Thursday, 10 July 2025

✍️ *कवियित्री निर्मला जीवने हिची कविता आंबेडकरी बुध्द विचारांकडे घेवुन जाणारी !*
       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.
बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

            कवियित्री निर्मला जीवने हिचा काही दिवसांपूर्वी मला फोन आला होता. आणि तिने मला *"नवा संकल्प"* हा कविता संग्रह / *"अजिंक्य नीर"* हे स्वकथन मला पोस्टाने पाठविले. मध्यंतरी ती घसरुन पडल्यामुळे तिला चालतांना त्रास होत असल्याचे पत्र सोबतचं पाठविले. निर्मला जीवने हिचा *"नवा संकल्प"* हा दुसरा काव्य संग्रह असुन *"दवंडी"* हा तिचा पहिला काव्यसंग्रह आहे. नवा संकल्प ह्या कविता संग्रहातील काही कविता ह्या *"ललित साहित्याचा"* बोध करुन जातात. आयु निर्मला जीवने हिने हे सत्य तिच्या साहित्य लिखाणात मान्य केलेले आहे . तिच्या कविता संग्रहातील संविधान संदर्भातील शब्द संविधानाचे मुल्य जोपासतांना दिसते. ती म्हणते - *"जगण्याचे तत्वज्ञान / सांगते संविधान / मूल्य नव्या क्रांतीचे / दिसते पानापान."* आणखी ती म्हणते - *"हाच करा रे संकल्प / करु नका रे अपमान / जगण्यासाठी आम्हा / वाचविणार संविधान."* माजी सनदी अधिकारी *इ. झेड. खोब्रागडे* ह्यांनी बुध्द - आंबेडकरी साहित्याला छेद देण्याकरिता *"संविधान साहित्य संमेलन"* ह्या नावाने साहित्यामध्ये भर देण्याचा अफलातुन प्रकार चालविला आहे. दीक्षाभूमी नागपूर येथे ८ - ९ जुन २०१९ रोजी सदर आयोजन केले होते. सदर साहित्य संमेलनाला मी स्वत: आणि माझी संघटना *"सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* द्वारा विरोध करुन मा. उच्च न्यायालयात याचिका क्र. ३९४०/२०२९ दाखल केली होती. माझ्या बाजुचे मा. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल *एड. चेतन बैरवा / एड. बी.बी‌. रायपूरे* होते. उच्च न्यायालयाने सदर संमेलन हे माझ्या *"मुलभुत अधिकाराचे उल्लंघन करणारे नाही"* ह्या कारणांनी याचिका डिस्पोस्ड ऑफ केली. मी सदर याचिका माझ्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन झाल्यामुळे दाखल केलेली नव्हती. परंतु *न्या. रवी देशपांडे / न्या. विनय जोशी* ह्यांच्या संविधान ज्ञानाबद्दल काय बोलावे ? *"भारतीय संविधानाचा सन्मान करणे"* हे आपण सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. भारतीय संविधान हे मुलत: *"कायद्याचे पुस्तक"* (Legal Book) नाही. तर ते *"कायद्याचे दस्तावेज"* (Legal Documents) आहे. त्यामुळे  *"भारतीय संविधान"* हे *"साहित्य मुळींच नाही."* साहित्य हे घाणेरडे / अश्लिल ही असु शकते. साहित्य मान्य नसेल तर निषेध म्हणून *"जाळले ही जावु शकते."* इ झेड खोब्रागडे ह्यांच्या मुर्खपणामुळे नवी दिल्लीच्या जंतरमंतर स्थानात *"भारतीय संविधान जाळण्यात आले."* परंतु बिन-अकल माणसाला कोण ज्ञान सांगणार ? असो.
           निर्मला जीवने हिची *"क्रांतिदिन"* ही कविता क्रांती इतिहास अभावाची दिसुन येते. भारताचा क्रांती इतिहास हा वेगळा आहे. मग तो उठाव १८५७ चा कां असेनां ! भारतीय कांग्रेस - गांधी राजनीतिची अदुरदर्शिता ही *"भारताला स्वातंत्र ३ -४ वर्षे उशिरा"* होण्याला कारणीभूत झाला आहे. *"रयतेचा राजा शिवाजी महाराज"* ह्या कवितेचे संदर्भ बरे असले तरी छ. शिवाजी महाराजांचे शिलालेख *"संस्कृत ह्या भाषेतील"* आहेत, हे समजुन घेणे गरजेचे आहे. अर्थात ब्राह्मण्य प्रभावाचा बोध होतो.*"गुढी पाडवा"* हा कविता संदर्भ इतिहास ही निर्मला हिने जाणुन घेणे गरजेचे आहे. मग *"क्रांती"* ह्या कविता आशयातील १९४२ ची *"चले जाव क्रांती"* ही !  हा गांधी - कांग्रेसचा मोठा मुर्खपणा होता. *"द्वितीय महायुध्द "* कालखंड १९३९ - ४५ हा *"हिटलर - झारशाही विरुध्द"* सुरु होते. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी *"मित्र देश - इंग्लंड - अमेरिका - रशिया"* ह्यांना समर्थन दिलेले होते. *"महार रेजिमेंट"* युध्दात सक्रिय होती. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांना कांग्रेस मंडळी ही गद्दार म्हणत होती. कांग्रेस ही *झुरी राष्ट्र - हिटलर* सोबत सख्य करावे की *"मित्र राष्ट्र"* ह्या द्वंद्वात अडकली होती. आणि उशिराने गांधी - कांग्रेसने मित्र राष्ट्राला पाठिंबा दिला. हा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. वरुन त्या कविता ललित साहित्याचा बोध करुन देण्या-या आहेत. *"जी़वाचा मापदंड"* ह्या कवितेत ती म्हणते - *"मापदंड जीवाचा / अनुसरा मार्ग विशुध्द / पंचशील तत्व / ही शिकवण देती बुध्द."* अगदी साध्या - सोप्या भाषेत ती बुद्ध सांगुन जाते. *"प्रियदर्शी सम्राट अशोक"* संदर्भ सांगताना ती राजमुद्रा विषयावर लिहिते - *"चार सिंहाची प्रतिमा / मुद्रा आहे भारताची / असा हा राजा सर्वोत्तम / सर्वश्रेष्ठ शान या देशाची."* निर्मला जीवने हिच्या प्रत्येक कवितेची समिक्षा करण्यास शब्दबंधन मर्यादा आहे. नया संकल्प ह्या कविता संग्रहाचे प्रकाशन समिक्षा प्रकाशन पंढरपूर ह्यांनी केले असुन ही पहिलीच आवृत्ती आहे.  कवियित्रीचा प्रयास उत्तम असला तरी तिने *"ललित साहित्य"* ह्या विचारातुन बाहेर पडायला हवे. बुध्द आंबेडकरी साहित्यातील *"सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / नैतिकशास्त्र / प्रेम / स्त्री भाव"* इत्यादी आशयाची मांडणी नव्या स्वरूपात करायला हवे. पुर्व पार चालत आलेल्या साहित्य लिखाणातुन बाहेर पडुन तिने *"स्वतःचे लिखाण अस्तित्व"* निर्माण करायला हवे. निर्मला जीवने हिच्या भावी लिखाणाला माझ्या मंगल कामना आहेत.

----------------------------------------
✍️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
        नागपूर दिनांक ९ जुलै २०२५

Tuesday, 8 July 2025

 🫀 *वेदनांचे काळीज ...!*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


वेदनांचे काळीज

दु:खाचे डोंगर

ह्या उराशी बाळगुन

माणुस हा जगत असतो

खचलेला ही असतों

जीवन सत्य शोधतांना

मग महाकारुणीक बुध्द

सहज बोध करुन जातो

चार आर्यसत्य

आर्य अष्टांगिक मार्ग

बुध्द पंचशील 

शुण्यवाद सिध्दांत 

प्रतित्यसमुत्पाद 

कारणकार्यभाव सिध्दांत

कारणा असेल तर

कार्य हे घडत असते

कारण नसेल तर

कार्य घडुनचं येत नाही 

आणि बरेचं काही बुध्द विचार ....

माणुस हा सावध होतो

प्रज्ञा ही जागृत होते

आशेचे एक किरण

सुर्य - चंद्रात बघत असतो

निसर्ग जगातील सौंदर्य 

हिरवीगार वनराई

विविध रंगी फुल झाडे

उंच उंच वृक्ष - शुध्द हवा

जंगल - पहाड वगैरे वगैरे

नागमोडी वळण रस्ते

आणि कारचा हा प्रवास

मित्रांची ती सोबत

विसरलेली मानवी करुणा

पुनश्च मनाला चेतवीत असते

असत्य - धोकेदारी ह्या जगात ....

इतिहासाची प्राचीन भिंंत

ती समोर नजरेला येते

ती बोलकी झालेली असते 

प्राचिन बुद्ध काळ इतिहास 

ती कथन करीत असते

बाजुलाच उभ्या असलेल्या 

सांची स्वरुप बुध्द विहारात 

प्रवेश करीत असतांना

शांतीचा सहज बोध होतो

बुध्दा समोर हात जोडून 

बुध्द वंदना केल्यावर 

शांत मनाने तो बाहेर पडतो

एका सत्य युगात

आपले एक उद्दीष्ट समोरा ठेवुन ....


----------------------------------

नागपूर दिनांक ६ जुलै २०२५

Friday, 4 July 2025

 🤝 *जागतिक रिपब्लिकन महिला परिषद २०२५ : रिपब्लिकन जागतिक (???) किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंदोरा ? रिपब्लिकन विचार राजकिय आकलन !*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

  

             रिपब्लिकन पक्ष आहे की विचार (?) आणि आयोजक वर्गांनी *"जागतिक रिपब्लिकन महिला परिषद २०२५"* समारोहाचे आयोजन शनिवार ५ जुलै २०२५ रोजी *"डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर"* नागपूर ह्या ठिकाणी आयोजित केल्याची एक मोठी बातमी मिडियामध्ये दिसुन आली. सोबतचं रिपाई माजी राष्ट्रीय अध्यक्ष *"बॅरी‌. राजाभाऊ खोब्रागडे जन्म महोत्सव"* संदर्भ हा दिला गेला. जागतिक संदर्भ ह्या सम्मेलनाला दिसल्यामुळे *"अमेरिकेतील आजच्या सत्तारूढ असलेल्या रिपब्लिकन पार्टीचे नेते डोनाल्ड ट्रम्प"* ह्यांच्या सोबत काही समन्वय आहे काय ? हा अहं विचार मनात आला. अमेरिका ह्या देशात *"रिपब्लिकन पक्ष / डेमोक्रॅटिक पक्ष"* ह्या दोन पक्षांची उलट पालट *"युनायटेड स्टेट्स कांग्रेसवर"* नियंत्रण राहिलेले आहे. अर्थात सत्ता असते. रिपब्लिकन (?) आयोजकांनी सदर संदर्भातुन *"जागतिक रिपब्लिकन महिला परिषद २०२५ "* आयोजन केले असल्यास समस्त आयोजकांचे अभिनंदन करायला हवे ! परंतु *"रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया"* हा राजकीय संदर्भ *बाबासाहेब डॉ आंबेडकरांनी* कां दिला आहे ? हे समजून घेणे गरजेचे आहे. १५ ऑगस्ट १९३६ ला स्थापन *"स्वतंत्र मजूर पक्ष"* (Independent Labour Party) हा सन १९४२ साली बाबासाहेब डॉ आंबेडकरांना कां बरखास्त करावा लागला ? ही माहिती किती रिपब्लिकानां माहित आहे हा महत्त्वाचा विषय आहे. सन  १७-२० जुलै१९४२ साली नागपुरात बाबासाहेबांनी *"शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची"* स्थापन करुन राजकीय निवडणूक लढविली होती. नंतर १९५६ साली *"रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया"* ही राजकीय संकल्पना देवुन बाबासाहेब डॉ आंबेडकर हे आम्हाला सोडुन गेले. परंतु बाबासाहेबांचे नातु *एड. प्रकाश आंबेडकर* ह्यानी तर रिपब्लिकन विचारांची नाळ तोडुन *"बहुजन महासंघ ते वंचित आघाडी"* असा राजकीय प्रवास केलेला आहे, त्याला आम्ही काय म्हणावे ? प्रकाश आंबेडकर ह्यांना ४० - ५० वर्षापुर्वी *डॉ आनंद जीवने*'ह्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम परिचीत करणे, ही *"आमची सर्वात मोठी चुक"* झालेली आहे. अश्या ह्या दुष्काळी राजकीय परिस्थितीत *"रिपब्लिकन पक्षाचे"* बिखरणे / रिपब्लिकन नावाने विविध रुपी *"आघाड्या"* तयार होणे / रिपब्लिकन नावाने *"जागतिक रिपब्लिकन"* नावाचा संदर्भ ही ??? हा विचार माणसाला चिंताग्रस्त करून जातो. डॉ बाबासाहेबांचा *"राजकीय वारसा - रिपब्लिकन विचार"*  हा केवळ जीवंत आहे. इंडिया असलेला राष्ट्रिय राजकीय पक्ष - *"रिपब्लिकन पार्टी ऑफ इंदोरा"* सुध्दा नाही. तो मृतप्राय झालेला आहे.

            बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांचा प्रवास हा *"सामाजिक"* (बहिष्कृत हितकारणी सभा २० जुलै १९२४ / समता सैनिक दल १३ मार्च १९२७) ते *"राजकीय"* (इंडिपेंडंट लेबर पार्टी - १५ ऑगस्ट १९३६ / शेड्युल्ड कास्ट फेडरेशन १७ - २० जुलै १९४२) आणि नंतर *"धम्म विचार"* (भारतीय बौद्ध जनसंघ १९५१ / दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया ४ मे १९५५)  देवुन १४ ऑक्टोबर १९५६ रोजी जगाला *"बुद्ध"* दिला. महान *"चक्रवर्ती सम्राट अशोक"* ह्यांच्या नंतर बुध्द धम्माचे पुन: उत्थान करणारे *"महानायक"* झाले आहेत. आणि भारतीय राजकारणात सफल योध्दा झाले. तर *मोहनदास गांधी* ह्यांचा प्रवास प्रथम *"राजकारण"* (राष्ट्रिय कांग्रेस) नंतर *"धर्मकारण - समाजकारण"* असा झालेला आहे. गांधींना सत्तारुढ जातीय सत्ता वलय असल्यामुळे ते टिकाव धरु शकले. *बाबासाहेबांना* असे वलय नव्हते. *"शुण्यातुन निर्माण झालेले"* ते नेते होते. *"द्वितीय महायुध्दातील"* डॉ बाबासाहेब आंबेडकर - गांधी कांग्रेस संघर्ष / डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे मित्र पक्ष - *"इंग्रजांना खुले समर्थन"* / गांधी - कांग्रेस ह्यांचे भरकटणे *"धुरी राष्ट्र - हिटलर"* वा मित्र राष्ट्र *"इंग्लंड"* ह्यापैकी कुणाला समर्थन द्यावे हे द्वंद्वत्व / बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांना देशद्रोही म्हणने, बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्या वैचारिक संघर्षातुन तावुन निघालेले होते. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांचा *"संघर्ष - त्याग - देशभक्ती - समाजाचे उत्थान - भारतीय संविधानतुन दिलेले अधिकार"* आम्ही किती समजुन / उमगुन घेतले ? हा प्रश्न रिपब्लिकन विचारकांनी समजून घेणे गरजेचे आहे. कारण आमची राष्ट्रिय नेते - कार्यकर्ते ही *"सत्ता तुकडे घास"* खाणारी झालेली आहेत. पाय लोटांगण करणारी / विविध नेत्यांचे थुका चाटणारी आहेत. रिपब्लिकन (???) नावाने *अशोक कोल्हटकर* आणि तमाम *"चाटु टीम"* ही त्यांचे ज्वलंत उदाहरण म्हणायला हवे नां ! अर्थात *"रिपब्लिकन विचारांचे कांग्रेसीकरण"* झाल्यास वावगे काय ? *रामदास आठवले / प्रा. जोगेंद्र कवाडे / एड. सुलेखा कुंभारे* ह्यांनी मग *"रिपब्लिकन विचारांचे भगवाकरण"* केल्यास मग पोटात दुखायला नको !!! कांग्रेसी आमदार / माजी मंत्री *डॉ. नितीन राऊत* हा सुध्दा रिपब्लिकन होवुन जातो. *"रिपब्लिकन शो"* हा असा चालु असतो. *"मेरा नाम जोकर"* फेम राज कपुर विचारानुसार *"दि शो मस्ट गो ऑन."* (The show must go on) ह्या रिपब्लिकन विचारांचे (?) अगदी तेचं सुरु आहे.  *"समाज जाये भाड में !!!!!"* उद्या रिपब्लिकन गुलामीचे पोवाडे गायिले जातील !!!

        जय बुद्ध ! जय भीम !! जय भारत !!! जय संविधान !!!!!

------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपूर दिनांक ४ जुलै २०२५

Wednesday, 2 July 2025

 ✍️  *प्रा. डॉ. तारा भवाळकर समान मराठी साहित्याचे मदारी पंढरपुरच्या विठ्ठलामध्ये ही सरते शेवटी विष्णु - शिव - गणेश शोधतात !*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


              नवी दिल्ली येथे झालेल्या *"९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५"* चे अध्यक्ष पद *प्रा. डॉ. तारा भवाळकर* ह्यांनी भुषविले होते. आजपर्यंत मराठी साहित्य संमेलनात किती महिलांनी अध्यक्षपद भूषविले आहेत ? असा गणितीय लेखाजोखा हा मांडला गेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपद भुषविणा-या *प्रा डॉ तारा भवाळकर* ह्या सहाव्या विदुषी झालेल्या आहेत. अभिनंदन *डॉ तारा भवाळकर !* परंतु साहित्य *समेलनाच्या अध्यक्षांनी किती तीर मारलेत ?* हा प्रश्न मात्र जश्याचा तसाच आहे. ह्या संदर्भात *"साहित्याचा उगम - वास्तव - अभिजात दर्जा"* ह्या विषयावर माझे बरेच लेख मिडियात प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेचा उगम इतिहास *इसवी ७०५ सालचा* पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे शिलालेख"* साक्ष देतो आहे. दुसरा शिलालेख हा *इसवी १०१२ सालचा* रायगड जिल्हा अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी सापडला. तिसरा शिलालेख *इसवी १०१८ सालचा* सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* हा आहे. चवथा शिलालेख *इसवी १०३९ सालचा* कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडला. *"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी २००० वर्षांचा इतिहास असणे गरजेचे होते."* अर्थात सन २०२५ साली मराठी भाषेला २००० वर्ष होत नसल्यामुळे सरते शेवटी *"मराठी साहित्यिक वर्ग"* ही बुध्दमय संस्कृतीच्या *"नाणेघाट शिलालेख"* हा आधार शोधायला निघालेत. आणि बुद्धमय संस्कृतीचा *"नाणेघाट शिलालेख"* आधार घेवुन *"मराठी भाषेला अभिजात दर्जा"* मिळविण्यासाठी ती यशस्वी झालेले आहेत. करीता मराठी साहित्यिक वर्गाचे अभिनंदन !!!

            मराठी शिलालेख संदर्भ ह्यासोबतचं मराठी भाषातज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी *"समंत सिध्दांत"* अनुसार मराठी भाषेचे खरे मुळ *"तामिळ भाषेतुन"* मानलेले आहे. ह्याशिवाय मराठी भाषातज्ञ *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांनी श्री खरे ह्यांच्या विधानाची पुष्टी केलेली आहे. *दुर्गा भागवत* हिने राजाराम शास्त्री ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत पेक्षा जुनी आणि खरी भाषा मानलेली आहे. परंतु संस्कृत भाषा ही कोणती ? कारण बुध्द संस्कृतीमध्ये इसवी पहिल्या शतकात *"पाली भाषेवर"* संस्कार करुन *"हिब्रु संस्कृत भाषेचा"* अविष्कार केला गेला. पाली भाषा सोबतचं हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) आहे. *"देवनागरी लिपीचा"* प्रथम प्रारुप *इसवी ११०० साल* असले तरी ती *इसवी १२९६ साली* व्यवहारात आली. मराठी भाषेची  तद्वतचं *"क्लासिकल संस्कृत भाषा"* हिची लिपी ही *"देवनागरी"* आहे. तेव्हा दुर्गा भागवत ही *"क्लासिकल संस्कृत"* संदर्भ देत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. *प्रा हरी नरके* हे मराठी भाषा ही *"इसवी सनाच्या पुर्वीपासुन अहिर माहाराष्ट्री - प्राचिन म-हाटी भाषेपासुन शौरसेनी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. आणि शौरसेनी भाषेपासून कालांतराने मागधी / पैशाची या दोन भाषेची उत्पत्ती"* हा अफलातून *"जावंई शोध"* लावलेला आहे. हरी नरके ह्यांनी मराठी भाषेची *"मुळ लिपी"* कोणती ? हे सुध्दा सांगुन द्यायला हवे. मराठी भाषेची *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / कोल्हापूरी मराठी / व-हाडी मराठी "* असे पोट प्रकार दिसुन येतात.

           ब्राह्मण्य मराठी साहित्य धारेचा इतिहास हा तसा तर पुर्णतः *"फसवा इतिहास* आहे. आता मी अन्य भाषा - साहित्य संदर्भात बोलत नाही. *"मराठी भाषा - साहित्य ह्याचा खरा उदगाता कोण ?"* हा विवादाचा भाग आहे. परंतु मराठी साहित्यिकांनी मराठी साहित्याचे *"अग्रणी कवि"* म्हणून १२ व्या शतकातील *मुकुंदराज / संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/२/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांचा उदो उदो केलेला आहे. शिंपी समाजाचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते ३/०७/१३५०), संत नामदेव महाराज परिवारातील *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०), महार समाजाचे *संत चोखामेळा* (१२७३ ते १३३८) ह्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मराठी संतांना *"अग्रणी कवि"* म्हणुन स्थान देण्यात आले नाही. हा जन्म इतिहास समजून घेणे फार गरजेचे आहे. त्यांसोबतचं सोनार जातीचे *नरहरी सोनार* (११९३ ते १३१३), चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा* / ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज* (१५३३ ते १५९९), वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०१/१६०८ ते १९/०३/१६५० (१६८८) ही तमाम संत *"पंढरपूरच्या विठोबा / बुध्दाला"* शरण गेल्यामुळे दुर्लक्षित झालेली आहेत. ब्राह्मण जातीचे *संत रामदास स्वामी*(१६०६ ते १६८२) ह्यांचा मात्र उदोउदो करुन *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु असल्याचा फसवा इतिहास रचला गेला. वास्तविकत: *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु *संत तुकाराम महाराज* होते. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या शिवनेरी किल्ल्याच्या शेजारी *"बुध्द लेणी"* ह्या कोरलेल्या आहेत. बुध्दाला शरण गेलेल्या ह्या तमाम संतांच्या मराठी अभगांचा अभ्यास होणे / संशोधन होणे गरजेचे आहे.

             *प्रा. डॉ. तारा भवाळकर* ही मराठी साहित्यिक पंढरपुरच्या विठोबात *"वैष्णव / शिव / गणेश रुपे"* सांगित आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या *"दगडी मुर्तीतुन प्राण काढल्याचा विधी "* ती आपल्याला मिडिया मुलाखतीत सांगित आहे. दगडातुन प्राण काढल्यानंतर तो प्राण घागरीत ठेवल्यावर *"घागरी विठोबा"* हा सुध्दा संदर्भ देत आहे. *"दगडामध्ये काय प्राण वास असतो ?"* पंढरपूर विठोबाची मुर्ती ही मुळ मुर्ती नाही. पंढरपुर विठाबाची मुर्तींचे आक्रांत वेळी स्थानातरण करण्यात आले. वगैरे वगैरे. तारा भवाळकर ही मिडिया मुलाखतीत अजुन खुप काही सांगुन गेली. अजुन ब-याच काही मान्यवरांच्या मतांमध्ये ही विरोधाभास आहे.  खरे तर, दगडी मुर्तीचा अविष्कार ही प्राचीन कला बुध्द संस्कृतीची *"गांधार कला / मथुरा कला"* ही साक्ष आहे. तसे बघावे तर *डॉ तारा भवाळकर* हिच्या दगडी मेंदुचा प्रमाण हा परिचय आहे. *संत नामदेव महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात - *"मध्ये झाले मौन देव निज घ्यावी | बौध्द ते म्हणोनी नावे रुप ||"*  वरिष्ठ संत *जनाबाई* म्हणते - *"होवुनिया कृष्ण कंस वधियेला | आता बुद्ध झाला सखा माझा ||"* (३४४) दुस-या अभंगात ती म्हणते - *"गोकुळ अवतारु | सोळा सहस्त्रावरु | आपण योगेश्वरु | बौध्द रुपी |"* (१०५३) तिस-या अभंगात ती म्हणते - *"व्रत भंगासाठी बौध्द अवतार | झाला दिगंबर अवनीये |"* (१०९६) चवथ्या अभंगात ती म्हणते - *"ऐसा कष्ठी होऊनी बौध्द राहिलासी |"* (१०९८) अग्रणी संत *चोखामेळा महाराज* म्हणतात - *"चोखा चोखत निर्मळ | तया अंगी नाही मळ | चोखा चोखाचा सागर | चोखा भक्तीची माऊली |"* संत चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई* म्हणते - *".... देह असुनही तू ही देही | सदा समाधीस्त राही | पाहाते पाहणे गेले दुरी | मने चोखियाची महारी |"* ब्राम्हण जातीचे संत *एकनाथ महाराज* म्हणतात - *"नवबा बैसे स्थिररुप | तया नाम बौध्दरुप | संत तया दारी | तिष्ठाताति निरंतरी |"* जगद्गुरु *संत तुकाराम महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात - *"बौध्द अवतार माझिया अदृष्टा | मौर्य मुखे निष्ठा धरियेली |"* दुस-या अभंगात ते म्हणतात - *"नावे रुपे अंगी लावला विटाळ | होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध |"* अजुन संतांचे बुध्द संदर्भात खुप काही अभंग आहेत‌. *बाबासाहेब डॉ आंबेडकर* ह्यांनी पंढरपूरचा विठ्ठल हे बुध्दचं असल्याचे म्हटलेले आहे. *"पुंडलिक > पुंडरिक > कमळ."* आणि कमळ हे बुध्द धर्मात महत्वाचे मानलेले आहे. आता शब्द मर्यादेमुळे हा विषय आटोपता घेणे आवश्यक आहे.

             भाषा लिपीचा बोध ही *"सिंधु घाटी सभ्यता"* (इ. पु. ३३०० ते १९००) ही देत असली तरी ती लिपी आजपर्यंत समजली / उमगली गेलेली नाही. त्यांनतर सिंधु घाटी सदृश्य लिपी - *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) ही इ.पु. सातव्या - सहाव्या शतकात - *"बुध्द कालखंडात"* उदयास आली. बोली भाषा ही *"पाली - प्राकृत भाषा"* होती. आणि *"बुध्द साहित्याचा अविष्कार झालेला आहे."* ह्याशिवाय *"स्त्री साहित्याचा उगम"* ही बुद्ध धम्माची देण आहे. इसवी पहिल्या शतकात (हिनयान - महायान संप्रदाय विभाजन) पाली भाषेवर संस्कार होवुन *"हिब्रू संस्कृत भाषा"* जन्माला आली. हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही *"धम्म लिपी"* ( ब्राम्ही लिपी) होती. हिब्रु संस्कृत भाषा नंतर इसवी पाचव्या शतकात *"अपभ्रंश भाषा"* उदयास आली. इतकेच नाही तर *"शंख लिपी"* आणि अन्य काही लिपीचा ही अविष्कार झालेला होता. इसवी दहाव्या शतकात *"पाली प्राकृत ह्या भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदि हिंदीचा जन्म झाला."* महत्वाचे म्हणजे *"वैदिक धर्म / ब्राम्हण धर्म"* उदय हा *दहाव्या शतकानंतर* दिसुन येतो. बुध्द कालखंडात *"बम्हण"* हा शब्द प्रयोग *"विद्वान / श्रमण / समण"* ह्या अर्थाने केला जात असे. *"ब्राह्मण धर्म"* नाही. इसवी ११०० ह्या कालखंडामध्ये *"देवनागरी लिपीचे"* प्रारुप तयार होवुन इसवी १७९६ ला देवनागरी लिपी व्यवहारात आली. इसवी १६४५ ह्या कालखंडात *"उर्दु भाषा"* ही उदयास आली. इसवी १८ व्या शतकात *"आदि हिंदी"* भाषा नंतर *"आधुनिक हिंदी"* ह्या भाषेचा अविष्कार झाला. मराठी भाषा उगम उत्तरेकडुन (सातपुडा रांगा पासुन कावेरीच्या पश्चिमेकडे आणि उत्तरेस दमणपासुन दक्षिणेकडे गोव्यापर्यंत विस्तारीत गेल्याचा काही संदर्भ आहे. परंतु *"शिलालेख प्रमाण"* हे इसवी ७०५ पासुनचं दिसुन येतात. एकंदरीत *"लिपी - भाषा - साहित्य उगम"* ही बुद्ध धम्माची देण आहे. *"मुर्ती कला - शिल्प कला"* ही सुध्दा बुद्ध धर्माची देणं आहे. परंतु *तारा भवाळकर* समान मंद बुध्दीचे सा‌हित्यिक वर्ग *"लिपी / भाषा / साहित्य / कला उगम - वास्तव समजून घेत नसतील"* तर त्याला आपण काय म्हणावे ??? हाच संदर्भ मग तो *"पंढरपूरचा विठोबा / तिरुपतीचा बालाजी"* ह्यांना ही लागु आहे !!! 


-----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक २ जुलै २०२५

✍️  *प्रा. डॉ. तारा भवाळकर समान मराठी साहित्याचे मदारी पंढरपुरच्या विठ्ठलामध्ये ही सरते शेवटी विष्णु - शिव - गणेश शोधतात !*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


              नवी दिल्ली येथे झालेल्या *"९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५"* चे अध्यक्ष पद *प्रा. डॉ. तारा भवाळकर* ह्यांनी भुषविले होते. आजपर्यंत मराठी साहित्य संमेलनात किती महिलांनी अध्यक्षपद भूषविले आहेत ? असा गणितीय लेखाजोखा हा मांडला गेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपद भुषविणा-या *प्रा डॉ तारा भवाळकर* ह्या सहाव्या विदुषी झालेल्या आहेत. अभिनंदन *डॉ तारा भवाळकर !* परंतु साहित्य *समेलनाच्या अध्यक्षांनी किती तीर मारलेत ?* हा प्रश्न मात्र जश्याचा तसाच आहे. ह्या संदर्भात *"साहित्याचा उगम - वास्तव - अभिजात दर्जा"* ह्या विषयावर माझे बरेच लेख मिडियात प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेचा उगम इतिहास *इसवी ७०५ सालचा* पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे शिलालेख"* साक्ष देतो आहे. दुसरा शिलालेख हा *इसवी १०१२ सालचा* रायगड जिल्हा अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी सापडला. तिसरा शिलालेख *इसवी १०१८ सालचा* सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* हा आहे. चवथा शिलालेख *इसवी १०३९ सालचा* कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडला. *"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी २००० वर्षांचा इतिहास असणे गरजेचे होते."* अर्थात सन २०२५ साली मराठी भाषेला २००० वर्ष होत नसल्यामुळे सरते शेवटी *"मराठी साहित्यिक वर्ग"* ही बुध्दमय संस्कृतीच्या *"नाणेघाट शिलालेख"* हा आधार शोधायला निघालेत. आणि बुद्धमय संस्कृतीचा *"नाणेघाट शिलालेख"* आधार घेवुन *"मराठी भाषेला अभिजात दर्जा"* मिळविण्यासाठी ती यशस्वी झालेले आहेत. करीता मराठी साहित्यिक वर्गाचे अभिनंदन !!!

            मराठी शिलालेख संदर्भ ह्यासोबतचं मराठी भाषातज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी *"समंत सिध्दांत"* अनुसार मराठी भाषेचे खरे मुळ *"तामिळ भाषेतुन"* मानलेले आहे. ह्याशिवाय मराठी भाषातज्ञ *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांनी श्री खरे ह्यांच्या विधानाची पुष्टी केलेली आहे. *दुर्गा भागवत* हिने राजाराम शास्त्री ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत पेक्षा जुनी आणि खरी भाषा मानलेली आहे. परंतु संस्कृत भाषा ही कोणती ? कारण बुध्द संस्कृतीमध्ये इसवी पहिल्या शतकात *"पाली भाषेवर"* संस्कार करुन *"हिब्रु संस्कृत भाषेचा"* अविष्कार केला गेला. पाली भाषा सोबतचं हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) आहे. *"देवनागरी लिपीचा"* प्रथम प्रारुप *इसवी ११०० साल* असले तरी ती *इसवी १२९६ साली* व्यवहारात आली. मराठी भाषेची  तद्वतचं *"क्लासिकल संस्कृत भाषा"* हिची लिपी ही *"देवनागरी"* आहे. तेव्हा दुर्गा भागवत ही *"क्लासिकल संस्कृत"* संदर्भ देत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. *प्रा हरी नरके* हे मराठी भाषा ही *"इसवी सनाच्या पुर्वीपासुन अहिर माहाराष्ट्री - प्राचिन म-हाटी भाषेपासुन शौरसेनी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. आणि शौरसेनी भाषेपासून कालांतराने मागधी / पैशाची या दोन भाषेची उत्पत्ती"* हा अफलातून *"जावंई शोध"* लावलेला आहे. हरी नरके ह्यांनी मराठी भाषेची *"मुळ लिपी"* कोणती ? हे सुध्दा सांगुन द्यायला हवे. मराठी भाषेची *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / कोल्हापूरी मराठी / व-हाडी मराठी "* असे पोट प्रकार दिसुन येतात.

           ब्राह्मण्य मराठी साहित्य धारेचा इतिहास हा तसा तर पुर्णतः *"फसवा इतिहास* आहे. आता मी अन्य भाषा - साहित्य संदर्भात बोलत नाही. *"मराठी भाषा - साहित्य ह्याचा खरा उदगाता कोण ?"* हा विवादाचा भाग आहे. परंतु मराठी साहित्यिकांनी मराठी साहित्याचे *"अग्रणी कवि"* म्हणून १२ व्या शतकातील *मुकुंदराज / संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/२/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांचा उदो उदो केलेला आहे. शिंपी समाजाचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते ३/०७/१३५०), संत नामदेव महाराज परिवारातील *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०), महार समाजाचे *संत चोखामेळा* (१२७३ ते १३३८) ह्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मराठी संतांना *"अग्रणी कवि"* म्हणुन स्थान देण्यात आले नाही. हा जन्म इतिहास समजून घेणे फार गरजेचे आहे. त्यांसोबतचं सोनार जातीचे *नरहरी सोनार* (११९३ ते १३१३), चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा* / ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज* (१५३३ ते १५९९), वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०१/१६०८ ते १९/०३/१६५० (१६८८) ही तमाम संत *"पंढरपूरच्या विठोबा / बुध्दाला"* शरण गेल्यामुळे दुर्लक्षित झालेली आहेत. ब्राह्मण जातीचे *संत रामदास स्वामी*(१६०६ ते १६८२) ह्यांचा मात्र उदोउदो करुन *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु असल्याचा फसवा इतिहास रचला गेला. वास्तविकत: *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु *संत तुकाराम महाराज* होते. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या शिवनेरी किल्ल्याच्या शेजारी *"बुध्द लेणी"* ह्या कोरलेल्या आहेत. बुध्दाला शरण गेलेल्या ह्या तमाम संतांच्या मराठी अभगांचा अभ्यास होणे / संशोधन होणे गरजेचे आहे.

             *प्रा. डॉ. तारा भवाळकर* ही मराठी साहित्यिक पंढरपुरच्या विठोबात *"वैष्णव / शिव / गणेश रुपे"* सांगित आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या *"दगडी मुर्तीतुन प्राण काढल्याचा विधी "* ती आपल्याला मिडिया मुलाखतीत सांगित आहे. दगडातुन प्राण काढल्यानंतर तो प्राण घागरीत ठेवल्यावर *"घागरी विठोबा"* हा सुध्दा संदर्भ देत आहे. *"दगडामध्ये काय प्राण वास असतो ?"* पंढरपूर विठोबाची मुर्ती ही मुळ मुर्ती नाही. पंढरपुर विठाबाची मुर्तींचे आक्रांत वेळी स्थानातरण करण्यात आले. वगैरे वगैरे. तारा भवाळकर ही मिडिया मुलाखतीत अजुन खुप काही सांगुन गेली. अजुन ब-याच काही मान्यवरांच्या मतांमध्ये ही विरोधाभास आहे.  खरे तर, दगडी मुर्तीचा अविष्कार ही प्राचीन कला बुध्द संस्कृतीची *"गांधार कला / मथुरा कला"* ही साक्ष आहे. तसे बघावे तर *डॉ तारा भवाळकर* हिच्या दगडी मेंदुचा प्रमाण हा परिचय आहे. *संत नामदेव महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात - *"मध्ये झाले मौन देव निज घ्यावी | बौध्द ते म्हणोनी नावे रुप ||"*  वरिष्ठ संत *जनाबाई* म्हणते - *"होवुनिया कृष्ण कंस वधियेला | आता बुद्ध झाला सखा माझा ||"* (३४४) दुस-या अभंगात ती म्हणते - *"गोकुळ अवतारु | सोळा सहस्त्रावरु | आपण योगेश्वरु | बौध्द रुपी |"* (१०५३) तिस-या अभंगात ती म्हणते - *"व्रत भंगासाठी बौध्द अवतार | झाला दिगंबर अवनीये |"* (१०९६) चवथ्या अभंगात ती म्हणते - *"ऐसा कष्ठी होऊनी बौध्द राहिलासी |"* (१०९८) अग्रणी संत *चोखामेळा महाराज* म्हणतात - *"चोखा चोखत निर्मळ | तया अंगी नाही मळ | चोखा चोखाचा सागर | चोखा भक्तीची माऊली |"* संत चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई* म्हणते - *".... देह असुनही तू ही देही | सदा समाधीस्त राही | पाहाते पाहणे गेले दुरी | मने चोखियाची महारी |"* ब्राम्हण जातीचे संत *एकनाथ महाराज* म्हणतात - *"नवबा बैसे स्थिररुप | तया नाम बौध्दरुप | संत तया दारी | तिष्ठाताति निरंतरी |"* जगद्गुरु *संत तुकाराम महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात - *"बौध्द अवतार माझिया अदृष्टा | मौर्य मुखे निष्ठा धरियेली |"* दुस-या अभंगात ते म्हणतात - *"नावे रुपे अंगी लावला विटाळ | होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध |"* अजुन संतांचे बुध्द संदर्भात खुप काही अभंग आहेत‌. *बाबासाहेब डॉ आंबेडकर* ह्यांनी पंढरपूरचा विठ्ठल हे बुध्दचं असल्याचे म्हटलेले आहे. *"पुंडलिक > पुंडरिक > कमळ."* आणि कमळ हे बुध्द धर्मात महत्वाचे मानलेले आहे. आता शब्द मर्यादेमुळे हा विषय आटोपता घेणे आवश्यक आहे.

             भाषा लिपीचा बोध ही *"सिंधु घाटी सभ्यता"* (इ. पु. ३३०० ते १९००) ही देत असली तरी ती लिपी आजपर्यंत समजली / उमगली गेलेली नाही. त्यांनतर सिंधु घाटी सदृश्य लिपी - *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) ही इ.पु. सातव्या - सहाव्या शतकात - *"बुध्द कालखंडात"* उदयास आली. बोली भाषा ही *"पाली - प्राकृत भाषा"* होती. आणि *"बुध्द साहित्याचा अविष्कार झालेला आहे."* ह्याशिवाय *"स्त्री साहित्याचा उगम"* ही बुद्ध धम्माची देण आहे. इसवी पहिल्या शतकात (हिनयान - महायान संप्रदाय विभाजन) पाली भाषेवर संस्कार होवुन *"हिब्रू संस्कृत भाषा"* जन्माला आली. हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही *"धम्म लिपी"* ( ब्राम्ही लिपी) होती. हिब्रु संस्कृत भाषा नंतर इसवी पाचव्या शतकात *"अपभ्रंश भाषा"* उदयास आली. इतकेच नाही तर *"शंख लिपी"* आणि अन्य काही लिपीचा ही अविष्कार झालेला होता. इसवी दहाव्या शतकात *"पाली प्राकृत ह्या भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदि हिंदीचा जन्म झाला."* महत्वाचे म्हणजे *"वैदिक धर्म / ब्राम्हण धर्म"* उदय हा *दहाव्या शतकानंतर* दिसुन येतो. बुध्द कालखंडात *"बम्हण"* हा शब्द प्रयोग *"विद्वान / श्रमण / समण"* ह्या अर्थाने केला जात असे. *"ब्राह्मण धर्म"* नाही. इसवी ११०० ह्या कालखंडामध्ये *"देवनागरी लिपीचे"* प्रारुप तयार होवुन इसवी १७९६ ला देवनागरी लिपी व्यवहारात आली. इसवी १६४५ ह्या कालखंडात *"उर्दु भाषा"* ही उदयास आली. इसवी १८ व्या शतकात *"आदि हिंदी"* भाषा नंतर *"आधुनिक हिंदी"* ह्या भाषेचा अविष्कार झाला. मराठी भाषा उगम उत्तरेकडुन (सातपुडा रांगा पासुन कावेरीच्या पश्चिमेकडे आणि उत्तरेस दमणपासुन दक्षिणेकडे गोव्यापर्यंत विस्तारीत गेल्याचा काही संदर्भ आहे. परंतु *"शिलालेख प्रमाण"* हे इसवी ७०५ पासुनचं दिसुन येतात. एकंदरीत *"लिपी - भाषा - साहित्य उगम"* ही बुद्ध धम्माची देण आहे. *"मुर्ती कला - शिल्प कला"* ही सुध्दा बुद्ध धर्माची देणं आहे. परंतु *तारा भवाळकर* समान मंद बुध्दीचे सा‌हित्यिक वर्ग *"लिपी / भाषा / साहित्य / कला उगम - वास्तव समजून घेत नसतील"* तर त्याला आपण काय म्हणावे ??? हाच संदर्भ मग तो *"पंढरपूरचा विठोबा / तिरुपतीचा बालाजी"* ह्यांना ही लागु आहे !!! 


-----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक २ जुलै २०२५

Monday, 30 June 2025

 🇮🇳 *भारतीय संविधान की प्रास्ताविका - समाजवादी / धर्मनिरपेक्ष शब्द को ब्राह्मणी संघ (RSS) विरोध देश गद्दारीका परिपाक !*

     *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य,* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो‌ न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२'


           पिछले तिन - चार - पाच दिनों से, मैं *"ब्राह्मण्य संघ"* (RSS) राष्ट्रिय सरचिटणीस *दत्तात्रय होसबोळे* इनके *"भारत संविधान की प्रास्ताविका"* (Preamble) संदर्भ के *"समाजवादी - धर्मनिरपेक्ष शब्द विरोधी"* बयाण से, इस विषय पर लिखने का मेरा मन हुआ था. परंतु मेरी कुछ बडी व्यस्तता रही है. उसी दरम्यान भारत के उपराष्ट्रपती *जगदीश धनकड* इनका बडा बयाण - *"समाजवादी - धर्मनिरपेक्ष यह शब्द सनातन शब्द का विरोधी है"* आया है. साथ साथ केंद्रीय मंत्री *शिवराज सिंग चव्हान* / असम के बडेबोल मुख्यमंत्री *हेमंत बिसवा* समान भाजपा की ओर से, अन्य नेताओं का बयाण भी सामने आया है. सबसे पहले *"भाजपा की घटना"* में अटलबिहारी वाजपेयी / लालाकृष्ण आडवणी काल में, *"समाजवादी - धर्मनिरपेक्ष"* यह शब्द दिखाई देता है. तब भाजपा / संघ, क्या सोया हुआ था ? हमारी *मा. सर्वोच्च न्यायालय* मे, *"प्रास्ताविका से वह शब्द हटाने"* संदर्भ मे, बहुत सारी याचिका डाली गयी थी. परंतु मां. सर्वोच्च न्यायालय ने उन सारी *"याचिकाओं को खारिज"* किया है. फिर भी *संघवादी / भाजपा वादी बरसाती मेंडक"* समान ड्राव ड्राव चिल्लाते रहे है. वैसे इनके पुरखों का इतिहास *"भारत गद्दारी का"* ही रहा है. और *"गद्दार लहु"* यह देश गद्दारी की भाषा ही कहेगा. वही *"महाराष्ट्र की राजनीति"* के हमारे विरोधी दलों ने, *"मराठी भाषा"* मुद्दा उठाया है. *"भारत के संविधान प्रास्ताविका"*/ मराठी भाषा विषय उठना, यह एक गहरी साजीश का बोध कराता है. अर्थात इन शब्द विवादों में, भारत सरकार / महाराष्ट्र सरकार की ओर से *"लोगों को इन शब्द विरोधी"* बयाण से, कुछ बडी राजनीति खेली जा चुकी है. अर्थात वो दुसरा विवादीत बडा विषय भी हो सकता है. और हम केवल इन विवादों में ही उलझते रहे ! वैसे देखे जाए तो, भारतीय संविधान की प्रास्ताविका (Preamble) से, *"वह शब्द हटाना इतना सहज भी नहीं"* है. सर्वोच्च न्यायालय की ११ न्यायाधीश पीठ ने, *"केशवानंद भारती"* केस में, *"संविधान के मुल सरंचना"* (Basic Structure) में, किसी भी प्रकार के *"बदलाव करने की पाबंदी"* लगायी है.

              संघवादी *दत्तात्रय होसबोळे* ये तो, उन गद्दार पुरखों का वंशज है. जो उनके पुरखे *भारत का संविधान / तिरंगा झेंडा"* इसका कडा विरोध करते रहे. उस को जलाते रहे है. *"अंग्रेजो के कुत्ते"* बने हुये थे. *"मनुस्मृती"* के पक्षधर रहे है. संघ का मुखपत्र - *"आर्गनायझर"* यह बातें बयाण कर देता है. बाबासाहेब डॉ आंबेडकर का पुतला जलानेवाली औलाद है. तो उनसे *"देशभक्ती"* की, हम क्या अपेक्षा करे ? भारत का उपराष्ट्रपती *जगदीश धनकड* ये भारत के इतिहास में, सबसे बडा *"ना-लायक उपराष्ट्रपती"* दर्ज हो चुके हैं. जगदीश धनकड ने भारतीय *"संविधानिक पद की गरिमा"* को छिन्न छिन्न किया है. जगदीश धनकड को *"सनातन"* शब्द यह *"बुध्द धर्म "* से जुडा है, यह मालुम तक नहीं है. *"धम्म पद"* इस ग्रंथ के यमक वग्गो में गाथा है - *"न हि वेरेन वैरानि सम्मन्तीध कुदाचनं | अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ||"* (अर्थात - वैर से वैर कभी शांत नहीं होता. अवैर से वैर शान्त होता है. यही संसार का नियम है. यही सनातन धर्म है.) बुध्द काल में ना ही *"वैदिक धर्म"* था, ना ही *"ब्राह्मण धर्म"* था, ना *"हिंदु धर्म "* था. यह सभी *"इसवी १० वी शती"* के बाद बुध्द धर्म के *"हिनयान / तंत्रयान संप्रदाय"* के परिपाक से उत्पन्न हुआ है. *"आदि शंकराचार्य "* को तो, *"प्रछन्न बौध्द "* भी कहा जाता है. अन्य भाजपा / संघीयो के बारे में, हम क्या कहे ? यहाँ सवाल तो, उन उन मतदाता का भी है, जो उन्हे अपना मत देता है. भारत का संविधान यह *"सार्वभौम - समाजवादी - धर्मनिरपेक्ष - लोकतंत्र - सामाजिक / आर्थिक / राजकीय समानता - न्याय अभिव्यक्ती "* की बात करता है. हमारी *"सर्वोच्च न्यायालय"* यह भारतीय संविधान की *"कस्टोडियन"* है. *"वॉच डॉग "* है. परंतु पिछले ११ सालों में समाजवाद - धर्मनिरपेक्षता को ठेंगा दिखाकर, *"पुंजीवाद"* (Capitalism) को बढावा मिला है. *"लोकतंत्र"* (Democracy) यह केवल तो, नाम का ही रह गया है. *इंदिरा गांधी* इन्होने *"इमरजंसी"* यह भारत संविधान की तहत *(आर्टिकल ३५२)* लगायी हुयी थी. तत्कालीन राष्ट्रपती *फक्रुद्दीन अली अहमद* इन्होने अधिकारीक तौर पर *"इमरजंसी आदेश"* जारी किया था. *जयप्रकाश नारायण* इनसे जुडी पिलावळ, भारत में *"बेबंदशाही"* में लिप्त दिखाई देती थी. परंतु *नरेंद्र मोदी सरकार* ने पिछले ११ साल से, *"अघोषित इमरजंसी"* लादी है. इसका क्या ??? आज भारत में *"बेकारी - बेरोजगारी - गरिबी"* बढी है. फिर भी भारत की आवाम खामोश है. भारत की ७०% आवाम *"मुफ्त अनाज"* पर बसर कर रही है. अत: भारत में *"मुर्दे"* (Live Dead Body) बसते है. अर्थात भारत यह *"मुर्दो का देश"* (The Country of Live Dead Body) है.


----------------------------------------

▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपुर दिनांक ३० जुन २०२५

Sunday, 29 June 2025

 👌 *बुद्ध वचनाने ...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        मो. न. ९३७०९८४१३८ 


बुध्द वचनाने आली शांती जगा हे

सुवर्ण मध्य काळ हा दिसे जगा रे...


नको तार छेडु तु प्रिय वीणेची हे

मधुर संगितांची लय भरली मना रे

शब्दांच्या मशाली पेटतील जगा हे

माणसांची मने ही दुभंगली कां रे...


त्या मधुर आठवणी होत्या मना हे

त्या विसरणे ही ग्रस्त व्याधी कां रे

एकमेकांना जोडण्या बांध असा हे

अशांत जगी ह्या आता शोधु कुठे रे...


ह्या जगात पेटतील ती महायुध्दे हे

साम्राज्याचा विस्तार अजुन किती रे

पंचशील नाद गुंजला ह्या जगात हे

सत्याचा मार्ग हाचं झाला सम्यक रे...


प्रेमाचा बंध हाच जगात सच्चा हे

आज तो सापडुन ना दिसे कुठे रे

देशभक्ती ज्वाला आता पेटवु या हे

विश्वाची शक्ती ही निर्माण करु या रे...


---------------------------------------

नागपूर दिनांक २८ जुन २०२५