनुसार, एक आदर्श मानवीय जीवन जीने के लिये कौन कौन से प्रयास आवश्यक है ?*

* उत्तर :- हमने पहले प्रश्न में मानव प्रकृति विषय पर चर्चा की है.  बुध्द ने वैरता न करने की शिक्षा दी है. वह गाथा है -

*'न हि वेरेन वेरानि सम्मन्तीध कुदाचनं | अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ||"* (अर्थात :- वैर से वैर कभी शांत नहीं होता. अवैर से वैर शांत होता है. यही संसार का नियम है. यही सनातन धर्म है.)

------------------------------------------

बुध्द ने मानव को अपना कार्य स्वयं करने की शिक्षा दी है. वह गाथा भी सुने -

*'तुम्हेहि किच्चं आतप्पं अक्खातारो तथागता | पटिपन्ना पमोक्खन्ति झायिनो मारबंधना ||"* (अर्थात :- कार्य करने के लिये तुम्हे ही उद्योग करना है. तथागत का कार्य केवल मार्ग दिखाना है. उस अनुसार तुम्हे मार्ग पर आरुढ होकर, ध्यानमग्न होकर मार के बन्धनो से मुक्त होना है‌.) बुद्ध ने देव आहे संकल्पना को नकारा है.

-------------------------------------------

बुध्द ने तृष्णा की आसक्ती शोक का कारण माना है. बुध्द कहते हैं -

*"तण्हाण्य जायते सोको, तण्हाय जायते भयं | तण्हाय विप्पमंतस्स, नत्थि सोको कुतो भयं ||"* (अर्थात :- तृष्णा के कारण शोक उत्पन्न होता है. भय उत्पन्न होता है. तृष्णा से मुक्त होने पर, शोक नहीं रहेगा. ना भय रहेगा.)

-------------------------------------------

विसुध्दीमग्ग इस ग्रंथ में मृत्यू का कारण बताया है.

*"नामं च रुपं च इथ अत्थि सच्चतो, न हेत्थो सत्तो मनुजो इव अभिसंखात, दुक्खस्स पुञ्ञो विणकट्ठसदिसो ||"* (अर्थात :- नाम - रुप यह जोडी एकमेक पर आश्रित होती है. जब एक भंग हो जाती है, तब दुसरी भी भंग हो जाती है. और मृत्यु होता है.)

-------------------------------------------

बुध्द ने चित्त को सर्वोपरी माना है. उस की एक गाथा है.

*'चित्तेन नियतो लोको |"* (, अर्थात :- सृष्टी - संसार ही चित्त की उपज है. इस लिये चित्त ही सर्वोपरी है. इसलिए चित और उस के विशेष गुणों का अभ्यास करना चाहिए.

------------------------------------------

बुध्द के धम्म का सारं दो लाईन में हम समझ सकते हैं. वह गाथा है -

*"सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसम्पदा | सचित्त परियोदपनं एतं बुध्दानं सासनं ||"* (अर्थात :- सभी पापो को न करना, कुशल कर्म करना तथा स्वयं के मन को (चित्त) परिशुध्द करना, यही बुद्ध की शिक्षा है. यही बुद्ध का शासन है.) बुध्दीझम बहुत व्यापक विषय है.  फिर भी कम शब्दों में, मैने बताने का प्रयास किया है. भवतु सब्ब मङ्गलं !


* * * * *  * * * * * * * *

* परिचय : -

* *डाॅ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

    (बौध्द - आंबेडकरी लेखक /विचारवंत / चिंतक)

* मो.न.‌ ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

* राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

* राष्ट्रिय पेट्रान, सीआरपीसी वुमन विंग

* राष्ट्रिय पेट्रान, सीआरपीसी एम्प्लाई विंग

* राष्ट्रिय पेट्रान, सीआरपीसी ट्रायबल विंग

* राष्ट्रिय पेट्रान, सीआरपीसी वुमन क्लब

* अध्यक्ष, जागतिक बौध्द परिषद २००६ (नागपूर)

* स्वागताध्यक्ष, विश्व बौध्दमय आंतरराष्ट्रिय परिषद २०१३, २०१४, २०१५

* आयोजक, जागतिक बौध्द महिला परिषद २०१५ (नागपूर)

* अध्यक्ष, अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशन नागपुर

* अध्यक्ष, जीवक वेलफेयर सोसायटी

* माजी अध्यक्ष, अमृतवन लेप्रोसी रिहबिलिटेशन सेंटर, नागपूर

* अध्यक्ष, अखिल भारतीय आंबेडकरी विचार परिषद २०१७, २०२०

* आयोजक, अखिल भारतीय आंबेडकरी महिला विचार परिषद २०२०

* अध्यक्ष, डाॅ. आंबेडकर आंतरराष्ट्रिय बुध्दीस्ट मिशन

* माजी मानद प्राध्यापक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थान, महु (म.प्र.)

* आगामी पुस्तक प्रकाशन :

* *संविधान संस्कृती* (मराठी कविता संग्रह)

* *बुध्द पंख* (मराठी कविता संग्रह)

* *निर्वाण* (मराठी कविता संग्रह)

* *संविधान संस्कृती की ओर* (हिंदी कविता संग्रह)

* *पद मुद्रा* (हिंदी कविता संग्रह)

* *इंडियाइझम आणि डाॅ. आंबेडकर*

* *तिसरे महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर*

* पत्ता : ४९४, जीवक विहार परिसर, नया नकाशा, स्वास्तिक स्कुल के पास, लष्करीबाग, नागपुर ४४००१७

* *२१ में २०२५ में मैं ट्रवल्स होकर भी सदर आंतरधर्मीय सभा में सहभागी हो सका.*

Tuesday, 20 May 2025

 🌹 *डॉ बाबासाहेब आंबेडकर नॅशनल मेमोरियल / इंदिरा गांधी मेमोरियल नयी दिल्ली को डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'इनकी सदिच्छा भेट !*


       सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

नयी दिल्ली दौरे पर. उस दौरै मे वे संघटन का विस्तार तथा मजबुतीकरण पर भी चर्चा करनेवाले है. कुछ लोगों को मिलने का भी प्रयोजन है. नयी दिल्ली के इस दौरे में, डॉ जीवने इन्होने *डॉ बाबासाहेब आंबेडकर नॅशनल मेमोरियल नयी दिल्ली* तथा *इंदिरा गांधी मेमोरियल नयी दिल्ली* इन स्थानों को भी सदिच्छा भेट दी. उस नयी दिल्ली दौरे में एक टि व्ही चैनल ने, आपरेशन सिंदुर विषय पर, छोटीसी बाइट भी ली.

Sunday, 18 May 2025

 🤝 *किशोर सिंग राजपूत / जयेशकुमार परमार / बाबुभाई परमार इनकी सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल - गुजरात प्रदेश पर नियुक्ती !*


     सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल - *"गुजरात प्रदेश उपाध्यक्ष"* पद  पर *किशोर सिंग राजपूत* इनकी नियुक्ती तथा *प्रदेश सचिव* पद पर *जयेशकुमार लालजीभाई परमार / बाबुभाई परमार*  इनकी नियुक्ती गुजरात प्रदेश अध्यक्ष *रंजना परमार* इनकी शिफारस पर, सेल के राष्ट्रिय सचिव *सुर्यभान शेंडे* इन्होने जाहिर की है. सदर नियुक्ती की सुचना सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्हे दी गयी है. सदर नियुक्ती पर किशोर सिंग राजपूत / जयेशकुमार लालजीभाई  परमार / बाबुभाई परमार इनका अभिनंदन सर्व पदाधिकारी वर्ग ने किया है.

 🤝 *विजय सहारे / राहुल झोडापे इनकी सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल पर नियुक्ती !*


     सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल - *"विदर्भ विभाग सचिव"* पद  पर *विजय सहारे* इनकी नियुक्ती तथा *नागपुर उपाध्यक्ष* पद पर *राहुल झोडापे*  इनकी नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष *दिलिप तांदळे* तथा विदर्भ विभाग उपाध्यक्ष *राजेंद्र घोरपडे* इनकी शिफारस पर, सेल के राष्ट्रिय सचिव *सुर्यभान शेंडे* इन्होने जाहिर की है. सदर नियुक्ती की सुचना सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्हे दी गयी है. सदर नियुक्ती पर विजय सहारे / राहुल झोडापे इनका अभिनंदन सर्व पदाधिकारी वर्ग ने किया है.

Friday, 16 May 2025

 🤝 *ममता प्रकाश गौतम की वुमेन्स विंग के राष्ट्रिय उपाध्यक्ष पद पर नियुक्ती / सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल - गुजरात प्रदेश उपाध्यक्ष पद पर भारत परमार - दिनेश परमार इनकी नियुक्ती तथा हिरालाल रंगारी नागपुर शहर उपाध्यक्ष पद पर नियुक्ती !*


     सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल की *"वुमेन्स विंग"* के *"राष्ट्रिय उपाध्यक्ष"* पद पर *ममता प्रकाश गौतम* इनकी नियुक्ती महिला विंग की राष्ट्रिय संघटक *डॉ. मनिषा घोष* इन्होने की है. सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल - *"गुजरात प्रदेश उपाध्यक्ष"* पद पर *भारतभाई परमार / दिनेशभाई परमार*  इनकी नियुक्ती गुजरात प्रदेश अध्यक्ष *रंजना परमार* इनकी शिफारस पर, सेल के राष्ट्रिय सचिव *सुर्यभान शेंडे* इन्होने जाहिर की है. तथा महाराष्ट्र के *"नागपुर शहर उपाध्यक्ष"* पद पर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष *दिलिप तांदळे* तथा विदर्भ उपाध्यक्ष *सुरेश खोब्रागडे* इनकी शिफारस पर, नागपुर शहर अध्यक्ष *डॉ. राजेश नंदेश्वर* इन्होने की है. सदर नियुक्ती की सुचना सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्हे दी गयी है. सदर नियुक्ती पर ममता गौतम / भारतभाई परमार / दिनेश भाई परमार / हिरालाल रंगारी इनका अभिनंदन सर्व पदाधिकारी वर्ग ने किया है.

Monday, 12 May 2025

 ‌‌‌‌👌 *बुध्दाचे सारनाथ धम्मचक्र प्रवर्तन हे भारत इतिहासातील मानवी मुल्याचे प्रतिक आहे - डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* (सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल द्वारा नागपूर मुख्यालयात आयोजित बुध्द जयंती समारोह)

  

     भगवान बुध्दाला बुध्दगया येथे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ऋषीपतनाच्या मृगदाय अर्थात सारनाथ येथे *"प्रथम धम्मचक्र प्रवर्तन*" हे करण्याचा निर्णय बुध्दानी घेतला. सर्वप्रथम बुध्दाला आलारकालाम ह्यांची आठवण झाली. परंतु त्यांचे निर्वाण झाल्याचे कळल्यावर उद्दक रामपुत्ताची आठवण झाली. परंतु त्यांचेही निर्वाण झाल्याचे कळल्यावर त्यांना पंचवर्गीय भिक्खुची आठवण झाली. बुध्द ज्ञानप्राप्ती करीत असतांना बुध्दाची सेवाही केली होती. म्हणून पाच वर्गीय भिक्खुंना ज्ञानप्राप्तीचा उपदेश करण्याचा निर्णय बुध्दांनी घेतला होता. बुध्दाचा उपदेश पंचवर्गीय भिक्खु पैकी सर्वात आधी कौंडिण्य ह्यांना समजला. आणि मग अन्य भिक्खुंना समजला. बुध्दांनी विशद केलेल्या आठ जीवनक्रमाला *"अष्टांग मार्ग"* म्हटल्या गेले आहे. आणि बुध्दांनी सर्व प्रथम पाच भिक्खुंना जो उपदेश दिला, तो उपदेशाला "प्रथम धम्मचक्रप्रवर्तन" असे म्हणतात. बुध्दानी दोन प्रकारचे प्रवचन दिले. पहिले होते - धम्मचक्रप्रवर्तन सुत्र. त्यालाच *"चार आर्य सत्य"* असे सुध्दा म्हणतात. आणि दुसरे होते अनात्मलक्षण सुत्र. ह्यामध्ये कोणतीही गोष्ट सनातन नसल्याचे तत्व / दु:खाचे अस्तित्व मानले / अनात्म अर्थात आत्माचे अस्तित्व नाकारले आहे. बुध्दाचे उपरोक्त उपदेश आजही लागु असल्याचे मत सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेलचे राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* ह्यांनी अध्यक्ष पदावरून काढले.

       सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल आणि अलाईड विंग तर्फे मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून *सुर्यभान शेंडे /  शालिक जिल्हेकर / इंजी. शीलकुमार गोस्वामी / इंजी. विजय बागडे / रवी पाटील / दिलिप तांदळे / एड. प्रज्ञा निकोसे* हे मान्यवर त्यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन *डॉ. मनिषा घोष* ह्यांनी तर आभार प्रदर्शन *राजेंद्र घोरपडे* ह्यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी *सरदार कर्नललसिंग दिगवा / डॉ. राजेश नंदेश्वर / सुरेखा खंडारे / सीमा बोरकर / दर्शना गेडाम / सपना बागडे / आशा मौंदेकर / माया घोरपडे / सुरेश खोब्रागडे / अशोक गोंडाणे / गौतम कठाणे / रविंद्र मेश्राम / शिवनाथ नागदेवे / नंदकुमार पाटील* ह्यांनी प्रयास केले. सदर कार्यक्रमात *सुर्यभान शेंडे / रवी पाटील / दिलिप तांदळे / डॉ मनिषा घोष / सुरेखा खंडारे* ह्यांनी बुद्ध गीत / भीम गीत सादर केले.

Sunday, 11 May 2025

 🤝 *मिसेस रंजना परमार सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल - गुजरात प्रदेश अध्यक्ष पद पर नियुक्त !*


     सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल की *"गुजरात प्रदेश अध्यक्ष"* पद पर *मिसेस रंजना परमार*  इनकी नियुक्ती सेल के राष्ट्रिय सचिव *सुर्यभान शेंडे* इन्होने जाहिर की है. सदर नियुक्ती की सुचना सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्हे दी गयी है. सदर नियक्ती पर रंजना परमार  इनका अभिनंदन सर्व पदाधिकारी वर्ग ने किया है.

 🤝 *मिसेस दर्शना गेडाम / प्रकाश गौतम / गौतम कठाणे /  सुरेश खोब्रागडे / अशोक गोंडाणे इनकी नियुक्ती सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल पर !*


     सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल की डॉटर कंसर्न *"सी.आर.पी.सी. वुमन विंग"* इस संघटन के *"राष्ट्रिय सचिव"* पद पर *मिसेस दर्शना प्र. गेडाम*  इनकी नियुक्ति तथा *"सी.आर.पी.सी. मेंन विंग"* इस संघटन के *"विदर्भ सचिव"* पद पर *प्रकाश गौतम* इनकी नियुक्ति, *"नागपुर शहर उपाध्यक्ष"* पद पर *गौतम कठाणे*  इनकी नियुक्ती / *"विदर्भ उपाध्यक्ष"* पद पर *सुरेश खोब्रागडे* इनकी नियुक्ती / *"नागपुर शहर उपाध्यक्ष"* पद पर *"अशोक गोडाणे* इनकी नियुक्ती सेल के महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष *दिलिप तांदळे* इनकी शिफारस पर, सेल के राष्ट्रिय सचिव *सुर्यभान शेंडे* इन्होने जाहिर की है. सदर नियुक्ती की सुचना सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्हे दी गयी है. सदर नियुक्ती पर मिसेस दर्शना गेडाम / गौतम / कठाणे / खोब्रागडे / गोंडाणे इनका अभिनंदन सर्व पदाधिकारी वर्ग ने किया है..

Friday, 9 May 2025

 ✍️ *बुद्ध - आंबेडकरी साहित्याची आजची भरारी  : दिशा - दशा आणि वास्तव !*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


             *"बुध्द - आंबेडकरी साहित्य"* तसे बघावे तर परस्पर एकजीव आहे. काही थोडे फार बदलाव वरवर दिसुन येतात ही ! परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सरते शेवटी बुध्दाच्या मार्गाचा स्वीकार करतात. *"बुध्दमय भारत"* हे बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम ध्येय होते. बुध्द - आंबेडकराचा जीवन संघर्षात बरीचं साम्य ही दिसुन येतात. बुध्दाचा पहिला संघर्ष हा *"रोहिणी नदी पाणी वाटपावरुन"* शाक्य युवा संघामध्ये झालेला प्रमुख विवाद होता. शाक्य संघाचे म्हणने सिध्दार्थास मान्य न झाल्यामुळे सिध्दार्थाला शाक्य संघ / आपले राज्य सोडुन जावे लागलेले होते. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी सुद्धा ३० मार्च १९२७ रोजी महाड जिल्हा रायगड येथे *"चवदार पाणी सत्याग्रह"* केला. बुध्दाचा दुसरा सत्याग्रह म्हणजे *"अनैतिक रीती रिवाजांच्या"* विरोधात होता. बुध्दाने अनिष्ट प्रथा - रूढी विरोधात बंड केले. अर्थात *"मानवी अधिकार प्राप्तीचा"* तो मुख्य लढा होता. बुध्दाचा लढा हा *"समतेचा"* होता. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी २ मार्च १९३० रोजी नासिकचा *"काळाराम मंदिर सत्याग्रह"* केला. सदर लढा ही *"मानव अधिकार प्राप्तीचा"* होता. *"समतेचा लढा"* होता. देवदर्शन हा प्रमुख उद्देश नव्हता. बुध्दांनी *"देवत्व संकल्पना"* नाकारली. बाबासाहेब ह्यांनी ही *"देवत्व संकल्पना"* नाकारली. बुध्दाचे अंतिम लक्ष *"बहुजन हिताय बहुजन सुखाय"* राहिलेले आहे. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी *"भारतीय संविधान"* ह्याचे लिखाण करुन  *"संविधानिक मौलिक अधिकार"* मिळवुन दिलेले आहेत. सांगायचे असे की, बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी आम्हाला *"बुद्ध"* दिला. आमचा आदर्श हे *"बुद्ध साहित्य"* असायला हवे. *"दलित साहित्य"* हे तर कदापी नाही. *"दलितत्व भावना"* कोण शहाणा व्यक्ती स्वीकार करणार ? मग *"दलित साहित्याचा"* उदोउदो कश्यासाठी ? परतुं काही साहित्यिक पांढरपेशा वर्गानी *"दलित विचार"* तर काहीं साहित्यिक वर्गांनी *"कॅम्युनिस्ट विचार"* हा शोषित वर्गावर लादण्याचा प्रयत्न केला होता. आणि काळाच्या ओघात ती मंडळी ही सफल सुध्दा झालीत. परंतु *"सत्य हे सत्यचं असते."* पुढे दलित साहित्य / कॅम्युनिस्ट साहित्य हा विचार मागे पडला. आणि *"बुध्द साहित्य"* हे माणसाच्या केंद्रस्थानी आले. आता तथाकथित पांढरपेशा वर्गाच्या गोरख विषयाकडे वळु या.

            इहवादी साहित्यिक *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांनी मार्क्स ही सांगितला आणि सोबत केशवसुत ही सांगितला. *"रमाई"* वर लिखाण केले म्हणुन / वा बुध्द ह्यावर थोडेफार बोलले म्हणुन मनोहर ह्यांना आपण *आंबेडकरी - बौध्द साहित्यिक* म्हणायचे काय ? मनोहर ह्यांनी तर स्वतः:ला *"इहवादी"* मानलेले आहे. यशवंत मनोहर हे *"श्रध्दा / अंधश्रद्धा"* दोघांना समान समजुन *"श्रध्दा"* ही नाकारतात. बुध्द म्हणतात, *"सध्दा बिजं तण्ते वुट्ठि पञ्ञा मे | .........."* (अर्थात : श्रध्दा हे माझे बी आहे. तपश्चर्या ही वृष्टी आहे. प्रज्ञा हा जु आणि नांगर आहे. पापलज्जा हा इसाड, चित्त ही दोरी, आणि स्मृती (जागृती) हा फाळ व चाबुक आहे. काय आणि वाचेचे मी संरक्षण करतो. उदरनिर्वाहाच्या आहारात संयमित असतो. सत्य हे माझे निंदन आहे. आणि संतोष ही माझी सुट्टी आहे. तसेच धुरा वाहणारा उत्साह योगक्षेमभिमुख (निर्वाणाभिमुख) जातो. व तेथे गेल्यावर तो परत येत नाही. तो शोकरहित होतो.) ह्या प्रकारे *"श्रध्दा"* ह्या विषयावर खुप काही बुध्द गाथा संदर्भ देता येतील. लेखाला शब्द मर्यादा असल्याने हा विषय आटोपता घेतो. यशवंत मनोहर ह्यांना व्यावसायिक साहित्यिक मानल्यास गैर होणार नाही. दुसरे साहित्यिक *प्रा. रावसाहेब कसबे / प्रा. हरी नरके* हे आंबेडकरी विचाराला *"गांधी विचारांची"* फोडणी देण्याचा प्रयास करीत असतात. ह्या दोन्ही लेखकांच्या *"गांधी फोडणीवर"* मी उत्तर दाखल माझे विचार लिहिलेले आहेत. ह्या दोघांना गांधींची कां गरज पडली ? हा प्रश्न आहे.

            *"दलित पॅंथर"* ही ९ जुलै १९७२ ला अमेरिकेतील *"ब्लॅक पॅंथर"* ह्या कॅम्युनिस्ट विचारापासुन स्थापन झालेली एक सामाजिक संघटना. आम्ही युवा पिढी त्याकाळात गारद झालेली बघितली आहेत. *"ब्लॅंक पॅंथर"* (१९६०) चे संस्थापक मंडळीत *ह्युब न्युटान / ओटान फोर्ट / बॉबी स्कले* / ह्यांच्या सोबत *माल्कम एक्स* ह्यांच्या लिखाणातुन जन्माला आल्याचा एक इतिहास आहे. लिखाणाला शब्द मर्यादा असल्याने हा विषय आटोपता घेतो. प्रश्न आहे, *"बुध्द - फुले - शाहु - आंबेडकर विचारधारा"* भारतामध्ये असतांना *राजा ढाले / नामदेव ढसाळ / ज. वि. पवार* समान काही मंडळींना *"कॅम्युनिस्ट विचारधारा"* प्रभावाच्या नावाचा आसरा कां घ्यावा लागलेला आहे ??? दलित पॅंथर स्थापनेच्या एक वर्षापुर्वी *नामदेव ढसाळ* ह्यांच्या *"गोलपीठा"* ह्या काव्यसंग्रहाचा खुप उदोउदो झालेला होता. *"गोलपीठा"* ह्या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे *"वेश्यालयातील कविता."* शब्द भाषा तर भयानक घाणेरडी आहे. काही वर्गांच्या न समजणाच्या पलिकडची. वेश्यांच्या जीवनातील कोणते संदर्भ आपण हे घ्यायला हवेत ? ह्या विषयावर पुन्हा कधी तरी चर्चा करु या. *शरणकुमार लिंबाळे* ह्याला तर दलित कवि म्हणण्यास धन्यता दिसुन येते. लिंबाळे हा दलितत्व सोडायला तयार नाही तर, त्याला मिळालेल्या *"सरस्वती पुरस्कार"* ह्याची लाज वाटण्याचे काही कारण दिसत नाही. आणि *लोकनाथ यशवंत* हा स्वतः:ला तर *"वादीहिन कवि"* असल्याचे तो बोलुन गेला. लोकनाथ हा आंबेडकरी बांधिलकी नाकारत असल्यामुळे ह्या विषयावर अधिक काय बोलावे ? कदाचित प्रेत उचलतांना समाजाच्या *"चार लोकांची"* ही गरज असण्याचे कारण दिसत नाही.

         सनदी अधिकारी ह्या पदावरून निवृत्त झालेले आमचे धम्म मित्र - *इ. झेड. खोब्रागडे* हे तर *"अफलातुन प्राणी"* आहेत. आंबेडकरी साहित्याला छेद देण्यास खोब्रागडेच्या मेंदुतुन *"संविधान साहित्य"* किडा हा जन्माला आला. *"भारताचे संविधान"* हे कसे साहित्य होणार आहे ? *"भारताचे संविधान"* हे *कायद्याचे पुस्तक* (Legal Book) नाही. तर ते *"कानुनी दस्तावेज"* (Legal Documents) आहे. दीक्षाभूमी नागपूरला झालेल्या *"संविधान साहित्य संमेलनाला"* माझी संघटना *"सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* द्वारा तिव्र विरोध केला गेला. *"उच्च न्यायालय"* नागपूर खंडपीठात याचिका क्र. ३९४०/२०१९ मी स्वतः *(डॉ मिलिन्द जीवने विरुद्ध संविधान फाऊंडेशन)* दाखल केली होती. विद्वत न्यायाधीश द्वय *रवी देशपांडे / विनय जोशी* ह्यांच्या बुध्दीची खुप कीव करावीशी वाटते. त्यांनी संविधान साहित्य संमेलन घेतल्याने माझ्या (डॉ जीवने) *"मुलभुत अधिकाराचे हनन होत नसल्यामुळे माझी सदर याचिका रद्दबातल केली."* सदर याचिका ही माझ्या मुलभूत अधिकाराचे हनन होत असल्यामुळे दाखल केली नव्हती. *"भारतीय संविधानाची गरीमा कायम रहावी"* म्हणुन दाखल केली होती. साहित्य जर मान्य नसेल तर त्याला जाळले जावु शकते. जसे *"मनुस्मृती ग्रंथाचे दहन"* करण्यात आले होते. खोब्रागडे महाशयाच्या ह्या दुष्कृतीमुळे नवी दिल्लीच्या जंतरमंतर येथे *"संविधानाची होळी"* पेटविण्यात आली होती. असे बिनडोक लोक प्रशासनात सनदी अधिकारी नियुक्त होतातचं कसे ? हा प्रश्न आहे.

            *"जागतिक आंबेडकरी साहित्य परिषद"* ह्या नावाने विदेशात बिझनेस करणारे *प्रा. दीपक खोब्रागडे* एक अफलातून प्राणी आहे. जागतिक साहित्य परिषद आयोजनास विरोध करण्याचे काही कारण नाही. जागतिक साहित्य परिषदेचा आयोजन दर्जा जागतिक स्तरावरील असायला हवा. पण ह्या जागतिक साहित्य नावाने चक्क *"प्रवासी व्यापार"* !!! सोबत जातीयवादी *डॉ. गिरीश गांधी* ह्यांचा विशेष आशिर्वाद. तसे गिरीश गांधी ह्यांच्या आर्थिक सहकार्याने पुरस्कृत असणारे *प्रा. डॉ. यशवंत मनोहर / इ. झेड. खोब्रागडे / स्मृतिशेष डॉ. भाऊ लोखंडे* सारखी काही मान्यवर होतीचं. आता तर *प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस* सारखी पंडा मंडळीसुद्धा आवाजी पोंगा वाजवीत आहेत. *पुरस्कार* तसेच *अध्यक्ष* पदाचा मोह आमच्या *"तथाकथित पांढरपेशा साहित्यिक वर्गाला"* दिसुन येतो. असाचं ह्या पुरस्काराच्या मागे धावणारा माझा जीवलग मित्र *प्रा. डॉ. प्रदिप आगलावे*  हा सुद्धा गिरीश गांधी ह्यांच्या मागे धावतांना मला दिसुन आला. नामांकित नाटककार / आकाशवाणी नागपुर येथे कार्यक्रम अधिकारी असलेला माझा खुप जीवलग मित्र *अमर रामटेके* ह्यांच्या शब्दात *डॉ. गिरीश गांधी म्हणजे सांस्कृतिक डॉन."* माझा जीवलग मित्र *प्रदीप आगलावे* हा तर महाराष्ट्र शासनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर खंड प्रकाशनात खुप विवादाचा पात्र झाला. समाजशास्त्री - *प्रदीप आगलावे* ह्यांचे लिखाण बुद्ध - आंबेडकरी साहित्य विषयासी निगडित आहे काय ? हा तर संशोधनाचा विषय आहे. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी *"जातीची"* समाजशास्त्रीय व्याख्या केली. *"Caste is a closed class."* (जात हा बंद वर्ग आहे.) बाबासाहेब ह्यांची *"समाजशास्त्रीय थेयरी"* सुध्दा आहे. आमचे मित्र प्रदीप आगलावे ह्यांनी स्वतःची कोणती समाजशास्त्रीय थेयरी विषद केली ? हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. आम्ही *"अभ्यासक मंडळींनी"* ह्या विद्वानाकडुन अशी अपेक्षा करणे काही गैर होणार नाही.

          बुध्द - आंबेडकरी साहित्य हा विषय खुप गहण विषय आहे. परंतु ह्या साहित्याला *"विद्रोह - नकार "* ह्यामध्ये सिमित करण्याचा प्रयत्न *"ब्राम्हण्य साहित्यिक वर्गांकडुन"* झालेला आहे. *"बुध्द साहित्य हे खरे तर, समस्त भाषा साहित्याची जननी आहे."* बुध्द साहित्याचे संदर्भ *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) / बोली भाषा - *"पाली भाषा"* निगडीत असतांना, सदर विषय रुजविण्याचा प्रयास कां गेला नाही ? हा प्रश्न आहे. बुध्द - आंबेडकरी साहित्यामध्ये *सौंदर्यशास्त्र / नैतिकवाद / मानवतावाद / राष्ट्रवाद / प्रेम आयाम"* इत्यादींचा उहापोह झाल्याचा संदर्भ / संशोधन आम्हाला फार कमी दिसुन येतो. *"हिब्रू संस्कृत / अपभ्रंश भाषा"* ह्याचे उगम स्थान *"पाली भाषा"* आहे. हिब्रू संस्कृत ची लिपी *"ब्राम्ही लिपी"* आहे. आताची संस्कृत भाषा ही *"क्लासिकल संस्कृत"* असुन लिपी ही *"देवनागरी लिपी"* आहे. *कालीदास* ह्यांचा खुप उदोउदो होत असतांना कालिदास ह्यांच्या लिखाणात *"नैतिक वाद"* कुठे आहे ? कालीदास हा *"भोगवाद साहित्याचे प्रतिक"* आहे. ह्यावरुन कालीदास ह्यांचा *"जन्म - मृत्यु स्थान"* गुमनाम आहे. अर्थात कालीदास हा काल्पनिक पात्र दिसुन येतो. भारतातील *"भाषा साहित्यावर एकाधिकारशाही"* ब्राह्मण वर्गाची असतांना, *"आमचा हा साहित्यिक वर्ग"* ब्राह्मण पायाखाली लोळण कां घेतो ? ही आमची वेदना आहे. उपरोक्त कारणे ही *"आमच्या साहित्यिक वर्गाच्या वस्त्रहरण करण्याची"* आहेत, हे पुनश्च सांगायला नको !!!


---------------------------------------

▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      नागपूर दिनांक ९ मे २०२५

Thursday, 8 May 2025

 🤝 *शालिक जिल्हेकर / प्रा. मनिष वानखेडे इनकी राष्ट्रिय महासचिव पद पर नियुक्ती सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल पर !*


     सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल की डॉटर कंसर्न *"सी.आर.पी.सी. बुध्दा आंबेडकरी साहित्यिक सेल"* इस संघटन के *"राष्ट्रिय महासचिव"* पद पर *शालिक जिल्हेकर*  इनकी नियुक्ति तथा *"सी.आर.पी.सी एम्प्लॉइज विंग"* इस संघटन के *"राष्ट्रिय महासचिव"* पद पर *प्रा. डॉ. मनिष वानखेडे* इनकी नियुक्ति, साहित्यिक सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *प्रभाकर दुपारे* इनकी शिफारस पर, सेल के राष्ट्रिय सचिव *सुर्यभान शेंडे* इन्होने जाहिर की है. सदर नियुक्ती की सुचना सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्हे दी गयी है. सदर नियुक्ती पर आयु. जिल्हेकर/ प्रा. वानखेडे इनका अभिनंदन सर्व पदाधिकारी वर्ग ने किया है.

Wednesday, 7 May 2025

🤝 *दिलिप तांदळे / राजेंद्र घोरपडे इनकी नियुक्ती सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल पर !*

     सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के मुख्य विंग में, *दिलिप तांदळे*  इनकी नियुक्ति *राज्य उपाध्यक्ष* पद पर तथा एम्प्लॉइज विंग के *"राष्ट्रिय सचिव"* पद पर तथा *राजेंद्र घोरपडे* इनकी नियुक्ती मेंन विंग  के *"विदर्भ उपाध्यक्ष"* तथा एम्प्लॉइज विंग के *"राज्य उपाध्यक्ष"* पद पर, सेल के राष्ट्रिय सचिव *सुर्यभान शेंडे* इन्होने जाहिर की है. सदर नियुक्ती की सुचना सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्हे दी गयी है. सदर नियुक्ती पर आयु. तांदळे / आयु. घोरपडे इनका अभिनंदन सर्व पदाधिकारी वर्ग ने किया है.

Tuesday, 6 May 2025

 👌 *बुध्द की पावन जन्मस्थली कपिलवस्तु (पिप्परहवा) में मिले पवित्र अस्थीधातु - हिरे जवाहरात की हाँगकाँग में ७ में २०२५ को खुली निलामी : भारत सरकार की खामोशी !*

     *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


         बुध्द की पावन जन्मस्थली कपिलवस्तु (पिप्परहवा) में, सन १८९८ को अंग्रेज शासन काल मे खुदाई की गयी थी. उस खुदाई में बुध्द के महापरिनिर्वाण के बाद, बुध्द की पावन अस्थिधातु आठ भागों में बाटी गयी. उस का एक भाग *"शाक्य वंश"* को मिला था. और उन्होंने उस पावन अस्थिधातु का जतन *"पांच अस्थि करंडक"* में, कपिलवस्तु (पिप्परहवा) स्तुप में सुरक्षीत रखने का इतिहास है. अंग्रेज शासन काल में पिप्परहवा स्तुप में हुये उत्खनन में, वह पांच करंडक तथा कुछ मुल्यवान रत्न - हिरे जवाहरात आदी मिले थे. अंग्रेज अफसर *विलियम क्लैक्सटन पेपे* इन्होने कुछ भाग को भारत में रखकर, बाकी सभी अस्थिधातु - हिरे जवाहरात आदी इंग्लंड ले गये. *मुझे व्यक्तिश:* भी, उन पावन स्थानों को भेट देने का अवसर भी मिला. भारत के नामचीन पत्रिका ने, उस बुध्द अस्थीधातु निलामी ७ मई २०२५ को होने की खबर छाप दी. और बडा तहलका मच गया. सदर *"निलामी"* को रोकने की मांग उठी. तो कुछ मान्यवरों ने *"भारत सरकार"* को, वह बुद्ध अस्थिधातु भारत वापस लाने की मांग की. कुछ मान्यवरों का मुझे मेसेज भी आया. मुंबई - नासिक प्रवास से आठ दिन पहले नागपुर आने के बाद, मैं व्हायरल फिवर से ५ दिनों सें पिडित रहा. उसी हालात  में, मुझे एक करीबी रिस्तेदार के अंतसंस्कार को तथा एक अन्य आंबेडकरी कार्यकर्ता के अंतसंस्कार को जाना भी पडा. मैं पुर्णतः स्वस्थ भी नहीं हो पाया. इस महत्वपूर्ण विषय पर लिखने का मन बना चुका.

         बुध्द की पावन अस्थिधातु यह भारत का, बडा अनमोल ठेवा है. अत: भारत सरकार / पुरातत्व विभाग का वह नैतिक कर्तव्य है कि, उस निलामी को रोक दे. तथा आवश्यक मुल्य चुकाकर, हाँगकाँग से उसे भारत लाये. *"युनेस्को कन्व्हेशन १९७०"* अंतर्गत, इस तरह की खुली निलामी करना उचित भी नहीं है. परंतु भारत के प्राचिन बुद्ध धरोहर की हालात, हम देख रहे है. पुरातत्व विभाग सोया हुआ है. मुझे प्राचिन बुद्ध धरोहर के प्रति प्रेम होने से, मैं अकसर अकेला तो कभी कभी मेरे मित्र के साथ भेट देते आया हुं. वह यादें मैं बहुत संजोगे रखता भी हुं. *श्रीलंका प्रवास* में भी मुझे उसका अच्छा अनुभव आया है. और *चक्रवर्ती सम्राट अशोक* के महान कार्यों को भुलना, कभी संभव भी नहीं है. यहां सवाल तो, भारत की अस्मिता *"जिंदापन"* का है. भारत सरकार हो या, भारत की आवाम हो, उनकी *"चेतना"* भी जीवित है या नहीं ? यह प्रश्न हैं. क्यौं कि *"थायलंड / मलेशिया / सिंगापूर / नेपाल / श्रीलंका / व्हिएतनाम / साऊथ कोरिया"* इन देशों कें, मेरे प्रवास में, उन विदेशी बुध्द लोगों की भावनांओं को, मैने बहुत करीब से देखा है. वह चेतना / भावना भारत में मृतप्राय दिखाई देती है. *"बुध्दगया"* विषय हो या, मुंबई का *"राजगृह"* विषय हो, वह कभी *"संघ शक्ति"* नहीं बन पाया है.


----------------------------------------

▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपुर, दिनांक ६ मई २०२५

Saturday, 3 May 2025

 🇮🇳  *जातीनिहाय जनगणना : केंद्र सरकार की घोषणा में निकष - पध्दति - उद्देश - क्रियान्वयन कैसे तथा किस प्रकार हो एक अहं प्रश्न !*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


             ३० अप्रेल २०२५ रात्री का समय. अचानक केंद्रीय मंत्रीमंडल का *"जातिनिहाय जनगणना"* (Caste Census) यह निर्णय केंद्रीय मंत्री *अश्विनी वैष्णव* घोषित करते है. *"भारतीय राजनीति"* में बडा भुचालसा आ जाता है. *"जातिनिहाय जनगणना"* का विरोध करनेवाली *"भाजपा सरकार,"* अचानक वह करने का निर्णय लेती है. भारत में *"पहलगाम दहशतवाद"* यह मुद्दा, बडे जोरों पर है. साथ ही *सर्वोच्च न्यायालय* में भी, *"पेगासे जासुसी प्रकरण"* पर चर्चा हो रही है. *"भाजपा दल का राष्ट्रिय अध्यक्ष"* किसे बनाना है ? यह अभी तक तय नहीं हो पा रहा है. *बिहार निवडणूक* जल्द ही होने जा रही है. फिर *"पश्चिम बंगाल / उत्तर प्रदेश"* आदी राज्यों में भी, *"निवडणूक माहौल"* होने जा रहा है. *"महाराष्ट्र की चुनाव यादी"* प्रकरण भी मुद्दा है. अत: इन सभी विषयों के बिच, यह निर्णय प्रधानमंत्री *नरेंद्र मोदी* इनका *"मास्टर स्ट्रोक"* कहे या विभिन्न उभरते मुद्दों से *"पलायन"* कहे ? यह संशोधन का विषय है. *"जातिनिहाय जनगणना"* पर, मेरा लेख पहले भी आया है. कांग्रेसी राजकुमार *राहुल गांधी* इस विषय पर, संसद तथा विभिन्न सभा में आवाज उठा चुका है. संघ प्रमुख *डॉ मोहन भागवत* ने, केंद्रीय मंत्रीमंडल निर्णय के एक दिन पहले ही, प्रधानमंत्री *नरेंद्र मोदी* इनसे भेट की थी. इन सभी विवादीत विषयों के बीच, प्रधानमंत्री *नरेंद्र मोदी* के *"जनगणना"* निर्णय ने, सभी राजनैतिक नेताओं को परेशानी में डाला है. इसी बीच विरोधी दल नेता *राहुल गांधी* ने, जनगणना निर्णय का स्वागत करते हुये, *"वहां कालमर्यादा निश्चित करने की"* खास मांग की है. वही वंचित आघाडी नेता *एड. प्रकाश आंबेडकर* इन्होने, *"जाती गणना कराने का निर्णय यह धुल फेकने जैसा"* बताया है. वैसे देखा जाए तो भारतीय राजनीति में, एड. प्रकाश आंबेडकर की स्थिती *"पुंगी राजनीति"* समान है. प्रकाश आंबेडकर के बोल *"हवा में उडने जैसे"* ही है. यही हाल सभी *"रिपब्लिकन / बसपा"* आदी नेताओं का भी है. अब हम मुख्य विषयों पर ही, चर्चा करतें है.

             भारत में पिछली जनगणना सन २०११ में हुयी थी. और उसके बाद वह *"जनगणना"* २०२१ में होनी थी. परंतु *"कोविड संक्रमण"* के कारण वह जनगणना नहीं हो पायी थी.वही सन १९३१ में इंग्रज काल में *"जातिनिहाय जनगणना"* हुयी थी. जो १०० साल के उपर बाद वह होने जा रही है. अनुसुचित जाती / जनजाति आरक्षण *"प्रतिशत"* सन १९३१ के आधार पर दिया जा रहा है. *"ओबीसी वर्ग"* की उचित जनगणना ना होने के कारण, उस वर्ग का *"आरक्षण प्रतिशत"* हमेशा विवादों में रहा है. *"EWS आरक्षण"* यह *"आर्थिक आधार"* पर, केवल *"उच्च वर्ग के लिये १०%"* व्यवस्था की गयी है. जब की समस्त जगहों पर, *"उच्च वर्गीयों*  का अधिपत्य रहा है. उपर से १०% की व्यवस्था EWS के नाम पर, उच्च वर्गीयों ने किया है तथा *"सर्वोच्च न्यायालय"* द्वारा इस आरक्षण को संवैज्ञानिक माना है. जब की *"मागासवर्गीय का आरक्षण सीमा ५०%"* अधिक ना हो, यह बंधन भी *"सर्वोच्च न्यायालय"* द्वारा लगाया गया है. एकुण लोकसंख्या में उच्च वर्ग का प्रतीशत ५ % कहा जाता है. उपर से *"EWS आरक्षण"* की व्यवस्था यह उच्च वर्ग के लिये होना, इसे हम क्या कहे ? अत: जातिनिहाय जनगणना के समय *"उच्च वर्ग"* का सामाजिक / आर्थिक स्तर की समिक्षा भी होनी चाहिये. भारतीय संविधान में मागासवर्ग को *"क्रिमिलेयर"* में बांधने की शर्त दिखाई नहीं देती. परंतु वह लादने का प्रयास भी किया जाता रहा है. परंतु *"न्याय व्यवस्था"* में उच्च वर्ग का अधिपत्य होने से, न्याय की अपेक्षा रखना एक संशोधन का विषय है. अत: न्याय व्यवस्था में *"कोलोजीयम"* पध्दती खत्म होकर, *"संघ लोकसेवा आयोग"* (UPSC) सदृश्य ही, आयोग द्वारा *"मेरीट धारकों"* का चयन जरुरी है. परंतु केंद्र सरकार द्वारा १२४ (अ) अंतर्गत *"National Judicial Appointment Commission"* का स्वीकार भी बहुत घातक होगा. उसका हश्र हमें *"केंद्रीय चुनाव आयोग / प्रवर्तन निदेशालय (ED) / CBI"* समान दिखाई देगा, यह भी हमे समझना जरुरी है.

          जातिनिहाय जनगणना में अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती / ओबीसी इनकी *"जातीगत जनगणना"* होते समय / *"धर्मगत जनगणना"* भी होनी चाहिये. धर्मगत जनगणना होते समय *"बौध्द प्रवर्ग"* की जनगणना होते समय, वह धर्मगत जनगणना में तिन विषयों का वर्गीकरण जरुरी है. जैसे -  *"परंपरागत बौध्द / धर्मांतरित बौद्ध / अनुसुचित जाती धर्मांतरित बौध्द."*  क्यौं कि *"अनुसुचित जाती धर्मांतरीत बौध्द"* इन्हे अलग *"प्रवर्ग"* अंतर्गत *"अनुसुचित जाती"* सुची में, अंतर्भुत करना सहज हो. *बाबासाहेब डॉ आंबेडकर* इनकी प्रेरणा से १४ अक्तुबर १९५६ को, महार आदी अस्पृश्य समुह ने, *"बौध्द धर्म"* का स्वीकार किया था. और *"बौध्द आरक्षण"* यह मांग होती रही. *व्ही. पी. सिंग* सरकार ने, सन १९९० में *"धर्मांतरित बौध्द"* आरक्षण में जो दोष छोडे थे, उन दोषों का निवारण होना भी जरुरी है. अत: केंद्र सरकार द्वारा *"जातीनिहाय आरक्षण चार्ट"* में, धर्मगत जनगणना उपरोक्त कॉलम / सवर्ण वर्ग की सामाजिक / आर्थिक स्थिती इसका उल्लेख होना बहुत जरुरी है. साथ ही जनगणना के *"निकष / पध्दती / उद्देश / क्रियान्वयन / कालावधी"* भी निश्चित होना बहुत जरुरी है. हम ने *"मंडल आयोग"* की स्थिती को बहुत पास से देखा है. अत: अगर केंद्र सरकार *"जातिनिहाय जनगणना"* में बहुत गंभीर हो तो, इस विषय संदर्भ में आगे बढे. इसी अपेक्षा में !!!


****************************

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपुर दिनांक ३ में २०२५

Friday, 2 May 2025

 🇮🇳  *जातीनिहाय जनगणना : केंद्र सरकार की घोषणा में निकष - पध्दति - उद्देश - क्रियान्वयन कैसे तथा किस प्रकार हो एक अहं प्रश्न !*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


             ३० अप्रेल २०२५ रात्री का समय. अचानक केंद्रीय मंत्रीमंडल का *"जातिनिहाय जनगणना"* (Caste Census) यह निर्णय केंद्रीय मंत्री *अश्विनी वैष्णव* घोषित करते है. *"भारतीय राजनीति"* में बडा भुचालसा आ जाता है. *"जातिनिहाय जनगणना"* का विरोध करनेवाली *"भाजपा सरकार,"* अचानक वह करने का निर्णय लेती है. भारत में *"पहलगाम दहशतवाद"* यह मुद्दा, बडे जोरों पर है. साथ ही *सर्वोच्च न्यायालय* में भी, *"पेगासे जासुसी प्रकरण"* पर चर्चा हो रही है. *"भाजपा दल का राष्ट्रिय अध्यक्ष"* किसे बनाना है ? यह अभी तक तय नहीं हो पा रहा है. *बिहार निवडणूक* जल्द ही होने जा रही है. फिर *"पश्चिम बंगाल / उत्तर प्रदेश"* आदी राज्यों में भी, *"निवडणूक माहौल"* होने जा रहा है. *"महाराष्ट्र की चुनाव यादी"* प्रकरण भी मुद्दा है. अत: इन सभी विषयों के बिच, यह निर्णय प्रधानमंत्री *नरेंद्र मोदी* इनका *"मास्टर स्ट्रोक"* कहे या विभिन्न उभरते मुद्दों से *"पलायन"* कहे ? यह संशोधन का विषय है. *"जातिनिहाय जनगणना"* पर, मेरा लेख पहले भी आया है. कांग्रेसी राजकुमार *राहुल गांधी* इस विषय पर, संसद तथा विभिन्न सभा में आवाज उठा चुका है. संघ प्रमुख *डॉ मोहन भागवत* ने, केंद्रीय मंत्रीमंडल निर्णय के एक दिन पहले ही, प्रधानमंत्री *नरेंद्र मोदी* इनसे भेट की थी. इन सभी विवादीत विषयों के बीच, प्रधानमंत्री *नरेंद्र मोदी* के *"जनगणना"* निर्णय ने, सभी राजनैतिक नेताओं को परेशानी में डाला है. इसी बीच विरोधी दल नेता *राहुल गांधी* ने, जनगणना निर्णय का स्वागत करते हुये, *"वहां कालमर्यादा निश्चित करने की"* खास मांग की है. वही वंचित आघाडी नेता *एड. प्रकाश आंबेडकर* इन्होने, *"जाती गणना कराने का निर्णय यह धुल फेकने जैसा"* बताया है. वैसे देखा जाए तो भारतीय राजनीति में, एड. प्रकाश आंबेडकर की स्थिती *"पुंगी राजनीति"* समान है. प्रकाश आंबेडकर के बोल *"हवा में उडने जैसे"* ही है. यही हाल सभी *"रिपब्लिकन / बसपा"* आदी नेताओं का भी है. अब हम मुख्य विषयों पर ही, चर्चा करतें है.

             भारत में पिछली जनगणना सन २०११ में हुयी थी. और उसके बाद वह *"जनगणना"* २०२१ में होनी थी. परंतु *"कोविड संक्रमण"* के कारण वह जनगणना नहीं हो पायी थी.वही सन १९३१ में इंग्रज काल में *"जातिनिहाय जनगणना"* हुयी थी. जो १०० साल के उपर बाद वह होने जा रही है. अनुसुचित जाती / जनजाति आरक्षण *"प्रतिशत"* सन १९३१ के आधार पर दिया जा रहा है. *"ओबीसी वर्ग"* की उचित जनगणना ना होने के कारण, उस वर्ग का *"आरक्षण प्रतिशत"* हमेशा विवादों में रहा है. *"EWS आरक्षण"* यह *"आर्थिक आधार"* पर, केवल *"उच्च वर्ग के लिये १०%"* व्यवस्था की गयी है. जब की समस्त जगहों पर, *"उच्च वर्गीयों*  का अधिपत्य रहा है. उपर से १०% की व्यवस्था EWS के नाम पर, उच्च वर्गीयों ने किया है तथा *"सर्वोच्च न्यायालय"* द्वारा इस आरक्षण को संवैज्ञानिक माना है. जब की *"मागासवर्गीय का आरक्षण सीमा ५०%"* अधिक ना हो, यह बंधन भी *"सर्वोच्च न्यायालय"* द्वारा लगाया गया है. एकुण लोकसंख्या में उच्च वर्ग का प्रतीशत ५ % कहा जाता है. उपर से *"EWS आरक्षण"* की व्यवस्था यह उच्च वर्ग के लिये होना, इसे हम क्या कहे ? अत: जातिनिहाय जनगणना के समय *"उच्च वर्ग"* का सामाजिक / आर्थिक स्तर की समिक्षा भी होनी चाहिये. भारतीय संविधान में मागासवर्ग को *"क्रिमिलेयर"* में बांधने की शर्त दिखाई नहीं देती. परंतु वह लादने का प्रयास भी किया जाता रहा है. परंतु *"न्याय व्यवस्था"* में उच्च वर्ग का अधिपत्य होने से, न्याय की अपेक्षा रखना एक संशोधन का विषय है. अत: न्याय व्यवस्था में *"कोलोजीयम"* पध्दती खत्म होकर, *"संघ लोकसेवा आयोग"* (UPSC) सदृश्य ही, आयोग द्वारा *"मेरीट धारकों"* का चयन जरुरी है. परंतु केंद्र सरकार द्वारा १२४ (अ) अंतर्गत *"National Judicial Appointment Commission"* का स्वीकार भी बहुत घातक होगा. उसका हश्र हमें *"केंद्रीय चुनाव आयोग / प्रवर्तन निदेशालय (ED) / CBI"* समान दिखाई देगा, यह भी हमे समझना जरुरी है.

          जातिनिहाय जनगणना में अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती / ओबीसी इनकी *"जातीगत जनगणना"* होते समय / *"धर्मगत जनगणना"* भी होनी चाहिये. धर्मगत जनगणना होते समय *"बौध्द प्रवर्ग"* की जनगणना होते समय, वह धर्मगत जनगणना में तिन विषयों का वर्गीकरण जरुरी है. जैसे -  *"परंपरागत बौध्द / धर्मांतरित बौद्ध / अनुसुचित जाती धर्मांतरित बौध्द."*  क्यौं कि *"अनुसुचित जाती धर्मांतरीत बौध्द"* इन्हे अलग *"प्रवर्ग"* अंतर्गत *"अनुसुचित जाती"* सुची में, अंतर्भुत करना सहज हो. *बाबासाहेब डॉ आंबेडकर* इनकी प्रेरणा से १४ अक्तुबर १९५६ को, महार आदी अस्पृश्य समुह ने, *"बौध्द धर्म"* का स्वीकार किया था. और *"बौध्द आरक्षण"* यह मांग होती रही. *व्ही. पी. सिंग* सरकार ने, सन १९९० में *"धर्मांतरित बौध्द"* आरक्षण में जो दोष छोडे थे, उन दोषों का निवारण होना भी जरुरी है. अत: केंद्र सरकार द्वारा *"जातीनिहाय आरक्षण चार्ट"* में, धर्मगत जनगणना उपरोक्त कॉलम / सवर्ण वर्ग की सामाजिक / आर्थिक स्थिती इसका उल्लेख होना बहुत जरुरी है. साथ ही जनगणना के *"निकष / पध्दती / उद्देश / क्रियान्वयन / कालावधी"* भी निश्चित होना बहुत जरुरी है. हम ने *"मंडल आयोग"* की स्थिती को बहुत पास से देखा है. अत: अगर केंद्र सरकार *"जातिनिहाय जनगणना"* में बहुत गंभीर हो तो, इस विषय संदर्भ में आगे बढे. इसी अपेक्षा में !!!


****************************

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपुर दिनांक ३ में २०२५