Monday 28 September 2020

  * कोरोना संक्रमण काळात विकास कामातील अवरोधी शुक्राचार्य नेत्यांना धडा द्यावा काय...? 

 * डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य', * नागपूर

           मो.न. 9 370 9 84138

 राष्ट्रीय अध्यक्ष, सिहहिल राईट्स प्रोटेक्शन सेल


        नागपुरच्या मनपा (नागुर महानगर पालिका) इतिहासत हया ऑरेंज सिटी शहराला * टी। चंद्रशेखर * आनी * तुकाराम मुंढे * ही दोन अतिशय कर्मदक्ष, बिनधास्त काम करनारी, प्रामाणिक आणि कोणार्थी राजकीय राम्याण्णा न जुमाननारे, असे श्रेष्ठ मनपा कृत लाभलेत ...! * "आनी सदर जैसा दोन्हि नागुर मनपा आयुक्तंनी, आपल्या श्रेष्ठ अशा कामाचा चिरकाल ठसा उमटवत, नागपुरच्य अधिकारवाद प्रभावी असो वा विपक्ष विपयना, काम करतांनांचि अनुकरण लायकी एडवुन दिली ...!" * हा भाग वासना आहे ", चंद्रशेखर हनुमान का चित्रण किया है। राहुल होता है आणि तुकाराम मुंढे ह्यांचा फारच की कमी। फक स स महने ...! आणि ह्या अल्प काळत अगर कुणी अधिकारी, जनतेच्य मनामध्ये आपली चाट जागा बनवुन जातो। आणि तसे बघता, नागपुरातील राजकिय गोद्यांच्य लायकीवर, एखादे चांगले विधायक / चिकित्सा पुस्तक लिहिता येइल। * * कारण ह्य राजकीय उप्यंना योग्यता अधिकारी आवदत नाही।

     मनपा आयुक्त म्हणुन तुकाराम मुंढे हे रूजु झाल्यांनतर मनपा नागपुरच्या वातावरणात एक चांगला भुचाल आलेला होता. *"महापौर संदिप जोशी असो की महापालिका अन्य पदाधिकारी असो, त्यांची दशा आणि दिशा पुर्णपणे बदलुन गेलेली होती...!"* त्यातचं आलेले *"विश्वव्यापी कोरोना संक्रमण,"* हे तुकाराम मुंढे ह्यांना एक तगडे आवाहन होते. आणि तुकाराम मुंढे ह्यांनी तर सदर आवाहन हे समर्थपणे पेलले सुध्दा. आणि शहरातील अशा गंभिर संक्रमण काळामध्ये, *"स्मार्ट सिटी संचालक पदाचा विवाद"* हा फारचं गरजेचा होता काय...? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुकाराम मुंढे ह्यांची सदर नियुक्ती, ही संविधानिक होती वा नव्हती...? हा भाग वगळता केला तर, मुंढे ह्यांनी खर्च केलेली सदर राशी ही जनकल्याण भावनेशी निगडीत होती वा नव्हती...!!! हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुकाराम मुंढे ह्यांनी त्यामध्ये काही गैरप्रकार केले होते काय...? हा प्रश्न नंतरचा झाला. *"परंतु सर्वात आधी शहरातील कोरोना संक्रमणावर, नियंत्रण ठेवणे हा महत्त्वाचा भाग होता...!"* जर सदर कामात तुकाराम मुंढे ह्यांनी काही गैरप्रकार केले नसल्यास, ह्या राजकीय नेत्यांना त्याचा मोठा बाहु करण्याचे प्रयोजन कां होते...??? हा प्रश्न पुढे उपस्थित होणार आहे. *"नागपूर शहरातील कोरोना संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी, तुकाराम मुंढे ह्यांच्या स्व-प्रणालीचे नागपुरी जनतेने स्वागत केलेले असतांना, राजकीय नेत्यांच्या पोटात उसळणाऱ्या गोळ्यांची चिकित्सा करणे, हे गरजेचे आहे...!"* कारण नागपूर शहराच्या विकासाचे दायित्व हे मनपाच्या अधिन आहे. असे असतांना पुढे *"विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त"* ह्या अलग समितीची स्थापना करणे, हे तुकाराम मुंढे ह्यांच्या अधिकारावर लावलेले सुरुंग होते, असे म्हणावे काय...? कारण त्या नव‌ गठित समितीने तुकाराम मुंढे ह्यांच्या कार्यपद्धती प्रमाणे, शहरातील कोरोना संक्रमणावर नियंत्रण करण्यास सफलता मिळविलेली दिसून येत नाही. *"नागपुरचे पालकमंत्री आणि आमचे मित्र डॉ. नितीन राऊत असो वा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, हे तुकाराम मुंढे काळात मिडियात फारचं डिंग डांग करतांना दिसायचे. आता ते कोणत्या बिळामध्ये झोपलेले आहेत...?"* हे कळायला मार्ग नाही. तसे ते *"दोन्ही नितिन > नीति + न > नीति नसलेले"* असे जीव आहेत. कारण मुंढे काळातील कॄतीशिलता आज दिसत नाही. कारण कोरोना संक्रमणात जबरदस्त वाढ होतांना दिसत आहे. मॄत्युचा ग्राफ वाढत आहे. आणि तुकाराम मुंढेची बदली करण्यात आलेली आहे. सर्वत्र राजकीय शांतता आहे. नविन मनपा आयुक्त *राधाकृष्णन बी.* हे राजकीय नेत्यांशी तडजोड करतांना दिसत आहेत. पोलिस आयुक्त *डॉ. भुषण कुमार उपाध्याय* हे ही बदलून गेलेले आहेत. आणि कोरोना संक्रमणात नविन पोलिस आयुक्त *अमितेश कुमार* ह्यांचे तर स्वागत सुरू आहे. कोरोना संक्रमणाला ऊत आलेला आहे.

      *"तत्कालीन मनपा आयुक्त टी. चंद्रशेखर ह्यांनी नागपुरात जो विकास केलेला होता, तो कधीच कोणत्याही सत्तागत राजकीय नेत्यांनी केलेला नाही...!* हा वास्तव इतिहास आहे. *टी चंद्रशेखर* अजुन एक वर्ष नागपुरमध्ये कार्यरत असते तर, नागपुरचा चेहरा मोहराचं पार बदलुन गेला असता. चंद्रशेखर ह्यांनी राजकीय नेत्यांना कधी थाराचं दिला नाही. भ्रष्ट राजकिय नेत्यांना जेलची हवा दाखविली. त्यांना भेटायला जाण्यास राजकीय नेतेचं काय तर, नगरसेवक सुध्दा घाबरत असत. परंतु *विलास मुत्तेमवार / सतिश चतुर्वेदी* ह्या नेत्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री ह्यांना त्यांची बदली करण्यास भाग पाडले. चांगल्या अधिका-यांची बदली करणारे नेते विलास मुत्तेमवार / सतिश चतुर्वेदी आज कुठे आहेत...? महाराष्ट्र राज्याचे गॄहमंत्री *अनिल देशमुख* तसेच दुसरे मंत्री *सुनिल केदार* हे सुध्दा हेव्ही वेट मंत्री आहेत. कोरोना संक्रमण काळामध्ये *तुकाराम मुंढे* ह्यांच्या सारख्या कर्तव्यनिष्ठ अधिका-याची नागपूर शहराला फारचं गरज आहे. सध्याचे जिल्हाधिकारी *रविंद्र ठाकरे* ह्यांना पाहिजे तसा प्रभाव नागपूर शहरावर जमवता आलेला नाही. नागपुरचे मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त ह्यांच्या अचानकपणे बदल्या झालेल्या आहेत. त्याप्रमाणेचं जिल्हाधिकारी *रविंद्र ठाकरे* ह्यांची बदली करून, *तुकाराम मुंढे* ह्यांना त्या पदावर आणल्यास आपल्या राजकीय नेत्यांनी केलेल्या चुका, ह्या काही तरी प्रमाणात झाकल्या जाणार आहेत. तेव्हा *"नवा गडी - नवा राज"* ह्या उक्ती प्रमाणे आमचे मंत्रीगण कामाला लागतील, अशी आशा करु या...!!! नाही तर, आपण नागपुरी जनतेने आपला अधिकार काय आहे...? हा इंगा अशा राजकीय नेत्यांना दाखवायलाचं हवा...!!!






* * * * * * * * * * * * * * * * * * *

* *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

* राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

* मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२

[14/09, 10:08 PM] Dr. Milind Jiwane: आपण सर्वांनी मिळून काम करावे. हा वाद बंद करावा.

No comments:

Post a Comment