✍️*ताराचंद खांडेकर लिखित आंबेडकरनिष्ठ वाङमय विमर्श - लेखन संकलन पुस्तकातील दलित साहित्य - बुध्द साहित्य संदर्भ आणि समिक्षा विचार आकलन !*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटींग प्रोफेसर, डॉ. बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञानं विद्यापीठ महु मप्र
बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक
आंतरराष्ट्रिय परिषदेचे संशोधन पेपर परिक्षक
मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२
वरिष्ठ दलित साहित्यिक - भाष्यकार *ताराचंद खांडेकर* लिखित लेखन संकलन पुस्तक वाचत असतांना साहित्याशी निगडित इतकी सहज - सरळ - सोपी ती पुस्तक नाही, ही प्रचिती बहुतेक वाचकांना झालेली असेल. ताराचंद खांडेकर ह्यांचा उल्लेख *"वरिष्ठ दलित साहित्यिक"* असे करण्याचे काही प्रयोजनही आहे. कारण प्रकरण १३ मध्ये खांडेकर स्वत: म्हणतात, *"मी स्वत:ला दलित साहित्यिक म्हणुन संबोधण्यात गौरव मानतो. त्याची कारणे केवळ सामाजिक किंवा जातीय वा वर्णीय नाही. मला स्वत:ला बौध्द साहित्यिक म्हणता आले असते. परंतु त्याऐवजी मी दलित साहित्यिक समजणे जास्त संयुक्तिक मानतो. "* तसे माझे खांडेकर ह्यांच्यासोबत संबंध हे माझ्या काँलेज जीवनापासुन आहेत. त्यामुळे मी त्यांच्या सामाजिक - साहित्यापासुन ब-याच कार्यासोबत चांगला परिचीत आहे. मांझी बांधिलकी ही *"बुध्द साहित्य"* संदर्भीत असल्याने सदर *"लेखन संग्रह"* ह्या पुस्तकाची समिक्षा करतांना मला साहित्याच्या अंतरंगात जाणे, हे मग आलेचं. सदर पुस्तक हे *"लेखन संग्रह"* असल्याने सदर पुस्तकाला काही मर्यादा आहेत. जर खांडेकरांनी सदर विषयावर *"संदर्भ साहित्य"* लेखन केले असते तर, सदर पुस्तकाची व्यापकता ही वेगळीच झालेली असती. सदर पुस्तकाची समिक्षा करण्यापुर्वी *"प्राचिन लिपी - प्राचिन भाषा - प्राचिन साहित्य - मराठी भाषा - उगम"* इत्यादी विषयावर संक्षिप्त चर्चा करु या. सदर विषय समजल्या शिवाय *"बुध्द साहित्य - आंबेडकरी साहित्य - दलित साहित्य"* आणि तमाम साहित्य प्रकाराला न्याय देणे संभव होणार नाही.
*"सिंधु घाटी सभ्यता"* ही तिन भागात विभाजीत करता येईल. *पुर्व सिंधु घाटी सभ्यता* (इ. पु. ७५०० - ३३००) / *सिंधु सभ्यता* (इ. पु. ३३०० - २६००) / *परिपक्व सिंधु सभ्यता* (इ. पु. २६०० - १९००) ह्याशिवाय प्राचिन तिन कालखंड समझुन घ्यावे लागणार आहेत. *पाषाण काल* (पुरा पाषाण काल इ. पु. २५००० - १२००० / मध्य पाषाण काल इ. पु. १२००० - १०००० / नव पाषाण काल इ. पु. १०००० - ३५००) / *कास्य युग* (इ. पु. ३३०० - १२००) / *लौह युग* (इ. पु. १२०० - ५५०). सिंधु घाटी सभ्येतेमध्ये *"चक्राकार स्तूप / अन्य स्तुप समोर तालाव / स्वस्तिक चिन्ह / कुबड बैल / सिंह मुद्रा / ज्ञानस्थ भिक्खु"* इत्यादी प्रमाण हे पहिला बुध्द *ताण्हनकर बुध्द* बोध करुन जातो. सध्या हा आपला विषय नाही. *"सिंधु लिपी"* ही अजुन पर्यँत वाचली वा समजली गेली नाही. ह्याशिवाय प्राचिन तिन लिपीचा बोध होतो. *"चित्र लिपी / भाव लिपी / ध्वनी लिपी. "* शब्द मर्यादा असल्याने ह्या अंतरागात जाणे शक्य नाही. नंतरचा कालखंड इ. पु. सहावे शतक *२८ वे शाक्यमुनी बुध्द* ह्यांचा जन्म कार्बन डेंटिग संशोधनातुन *इ. पु. ६२४* (इ. पु. ५६३ च्या ७० वर्ष आधी) लागलेला आहे. सदर संशोधन मान्य करावे किंवा नाही, हा अलग विषय आहे. आपला संबंध *"धम्म लिपी*" (ब्राम्ही लिपी) आणि भाषा *"मागधी - पाली - प्राकृत"* विषयासोबत निगडीत आहे. धम्म लिपी ही *"वाचली - समजली - उमगली"* गेली आहे. बुध्द महापरिनिर्वानंतर *"हिनयान - महायान"* ह्या दोन संप्रदायात बुध्द धर्म हा विभागला गेला. हिनयान हा *"पाली भाषा"* सोबत एकनिष्ठ झाला तर महायान संप्रदायाने पाली भाषेवर संस्कार करुन *"हिब्रु संस्कृत भाषा"* हिचा अविष्कार केला. परंतु लिपी मात्र *"ब्राम्ही लिपी"* होती. तसेच पुढे *"शंख लिपी / खरोष्टी लिपी"* संदर्भ ही दिसुन येतात. बाराव्या शतकानंतर हिब्रु संस्कृत पासुन ब्राम्हण धर्मीयांनी *"क्लासिकल संस्कृत भाषा"* हिचा अविष्कार केलेला आहे. परंतु लिपी मात्र *"देवनागरी लिपी"* होती. देवनागरी लिपीचे प्रारुप *"इसवी ११००"* मध्ये तयार झाले असले तरी, ती व्यवहारात *"इसवी १७९६* ला आली. ह्याशिवाय भारतात कालांतराने काही लिपीचा उदय होतो. *"उत्तरी धारा"* - गुप्त लिपी / कुटील लिपी / शारदा लिपी / देवनागरी लिपी. तर *"दक्षिण धारा"* - तेलगु / कन्नड / तामिल / कलिंग / ग्रंथ / मध्यदेशी / पश्चिमी लिपी इत्यादी अन्य लिपीचा अविष्कार झाला.
पाली - प्राकृत भाषा - हिब्रु संस्कृत भाषा नंतर इ. पु. पहिली - इसवी पाचवी शती ह्या कालखंडात *"अपभ्रंश भाषा"* व्यवहारात दिसुन येते. त्यांनतर पाली - प्राकृत भाषेची अंतिम अंपभ्रंश अवस्था म्हणजे *"आदि हिंदी भाषा"* ही होय. त्यानंतर इसवी बाराव्या शतकामध्ये *"आधुनिक हिंदी भाषेचा"* अविष्कार झाला. *अब्दुल रहमान* (अद्दहमान - इसवी १२ वी शति) हा आधुनिक हिंदी भाषेचा *"पहिला कवि"* (संदेश रासक ही काव्यरचना) आहे. *संत कबिर* (१३९९ - १५१२) ही आधुनिक हिदीतील दोन कवि मुस्लिम धर्मीय झाल्यावर त्यांची जात *"जुलाह"* होती. मुस्लिम धर्म हा स्वीकारण्याच्या आधी ते दोन्ही कवि *"कोळी > कोली > कोलीय"* अर्थात यशोधरा ह्यांच्या वंशाचे असल्याचा संदर्भ दिसुन येतो. दोन्ही जातीचा व्यवसाय *"विणकाम"* हा आहे. संत कबिर ह्यांचा जन्म *"सारनाथ"* लगत *"काशी"* येथे आणि निर्वाण बौध्दांचे गाव *"मघहर"* येथे झालेला आहे. संत कबिर ह्यांची रचना आहे - *"झीनी झीनी बिनी चादरीया / जस के तस घर बिनी चादरीया / अष्ट कमल दल चरखा डोले / पाच तत बिनी चादरीया / पुरब दिशा से उठी बदरीया / अपना अपना मेल संभालो / कर ये खेत निर्वाणी /"* कबिरांना समजुन घ्यायला ती साहित्य दृष्टी असणे गरजेचे आहे. मराठी भाषेतील *सन ७०५* सालचा शिलालेख पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे"* येथे आढळला आहे. दुसरा शिलालेख *सन १०१२* सालचा रायगड जिल्हातील *"अक्षी"* येथे सापडला आहे. तिसरा शिलालेख *सन १९१९* सालचा सोलापूर जिल्हातील *'हत्तरसंगकुंडल"* येथे सापडला आहे. चवथा शिलालेख *सन १९३९* सालचा कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडला आहे. मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्यासाठी २००० वर्षाचा इतिहास असणे गरजेचे असल्याने बुध्द वंशाच्या *"नाणेघाट शिलालेखाचा आधार"* हा घ्यावा लागल्याचा इतिहास नविन नाही. *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांच्या हिंदवी साम्राज्यामध्ये *"क्लासिकल संस्कृत भाषेतील"* शिलालेख आढळले असल्यामुळे ब्राम्हणी अधिपत्याची जाणिव सहज होते. शब्द बंधन असल्याने मराठी भाषा संदर्भात जास्त विवेचन करणे योग्य नाही.
इ. पु. तिस-या शतकात बुध्द धर्म हा *"हिनयान - महायान"* संप्रदायात विभाजन / इसवी पाचव्या शतकात महायान संप्रदाय द्वारा *"वज्रयान"* संप्रदायाला जन्माला घालणे / इसवी आठव्या शतकात वज्रयान द्वारा *"तंत्रयान"* संप्रदायाला जन्माला घालणे / इसवी ८५० साली *शंकर* नावाच्या व्यक्तिचा जन्म / पुढे तो व्यक्ति *"प्रछन्न बौध्द"* म्हणुन परिचीत होणे / इसवी दहाव्या शतकात वज्रयान - तंत्रयान द्वारा *"शैव पंथ - वैष्णव पंथ - साक्त पंथ"* ह्याला जन्माला घालणे / शंकर ह्या व्यक्तीने स्वत: *"आदि शंकराचार्य"* घोषित करुन *"महायान बुध्द विहारावर"* अधिपत्य स्थापित करणे / महायान बुध्द विहार हे *"चार पीठ निर्माण "* / त्या चार पीठातुन *"चार वेदाची"* रचना होणे / इसवी अकराव्या - बाराव्या शतकात *"वैदिक - ब्राम्हण धर्माची"* स्थापना / मोगल आदी शासकांचे भारतावर आक्रमण - ही कारणे *"बुध्द धर्म अवनतीची"* झालेली आहेत. *"वेद / उपनिषद / रामायण / महाभारत"* इत्यादी ब्राम्हणी ग्रंथाची निर्मीती ही *"इसवी अकराव्या"* शतकांनंतर झालेली आहे. कारण वरील सर्व लिखाण हे *"कागदावर अंकित"* आहे. कागदाचा शोध हा *"इसवी दहाव्या शतकात चीन"* ह्या देशात लागला. तर बौध्द साहित्य लिखाण हे *"शीलालेख / ताम्रपट / ताडपत्र"* ह्यावर अंकित आहे. मुर्तीकला अविष्कारसुध्दा *"गांधार कला / मथुरा कला"* ही बुध्द धर्माची देण आहे. बुध्द कालखंड / बुध्द धर्म प्रभाव कालखंड ह्या कालखंडात *"वैदिक धर्म - ब्राम्हण धर्म"* अस्तित्वात नव्हता. बुध्द कलखंडात *"बम्हन"* ही संज्ञा *"समन / श्रमण / विद्वान"* ह्या अर्थाने विद्यमान होती. *"ब्राह्मण"* ह्या संज्ञेचा अर्थ वेगळा आहे. *"ब्राम्हण्यवाद"* ही त्यांची मानसिकता आहे. बुध्द कालखंडात आणि बुध्द प्रभाव कालखंडात *"वंश व्यवस्था"* होती. *"जाति व्यवस्था"* अस्तित्वात नव्हती. जसे - शाक्य वंश / कोलिय वंश / हरयक वंश / मौर्य वंश / शुंग वंश इत्यादी. दुसरे असे की, पाली भाषेमध्ये *ऋ / श / क्ष / त्र / ज्ञ / र"* ही शब्द नाहीत. चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेखात *"देवानपियेन पियदसिन लाजिन.... "* असा उल्लेख दिसुन येतो. *"लाजा = राजा* असा अर्थ आहे.
प्राचिन बुध्द प्रभाव कालखंडात *आचार्य अश्वघोष / आचार्य नागार्जुन / आचार्य आर्यसुरा / आचार्य कुमारल्भ"* ही चार महासुर्य म्हणुन परिचीत होती. आचार्य वसुमित्र - *अभिधम्म / प्रकरण पादशास्त्र / धातुकाम पादशास्त्र* / आचार्य कल्याणी पुत्र - *दिव्यावदान* / नागार्जुन - *मध्यमिका कारिका* / आर्यदेव - *चतु:शतक* / मैत्रीनाथ - *अभिसमयालंकार* / असंग - *महायान सुत्रालंकार* / दिग्नाग - *न्यायप्रवेश* / धर्मकिर्ती - *न्यायबिंदु* / शांतीदेव - *बोधाचार्य अवतार* ही संदर्भ दिसुन येतात. जातक कथा / भिक्खुनीच्या कविता / मिलिन्द प्रश्न / विशुध्दीमग्ग / महायान श्रध्दोत पद / सधर्म पुण्डरीक / ललित विस्तार / अट्ठसहस्त्रिका / महावस्तु / लंकावतार सुत्र / दशभुमिश्वर / नागानंदा / प्रतित्यसमुत्पाद / निर्वाणप्राप्ती इत्यादी प्राचिन ग्रथांचा संदर्भ देता येतो. *आचार्य अश्वघोष* रचित काव्य *"सौदरानंद"* हे तर भंते आनंद ह्यांच्या दीक्षित प्रसंगावर आधारीत रचना आहे. प्राचिन बुध्द साहित्याला *"प्रेम - मैत्री - सौंदर्यशास्त्र - नैतिकवाद"* इत्यादी भावांचा संदर्भ आहे. *"बुध्द चरित्रम्"* हे महाकाव्य बुध्दाच्या जीवनावर आहे. नाटक - संगित ह्याचे जनक *आचार्य अश्वघोष* आहेत. अश्वघोषांची रचना *"बुध्दचरित्रम् / सौदरानंद / गंडीस्त्रोथ गाथा / शारीपुत्रप्रकरणम्"* ह्या बुध्द साहित्यात उच्च कोटीच्या आहेत. प्रेम विरहातील *"उर्वशी वियोग"* ह्या नाटकाचा संदर्भ देता येतो. *अशोकवदान* हा ग्रंथ सम्राट अशोक ह्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे. *"दिपवंश / महावंश"* ही दोन प्राचिन बौध्द ग्रंथ आहेत. सम्राट अशोक दरबारातील विदेशी लेखक *मेगास्थनिज* लिखित ग्रंथ *"इंडिका"* तत्कालीन शासन व्यवस्थेचा बोध करुन जातो. जेव्हा आम्ही मराठी साहित्याकडे वळतो तेव्हा बाराव्या शतकातील *संत नामदेव महाराज / संत जनाबाई / संत चोखामेळा* ह्या अग्रणी कविचा उल्लेख महत्वाचा होवुन जातो. ती संत बुध्दाला शरण गेलेली आहेत. परतु ब्राम्हणी व्यवस्थेने ह्या *"संताकडे दुर्लक्ष"* करुन त्यांच्यापेक्षा *"वयाने लहान"* असलेल्या ब्राम्हण वर्गाच्या *संत ज्ञानेश्वर महाराज* ह्यांचा उदो उदो केलेला दिसुन येतो. संत नामदेव महाराज म्हणतात *"मध्ये झाले मौन, देव निज घ्यावी / बौद्ध ते म्हनोनी, नावे रुप /"* संत जनाबाई तिच्या अभंगात म्हणते *"ऐसा कष्टी होऊनी, बौध्द राहिलासी /"* बुध्दाला शरण गेलेल्या संतामध्ये *संत एकनाथ / संत तुकाराम / संत महापतीबुवा / संत नरहरी सोनार / संत सोयराबाई / संत निर्मलाबाई / संत कर्ममेळा / संत जगनाडे महाराज* ह्यांचा संदर्भ देता येईल. आम्हाला त्यांचा मार्ग पटावा वा ना पटावा, हा ज्याच्या त्याच्या बुध्दीचा प्रश्न आहे.
प्राचिन बुध्द साहित्य ते संत नामदेव आदि समस्त संतापर्यंतचा प्रवासात *"भारतीय समस्त साहित्याची जननी हे बौध्द साहित्य असल्याचा बोध होतो. "* सर्व भारतीय लिपीची जननी ही *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी *"साहित्य लेखण"* केलेले नाही, असे म्हणने ही मुर्खपणाचे आहे. *"मुकनायक / बहिष्कृत भारत / जनता / प्रबुद्ध भारत"* ही सर्व पाक्षिक कश्याचे द्योतक आहेत ? बाबासाहेबांनी केलेल्या लिखाणामुळे - प्रयासामुळेचं *"राष्ट्र निर्माण - राष्ट्र घडण / समाज घडण"* हे झालेले आहे. आणि हे लिखान महत्वाचे होते. ती प्रासंगिकताही होती. *साहित्य लिखाणाचा उद्देश काय आहे ?* बाबासाहेब १४ आँक्टोंबर १९५६ रोजी बुध्दाकडे घेवुन जातात. धम्म दीक्षेमध्ये ज्यांनी धर्म परिवर्तन केले, *"त्या शोषित समाजाने ह्या ५० - ६० वर्षाच्या अल्पश्या कालखंडामध्ये शोषका समकक्ष वैचारीक सामाजिक - सांस्कृतिक - मानसिक - वैचारिक प्रगती केल्याचा"* जगातील संशोधन आकडे खुप बोलके आहेत. *"आर्थिक उत्थान"* हवे ते झाले नाही. पंरंतु तो आर्थिक क्षेत्रातही पुढे जाण्याचा प्रयास करीत आहे. आणि वरील प्रश्नाचे उत्तर ह्यात दडलेले आहे. ज्यां बहिष्कृत समाजाने धर्मांतर केले नाही, तो समुह आज *"मानसिक गुलाम"* आहे. धर्मांध आहे. इतकेच काय तो *"दलित"* ही आहे. *"दलितत्व"* ही हिन मानसिकता आहे. म्हणुन *"सरस्वती पुरस्कार"* घेण्यास धन्यता मानतो. एक बहिष्कृत समाजातील साहित्यिक स्वत:ला *"वादीहिन"* म्हणवुन घेण्यास धन्यता मानतो. त्या वादीहिन साहित्यीकाला *"बौध्द म्हणवणा-या साहित्यिक मंडळींंना* पुरस्काराने सन्मानीत करण्यास कुठलीही लाज वाटत नाही. तेव्हा *"दलित"* नावाच्या *"साहित्य गटारीत"* राहायचे आहे किंवा *"बुध्द साहित्य"* ह्या उन्नत अवस्थेकडे जायचे आहे ? ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. *"आंबेडकरी साहित्याची"* बुध्द साहित्य प्रेरणा शक्ती आहे. *"दलित साहित्य / जन साहित्य / जनवादी साहित्य / ग्रामिण साहित्य / बहुजन साहित्य / परिवर्तनशील साहित्य / आदिवासी साहित्य / विद्रोही साहित्य"* अश्या ह्या साहित्य प्रकाराच्या दुकानदारी लावणा-या साहित्यिकांनी, *"समाज उत्थान'* कश्यात आहे ? हा विचार करणे गरजेचे आहे. जर ती साहित्यिक मंडळी सदर *"कुपमंडपातुन बाहेर पडण्यास"* तयार नसतील तर, त्यांच्या त्या विचारपीठावर जाण्यास काही अर्थ नाही.
दलित साहित्य हे *"नकार / निषेध / बंडखोरी"* ह्या सिमित जखडलेले दिसुन येते. *"दलित साहित्यिक"* हा संदर्भ व्यापक असेलही परंतु *"दलितत्व"* मिरवुन घेण्याचा विषय नाही. तो *"अलंकारही"* नाही. बाबासाहेबांनी *"दलित"* ह्या शब्दाचा प्रयोग अगदी क्वचित केला आहे. त्यांनी *"बहिष्कृत / आँप्रेस्ड क्लास"* हा शब्द प्रयोग केला आहे. बाबासाहेबांनी *"दलित"* नावानी पाक्षिक काढलेले नाही. मुकनायक - बहिष्कृत भारत - जनता - *"प्रबुद्ध भारत"* ह्याकडे घेवुन जातात. बाबासाहेबाकडुन अजुन काय *"साहित्य संदर्भ "* अपेक्षीत आहात ? *"दलित साहित्यातील सौंदर्यशास्त्र कोणते आहे ?"* दलित साहित्यातील *"नैतिकवाद"* काय आहे ? *"प्रेम - मैत्री - करुणा - बंधुभाव"* हा कोणता दिसतो आहे? अशी खुप काही प्रश्न ही सामोरा आहेत. नामदेव ढसाळ ह्यांच्या *"गोलपिठा"* (अर्थात वेश्यालयातील कविता) हा काव्यसंग्रह वरील पैकी कोणत्या संदर्भाला आपण स्वीकार करतो? हा प्रश्न आहे. *"दलित पँथर"* ह्या झंझावाताला अमेरिकेतील *"ब्लक पँथर"* विचाराचा संदर्भ आहे. *"मार्क्सवाद"* इत्यादी विचारांचा त्यावर मुलामाही चढलेला होता. बरीच मंडळी सदर चळवळीत बेचिराख झालीत. *मी स्वंय* सुध्दा ह्या दलित चळवळीत झोकलेला होतो. माझ्या परिवाराने मला सावरले नसते तर "*मी त्या झंझावातातुन"* कधीचाचं बाहेर पडलो नसतो. म्हणुन आज माझे स्वंतत्र अस्तित्व आहे. *शरदचंद मुक्तिबोध* हे चांगले भाष्यकार - साहित्यिक वगैरे असतीलही, परंतु आम्हाला आमचे महाकवि *वामनदादा कर्डक* जवळचे आहेत. त्यांच्या वेदना - कळकळ मी खुपचं जवळून बघितल्या आहेत. नाटककार *कमलाकर डाहाट* ह्यांच्या तिव्र वेदनाही मी बघीतलेल्या आहेत. आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे राष्ट्रिय अध्यक्ष *वि. रा. वाशीमकर* ह्याना तर मी माझ्या समोर अक्षरश: रडतांना बघितलेले आहे. वाशीमकर ह्यांनी तर ब-याच कार्यकर्तांचे जीवन घडवले होते. परंतु ते शेवट पर्यँत कफल्लकच राहिले. *"सामाजिक नाटकातील कलावंताच्या दु:ख - वेदना"* ह्या आपण समजु शकतो. *"जलसे - तमाश्या"* वगैरे लोककला कलावंताच्याही ह्याच दु:ख - वेदना आहेत. बुध्द हे समाजाला *"अत्त दिपो भव !"* हा संदेश देतात. आपल्या काही नाटकांनी *"व्यावसायिक स्वरुप"* धारण केलेले आहे. जसे - प्रभारे दुपारे ह्यांचे *द्वितिय महायुध्द आणि डॉ. आंबेडकर* / सुनिल रामटेके ह्यांचे *महासुर्य* / ह. बी. रंगारी लिखित *सम्राट अशोक* / प्रेम उके ह्यांचे *अहिंसक अंगुलीमाल* / अमन कबिर लिखित *संविधान* / प्रा. सुरेश खोब्रागडे ह्यांचे *क्रांतीसुर्य* / किरण गभणे हिचे *तथागत* / कबिर दा लिखित *भीमा कोरेगाव* / प्रभाकर दुपारे लिखित *रमाई* / वराडे लिखित *रमाई* / तसेच *शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला* / संजय जीवने लिखित *पैदागीर* इत्यादी नाटकांचा उल्लेख करता येतो. ह्याशिवाय नव नविन कलावंत जसे की - *रवी पाटील / सारनाथ रामटेके / मिलिन्द रामटेके / सुधिर पाटील / सुनिल हिरेखण / भास्कर मेश्राम / डाँ. मनिषा घोष* इत्यादी कलावंत नाटकात आपली सशक्त भुमिका वठवीतांना दिसत आहेत. काळाच्या ओघात परिवर्तन आवश्यक असते. बाबासाहेब आंबेडकरांनी वैदिक धर्माचे रुपांतर *"ब्राम्हण धर्मात"* आणि ब्राम्हण धर्माचे रुपांतर *"हिंदु धर्मात"* झाल्याचा संदर्भ हा दिला आहे. सदर परिवर्तनातुन *"अल्पसंख्याक ब्राम्हण समुह"* हा *"बहुसंख्याक सत्ताधारी वर्ग"* झाल्याचे आपण अनुभव घेत आहोत. आज बुध्द धर्म - बुध्द साहित्य हे *"अल्पसंख्याक वर्गात"* समाविष्ट आहे. आपल्याला *"बहुसंख्याक सत्ताधारी वर्ग"* व्हायचे असेल तर, साहित्यातील - समाजातील अशा दुकानदा-या बंद करणे फार गरजेचे आहे. आता पुनश्च "*बुध्द - फुले - शाहु - आंबेडकर"* जन्माला येतील, ही कल्पनाच दिवास्वप्नवत आहे. तेव्हा ही जबाबदारी आपल्यालाचं पेलायची आहे. साहित्यात जो *"भोगवाद / अनैतिकवाद"* आलेला आहे, त्याचे मुळ *कालीदास संस्कृत साहित्यामध्ये* दिसुन येतो. परंतु कालीदासांचे जन्म - मृत्यु स्थळ हे पुर्णत: अज्ञात कां आहे ? तेव्हा कालीदास हा *"काल्पनिक कवि"* होता काय ? हा अहं प्रश्न आहे. तीच स्थिती ब्राम्हण रचित *"वेद - उपनिषद - पुराण - रामायण - महाभारत"* इत्यादी ग्रंथाचीही आहे. *"मराठी भाषा"* साहित्यावरही ब्राम्हणशाहीने आपले अधिपत्य बळकावले आहे. आमचे हे *"साहित्य विभक्तीकरण"* ब्राम्हण वर्गाकरीता सोऩ्याचे अंडे आहे. म्हणुन आम्हाला जागे होणे गरजेचे आहे. आम्हाला आमचा *"मराठी साहित्य वसा"* हस्तगत करायचा आहे. *ताराचंद खांडेकर* हे वरिष्ठ साहित्यिक तसेच भाष्यकार असल्यामुळे ही आशा त्यांच्याकडुन करणे काहीचं गैर नाही. जयभीम !!!
-----------------------------------------------
▪️*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर, दिनांक ०३ एप्रिल २०२६